Skip to main content

Posts

Showing posts from November, 2022

सुदृढ, पारदर्शक,बळकट लोकशाहीसाठी तरुणांनी मतदार यादीत नाव नोंदवावे: श्रीकांत देशपांडे

ठाणे| मतदार यादीत नाव येण्यासाठी काय करावे लागेल, कोणता फॉर्म भरावा लागेल, अर्ज ऑनलाईन करायचा की ऑफलाईन, मतदार यादीत नावासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतील, अर्ज कुठे करावा, नाव नोंदणी अर्ज सादर करणे ते ओळखपत्र मिळणे या दरम्यान किती वेळ लागतो, मत दिलेल्या उमेदवारांने त्या मताचा गैरवापर केला तर काय करायचे … तरुणाईला पडलेल्या अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत शिंदे आणि जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडून ठाण्यातील विद्यार्थ्यांनी जाणून घेतली. समृद्ध, सुजाण व बळकट आणि पारदर्शक लोकशाही प्रक्रियेसाठी तरुणांनी मतदार यादीत नाव नोंदणी करून मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन यावेळी श्री. देशपांडे यांनी केले. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी, ठाणे जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय आणि ठाण्यातील के. ग. जोशी कला व ना. गो. बेडेकर वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत आयोजित लोकशाही गप्पा – भाग 7 अंतर्गत ‘कशी होते मतदार नोंदणी’ या परिसंवादात मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक  अधिकारी ...

आरोग्य विज्ञान विद्यापीठात बालक शोषणाविरोधात जनजागृती पदयात्रेचा समारोप

नाशिक| जागतिक बालक शोषण विरोध दिनानिमित्त जनजागृती करण्यासाठी औरंगाबाद ते आरोग्य विद्यापीठ दरम्यान  महात्मा गांधी मिशन इन्स्टिटयुट ऑफ फिजीओथेरपी महाविद्यालयाच्या सत्तर पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या रॅलीचा समारोप आरोग्य महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात करण्यात आला. दि. 17 नोव्हेंबर  पासून औरंगाबाद येथून या रॅलीचा प्रारंभ करण्यात आला होता. या  रॅलीचा प्रमुख उद्देश हा बाललैंगिक शोषणाच्या विरोधात जनजागृती व प्रबोधन करण्याचा होता. या 210 किलोमीटरच्या रॅली दरम्यान विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी पथनाटयाव्दारे संदेश देण्याचे कार्य केले.    याप्रसंगी विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प. यांनी दृकश्राव्य संदेशाव्दारे सांगितले की, सक्षम आणि संवेदनाशील पिढी घडविण्यासाठी बाल अवस्थेत मुलांना सुयोग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे असते असे त्यांनी सांगितले. विद्यापीठाच्या प्रवेशव्दारापासून ते विद्यापीठ परिसरापर्यंत विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या रॅलीत सहभाग नोंदविला. या कार्यक्रमास विद्यार्थी कल्याण...

..आता मराठा समाजाला १० टक्के आणि ओबीसींना हक्काचे २७ टक्के आरक्षण द्या: छगन भुजबळ

नाशिक|मागासवर्गीयांच्याआरक्षणाला असलेली घटनेची ५० टक्क्यांची मर्यादा आर्थिक दुर्बल घटकांसाठी शिथिल करता येते तर मग मराठा आरक्षणासाठी ही मर्यादा शिथिल का केली जात नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न भिजत का ठेवला जातो आहे असा सवाल उपस्थित करत आर्थिक आरक्षणामुळे आता आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली आहे. मग आता मराठा समाजाला १० टक्के आणि आदिवासी बहुल स्थानिक स्वराज संस्थांमध्ये ओबीसी घटकाला त्यांच्या हक्काचे २७ टक्के आरक्षण द्या अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची नाशिक शहर व जिल्हा कार्यकारिणीची बैठक नाशिक येथील राष्ट्रवादी भवन येथे पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार बांधवांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने आर्थिक दुर्बल घटकांसाठी १०% आरक्षणाची तरतूद करणारी १०३ वी घटनादुरुस्ती तीन विरुद्ध दोन मतांनी वैध ठरवली आहे. जाती आधारित आरक्षणाचा लाभ मिळत असलेल्या एस.सी.-एसटी आणि ओबीसी समाजाला आर्थिक आरक्षणाचा पर्याय...

