Skip to main content

हे घर माझे माहेर...सिंधुताई घरी आल्या होत्या तेव्हा..

अनाथांच्या डोक्यावर छत्र उभा करणाऱ्या सिंधुताई सातत्याने महाराष्ट्रभर फिरून आपल्या पिलांसाठी निधी जमवायच्या. सांगली जिल्ह्याचे त्यांचे येणे जाणे अनेकदा व्हायचे. त्या निमित्ताने महाराष्ट्रातील अनेक घरे त्यांनी जोडली. 94-95 साल असावं... ताई आमच्या घरी आल्या होत्या. पाहुण्यांचे आगत-स्वागत हा तर आमच्या मातोश्रींचा आवडता छंद.
He-ghar-majhe-maher-athvanitil-maay-sidhiutai-sapkal-shivraj-katkarj
महाराष्ट्रातील खूप मोठ्या, भल्या माणसांनी तिने बनवलेल्या उत्तम भोजनाचा आस्वाद घेतला आहे. त्यात सिंधुताईंचाही समावेश होता. पप्पानी त्यांना निमंत्रित केले होते. त्यामुळे त्या दिवसभर आमच्या घरीच होत्या. आम्हा सर्व मुलांशी, आई, आजी बरोबर गप्पा झाल्या. अनेक लोकांनी आमच्या घरी येऊन त्यांना मदत देऊ केली. ताईना पुढे जायचे होते, जाताना निरोप घेता घेता आजीने पुन्हा येण्यास सांगितले.

.... तशा त्या म्हणाल्या, हे घर पण आता माझे माहेर झाले. आप्पासाहेब काटकर नावाचा मला एक भाऊ मिळाला...कधीही येईन..... सोबतचा फोटो पप्पा आणि सिंधुताई यांचा असा सहजफोटो निघण्याचे कारण म्हणजे, छायाचित्रकार नाना धामणीकर यांना ताईंचे फोटो घ्यायचे होते. त्यासाठी ते आले होते. ताई बोलत होत्या, पुढे बसलेलो लोक ऐकत होते. त्यांचे बोलणे ऐकून वयोवृद्ध नाना भारावले आणि त्यानी अक्षरश: पायावर डोकं ठेऊन ताईंना नमस्कार केला. 

पुढे  सांगलीत  कार्यक्रमासाठी ताई आल्यानंतर मी त्यांची भेट घेतली. तेव्हा त्या कुटुंबातील सर्वांशी फोनवर बोलल्या. डॉ.पतंगराव कदम यांच्या वाढदिवसाच्या अंकासाठी मुलाखत घेण्यासाठी त्यांच्याशी फोनवरुनच एकदा खूप बोलणे झाले. मी अनाथांची आई म्हणून फिरते. पण पतंगराव कदम यांनी माझ्या मुलीचे पालकत्व स्वीकारले म्हणून तिचे उच्च शिक्षण झाले... अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली. कृतज्ञपणे आणि काळजाला भिडणारे बोलणाऱ्या, माणसं जोडणार्या ताई आज नाहीत असे म्हणतानाही डोळे भरून येतात.

शिवराज काटकर, 
वरिष्ठ पत्रकार, सांगली

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...