Skip to main content

Posts

Showing posts from January, 2021

शालेय शुल्कवाढी विरोधात पालकांचे आंदोलन

मुंबई |शालेय विद्यार्थ्यांच्या फी वाढीच्या मुद्यावरून पालक संघटना आक्रमक झाल्या असून 'ऑल इंडिया पॅरेंटस् असोसिएशन'च्या नेतृत्वाखाली राज्यातील विविध पालक संघटनांनी काल शिवसेना भवनावर मोर्चा काढला.       लाॅकडाऊनमुळे अनेकांवर बेकारीचे संकट आले आहे. त्यामुळे शुल्कामध्ये सवलत देण्याची मागणी पालकांनी सरकारकडे केली आहे. शिक्षणमंत्र्यांनी लाॅकडाऊनमध्ये शुल्लक घेऊ नये ,असे आदेश शाळांना दिले तरीही शाळा प्रशासनाकडून ‌‍विविध शुल्लक वसूल करण्यात येत होते. केवळ शिकवणी शुल्कच घेण्यात यावे या पालकांच्या विनंतीलाही शाळा प्रशासनाकडून  वाटाण्याच्या अक्षता लावण्यात येत होत्या.  यासंदर्भात पालक संघटनांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे पत्रव्यवहार करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे शनिवारी सकाळी ११.३० वाजता पालक वर्षा गायकवाड यांच्या धारावीतील निवासस्थानी पोहोचले, मात्र त्या तेथे रहात नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पालक संघटनांनी थेट शिवसेना भवनाकडे आपला मोर्चा वळवला.शिवसेना भवनावर स्टेट मायनाॅरिटी कमिशनचे अध्यक्ष जे.एम. अभ्यंकर यांनी याप्रकरणी एक बैठक बसवू...

औरंगाबाद: वेब वृत्तपत्रांच्या तुलनात्मक अभ्यासासाठी श्याम टरके यांना पीएचडी

औरंगाबाद| प्रतिनिधी| नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विषयातील पीएच.डी पदवी श्याम बालासाहेब टरके यांना जाहीर झाली. त्यांचा ‘हिंदी व मराठी वेब वृत्तपत्रांचा तुलनात्मक अभ्यास’ हा शोध प्रबंध विद्यापीठाने स्वीकारला. या प्रबंधात राष्ट्रीय पातळीवरील बीबीसी हिंदी, तहलका हिंदी तर प्रादेशिक स्तरावरील उस्मानाबाद लाईव्ह आणि आज लातूर या वेब वृत्तपत्रांचा त्यांनी तुलनात्मक अभ्यास केलेला आहे. त्यांना मार्गदर्शक म्हणून महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू प्रोफेसर डॉ. सुधीर गव्हाणे व सहमार्गदर्शक म्हणून नांदेड विद्यापीठाच्या माध्यम शास्त्र संकुलाचे संचालक तथा विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. दीपक शिंदे यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या या यशाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागाचे सेवानिवृत्त प्राध्यापक तथा जनसंपर्क तज्ज्ञ व हैद्राबाद येथील हिंदी प्रचार सभेचे परीक्षा मंत्री सुरेश पुरी यांनी अभिनंदन केले आहे.  श्री. टरके यांनी यापूर्वी दै.गोदातीर समाचार, दै.मराठवाडा साथी, दै. सकाळ आणि गोवा येथे दै...

नाशिकच्या मराठी साहित्य संमेलनस्थळाचे ‘कुसुमाग्रज नगरी’ नामकरण

नाशिक| अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला देशभरातून साहित्यिक येणार आहेत. याचे सगळे नियोजन करण्याची जबाबदारी स्वागतध्यक्ष म्हणून व एक नाशिककर म्हणून मी पार पाडणार आहे. तसेच नाशिकमध्ये होणाऱ्या संमेलनस्थळाला ‘कुसुमाग्रज नगरी’ म्हणून नामकरण केले असल्याचे, पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी जाहीर केले.  घरोघरी उभारा सहभागाची, सन्मानाची गुढी संमेलनाचा उत्साह आणि आनंद हा केवळ साहित्य संमेलनाचे आयोजन असलेल्या वास्तूभोवती न राहता संपूर्ण शहरात त्याचे प्रतिबिंब उमटायला हवे. यासाठी प्रत्येक नाशिककराने संमेलन काळात आपल्या घरावर या सन्मानाची आणि साहित्य सोहळ्याची गुढी उभारावी. जेणेकरून या उत्सवाच्या निमित्ताने आपल्या शहरात आलेल्या साहित्यिक आणि मान्यवरांच्या मनावर प्रभाव पडेल की, प्रत्येक नाशिककर या सोहळ्यात तितक्यात तन्मयतेने सहभागी झाला आहे, असेही पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले. या संमेलनास शासनामार्फत 50 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून, आमदार निधी मधूनही मदत दिली जाणार आहे. येत्या 50 दिवसांत सूक्ष्म नियोजन करुन संमेलनाची परिपूर्ण नियोजन करण्यात यावे. तसेच संमेलनासाठी आवश्यक असलेल्या सर्व ...

