नाशिक| राज्यातील विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांच्या प्रश्नांवर औरंगाबाद येथील शिक्षकांनी औरंगाबाद ते मंत्रालय पायी आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलक शिक्षक आज नाशिक शहरात दाखल झाल्यानंतर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांना आंदोलन कर्त्या शिक्षकांची भेट घेण्याच्या सूचना केल्या होत्या.
त्यानंतर त्यांनी आज नाशिकमध्ये दाखल झालेले शिक्षक गजानन खैरे यांच्यासह सहभागी झालेल्या शिक्षकांची भेट घेतली. यावेळी भालचंद्र भुजबळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थितीत होते.