Skip to main content

आधुनिक सुविधायुक्त हॉस्पिटल्ससह सीजीएचएस वेलनेस सेंटरच्या विस्तारीकरणावर भर देणार: डॉ. भारती पवार

मुंबई| नाशिक| एम्स राज्यात नागपूर येथे आहे, एका राज्यात एकच एम्स असल्याने त्यामुळे येथे ते देता येत नसले तरी सीजीएचएस वेलनेस सेंटरच्या माध्यमातून आधुनिक सुविधा युक्त हॉस्पिटल्स तयार करून त्याच्या विस्तारीकरणासाठी पुढील काळात प्रयत्न केले जातील अशी ग्वाही केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती प्रवीण पवार यांनी आज येथे दिली. 
CGHS-will-focus-on-expansion-of-wellness-center-with-modern-facilities-Dr-Bharti-Pawar
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती प्रवीण पवार यांच्या हस्ते आज केंद्र सरकारच्या आरोग्य योजने अंतर्गत गांधीनगर नाशिक येथील नवीन अॅलोपॅथिक निरामय स्वास्थ्य केंद्राचे उद्घाटन झाले. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना त्याबोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर महापौर सतीश कुलकर्णी, खा. हेमंत गोडसे, आ. देवयानी फरांदे, ज्येष्ठ भाजप नेते लक्ष्मण सावजी, भाजप शहराध्यक्ष गिरीष पालवे, आ. सीमा हिरे, आ. सरोज अहिरे, विजय साने, नगरसेवक अनिल ताजनपुरे, राहुल दिवे, नगरसेविका सुषमा पगारे, कुणाल वाघ, दिल्ली येथील सीजीएचएसचे संचालक निखिलेश चंद्र आणि मुंबई येथील सीजीएचएसच्या अवर संचालक डॉ.डी.एम.देसाई, प्रेस कामगार युनियनचे अध्यक्ष राम हरक, सचिव रवी आवरकर यांच्यासह सीजीएचएस केंद्राचे अधिकारी, प्रेस कर्मचारी युनियनचे सभासद व पदाधिकारी, केंद्र सरकारचे सेवारत आणि निवृत्तीधारक उपस्थित होते. 
आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवार पुढे म्हणाल्या की, हे सरकार केंद्राच्या सेवारत कर्मचाऱ्यांचा निवृत्तीनंतर देखील काळजी घेणारे सरकार आहे. नरेंद्र मोदींच्या माध्यमातून देशाला असे पंतप्रधान लाभले आहे ज्यांनी आपल्या कार्यकाळात विकासाला गती दिली आहे. ७० वर्षात जे झाले नाही त्यांनी करुन दाखविले. माजी पंतप्रधान अटबिहारी वाजपेयी यांच्या काळात ७ एम्स होते. मोदींच्या नेतृत्वात आता २२ एम्स उभे राहिले. १५७ वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी दिली. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, महापौर सतीश कुलकर्णी, केंद्र सरकारच्या कर्मचारी युनियननी सातत्याने सीजीएचएस वेलनेस केंद्राची मागणी केली. मी देखील वेळोवेळी पाठपुरावा केला. निवृत्तीधारकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिले त्यासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्नशील होते. त्यात नाशिक जिल्ह्याला केंद्रात मंत्रीपद लाभल्याने वेलनेस सेंटरचा प्रश्न मार्गी लावण्यात यश आले. चांगली वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी या वेलनेस सेंटरच्या यादीत आणखी हॉस्पिटलचा समावेश करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.


नाशिक सीजीएचएस सेंटर महाराष्ट्रतील चौथे शहर: आ. देवयानी फरांदे
 
सीजीएचएस सेंटरच्या माध्यमातून नाशिक शहरासाठी ही मोठी उपलब्धी आहे. नाशिक सीजीएचएस वेलनेस सेंटर हे मुंबई, पुणे आणि नागपूरनंतर महाराष्ट्रातील चौथे शहर आहे. या ठिकाणी मोठी जागा उपलब्ध आहे, त्यामुळे येथे एखादा मोठा कारखाना किंवा मोठा प्रकल्प आणावा अशी मागणी या मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधी म्हणून आ. देवयानी फरांदे यांनी केली. 

केंद्राच्या सुमारे दीड लाख सेवारत आणि निवृत्ती धारकांना फायदा: महापौर सतीश कुलकर्णी

महापौर सतीश कुलकर्णी यांनी एम्सच्या तोडीचे हॉस्पिटल बनवता येईल का यावर मंत्र्याचे लक्ष वेधले. तसेच ते म्हणाले, केंद्र सरकारच्या सीजीएचएस वेलनेस सेंटरच्या माध्यमातून चांगली सेवा उभी राहिली आहे. या सेवेचा लाभ केंद्राच्या १.६ लाख सेवारत आणि निवृत्तीधारकांना लाभ मिळणार आहे. त्यात आणखी दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याची त्यांनी मागणी केली.

निवृत्तीधारकांची संख्या बघता आणखी १० केंद्रांची गरज: खा. हेमंत गोडसे

केंद्र सरकारच्या कामगार संघटनांनी केलेला पाठपुरावा, त्यासाठी सातत्याने संसदेत केलेली मागणी केली. मात्र संसदेत नुसते प्रश्न मांडून चालत नाही तर सातत्यपूर्ण पाठपुरावा करावा लागतो. केंद्राने १६ सेंटरला परवानगी दिली त्यात नाशिक हे पहिले केंद्र ठरले आहे. या केंद्रासाठी जागेची आवश्यकता होती. आदी सिडको आणि इतर ठिकाणी शोध घेतला पण गांधीनगरची जागा योग्य असल्याने या ठिकाणी केंद्र निश्चित झाले, असे सांगून निवृत्तीधारकांची सख्या बघता अशा आणखी १० केंद्रांची गरज असल्याचे खा. हेमंत गोडसे यांनी सांगितले


सध्या संपूर्ण देशातील 74 शहरांमधील अंदाजे 38.5 लाख लाभार्थी केंद्र सरकारी आरोग्य योजनेत समाविष्ट आहेत. सरकारी आणि सीजीएचएस योजनेअंतर्गत समाविष्ट केलेल्या निवृत्तीवेतनधारक आणि इतर निवडक लाभार्थ्यांसाठी या योजनेत समाविष्ट केलेल्या केंद्रांमध्ये उपचारांसाठी उपलब्ध रोखरहित सुविधा, आपत्कालीन परिस्थितीत शासकीय/खासगी रुग्णालयांमध्ये घेतलेल्या उपचारांच्या खर्चाची परतफेड, श्रवणयंत्र, कृत्रिम अवयव, उपकरणे इत्यादी खरेदीसाठी झालेल्या खर्चाचा परतावा  आणि कुटुंब कल्याण, माता आणि बाल आरोग्य सेवा यासह नाशिकमधील सीजीएचएस निरामय स्वास्थ्य केंद्र  ओपीडी अर्थात बाह्य रुग्ण विभागाद्वारे  उपचार प्रदान करेल.

सीजीएचएस निरामय स्वास्थ्य केंद्राचा शहरातील सुमारे 71,000 सेवारत आणि निवृत्तीवेतनधारक केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह सुमारे 1.6 लाख लाभार्थ्यांना फायदा होईल. यापूर्वी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सीजीएचएस निरामय स्वास्थ्य केंद्राचे उपचार घेण्यासाठी मुंबई किंवा पुण्याला जावे लागत होते.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...