साहित्य संमेलन यशस्वी करण्याची जबाबदारी सर्व नाशिककरांची: स्वागताध्यक्ष ना. भुजबळ

नाशिक| नाशिकमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात देशभरातून येणाऱ्या प्रत्येकाचा यथोचित सन्मान व्हावा ; नाशिकचे साहित्य संमेलन संस्मरणीय व्हावे यासाठी माझ्यासह नाशिकच्या प्रत्येक नागरीकाने स्वागताध्यक्षाच्या भुमिकेतून  संमेलन यशस्वी करण्याची जबाबदारी खांद्यावर घ्यावी, असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी केले आहे.  अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजनाच्या अनुषंगाने गोखले एज्युकेशन सोसायटी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ बोलत होते.  यावेळी यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, आमदार हिरामण खोसकर, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार जयवंतराव जाधव, महापालिकेचे अप्पर आयुक्त सुरेश खाडे, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, उपायुक्त मनोज घोडे पाटील, डॉ.मो.सो.गोसावी, चंद्रकांत महामीने, नगरसेवक शाहू खैरे, गजानन शेलार, जयप्रकाश जतेगावकर, शंकर बोऱ्हाडे, डॉ.कैलास कमोद, दिलीप खैरे, वसंत खैरनार, श्रीकांत बेनी, दत्ता प...

भारतातील सिरम उत्पादित तिसरी लस जुनपर्यंत शक्य: अदर पुनावाला

मुंबई| नोव्हावाक्सची कोरोना व्हायरस लस  कोव्होवॅक्स   यावर्षी  जूनपर्यंत बाजारात दाखल होईल, अशी माहिती सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी दिली आहे. त्यामुळे भारतात निर्मिती केलेली  कोव्होवॅक्स ही तिसरी लस ठरणार आहे. यापूर्वी सिरम आणि अस्त्रजेनेकाच्या कोविशिल्डचे लसीकरण भारतात सुरू आहे. सिरम भागीदारीतून ही दुसरी लस उत्पादित करणार आहे. फोटो: फाईल अमेरिकन लस विकसक नोव्हावाक्सच्या भागीदारीत सिरमतर्फे ही लस विकसित केली जात आहे.  या आठवड्याच्या सुरुवातीस सीरम संस्थेने कोव्होवॅक्सची देशांतर्गत छोट्या छोट्या चाचण्या घेण्यासाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाची परवानगी मागितली. स्वदेशी निर्मित आयसीएमआर आणि भारत बायोटेकची कोव्हाक्सीन आणि कोविशिल्डनंतर  कोव्होवॅक्स ही तिसरी लस ठरणार आहे.

जीएसटीतील जाचक अटी रद्द करा: व्यवसायिकांची मागणी

नाशिक| जीएसटीतील जाचक अटी त्वरीत रद्द करून त्याची अंमलबजावणी करावी, व्यापाऱ्यांना जो निष्कारण दंड व व्याज आकारणी केली जाते  तो सुद्धा बंद करावा अशी मागणी व्यवसायिकांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. जीएसटी प्रशासनाविषयी कर व्यावसायिकांच्या तक्रारी आणि विविध मागण्यांसाठी नाशिकचे सीजीएसटीचे अतिरिक्त आयुक्त अविनाश शेटे, सह आयुक्त अजय बोंडे, एसजीएसटीचे सुभाष टिळेकर यांना भेटून व्यवसायिकांच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॅमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल चव्हाण, नाशिक टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे असोसिएशनचे अध्यक्ष सुनील देशमुख, उपाध्यक्ष निवृत्ती मोरे, सेक्रेटरी राजेंद्र बकरे, चार्टर्ड अकाउंटंट रवी राठी, सोमानी, हेमंत डागा, प्रकाश विसपूते, अक्षय सोनजे उपस्थित होते. याप्रसंगी व्यावसायिकांच्या तक्रारी व मागण्याची माहिती अर्थमंत्र्यांकडे पोहोचवून दिलासा देण्याबाबत पाठपुरावा करू असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.   जीएसटी  भारतात येऊन साधारण तीन वर्ष झाले, पण त्यात दर...

