Skip to main content

Posts

Showing posts from September, 2022

गांधीनगर येथे रामलीला रंगीत तालमीला उत्साहात प्रारंभ

नाशिकरोड| नाशिककरांसाठी भूषणावह रामलीला हिंदी नाटिका रंगीत तालमीला गांधीनगर मध्ये उत्साहात प्रारंभ झाला. रामायणातील विविध मुख्य प्रसंग, संवाद यावर गांधीनगर प्रेस कर्मचाऱ्यांतर्फे नियमित सराव केला जातोय. ६७ वर्षांची प्रदीर्घ गौरवशाली परंपरा लाभलेल्या गांधीनगर रामलीला  समस्त रामभक्तांसाठी पर्वणीच ठरते. यातील बहुसंख्य कलावंत  प्रेस मधील कर्मचारी आहेत, हे विशेष. रामायणातील विविध मुख्य प्रसंगाची रंगीत तालीम झाली. रत्नाकर डाकू - नारद मुनी भेट, रावण अत्याचार, श्रावण वध, राम लक्ष्मण सीता जन्म, सीता स्वयंवर, मंथरा कैकयी संवाद, वनप्रस्थान व ईतरही मुख्य प्रसंग यांची रंगीत तालीम घेण्यात आली. रामाची भूमिका महेश खैरनार, लक्ष्मण - प्रदीप भुजबळ, सीता - प्रिया सुरते, दशरथ - संजय महाले, परशुराम - हरीश परदेशी, कैकयी - रचना चिंतावर, भरत - गोपाल लोखंडे, रावण - ज्ञानेश्वर कुंडारिया, विभिषण - सतीश वाणी, अंगद - शुभम परदेशी, वाली - चेतन धराडे, सुग्रीव - निशांत हुंमणे, हनुमान - संजू रासकर, नारद मुनी - मुकुंद वैद्य, शत्रुघ्न - अनिल गायकवाड, वाल्मिकी - सुनील मोदियानी, जनक - रवि वरखेडे, वशिष्ठ - सचिन दलाल...

नवरात्रोत्सवाचे वेध: महिला वर्गाकडून गरबारासचा सराव

नाशिक|नवरात्रोत्सवासाठी सार्वजनिक मंडळांची  जय्यत तयारी सुरू आहे. त्यामुळे आता उत्सवाचे वेध शहरवासीयांना लागले आहे. या काळात दांडिया रासचा उत्साह काही वेगळाच असतो, त्याअनुषंगाने दांडीया प्रेमींनी ही कंबर कसली आहे, ठिकठिकाणी गरबा रासचा आयोजन होत असल्याने दांडीयाप्रेमी प्रशिक्षण व सराव करतांना दिसत आहे. दि. 26 सप्टेंबर रोजी देवीची घटस्थापना करून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होईल. कोविड काळानंतर प्रथमच मोकळेपणाने हा उत्सव साजरा केला जात आहे. त्यामुळं नवरात्रोत्सवाचा उत्साह सर्वत्र दिसून येत आहे.  नवरात्र म्हणजे ९ दिवस चालणाऱ्या उत्सवाला जोड असते ती दांडियाची यात अबाल वृद्धांपासून सर्वच आनंदाने सहभागी होतात. त्यात महिला वर्गाचा हिरहिरीने सहभाग असतो, गरबा रासला त्यांची विशेष पसंती असते. दांडीया गरबा रास याचे विशेष प्रशिक्षण या काळात घेतले जाते. शहरातील नृत्यवंदना डॅान्स ॲकॅडमीतर्फे महिला स्पेशल गरबा नृत्य वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. कृषीनगर येथील समाज हॅाल येथे यावेळी ७५ वर्षीय आजीबाईपासून ते ७ वर्षाच्या चिमुकलीचा प्रशिक्षण व सरावात सहभाग दिसून आला. शिक्षिका पल्लवी रविद्...

ह.भ.प. कापसे महाराज यांच्या मातोश्री ताराबाई कापसे यांचे निधन

नाशिक|ह.भ.प. कापसे महाराज यांच्या मातोश्री ताराबाई बळवंत कापसे यांचा आज सकाळी ९.४५ वाजता वय (८०) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुले, मुली, नातवंडे असा परिवार आहे.  त्यांच्यावर पंचवटी अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भावपूर्ण श्रदांजली दिली.

