Skip to main content

मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

कुणाला कोणते खाते मिळाले ते वाचा 

मुंबई| दिअँकर वृत्तसेवा| राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप आज जाहीर झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाकडे गृह विभाग कायम असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अपेक्षेप्रमाणे  अर्थ खाते देण्यात आले. तर उपमुख्यमंत्री एकनाथ एकनाथ शिंदे यांना नगर विकास, गृह निर्माण खात्याची जबाबदारी मिळाली आहे. चंद्रशेखर बावनकुळे  यांना महसूल तर राधाकृष्ण विखे पाटील यांना जलसंधारण (गोदावरी व कृष्णा खोरे विकास) खाते मिळाले आहे.

तसेच इतर मंत्रिमंडळ खातेवाटप पुढीलप्रमाणे आहे.

हसन मुश्रीफ - वैद्यकीय शिक्षण
चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री
गिरीश महाजन - जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन
गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा
गणेश नाईक - वन
दादाजी भुसे - शालेय शिक्षण
संजय राठोड - माती व पाणी परीक्षण
धनंजय मुंडे - अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
मंगलप्रभात लोढा कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
उदय सामंत - उद्योग व मराठी भाषा
जयकुमार रावल - विपणन, प्रोटोकॉल
पंकजा मुंडे - पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन
अतुल सावे - ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकर
अशोक उईके - आदिवासी विकास मंत्रालय
17. शंभूराज देसाई - पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
18. आशिष शेलार - माहिती व तंत्रज्ञान
19. दत्तात्रय भरणे क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
20. अदिती तटकरे - महिला व बालविकास
21. शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम
22. माणिकराव कोकाटे - कृषी
23. जयकुमार गोरे - ग्रामविकास, पंचायत राज
24. नरहरी झिरवाळ अन्न व औषध प्रशासन
25. संजय सावकारे - कापड
26. संजय शिरसाट - सामाजिक न्याय
27. प्रताप सरनाईक - वाहतूक
28. भरत गोगावले रोजगार हमी, फलोत्पादन
29. मकरंद पाटील - मदत व पुनर्वसन
30. नितेश राणे - मत्स्य आणि बंदरे
31. आकाश फुंडकर - कामगार
32. बाबासाहेब पाटील - सहकार
33. प्रकाश आबिटकर सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, राज्यमंत्री
34. माधुरी मिसाळ - सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण
35. आशिष जयस्वाल अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय
36. मेघना बोर्डीकर - सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा
37. इंद्रनील नाईक - उच्च आणि तंत्र शिक्षण, आदिवासी विकास आणि पर्यटन योगेश कदम - गृहराज्य शहर
38. पंकज भोयर - गृहनिर्माण.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...