उत्राणे गावाच्या सर्वांगीण विकासावर भर देणार: ॲड.रविंद्र पगार

नामपूर|प्रतिनिधी| उत्राणे गावाचा सर्वांगीण विकास करुन गावच्या जनतेने टाकलेला विश्वास सार्थ करा असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार यांनी केले आहे. बागलाण तालुक्यातील उत्राणे ग्रामपंचायतीची निवडणुक नुकतीच पार पडली. यात नामपुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिपक पगार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलच्या सर्वच्या सर्व ८ जागा मोठ्या मताधिक्याने निवडुन आल्या आहेत. या नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्यांचा सपत्नीक सत्कार गावचे भूमिपुत्र व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार व त्यांच्या पत्नी सौ.संध्या पगार यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी पॅनल प्रमुख दिपक पगार, नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्य केदा पगार, कोमल पगार, रोहिदास आहिरे, आकाश पगार यांची भाषणे झाली. निवडणुकीतील उणीदुणी काढत बसण्यापेक्षा सर्वांना सोबत घेऊन उत्राणे गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील रहावे असे देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार यावेळी बोलतांना सांगितले. राज्य सरकारच्या माध्यमातून असलेल्या  विविध योजना उत्रा...

शासनाने जाहिर केलेल्या डीसीपीआरच्या निर्णयाने बांधकाम क्षेत्राला उभारी: ना. भुजबळ

नाशिक| शेती व बांधकाम व्यवसायाने माणसाच्या जीवनाला स्थैर्य प्राप्त करून दिले आहे. बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध होत असतो. त्यामुळे कोरोनाकाळात थांबलेला बांधकाम व्यवसाय सुरू करून अर्थचक्राला गती देण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या डीसीपीआरच्या निर्णयाने बांधकाम क्षेत्राला उभारी दिली असल्याचे मत, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.  कोर्टयार्ड मॅरिएट येथे आयोजित क्रेडाई शिखर परिषदेत मार्गदर्शन करतांना पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते. यावेळी क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीष मगर, क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष राजीव पारख, माजी सचिव महेश झगडे, सुनील कोतवाल, रवी महाजन, अनिल महाजन, डॉ. कैलास कमोद उपस्थित होते. पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, शासनाने स्टम्प डयुटीवर सूट दिल्यामुळे बांधकाम क्षेत्राच्या विकासाला गती मिळाली. तसेच गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित असलेला डीसीपीआरचा प्रश्न शासनाने सूक्ष्म अभ्यास करुन सुटसुटीत पध्दतीने मांडला आहे. यात पार्किंग क्षेत्रासाठी असलेले क्लिष्ट नियम सोपे केले असून, य...

जिल्हा नियोजन समितीतर्फे जिल्ह्याच्या विकासासाठी ७३२ कोटी ७१ लाखांची तरतूद

नाशिक| पुढील 2021-22 या वर्षाकरिता सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत 348 कोटी 86 लाख, आदिवासी उपाययोजनेंतर्गत 283 कोटी 85 लाख आणि अनुसूचित जाती उपाययोजनेंतर्गत 100 कोटी रूपये अशा 732 कोटी 71 लाख रुपयांचा नितव्यव मंजूर करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी अजून वाढीव 190 कोटींचे नियोजन करण्यात यावे, अशा सुचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी कृषीमंत्री दादाजी भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मालेगावच्या महापौर ताहेरा शेख, आमदार सर्वश्री नरेंद्र दराडे,  माणिकराव कोकाटे, किशोर दराडे, दिलीप बनकर, नितीन पवार, हिरामण खोसकर, सरोज आहिरे, सीमा हिरे,  सुहास कांदे, राहुल ढिकले, दिलीप बोरसे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस अधीक्षक सचिन पाटील,...

