Skip to main content

द्राक्षासह इतर फळ, भाजीपाल्याच्या निर्यातीवर सबसिडी जाहीर करा: खा.डॉ.भारती पवार

नाशिक| महाराष्ट्रातील दिंडोरी लोकसभा मतदार संघासह नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर द्राक्ष शेती केली जाते. जवळपास ७५ टक्के द्राक्ष निर्यात ही भारताबाहेर नेदरलँड, रुस, बांगलादेश, जर्मनी, यु.के. यासह अनेक देशांमध्ये केली जात आहे. द्राक्षासह इतर फळ, भाजीपाल्याच्या निर्यातीवर सबसिडी जाहीर करा अशी मागणी खा.डॉ.भारती पवार यांनी केली आहे.
Announce-subsidy-on-export-of-grapes-and-other-fruits-and-vegetables-Dr-Bharti-Pawar
आपल्या मार्फत निर्यात केल्या जाणाऱ्या द्राक्षांची गुणवत्ता इतर देशांच्या तुलनेत सर्वोत्तम आहे. फळांमध्ये सर्वात जास्त निर्यात द्राक्षांची केली जाते असे बोलत असताना खा.डॉ.भारती पवार यांनी केंद्र सरकारचे आभार व्यक्त करत निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी एम.इ.आय.एस.या योजनेअंतर्गत ताजे फळे आणि भाजीपाल्याच्या निर्यातीवर सबसिडी दिली ही जीएफ.ओ. बी.च्या मूल्यावर ५ ते ७ टक्के होती. ही योजना दि.३१ डिसेंबर २०२० पर्यंत लागु होती. 

केंद्र सरकारने आर.ओ.डी.टी.ई.पी. नावाची एक नवीन योजना लागू केली आहे. परंतु योजनेअंतर्गत किती टक्के सबसिडी मिळणार आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही असे सांगत खा.डॉ.भारती पवार यांनी संसदेच्या सभापती महोदयांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री यांना विनंती केली कि, मोठ्या प्रमाणावर चांगल्या प्रतीचे द्राक्ष जे भारतातून निर्यात सुरु करण्यात आली आहे. ज्याप्रमाणे रेल्वे द्वारे कृषी उत्पादनावर सबसिडी दिली जात आहे त्याचप्रमाणे द्राक्ष व इतर फळे व भाजीपाल्यावर लवकरात लवकर हि सबसिडी देण्याची तरतूद करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी खा.डॉ.भारती पवार यांचेकडून  संसदेत करण्यात आली.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...