Skip to main content

झेडपीतर्फे कोरोना लढयासाठी जिल्ह्यात 5 नवीन केंद्रे

नाशिक। प्रतिनिधी: कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना  जिल्हा परिषदेच्या विविध यंत्रणेमार्फत राबविली जात आहे. या पार्श्वभुमीवर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांच्या अध्यक्षतेत झाली. यावेळी सुरक्षित अंतर ठेवून चर्चा करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ.सयाजीराव गायकवाड, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती संजय बनकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश बच्छाव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप)रवींद्र परदेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मबाक) दीपक चाटे व शिक्षणाधिकारी वैशाली झनकर उपस्थित होते.

Zp-corona-virus-covid-19
फोटो: टीम अँकर

वेंटिलेटर्सची गरज पडल्यास जिल्हा स्तरावर संदर्भित करणार:- डॉ. कपिल आहेर

प्रशासकीय पातळीवरील कोरोना प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक औषध खरेदी, औषधी साहित्य वाटप व कोरोना रुग्ण आढळलेल्या तालुक्यात प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय संशयित रुग्णशोध व आरोग्य शिक्षण देण्यासाठी आरोग्य कर्मचारी करत असलेल्या कामाचा आढावा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर यांनी सादर केला. जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर कोरोना प्रतिबंधात्मक साहित्य सामुग्री गरजेनुसार उपलब्ध करण्यात देण्यात आलेली असुन काही औषध सामुग्री यांची निविदा प्रक्रिया जिल्हा परिषद स्तरावरुन राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील कोरोना बाधित संपर्कात आलेले संशयित व कोरोना लक्षणे असलेले रुग्ण जिल्हा स्तरावर संदर्भीय न करता त्यांना त्याच तालुक्यात विलगीकरन करुन त्याच ठिकाणी त्यांना उपचार सुरू करणार आहेत. कोरोना संपर्कातील व्यक्ती किंवा संशयित रुग्णास आवश्यकता वाटल्यास किंवा व्हेंटिलेटर्सची गरज भासल्यास त्या रुग्णास जिल्हा स्तरावर संदर्भित करण्यात येणार आहेत.


जिल्ह्यात 5 केंद्र कार्यान्वित होणार

या आठवड्यात साधारण पाच केंद्र कार्यान्वित करण्याबाबत प्रशासन स्तरावरुन कारवाई करण्यात येत आहे. जिल्ह्यात कोरोना लढा देण्यासाठी उपसंचालक आरोग्य सेवा, नाशिक मंडळ नाशिक या कार्यालाया मार्फत विविध पदांची आरोग्य कर्मचारी व अधिकारी यांची भरती प्रक्रिया तात्काळ राबविण्यात येत आहे.


आहार योजनेअंतर्गत ८१४७२२ अंडी वाटप:-चाटे

अमृत आहार योजने अंतर्गत जिल्ह्यातील एकूण सात महिने ते सहा वर्षे वयोगटातील साधारण १२६६९८ बालकांना माहे एप्रिल, २०२० मध्ये ८१४७२२ अंडी वाटप करण्यात आल्याची माहिती सादर करण्यात आली. जिल्ह्यात ग्रामीण भागातील मुलांना अमृत आहार योजने अंतर्गत देय असलेले साधारण पंधरा कोटी रुपये जिल्हा परिषद स्तरावरुन अंगणवाडी सेविका यांचे खाती वर्ग करण्यात आल्याची माहिती दीपक चाटे यांनी दिली.

Corona-virus-covid-19

गरज भासल्यास 22 शाळा अधिग्रहीत करू:-डॉ. झनकर 

जिल्ह्यात कार्यरत प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालय या व्यतिरिक्त कोरोना रुग्णांसाठी आवश्यकता भासल्यास जिल्ह्यातील साधारण २२ खाजगी शाळा व शासकीय आश्रम शाळा अधिग्रहित करुन त्या ठिकाणी  संशयित कोरोना रुग्ण विलगीकरण कक्ष म्हणुन स्थापन करण्याबाबत कृती आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांनी दिली._ 

ग्रामीण रोजगार कामे उपलब्ध करणार:-परदेशी

महात्मा गांधी रोजगार योजने अंतर्गत ग्रामीण भागात सुरक्षित अंतर ठेवून ग्रामीण रोजगार यांना रोजगार उपलब्ध करुन देऊन कामे सुरू करण्यात आल्याची माहिती रवींद्र परदेशी यांनी दिली.

Corona-virus-covid-19

जिल्ह्यात अद्याप टँकर प्रस्ताव नाही:- एमएम खैरनार

नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात सद्य स्थितीत कुठेही पिण्याच्या पाणी टंचाई प्रस्ताव जिल्हा प्रशासनास प्राप्त नसुन भविष्यात पाणी टंचाई अंतर्गत टँकर मागणी प्रस्ताव प्राप्त झाल्यास तात्काळ टँकर मंजुरी बाबत कारवाही जिल्हा स्तरावरुन करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता एम.एम. खैरनार यांनी दिली.

प्रशासनाचे काम चांगले:-अध्यक्ष, बाळासाहेब क्षीरसागर

जिल्हा परिषदेचे कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना या संदर्भात प्रशासकीय यंत्रणा चांगले काम करत आहे. ग्रामीण भागात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविका हे भर उन्हामध्ये घरोघरी जाऊन कोरोना साथ सर्वेक्षण व आरोग्य शिक्षण देत आहेत. सोबत अमृत आहार योजने अंतर्गत अंडी व केळी पात्र लाभार्थी बालकांना प्रत्येकाचे घरी जाऊन वाटप केले जात आहे. कोरोना विरोधी लढ्यात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसह सर्व प्रशासकीय यंत्रणा अभिनंदनास पात्र आहे :- बाळासाहेब रामनाथ क्षिरसागर, अध्यक्ष, जिल्हा परिषद, नाशिक


प्रशासनातील समन्वय कायम ठेवा:-सीईओ बनकर

 कोरोना साथरोग प्रतिबंधात्मक उपाय योजनेकामी जिल्हा परिषद अध्यक्ष व पदाधिकारी यांचे चांगले सहकार्य लाभत आहे. जिल्हा परिषद स्तरावरील खाते प्रमुख तालुकास्तरीय गटविकास अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आलेल्या विविध जबाबदाऱ्या चांगल्या पार पाडत आहेत :- लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...