नाशिक- बेळगाव विमानसेवा जानेवारी २०२३ पासून सुरू होण्याची चिन्हे

नाशिक|नाशिक ते बेळगाव विमानसेवा जानेवारी २०२३ पासून सुरु होणे अपेक्षित असून कोविडमुळे उडान योजनेचा कार्यकाळ पूर्ण न करू न शकलेल्या अलायन्स एअरला उडान योजनेअंतर्गत कालावधी वाढवून देणे विचाराधीन असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना पत्राद्वारे दिली अशी माहिती आयमाचे पदाधिकारी मनीष रावल यांनी दिली आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी विमान कंपन्यांना उडान अंतर्गत किमान २ वर्षे मुदतवाढ द्यावी अशी मागणी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. याबाबत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी छगन भुजबळ यांना पत्र पाठवून नाशिक विमानसेवा पूर्ववत करण्याबाबत माहिती दिली आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले होते की, भारत सरकारने टियर वन आणि टियर टू शहरांमधील हवाई संपर्क वाढवण्यासाठी उडान योजना सुरू केली आहे. रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम अंतर्गत विविध क्षेत्रांच्या बोलीमध्ये नाशिक एचएएल विमानतळाचा...

विद्या प्रबोधिनी प्रशाला इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बिरसा मुंडा यांची जयंती साजरी

नाशिक| सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित विद्या प्रबोधिनी प्रशाला इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवन कार्याचा परिचय शाळेच्या संस्कृत शिक्षिका सौ. स्मिता जोशी यांनी करून दिला कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका डॉक्टर अंजली सक्सेना, उपमुख्यध्यापिका नायडू , पर्यवेक्षिका प्रियंका भट, श्री. दुसाने सर यांचे मार्गदर्शन लाभले.  कार्यक्रमात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनींचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. तसेच भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवन कार्यावर आधारित डॉक्युमेंटरी फिल्म चे सादरीकरण करण्यात आले. या डॉक्युमेंटरीत शालेय विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. डॉक्युमेंट्री तयार करण्यासाठी मुख्याध्यापिका डॉक्टर अंजली सक्सेना,  सौ. स्मिता जोशी,  सौ कोमल मसरणी, सौ प्रियांका शेळके आणि  सौ नेहा लोणीकर,  सौ. दलाल,  सौ. वनिता महाजन यांचे सहकार्य लाभले.

भारत जोडो यात्रेत शिवसेना नेते आदित्य ठाकरेंचा सहभाग

वारंगा,हिंगोली| भारत जोडो यात्रेत शिवसेना नेते आदित्य ठाकरे सहभागी झाले. हिंगोली जिल्ह्यातील चोरंबा फाटा येथून ते पदयात्रेत सहभागी झाले. त्यांच्याबरोबर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आ. सचिन अहिर, नांदेडचे संपर्क प्रमुख, माजी खासदार सुभाष वानखेडे पदयात्रेत सुमारे पाच किलोमीटर चालले. यावेळी राहुलजी आणि आदित्य यांच्यात चर्चा रंगली होती. सुमारे सहाच्या सुमारास आदित्य ठाकरे पदयात्रेतून बाहेर पडले. संध्याकाळी ७ वाजता वरंगा फाट्या येथे स्थानिकांशी राहुलजी गांधी यांनी संवाद साधला. यावेळी दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. हिंगोली जिल्ह्यात पदयात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. एकाचवेळी असंख्य मुखातून 'भारत जोडो'च्या घोषणा, हातात तिरंगी झेंडे...कौशल्याने कोरलेल्या मोठमोठ्या आकर्षक रांगोळ्या....आणि राहुलजी गांधी यांची एक झलक पाहण्यासाठी खिळलेले हजारो डोळे...यात्रेतील हजारो नागरिकांच्या विराट जनसागराच्या साक्षीने सायंकाळी 4.14 वाजता पदयात्रेने हिंगोली जिल्ह्यात प्रवेश केला होता. यावेळी शेकडो शिवसैनिक हातात मशाली घेऊन पदयात्रेत सहभागी झाले होते. भल्...

