Skip to main content

..तर मुख्यमत्र्यांनी ठाकरीबाणा दाखवून त्या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा: प्रवीण दरेकर

शिर्डी| विशेष प्रतिनिधी| राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील एका मंत्र्याच्या बाबतीत जनतेच्या मनात संशय निर्माण होत असेल आणि त्याला आधारित काही क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाले असतील तर लोकांच्या मनात आता फार काळ संभ्रम असता कामा नये, याच सरकारमधील मागे एका मंत्र्याच्या बाबतीत अशीच घटना घडली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धाडसाने ठाकरीबाना दाखवून तातडीने राजीनामे घ्यायला हवे अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली.
Then-the-Chief-Minister-should-resign-by-showing-Thakribana-pravin-Darekar
दरम्यान विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शनिवारी शिर्डी येथे साईदरबारी मध्यान्ह आरतीनंतर हजेरी लावत साईसमाधीचे मनोभावे दर्शन घेतले. याप्रसंगी शिर्डी शहर भाजपच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, नगराध्यक्ष शिवाजीराजे गोंदकर, मा.उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन,साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे, भाजपचे नगरसेवक अशोक गोंदकर आदीसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी पत्रकार परिषदेत बोलतांना दरेकर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन जो पक्ष उभा राहिला आणि आज छत्रपतींच्या आशीर्वादानेच राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्तेत आले असतांना आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीबाबत अशाप्रकारचे निर्बंध वातावरण सुरळीत होत असतांंना टाकणे योग्य नाही. एका बाजूला काँग्रेसचा काल मेळावा झाला त्यात हजारोंंच्या संख्येने लोक जमा झाले, राज्यात रेस्टॉरंट बार, पब रात्रभर गर्दित सुरु असून प्रसंगी मोठ मोठे विवाह सोहळे पार पडत असून त्यास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हजेरी लावत आहे, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याबाबत एका चौकटीत बसवून निर्बंध लादता कामा नाही अशी आमची भूमिका आहे. 

साईबाबा संस्थांवर विश्वस्त मंडळ नेमून कारभार सशक्त करणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. साईबाबा संस्थानच्या माध्यमातून ग्रामस्थांचे विविध प्रश्नांच्या संदर्भात दुर्लक्ष होत आहे. साईसंस्थानने विश्वस्त मंडळ नेमून हळूहळू दर्शन क्षमता वाढवली पाहिजे असे मत व्यक्त करत लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांवर कोणाला ही दडपशाही करता येणार नाही असे ठामपणे सांगत पत्रकारावर गुन्हा दाखल करणे ही बाब अतिशय निंदनीय आहे आणि त्यांच्यावर दबाव तंत्र वापरणे योग्य नसल्याचे आ. दरेकर यांनी बोलून दाखवले. यावेळी भाजयुमोच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.


फोटो: विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा सत्कार करताना भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, नगराध्यक्ष शिवाजीराजे गोंदकर, मा.विश्वस्त सचिन तांबे आदी

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...