साईबाबा हार्ट इन्स्टिट्युटतर्फे आयोजित आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा प्रतिसाद

चांदवड| श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट आणि रिसर्च सेंटर व श्री साईकृपा रिसर्च फाऊंडेशन, नाशिक आणि चांदवड भोयेगाव येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी जिप प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मधुमेह आणि हृदयरोग निदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात १०० रुग्णांची तपासणी करून तज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. चांदवड तालुक्यातील भोयेगाव येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय  शाळेत  सकाळी १० ते दु . ३ वा. दरम्यान तपासणी शिबीर झाले. यावेळी ग्रामस्थ तसेच परिसरातील नागरिकांना शिबीरात डॉ. किरण पांडव एमडी(अतिदक्षता तज्ञ) यांनी रुग्णांच्या तपासण्या करुन मार्गदर्शन केलं, तज्ञ डॉक्टरांमार्फत ब्लडप्रेशर, रक्तातील साखर, गरज भासल्यास ई.सी.जी. करण्यात आले. ( मोफत मधुमेह आणि हृदयाची रोग निदान तापसणी शिबीर )  यावेळी डॉ. किरण पांडव, संतोष आहेर, सचिन चव्हाण, कल्पेश वाळके, विनोद भदाणे, श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूटची टीमने शिबिरासाठी उपस्थित राहून विशेष परिश्रम घेतले. तसेच भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी शाळेचे मुख्याध्यापक निवृत्ती आहेर  व सर्व शिक्षक वृंद यांचे ही मोला...

पिंपरीआंचल येथे लवकरच सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित : खा.डॉ.भारती पवार

नाशिक| माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी  ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे जनक असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत दिंडोरी तालुक्यातील पिंपरी आंचलगावी सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम पूर्णत्वास गेले असून लवकरच या प्रकल्पाच्या माध्यमातून वीज निर्मितीला सुरवात होणार आहे.  या प्रकल्पातुन रोज सुमारे 3 मेगावॅट विज निर्माण होणार आहे.  प्रकल्पामुळे गावातील शेतकऱ्यांना दिवसा विज पुरवठा होणार असून त्यांची विजे अभावी होणारी परवड थांबणार आहे. सध्या लासलगाव, वणी या ठिकाणी हे सौर ऊर्जेचे प्रकल्प सुरू असून आता पिंपरीआंचल व निगडोळ येथे नवीन प्रकल्प कार्यान्वित होत आहेत.  केंद्र सरकारच्या अख्यारीतीत विज कंपन्यांच्या संलग्न असणाऱ्या E C L कंपनी या प्रकल्पाची देखरेख करणार असून ह्यांच्या माध्यमातून या सौरऊर्जा प्रकल्पाचे कामकाज चालणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौर ऊर्जेवर अधिकाधिक भर दिला असून भविष्यात देशाला लागणारी अधिकची विज ही सौर ऊर्जेच्या माध्यमातून निर्माण करण्यावर भर देणार आहे असे प्रकल्प दिंडोरी लोकसभा मतदार संघातील अनेक गावांमध्ये राबविणार असल्याचे खा.डॉ...

आरोग्य विद्यापीठाने संशोधन केंद्र बनवून जागतिक ठसा उमटावावा: राज्यपाल कोश्यारी

नाशिक|आरोग्य क्षेत्रात जास्तीत जास्त संशोधन कार्य करुन नाशिक हे तीर्थक्षेत्रासमवेत आरोग्य विद्यापीठ हे संशोधनाचे केंद्र बनवून त्याचा जागतिक ठसा उमटवावा असे प्रतिपादन विद्यापीठाचे मा. कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले.  आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा ऑनलाईन विसाव्या दीक्षान्त समारंभाप्रसंगी केले. ते या समारंभास ऑनलाईन उपस्थित होते. या समारंभास मा. कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर, प्रति-कुलगुरु डॉ. मोहन खामगांवकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, वित्त व लेखा अधिकारी नरहरी कळसकर, विद्यापीठ विद्याशाखांचे अधिष्ठाता डॉ. सचिन मुंब्रे, डॉ. जयंत पळसकर, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. धनाजी बागल, डॉ. राजश्री नाईक आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या दीक्षांत समारंभातील अध्यक्षीय भाषणात मा. कुलपती तथा राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांनी सांगितले की, कोविड-19 आजाराच्या परिस्थितीत आरोग्य शिक्षणातील सर्व विद्याशाखांनी एकत्र येऊन आरोग्य विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय काम केले याबद्दल मला अभिमान आहे.आरोग्य आणि शिक्षण या...

