Skip to main content

श्री कपालेश्वर मंदिर मूल्यांकनाचे काम पूर्ण; ४.७३ लाखाच्या वस्तू

नाशिक|दिअँकर वृत्तसेवा|संस्थान श्री कपालेश्वर महादेव मंदिर येथे भाविकांनी केलेल्या धातूच्या वस्तूंचे मूल्यांकन  नुकतेच करण्यात आले त्याबाबतचा अहवाल प्राप्त झाला असून, संस्थानकडे सोन्याच्या वस्तूंचे मूल्यांकन ९८ हजार ८०० रू. तर चांदीच्या वस्तू मूल्यांकन ३ लाख ७२ हजार २१५ इतके आले आहे. 


संस्थानचे अधिकृत मूल्यांकनकर्ता चेतन राजापुरकर यांच्यामार्फत करण्यात आले.  राजापुरकर यांनी कपालेश्वर चरणी मानद सेवा दिली. नवीन विश्वस्त मंडळ अस्तित्वात आल्यापासून संस्थानने भाविकांसाठी पारदर्शक कारभार करण्याकडे भर दिलेला आहे. श्रीकपालेश्वर मंदिराच्या इतिहासात पहिल्यांदा भाविकांनी दिलेल्या वस्तूंचे मूल्यांकन झाल्याने संस्थानच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. मूल्यांकन करताना  संस्थानचे अध्यक्ष ॲड. अक्षय कलंत्री, खजिनदार सी.ए. श्रीकांत राठी, विश्वस्त मंडलेश्वर काळे, श्रद्धा दुसाने (कोतवाल), रावसाहेब कोशिरे आदी उपस्थित होते.




वैशिष्ट्ये पूर्ण दागिन्यांचा समावेश

श्री कपालेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट यांच्या ताब्यातील सोने व चांदी दागिन्यांचे मूल्यांकनाचे काम कॅमेऱ्याच्या निगराणी खाली आम्ही ट्रस्टचे अधिकृत व्हॅल्यूअर म्हणून पूर्ण केले.  मूल्यांकन अहवाल ट्रस्ट कडे सोपावलेला आहे. मूल्यांकन  दागिन्यांमध्ये काही वैशिष्ट्ये पूर्ण दागिने बघायला मिळाले  यात नवसपूर्ती निमित्ताने दिलेले  विविध सोने व चांदी वस्तू जसे घराची चांदीची प्रतिकृती , चांदीचे पाळणे तसेच बेलपान हार , बेलपान , त्रिशूल इत्यादी दागिने मोठ्याप्रमाणात बघायला मिळाल्यात. तसेच मंदिरातील गुरव यांच्या ताब्यातील प्राचीन दुर्मिळ देवाचे दागदागिने उपलब्ध न झाल्याने त्याचे व्हॅल्यूशन करता आलेले नाही.

-चेतन राजापूरकर
गव्हर्नमेंट अप्रुड व्हॅल्यूअर

संस्थानतर्फे इतिहासात पहिल्यांदा कपालेश्वर महादेवाच्या भाविकांनी दिलेल्या वस्तूंचे मूल्यांकन करण्यात आले. भाविकांनी व संस्थानने कपालेश्वर महादेवांच्या शृंगारासाठी गुरवांकडे दिलेल्या वस्तू मूल्यांकन  करणेकामी संस्थानमध्ये हजर करण्याबाबत सर्व ५ गुरव परिवारांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे. परंतु अद्याप त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. सदरच्या वस्तू मूल्यांकन करणेकामी हजर न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

ॲड. अक्षय कलंत्री, अध्यक्ष , संस्थान श्री कपालेश्वर महादेव मंदिर

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...