Skip to main content

ऑनलाइन सोने खरेदी-विक्रीद्वारे 10 कोटींची उलाढाल: सराफांसाठी ई-मार्केट ठरतंय फायदेशीर

नाशिक| प्रतिनिधी| सराफी व्यवसायिकांनी ई- मार्केटचा आधार घेत आपली ऑनलाइन सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली. ऑनलाइन द्वारे ग्राहकांकडून सुमारे १० कोटींची उलाढाल झाली आहे, अशी माहिती नाशिक सराफ असोसिएशनचे अध्यक्ष चेतन राजापूरकर यांनी दिली. खास करून खरेदीसाठी २५ ते ४५ वयोगटातील ग्राहकांचा विशेष प्रतिसाद दिसून आला. 
10-crore-turnover-from-online-gold-trading-E-market-is-profitable-for-bullion
फोटो: फाईल
चोखंदळ ग्राहक नेहमी सोने खरेदीसाठी आपल्या पसंतीच्या सराफी पेढीत जातो. कारण ती वस्तू खात्रीशीर असणार याचा विश्वास असतो. मात्र महामारीच्या काळात ग्राहकांना प्रत्यक्ष सोने खरेदी टाळावी लागली. लग्नसोहळा आणि महत्वाच्या सणासुदीच्या काळात सोने खरेदीसाठी पडावे की नाही असा सुरक्षेच्या दृष्टीने प्रश्न होता. याकाळात  ग्राहकांची सुरक्षा ही महत्वाची बाब होती. 

कोरोना संकट काळात सराफ व्यवसायिकांच्या व्यवसायावर देखील आर्थिक संकट आले. ग्राहक बाजारातून गायब झाल्याने व्यवसायावर परिणाम झाला, त्यामुळे सराफी व्यवसायिकांसमोर झालेले आर्थिक नुकसान कसे भरून काढणार असा प्रश्न होताच. तशात सर्वत्र ई- कॉमर्स व्यवसायाने पाय पसरले होते, ग्राहक ऑनलाइन खरेदीला प्राधान्य देत असल्याचे दिसून आले, त्यामुळे ऑनलाईन खरेदीला मोठे महत्व आले होते. ई-मार्केटचा उपयोग करून कपडे, किराणा, फर्निचर, यासह सर्व प्रकारची खरेदी- विक्री ऑनलाइन फ्लॅटफॉर्मच्या माध्यमातून केली जात असल्याने मोठी आर्थिक उलाढाल होत आहे. आता सराफी व्यवसायिक देखील याकडे वळाले आहे आणि ई- मार्केटचा फायदा घेत आहे.
 
याच कालावधीत काही सराफी व्यवसायिकांनी ई- मार्केटचा आधार घेत आपली ऑनलाइन सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली. त्याद्वारे दसरा दरम्यान ग्राहकांकडून सुमारे ८ ते १० कोटींची उलाढाल झाली. यात युवा वर्गाची संख्या मोठी होती. आता सराफी व्यवसायिक देखील काळाप्रमाणे बदलत आहे. भलेही ही ऑनलाईन खरेदी मर्यादा सध्या १५ हजारापर्यंत दिसून आली आहे, कालांतराने ती वाढेल असा विश्वास चेतन राजापूरकर यांनी व्यक्त केला आहे. तसेच  सोशल माध्यमाचा व्यवसायासाठी चांगला वापर केला जात आहे 

छोटया व्यावसायिकांकडून सोशल माध्यमाचा वापर: चेतन राजापूरकर

ऑनलाइन मध्ये सोशल माध्यमाचा ही वापर करण्यात आला, फेसबूक, व्हॉट्सऍप, इंस्टाग्रामद्वारे सोन्याच्या दागिन्यांचे वेगवेगळया प्रकारचे आकर्षक डिझाईन ग्राहकांना पाठवून त्यांची संमती घेतली जाते, हव्या त्या डिझाइनचे दागिने त्यांना घरपोच किंवा त्यांना हवे त्याठिकाणी उपलब्ध करून दिले जातात

चेतन राजापूरकर अध्यक्ष, नाशिक सराफ असोसिएशन.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...