नाशिक| बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती या गावामध्ये महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जाणीवपूर्वक व सूडबुद्धीने रातोरात हटवण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेचा मी तीव्र निषेध व्यक्त करतो असे ना. भुजबळ यांनी सांगून कर्नाटक सरकारने संबंधितांवर कडक कारवाई करून तातडीने आराध्यदैवत वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाची सन्मानपुर्वक पुनर्स्थापना करावी अशी मागणी केली केली आहे. राज्याचे पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न समन्वयक ना. छगन भुजबळ यांनी ट्विटरवरुन आपली भूमिका मांडली आहे.
तसे भुजबळ आणि बेळगाव यांचे नाते जुने असून बेळगावमध्ये मराठी लोकांवर होणाऱ्या अन्याया विरूद्ध त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे. शिवसेनेत असतांना त्यांना कर्नाटकात येण्यासाठी बंदी होती. त्यावेळी त्यांनी वेषांतर करुन आंदोलनात सहभाग घेतला होता.त्यामुळे भुजबळ याप्रकरणी ही पुन्हा आक्रमक झाले आहे.