Skip to main content

ईव्हीएम हद्दपार करा, बॅलेट पेपरवर मतदान घ्या! या मागणीसाठी महानुभाव परिषद-वारकरी पंथाचा मोर्चा

नाशिक| दिअँकर वृत्तसेवा|ईव्हीएम मशीन हद्दपार करून बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे या मागणीसाठी शुक्रवारी अखिल भारतीय महानुभव परिषद आणि अखिल भारतीय वारकरी पंथ यांच्यातर्फे गोल्फ क्लब ते जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. 

त्यानंतर महंत श्रीकृष्ण राजबाबा मराठे आणि ह भ प जनार्दन बळीराम कांदे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले."मत आमचा अधिकार आहे, तर त्याचा हिशोब मागने हा सुद्धा आमचा अधिकार आहे.." "इव्हीएम मशीन हटवा, लोकशाही वाचवा.."  "ईव्हीएम मशीन हटाव".. "बॅलेट पेपर लाओ, लोकतंत्र बचाव".. अशा वेगवेगळ्या नावाचे फलक हातात घेऊन बहुसंख्य नागरिकांनी मोर्चामध्ये सहभागी झाले. 

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल बघता सामान्य जनतेच्या ईव्हीएम वरील विश्वास आता पूर्णपणे उडाला आहे. सर्वच निकाल हे संशयास्पद असून राज्यांमध्ये एक प्रकारे जो आनंदाचे वातावरण होते. ते वातावरण आता दिसून येत नाहीये राज्यात, देशांमध्ये लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर बॅलेट पेपर वरतीच निवडणूक घेतली पाहिजे असे मत नाशिक जिल्हा महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत श्री कृष्णराज बाबा मराठे यांनी व्यक्त केले आहे.

यावेळी बोलताना अखिल भारतीय वारकरी पंथाचे राज्य कमिटी सदस्य ह.भ.प. जनार्दन बळीराम कांदे यांनी सांगितले की, या सर्व गोष्टींचा निषेध करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यानंतर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदन देण्यात आले.



बहुजन आघाडीच्या वतीने ईव्हीएम हटवण्यासाठी स्वाक्षरी मोहीम

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नाशिकरोड येथील पूर्णकृती पुतळाजवळ ईव्हीएम मशीन हटवा लोकशाही वाचवा, स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

नागरिकांनी ई.व्हि.एम हटवण्यासाठी स्वाक्षरी केल्या  आणि बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे नाशिक जिल्हा युवक अध्यक्ष दामोदर पगारे हे होते. सुरूवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. स्वाक्षरी मोहीम ठिकाणी बुद्ध भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी- अरुण शेजवळ, चावदास भालेराव, प्रविण बागुल, विश्वनाथ भालेराव, सुहास पवार, पंडित नेटावटे, दीपक भंडारी, बाळासाहेब घायवटे, उर्मिला गायकवाड, सविता पवार, नीतू सोनकांबळे, सुरेखा बर्वे, रोहिणी जाधव, बाळासाहेब जाधव, जयभीम पाईक सम्राट फुले, जितेंद्र श्रीवंत, विष्णू दोंदे, विजय दोंदे, युवराज बर्वे, रोहिदास साळवे, आकाश गायकवाड, दिनेश पुजारी, अनिल खैरनार, निलेश कटारे, संतोष सोनवणे, आदींसह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...