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई, अण्णांचे उपोषण स्थगित

राळेगणसिद्धी| केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दि. ३० रोजी राळेगणसिद्धी येथे उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री कैलाश चौधरी यांच्यासह अण्णांची राळेगणसद्धीमध्ये भेट घेत यशस्वी शिष्टाई करून अण्णांचे मन वळविण्यात आले. त्यानंतर अण्णांनी उपोषण स्थगित केल्याचे फडणवीस यांनी सांगितले लोकशाहीत चर्चेतूनच मार्ग निघत असतात आणि अण्णा हजारे यांची लोकशाहीवर दृढ श्रद्धा आहे. अण्णांच्या विविध मागण्यांसंदर्भात केंद्रीय कृषीमंत्री, नीती आयोग सदस्य आणि मा. अण्णा हजारे यांचे प्रतिनिधी अशी एक उच्चस्तरिय समिती गठीत करण्यात येत आहे.  देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा उच्चस्तरिय समितीचे गठन होते आहे. यापूर्वी अण्णा हजारे यांनी केलेल्या मागण्या आणि त्या पूर्ण केल्यासंबंधीचा अहवाल सुद्धा यावेळी त्यांना सादर केला. मा. अण्णा हजारे यांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचे पुनश्च एकदा आभार मानतो असे फडणवीस म्हणाले.

आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा शुक्रवारी ऑनलाईन दीक्षांत समारंभ

नाशिक| महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा विसावा दीक्षान्त समारंभ शुक्रवार दि. 29 जानेवारी 2021 रोजी नाशिक येथे ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे.  याबाबत अधिक माहिती देतांना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी सांगितले की, विद्यापीठाचा ऑनलाईन दीक्षांत समारंभात विद्यापीठाचे मा. कुलपती तथा राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या समारंभास विद्यापीठाचे प्र-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य खात्याचे मंत्री मा.नामदार श्री. अमित देशमुख आदी मान्यवर ऑनलाईन उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.  याबाबत अधिक माहिती देतांना विद्यापीठाचे प्रति-कुलगुरु डॉ. मोहन खामगांवकर यांनी सांगितले की, विद्यापीठाचा विसावा दीक्षांत समारंभाचे विद्यापीठाच्या अधिसभागृहात सकाळी 11.00 वाजता आयोजन करण्यात आले असून या समारंभात ऑनलाईन पध्दतीने विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत अधिक माहिती देतांना कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले की,  विविध विद्याशाखांच्या पदवीका, पदवी, पदव्युत्तर अभ...

'बर्ड फ्लू' बाबत जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी: ना. भुजबळ

नाशिक| जिल्ह्यात आता बर्ड फ्लूने आपले डोके वर काढले. बर्ड फ्ल्यू बाबत जिल्हा प्रशासन अगोदरपासूनच सतर्क असून त्याबाबत काळजी घेतली जात होती. मात्र आज दुर्दैवाने जिल्ह्यात बर्ड फ्लूच्या केसेस आढळून आल्या आहे. याबाबत जिल्हा प्रशासनासोबत फोनद्वारे संपर्क करून योग्य त्याना आवश्यक त्या उपयायोजना करण्याच्या सूचना दिलेल्या असून मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा मुद्दा मांडला जाणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. एकीकडे कोरोनाचे संकट दूर होत असतांना जिल्ह्यात आता बर्ड फ्लूने आपले डोके वर काढले. बर्ड फ्ल्यू बाबत जिल्हा प्रशासन अगोदरपासूनच सतर्क असून त्याबाबत काळजी घेतली जात होती. मात्र आज दुर्दैवाने जिल्ह्यात बर्ड फ्लूच्या केसेस आढळून आल्या आहे. याबाबत जिल्हा प्रशासनासोबत फोनद्वारे संपर्क करून योग्य त्याना आवश्यक त्या उपयायोजना करण्याच्या सूचना दिलेल्या असून मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा मुद्दा मांडला जाणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

एनसीपी प्रमुख खा. शरद पवार आंदोलनाविषयी काय म्हणाले..!

