Skip to main content

सिन्नर नगरपालिकेकडून वाहतूकदारांची बेकायदेशीर लूट:नाशिक ट्रान्सपोर्ट आणि गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा आरोप

नाशिक|सिन्नर शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. या काळात अत्यावश्यक सेवा बाजवणाऱ्या वाहतुकदारांची मात्र बेकायदेशीर लूट केली जात असून सदर लूट थांबाबवी तसेच लॉकडाऊन मधून अत्यावश्यकत सेवेत काम करत असलेल्या वाहतूक क्षेत्राला वगळण्यात यावे अशी मागणी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, नाशिक गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष पी. एम सैनी व सिन्नर नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष सुनील ढाने यांनी केलेली आहे.
Nsk-goods-and-transport
फोटो: फाईल
नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन व गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता सिन्नर शहरात लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. मात्र या भागात एमआयडीसीक्षेत्र नियमित सुरु आहे. असे असतांना या ठिकाणाहून मालवाहतूक करणाऱ्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना नगरपालिका विभागाकडून नोटीस देण्यात येत असून याठिकाणी येण्या जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. 

वास्तविक ट्रान्सपोर्ट करणाऱ्या वाहनांचा सिन्नर शहरातील लॉकडाऊन विभागास कुठलाही अडथळा निर्माण झालेला नाही. या भागात एमआयडीसी सुरु असल्याने आपत्कालीन सेवेत असलेले ट्रान्सपोर्ट व्यवसाय सुरु राहणे आवश्यक असतांना ट्रान्सपोर्ट उद्योजकांना नोटीसा देण्यात येत आहे. तसेच वाहतूकदारांकडून बेकायदेशीर आर्थिक लूट करण्यात येत आहे. तरी आपत्कालीन परिस्थितीत कुठलाही अडथळा निर्माण न करता सुरु आलेल्या ट्रान्सपोर्ट व्यवसाय नियमित सुरु ठेवण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे.

याबाबत नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन व नाशिक गुड्स ट्रान्सपोर्ट यांच्या वतीने नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ, सिन्नर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व सिन्नर तहसीलदार यांना दिले आहे.त्यावेळी सुभाष जांगडा, अजय जाधव,दत्ता ढमाले,शरद खालकर,वाशिम सय्यद , उत्तम कातकाडे ,दीपक अहिरे,विनायक तांबे,बळीराम कदम,इकबाल सय्यद आदी सोबत होते.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...