Skip to main content

नाशिक 'रन' मध्ये धावले हजारो नाशिककर

नाशिक| समाजातील गरजूंसाठी २३ व्या नाशिक रन मध्ये  शनिवारीच्या गुलाबी थंडीत हिरवे टी-शर्ट परिधान करून  हजारो नाशिककर धावले. तसेच समाजसेवी उपक्रमास स्वयंस्फूर्तीने हातभार लावला. यात पाच हजारहून अधिक नागरिकांनी आपला सहभाग घेतला होता. 

महात्मा नगर क्रीडांगणावर झालेल्या या रनच्या उपक्रमास  व्यासपीठावर   नाशिक रन चे अध्यक्ष प्रबल रे, उपाध्यक्ष मुकुंद भट, सचिव अनिल दैठणकर, खजिनदार राजाराम कासार, नाशिक रन चे  विश्वस्त  श्रीकांत चव्हाण, अविनाश देशपांडे, रमेश शालिग्राम, तेजिंदरनाथ, अशोक पाटील,  जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी  राजश्री गुंड,  माजी विश्वस्त एच एस बॅनर्जी, रमेश जीआर, सलील राजे, एच बी थोंटेश,  सुधीर येवलेकर,  बॉश इंडियाचे अध्यक्ष गुरुप्रसाद मुदलापूर, ख्रिटोप वर्सनेर , राकेश देसाई, एपीरॉक कंपनीचे महाव्यवस्थापक डॉक्टर कॅथरीना कोलकिंग, मनुष्यबळ विकास महाव्यवस्थापक पल्लवी पांडे, सोल्युशन चे जॉय अलुर, सुधीर मुतालिक, शशांक बेथारिया, थायसन कृप  चे  रवींद्र यादव, सॅमसोनाईट चे यशवंत सिंग,  बजाज संस चे सुमित बजाज,   एबीबी चे अतुल कुलकर्णी,मनोज वाघ,राहुल संगवी, वाय एम सिंग नागेश भट, अतुल मुंदडा,  आदि मान्यवर उपस्थित होते.

  नाशिक रन  हा लोकप्रिय उपक्रम सालावादाप्रमाणे यंदाही  महात्मा नगर क्रीडांगणावर  झाला.   सकाळी ८ वाजता  नाशिक रनचे उद्घाटन झाले व यावेळी राष्ट्रगीत संपन्न झाले. सकाळी.८.५५  वाजता प्रौढांसाठी रनला सुरुवात झाली. नाशिक रन महात्मा नगर क्रीडांगणापासून सुरू होऊन महात्मा नगर पाण्याची टाकी, रॉकेट सर्कल, जेहान सर्कल , गंगापूर रोड ,इंडियन ऑइल पेट्रोल पंप , परत जेहान  सर्कल, रॉकेट सर्कल भोसला गेट, सिक्स सिग्मा हॉस्पिटल व परत महानगर  क्रीडांगण असा नाशिक रन  झाला.विशेष मुलांसाठी व लहान मुलांसाठी रन  चा मार्ग टायटन वॉच महात्मा नगर पर्यंतच सीमित करण्यात आला होता.  रन मध्ये भाग घेणाऱ्या उपस्थितांसाठी लकी ड्रॉ काढण्यात आला  या लकी ड्रॉ बक्षीसामध्ये विजेत्यांना एलईडी टीव्ही, लॅपटॉप , सायकल , वाशिंग मशीन, घरगुती वापरासाठी चे हॅन्ड टूल्स व फर्निचर च्या वस्तू आदि बक्षीस देण्यात आले.  एक ते सात  क्रमांकाचे बक्षीसांचा लकी ड्रॉ यावेळी काढण्यात आल्यानंतर नाशिक टीडीके कंपनीकडून नाशिक रन चे  बॉश कंपनीकडे हस्तांतरण करण्यात आले.  हे हस्तांतरण विद्यमान अध्यक्ष प्रबळ रे यांनी नाशिक रन चे विद्यमान उपाध्यक्ष  मुकुंद भट यांना  केले. यानंतर उर्वरित उत्कंठा वाढीस लावणाऱ्या क्रमांक आठ ते दहा लकी ड्रॉ नंबर काढण्यात आले.  आभार नाशिक रनचे सचिव अनिल देठणकर यांनी मानले, सूत्रसंचलन स्नेहा ओक यांनी केले. कार्यक्रम यशस्वी ते साठी   नितीन देशमुख , बॉश कंपनीचे सुरक्षा व्यवस्थापक, सागर काजळे,श्रीपाद कुलकर्णी,  डॉ जॉर्ज शेरॉन ,  स्नेहा ओक, गोविंद बोरसे, उमेश ताजनपुरे, भूषण भुयारकर, अमित दराडे, सुधीर पाटील,  यांच्यासह वैद्यकीय सेवा, आदींसह २०० हून अधिक बॉश व टीडीके कंपनीचे स्वयंसेवक यशस्वीतेसाठी कार्यरत होते. 


चौकट 
२००३ साली नाशिक रनची मुहूर्तमेढ

सुरुवातीला २००३ साली नाशिक रन  या समाजसेवी संस्थेची मुहूर्तमेढ तत्कालीन संस्थापक विश्वस्त एन बालकृष्णन , सौमित्र भट्टाचार्य व समविचारी कंपन्यांचे मान्यवरांनी रोवली. नाशिक रन  या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत ५०० हून अधिक गरजू संस्थांना तसेच विशेषता क्रीडा संस्थांना व शैक्षणिक संस्थांना मदत करण्यात आली. हे सामाजिक कार्य आजतागायत अविरतपणे चालू आहे.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...