Skip to main content

देवाभाऊ रिटर्न्स!

 देवाभाऊ रिटर्न्स!

लोकसभेला महाविकास आघाडीची हवा होती, विधानसभेत ही आपलीच सत्ता येईल असा विश्वास त्यांना होता, मात्र चार महिन्यात वारे फिरले आणि महायुतीने काँग्रस प्रणित आघाडीचा सुपडा साफ करून महाराष्ट्राची सत्ता राखली. भाजपने १३२ जागा जिंकून युतीतील सर्वात मोठा पक्ष म्हणून मुख्यमंत्री पदावर दावा मजबूत केला. २०१९ विधानसभा निवडणूकीत १०५ जागा आणि सर्वाधिक ३७ टक्के मते भाजपाला होती, यंदा १३२ जागा मिळाल्या असल्या तरी वोटिंग परसेंटटेज २६ टक्क्यांवर घसरले तरी यंदा एवढे मोठे यश मिळाले हे महत्वाचे आहे.

निवडणुकी आधी भाजपने युतीतील आपल्या सहकारी पक्षांना सर्वात जास्त ज्याच्या जागा त्यांचा मुख्यमंत्री होईल हे स्पष्ट केलेले होते. त्यामुळे भाजपने त्यादृष्टीने रणनीती आखली अन् ती यशस्वी करुन दाखवली. त्यासाठी लोकसभेतील प्रचारात सहभागी न झालेल्या संघाची मनधरणी केली. त्याचा परिणाम निवडणुकीत बघायला मिळाला. लाडकी बहिण आणि एक हैं तो सेफ हैं या घोषणांचा भाजपने खुबीने वापर करून धुळे येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदाची इच्छा पूर्ण करण्यासाठी महायुतीला विजयी करण्याचे आवाहन केले.

जनतेने भाजपच्या पदरी घवघवीत यश टाकून महायुतीला स्पष्ट कौल दिला. भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्यानेे साहजिकच मुख्यमंत्री पदाची दावेदारी मजबूत झाली. शहा व मोदी यांच्यासह संघाचा पसंतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीस याचे नाव या आधीच निश्चित आहे. भाजपमध्ये फडणवीस यांच्या नावाला विरोध नाही. मराठा आरक्षणावरून जरांगेचा फडणवीस यांना विरोध असला तरी जरांगे फॅक्टरचा भाजपवर परिणाम दिसला नाही. त्यामुळे सध्या तरी फडणवीस यांच्या शिवाय दुसरा सक्षम पर्याय नाही. यापूर्वी मुख्यमंत्री होता होता उपमुख्यमंत्री झाले. त्यावेळी हाय कमांडच्या आदेशाला प्राथमिकता देत उपमुख्यमंत्री पदावर फडणवीस यांनी समाधान मानले. पक्ष त्यांचा त्याग विसरलेला नाही. फडणवीस यांनी हाय कमांडचा आदेश वेळोवेळी पाळला त्याचे फळ त्यांना मिळाले. 

हाय कमांड विनोद तावडे यांच्यासह पक्षातील मराठा नेते व  इतर नेत्यांशी चर्चा करत आहे. असे असले तरी संघाने फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करावे अशी ठाम मागणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती निवडणुकीला सामोरे गेली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे ही नाव पुन्हा चर्चेत आणण्याचा प्रयत्न झाला, असला तरी नैसर्गिक न्यायाप्रमाणे ज्याच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री, त्यामुळे शिंदेंनी सध्या माघार घेतली असली तरी शिवसेनेची नाराजी लपून राहिलेली नाही. तसेच फडणवीस आपल्या दोन्ही सहकारी पक्षांच्या नेत्यांशी कसे जुळवून घेतात हे बघावे लागेल. यापूर्वी ही दोन्हीशी मिळवून घेत देवाभाऊ यांनी सरकार चालवले आहे.

सहकारी पक्ष शिवसेनेच्या ५६ जागा असून् राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागा आहेत. त्यात सर्वधिक महत्वाच्या खात्यांसाठी रस्सीखेच सुरू आहे. शिवसेना गृहमंत्री पदावर आडून बसली आहे. मुख्यमंत्री पदानंतर गृहमंत्रीपद आपल्याकडे राहवे असे भाजपचे प्रयत्न आहेत. तर अर्थमंत्रीपद अजितदादा पवार यांच्याकडे जाण्याची शक्यता लक्षात घेऊन राजी- नाराजी नाट्य सुरू आहे, आता ५ डिसेंबरला महायुतीचा शापथविधी सोहळा होणार आहे. त्यात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासह महत्वाच्या चार ते पाच जणांचा शपथविधी होईल, असे सांगितले जाते. विनोद तावडे यांची ही शक्यता आहे. मात्र महायुतीला लाडकी बहीण योजनेने तारले असेल तरी सध्या महायुतीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्याने लाडक्या बहिणींसह सर्वांचा लाडका मुख्यमंत्री म्हणून देवाभाऊच आघाडीवर आहे.

दिगंबर मराठे

 


 

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...