Skip to main content

श्री कपालेश्वर मंदिर मूल्यांकनाचे काम पूर्ण; ४.७३ लाखाच्या वस्तू

नाशिक|दिअँकर वृत्तसेवा|संस्थान श्री कपालेश्वर महादेव मंदिर येथे भाविकांनी केलेल्या धातूच्या वस्तूंचे मूल्यांकन  नुकतेच करण्यात आले त्याबाबतचा अहवाल प्राप्त झाला असून, संस्थानकडे सोन्याच्या वस्तूंचे मूल्यांकन ९८ हजार ८०० रू. तर चांदीच्या वस्तू मूल्यांकन ३ लाख ७२ हजार २१५ इतके आले आहे. 


संस्थानचे अधिकृत मूल्यांकनकर्ता चेतन राजापुरकर यांच्यामार्फत करण्यात आले.  राजापुरकर यांनी कपालेश्वर चरणी मानद सेवा दिली. नवीन विश्वस्त मंडळ अस्तित्वात आल्यापासून संस्थानने भाविकांसाठी पारदर्शक कारभार करण्याकडे भर दिलेला आहे. श्रीकपालेश्वर मंदिराच्या इतिहासात पहिल्यांदा भाविकांनी दिलेल्या वस्तूंचे मूल्यांकन झाल्याने संस्थानच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. मूल्यांकन करताना  संस्थानचे अध्यक्ष ॲड. अक्षय कलंत्री, खजिनदार सी.ए. श्रीकांत राठी, विश्वस्त मंडलेश्वर काळे, श्रद्धा दुसाने (कोतवाल), रावसाहेब कोशिरे आदी उपस्थित होते.




वैशिष्ट्ये पूर्ण दागिन्यांचा समावेश

श्री कपालेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट यांच्या ताब्यातील सोने व चांदी दागिन्यांचे मूल्यांकनाचे काम कॅमेऱ्याच्या निगराणी खाली आम्ही ट्रस्टचे अधिकृत व्हॅल्यूअर म्हणून पूर्ण केले.  मूल्यांकन अहवाल ट्रस्ट कडे सोपावलेला आहे. मूल्यांकन  दागिन्यांमध्ये काही वैशिष्ट्ये पूर्ण दागिने बघायला मिळाले  यात नवसपूर्ती निमित्ताने दिलेले  विविध सोने व चांदी वस्तू जसे घराची चांदीची प्रतिकृती , चांदीचे पाळणे तसेच बेलपान हार , बेलपान , त्रिशूल इत्यादी दागिने मोठ्याप्रमाणात बघायला मिळाल्यात. तसेच मंदिरातील गुरव यांच्या ताब्यातील प्राचीन दुर्मिळ देवाचे दागदागिने उपलब्ध न झाल्याने त्याचे व्हॅल्यूशन करता आलेले नाही.

-चेतन राजापूरकर
गव्हर्नमेंट अप्रुड व्हॅल्यूअर

संस्थानतर्फे इतिहासात पहिल्यांदा कपालेश्वर महादेवाच्या भाविकांनी दिलेल्या वस्तूंचे मूल्यांकन करण्यात आले. भाविकांनी व संस्थानने कपालेश्वर महादेवांच्या शृंगारासाठी गुरवांकडे दिलेल्या वस्तू मूल्यांकन  करणेकामी संस्थानमध्ये हजर करण्याबाबत सर्व ५ गुरव परिवारांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे. परंतु अद्याप त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. सदरच्या वस्तू मूल्यांकन करणेकामी हजर न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

ॲड. अक्षय कलंत्री, अध्यक्ष , संस्थान श्री कपालेश्वर महादेव मंदिर

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...