मुंबई| कृषी कायद्याविषयीची चर्चा २००३ पासून सुरू आहे. माझ्याकडे कृषी खात्याची जबाबदारी असतानाही ही चर्चा सुरू होती. सर्व राज्यांच्या कृषी व पणन मंत्र्यांच्या बैठकीत आणि माझ्या उपस्थितीत बऱ्याच विषयांवर चर्चा झाली होती. नंतर निवडणुका झाल्या. नवीन सरकार आले आणि हा विषय मागे पडला, असे खा. शरद पवार यांनी सांगितले. Photo-File ते पुढे म्हणाले, अलिकडेच केंद्र सरकारने तीन कायदे संसदेत मांडले. कायदे मांडण्याला आमचा विरोध नाही. पण त्यावर सविस्तर चर्चा व्हावी. त्यातून सिलेक्ट कमिटीकडे कायदे पाठवावेत. तिथं चर्चा करुन निर्णय घ्यावा ही अपेक्षा होती. परंतु केंद्र सरकारने थेट कायदे मांडून गोंधळात कायदे मंजूर केले. तेव्हापासूनच मला वाटत होते, याची कधीना कधी प्रतिक्रिया उमटणारच. कृषी कायद्याबाबत सविस्तर चर्चा व्हावी अशी आमची भूमिका आहे. सविस्तर चर्चेला मर्यादा असतील तर ही बिले सिलेक्ट कमिटीकडे पाठवण्यात यावीत. सिलेक्ट कमिटीमध्ये सविस्तरपणे चर्चा करून निर्णय घेता येईल. मागचे ६० दिवस पंजाब, हरियाणा आणि वेस्टर्न यूपीतील शेतकर्‍यांनी अतिशय संयमितपणे आंदोलन केले. संयम दाखवून कडाक्याच्या थंडीत आंदोलन करणे ही ...

'हॉटेल शिवार'च्या रूपाने खवय्यांना मिळणार स्वादिष्ट भोजनाची मेजवानी

नाशिक| नाशिकपासून जवळच टोलनाक्याच्या अलीकडे महामार्गावरच माडसांगवी या निवांत ठिकाणी हॉटेल शिवार ग्राहकांच्या सेवेत रूजू झाले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक आणि येणाऱ्या- जाणाऱ्या प्रवाश्यांना हक्काचे स्वादिष्ट आणि आवडीचे भोजनाचे ठिकाण उपलब्ध झाले आहे. नाशिक हे विविध रुचकर पदार्थांसाठी सर्वत्र प्रसिध्द आहे, इथली मिसळ जशी राज्यभर प्रसिध्द आहे. तसेच येथील व्हेज आणि नॉनव्हेज भोजनही चवदार आणि ओळख वेगळी असलेलं आहे. येथे व्हेज, नॉनव्हेज थाळी मिळणारच आहे, तसेच मिसळ थाळीची चव खवय्यांना हवी हवीशी वाटेल, खास झणझणीत तर्रिदार रसा असलेली मिसळ खवय्यांच्या पसंतीस उतरेल, संपूर्ण परिवारासाठी हॉटेल शिवार एक निवांत आणि चांगले ठिकाण आहे. प्रशस्त बैठक व्यवस्था आणि मनोरंजनाची व्यवस्था असणार आहे. तसेच वेगळ्या धाटणीने तयार केलेले चिकन, मटण  आणि त्यासोबत बाजरी, ज्वारी, आणि नागलीची भाकर जेवणाची लज्जत वाढवणारी आहे. स्वादिष्ट, रुचकर भोजन हवे असेल तर चला मग आपल्या शिवारला! एकदा शिवारला भेट दिली की, पुन्हा आल्याशिवाय चैन पडणार नाही. त्यामुळे संपूर्ण फॅमिलीसह नागरिकांनी शिवारला एकदा तरी भेट द्यावी असे आवाहन ...

शिर्वे गावातील जिप शाळेत साई कॉम्पिटिशन अकॅडमीतर्फे शालेय साहित्याचे वाटप

नंदूरबार| शिर्वे गावातील जिल्हा परिषदच्या मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप साई कॉम्पिटिशन अकॅडमी संचालक एनजी वसावे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे दिसत होता . शहरासह आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे महत्व पटवून देणारी संस्था म्हणून साई  कॉम्पिटिशन अकॅडमी प्रसिद्ध आहे. विविध स्पर्धा परीक्षेची तयारी संस्था करून घेत असते. तसेच शैक्षणिक मार्गदशन केले, शाळेच्या स्तरावरच स्पर्धा परीक्षेचे महत्व कळावे यासाठी विविध उपक्रम साई  अकॅडमी राबवत असते.  नुकतेच साई कॉम्पिटिशन अकॅडमीतर्फे संचालक एनजी वसावे यांच्या हस्ते शिर्वे गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत वही, पुस्तके आणि पेन वाटप करण्यात आले प्रमुख उपस्थिती गावातील सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य आणि असंख्य पद्धतीने गावकरी उपस्थित होते विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य वाटपाची काही क्षणचित्रे