कांदा बाजारभावातील घसरण थांबविण्यासाठी तातडीने प्रयत्न करावे: छगन भुजबळ

मुंबई|नाशिक| कांदा बाजारभावातील घसरण कायमस्वरूपी थांबविणेसाठी कांदा निर्यात प्रोत्साहन योजना लागू करण्याची आवश्यकता आहे, यासाठी राज्य सरकारने केंद्र शासनाकडे आपले वजन खर्ची घालावे आणि जोपर्यंत भावातील घसरण थांबत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना तातडीने दिलासा  देण्यासाठी क्विंटलला किमान ५०० रुपये अनुदान देण्यात यावे अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याबाबत छगन भुजबळ यांनी त्यांना पत्र दिले आहे. फाईल फोटो छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठ्या प्रमाणावर कांदा पिकविणारे राज्य असुन भारतातील एकुण कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा ३३ टक्के वाटा आहे. महाराष्ट्रातील सरासरी उत्पादन इतर राज्यांपेक्षा जास्त आहे. शिवाय येथील कांद्याची प्रत चांगली असल्याने निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सोलापुर, सातारा, अहमदनगर, धुळे, बुलढाणा आणि जळगांव इ. जिल्हे कांदा उत्पादनासाठी प्रसिध्द असुन महाराष्ट्रातील एकुण कांदा उत्पादन...

समता परिषदेतर्फे मुंबईत दि. 26 सप्टेंबर रोजी खा.शरद पवार यांच्या हस्ते सत्यशोधक चळवळीतील समाजसेवकांचा सन्मान

नाशिक| क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला दि.२४ सप्टेंबर २०२२ रोजी दिडशे वर्ष पूर्ण होत आहे. या शतकोत्सवी सुवर्ण महोत्सवा निमित्त या दिवशी नाशिक शहर व जिल्ह्यात सत्यशोधक समाजाला अभिप्रेत उपक्रम राबविण्यात यावे. तसेच वर्षभर विविध उपक्रम राबवीत हे वर्ष साजरे करण्यात यावे असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे यांनी केले आहे.  अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने दि.२६ सप्टेंबर रोजी मुंबईत खासदार शरदचंद्र पवार यांच्या हस्ते सत्यशोधक चळवळीत काम करणाऱ्या समाज सेवकांचा सन्मान करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची बैठक भुजबळ फार्म येथील कार्यालयात पार पाडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रदेश चिटणीस समाधान जेजुरकर, जिल्हाध्यक्ष प्रा.ज्ञानेश्वर दराडे, डॉ.योगेश गोसावी, उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष संतोष डोमे, शहराध्यक्ष कविताताई कर्डक, मालेगाव शहराध्यक्ष नरेंद्र सोनवणे, महिला जिल्हाध्यक्ष पूजा आहेर, महिला शहराध्यक्ष आशाताई भंदूरे, मोहन शेलार, संतोष खैरनार, वि...

महाराष्ट्रात नविन प्रकल्प आणावा अन्यथा राज्य सरकारला स्वस्थ बसू देणार नाही: मेहबूब शेख

नाशिक| वेदांता- फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात तीव्र आंदोलन करून उपायुक्त रमेश काळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राज्य सरकारच्या विरोधातील विविध घोषणानी परिसर दणाणला होता आंदोलनात यावेळी युवक कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, निवृत्ती अरिंगळे, चेतन कासव, गणेश गायधनी, जगदीश पवार, योगेश निसाळ, विक्रम कोठुळे, पूजा आहेर, कुंदा सहाणे आदि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आपल्या भाषणात म्हणाले की, वेदांता-फॉक्सकॉन ग्रुपचा सुमारे दोन लाख कोटी रुपये गुंतवणूक असणारा प्रकल्प गुजरातला हलविण्यात आला. यामुळे महाराष्ट्रातील सुमारे १.५४ लाख हक्काचे रोजगार हिरावले गेले. महाविकासआघाडी सरकारच्या काळात अनेक प्रोजेक्ट राज्यात येणार होते. वेदांता कंपनीने महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेशमध्ये पाहणी केली होती. त्यानंतर सर्व अटींचा विचार करून महाराष्ट्र अंतिम केले. वेदांताच्या वरिष्ठ टीमने सुद्धा तळेगा...