Skip to main content

मायबाप जनतेच्या सेवेसाठी राजकारणात: खा. सुप्रिया सुळे यांचा अजितदादांवर पलटवार

नाशिक| दिअँकर वृत्तसेवा| ते त्यांचे मत आहे. लोकशाहीत सर्वांना अधिकार आहे. ही निवडणूक आमच्या कुटुंबासाठी नाही लढत, ही वैचारिक लढाई आहे. महाराष्ट्रातील अन्याया विरोधात, मायबाप जनतेसाठी, याभागातील शेतकऱ्यांच्या हमी भावासाठी, महिलांसाठी, महागाई, भ्रष्टाचाराविरोधात ही लढाई आहे. आम्ही घराण्यासाठी राजकारणात आलो नाही. या राज्यातील मायबाप जनतेच्या सेवेसाठी आलो आहे,असे खा. सुप्रिया सुळे अजितदादांवर पलटवार केला. 


नाशिक येथे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ खा. सुप्रियाताई सुळे नाशिक दौऱ्यावर होत्या. पत्रकारांशी संवाद साधतांना अजितदादा पवार यांनी पवार घराण्यातील कटूता कमी होईल असे वाटत नाही, असे स्टेटमेंट दिले होते, त्यावर पलटवार करतांना त्याबोलत होत्या.


उद्योगपती अडाणी यांच्याविषयी अजित दादांच्या युटर्न बाबत पत्रकारांनी प्रश्न केला असता. त्यांनी सांगितले, हा प्रश्न अजित पवारांना विचारा मी पहिल्याच दिवशी सांगितले होते. त्यांनीच स्टेटमेंट दिले. त्यांनी युटर्न घेतला. दोन्ही प्रश्न त्यांनाच विचारा असे सांगून अधिक काही बोलण्यास नकार दिला.

साहेब पहिले म्हणायचे सुप्रियाकडे लक्ष दया आता नातवाकडे लक्ष द्या म्हणतात, मी मुलासारखा असून ही लक्ष देत नाही या अजित पवारांच्या प्रतिक्रियेविषयी विचारले असता त्यांनी चार चार वेळेस उपमुख्यमंत्री कोणाला केले, मला, रोहितला की युगेंद्रला असा सवाल करुन प्रतिटोला लगावला.

बटेंगे तो कटेंगे या भाजपाच्या घोषणेवर अजितदादांपाठोपाठ भाजपा नेत्या पंकजाताई मुंडे यांनीही आक्षेप घेतल्याचे पत्रकारांनी लक्ष वेधले असता त्या म्हणाल्या, भाजपात दोन विचार झाले. एकीकडे देवभाऊ एक म्हणतात दुसरीकडे मित्रपक्ष व पंकजाताई एक याचा अर्थ भाजपाचे दोन वैचारिक भाग झाले. आधी दोन पक्ष फोडून पास झालेले देवाभाऊ यांना विचारा तुमच्या पक्षाचे विचाराचे दोन भाग झाले. विचारांचे असे हाल झाले तर सरकार कसे चालवणार अशी टीका खा. सुळे यांनी केली.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...