Skip to main content

देवाभाऊ रिटर्न्स!

 देवाभाऊ रिटर्न्स!

लोकसभेला महाविकास आघाडीची हवा होती, विधानसभेत ही आपलीच सत्ता येईल असा विश्वास त्यांना होता, मात्र चार महिन्यात वारे फिरले आणि महायुतीने काँग्रस प्रणित आघाडीचा सुपडा साफ करून महाराष्ट्राची सत्ता राखली. भाजपने १३२ जागा जिंकून युतीतील सर्वात मोठा पक्ष म्हणून मुख्यमंत्री पदावर दावा मजबूत केला. २०१९ विधानसभा निवडणूकीत १०५ जागा आणि सर्वाधिक ३७ टक्के मते भाजपाला होती, यंदा १३२ जागा मिळाल्या असल्या तरी वोटिंग परसेंटटेज २६ टक्क्यांवर घसरले तरी यंदा एवढे मोठे यश मिळाले हे महत्वाचे आहे.

निवडणुकी आधी भाजपने युतीतील आपल्या सहकारी पक्षांना सर्वात जास्त ज्याच्या जागा त्यांचा मुख्यमंत्री होईल हे स्पष्ट केलेले होते. त्यामुळे भाजपने त्यादृष्टीने रणनीती आखली अन् ती यशस्वी करुन दाखवली. त्यासाठी लोकसभेतील प्रचारात सहभागी न झालेल्या संघाची मनधरणी केली. त्याचा परिणाम निवडणुकीत बघायला मिळाला. लाडकी बहिण आणि एक हैं तो सेफ हैं या घोषणांचा भाजपने खुबीने वापर करून धुळे येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदाची इच्छा पूर्ण करण्यासाठी महायुतीला विजयी करण्याचे आवाहन केले.

जनतेने भाजपच्या पदरी घवघवीत यश टाकून महायुतीला स्पष्ट कौल दिला. भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्यानेे साहजिकच मुख्यमंत्री पदाची दावेदारी मजबूत झाली. शहा व मोदी यांच्यासह संघाचा पसंतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीस याचे नाव या आधीच निश्चित आहे. भाजपमध्ये फडणवीस यांच्या नावाला विरोध नाही. मराठा आरक्षणावरून जरांगेचा फडणवीस यांना विरोध असला तरी जरांगे फॅक्टरचा भाजपवर परिणाम दिसला नाही. त्यामुळे सध्या तरी फडणवीस यांच्या शिवाय दुसरा सक्षम पर्याय नाही. यापूर्वी मुख्यमंत्री होता होता उपमुख्यमंत्री झाले. त्यावेळी हाय कमांडच्या आदेशाला प्राथमिकता देत उपमुख्यमंत्री पदावर फडणवीस यांनी समाधान मानले. पक्ष त्यांचा त्याग विसरलेला नाही. फडणवीस यांनी हाय कमांडचा आदेश वेळोवेळी पाळला त्याचे फळ त्यांना मिळाले. 

हाय कमांड विनोद तावडे यांच्यासह पक्षातील मराठा नेते व  इतर नेत्यांशी चर्चा करत आहे. असे असले तरी संघाने फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करावे अशी ठाम मागणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती निवडणुकीला सामोरे गेली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे ही नाव पुन्हा चर्चेत आणण्याचा प्रयत्न झाला, असला तरी नैसर्गिक न्यायाप्रमाणे ज्याच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री, त्यामुळे शिंदेंनी सध्या माघार घेतली असली तरी शिवसेनेची नाराजी लपून राहिलेली नाही. तसेच फडणवीस आपल्या दोन्ही सहकारी पक्षांच्या नेत्यांशी कसे जुळवून घेतात हे बघावे लागेल. यापूर्वी ही दोन्हीशी मिळवून घेत देवाभाऊ यांनी सरकार चालवले आहे.

सहकारी पक्ष शिवसेनेच्या ५६ जागा असून् राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागा आहेत. त्यात सर्वधिक महत्वाच्या खात्यांसाठी रस्सीखेच सुरू आहे. शिवसेना गृहमंत्री पदावर आडून बसली आहे. मुख्यमंत्री पदानंतर गृहमंत्रीपद आपल्याकडे राहवे असे भाजपचे प्रयत्न आहेत. तर अर्थमंत्रीपद अजितदादा पवार यांच्याकडे जाण्याची शक्यता लक्षात घेऊन राजी- नाराजी नाट्य सुरू आहे, आता ५ डिसेंबरला महायुतीचा शापथविधी सोहळा होणार आहे. त्यात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासह महत्वाच्या चार ते पाच जणांचा शपथविधी होईल, असे सांगितले जाते. विनोद तावडे यांची ही शक्यता आहे. मात्र महायुतीला लाडकी बहीण योजनेने तारले असेल तरी सध्या महायुतीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्याने लाडक्या बहिणींसह सर्वांचा लाडका मुख्यमंत्री म्हणून देवाभाऊच आघाडीवर आहे.

दिगंबर मराठे

 


 

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...