समाजासाठी आरोग्य शिक्षण, संशोधन आणि रोग निदान त्रिसूत्री महत्वाची: भगत सिंह कोश्यारी

नाशिक| समाजासाठी आरोग्य शिक्षण, संशोधन आणि रोगनिदान त्रिसूत्री महत्वाची असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे मा. कुलपती तथा राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे पुणे येथील डॉ. घारपुरे मेमोरिअल जेनेटिक लॅब व कॅन्सर रिसर्च सेंटरचे उद्घाटन, नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट आणि नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स यांच्या समवेत परस्पर सामंजस्य कराराचे आदान-प्रदान  करण्यात आले व ‘मानस’ अँप प्रारंभ विद्यापीठाचे मा. कुलपती तथा राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले.  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. राज्यपाल यांच्या समवेत विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प., भारतीय औषध संशोधन संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुहास जोशी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या प्रसंगी अध्यक्षीय भाषणात मा. मा. कुलपती तथा राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांनी सांगितले की, आरोग्य शिक्षण आणि संशोधन या पायाभूत संकल्पना आहेत. विविध रोग व त्यावर उपचार शोधण्यासाठी मोठया प्रमाणात प्रयत्न करण्यात येतात. संश...

वडाळीभोई येथे हृदयरोग निदान शिबिर संपन्न

नाशिक| वडाळी भोई येथे जयश्री राम ज्येष्ठ नागरिक संघ व श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं मोफ़त हृद्यरोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. २०० हून अधिक रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला. या प्रसंगी हृदयरोग व मधुमेह तज्ञ डॉ कुणाल निकम यांनी उपस्थित नागरिकांना आहार, विहार व व्यायामचे महत्व पटवून देत मार्गदर्शन केले. या प्रसंगी डॉ अखिल पवार (एम डी), डॉ शिद्धार्थ जेउघाले (एम डी), डॉ शैलेश बडवर (एम डी), राहुल वाजे, नितिन पाटील व जेष्ठ नागिरक संघाचे सभासद डॉ. एन डी आहेर, नानाभाऊ आहेर, अर्जून बाबा, निवृत्ती आहेर, शिंदे बाबा, बाळासाहेब जाधव, जयराम जाधव, पूंजाराम जाधव व ग्रामस्त उपस्थित होते. या शिबिरात रुग्णांची रक्त शर्करा, ब्लड प्रेशर, कार्डियोग्राम (ई.सी.जी) तज्ञ डॉक्टरांचा सल्ला व गरजे नुसार मेडिसिन मोफ़त देण्यात आले. बऱ्याच रुग्णांना मधुमेह (डायबेडिस) व उच्च रक्तदाब असल्याचे तपासणी केल्यावर समजले. निदान करुन डॉ कुणाल निकम व सहकाऱ्यांनी मार्गदर्शन व औषधोपचार सुरू केला. हे शिबिर घेण्याचा उद्देश्य सफल झाल्याचं गावचे नागरिक शिबीराचे आयोजक श्री संतोष नानाभ...

नोटबंदी आणि जीएसटीने भारताची अर्थव्यवस्था बर्बाद केली: राहुल गांधी

नांदेड|नरेंद्र मोदी यांनी आजच्याच दिवशी 6 वर्षांपूर्वी रात्री 8 वाजता टीव्ही वर येऊन हजार व पाचशे रुपयांच्या नोटा बंद केला. तर जीएसटी चुकीच्या पद्धतीने लागू करून देशातील लहान, छोट्या उद्योगांवर मोठा आघात केला. नरेंद्र मोदी यांच्या या दोन्ही निर्णयाने देशाची अर्थव्यवस्था बर्बाद केली, असा घणाघाती हल्ला खा. राहुलजी गांधी यांनी केला. भारत जोडो यात्रेच्या महाराष्ट्रातील दुस-या दिवशीची पदयात्रेची सांगता भोपाळा गाव येथील छोटेखानी सभेने झाली. यावेळी नरेंद्र मोदी यांच्यावर राहुल गांधी यांनी टीकास्त्र सोडले. राहुलजी गांधी पुढे म्हणाले की, देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेले छोटे, मध्यम, लघु उद्योगाचे मोठे नुकसान झाले, लाखोंच्या संख्येने उद्योग बंद पडले, लाखो रोजगार गेले. तर नोटबंदीच्या लहरी निर्णयानेही नुकसान झाले. दोन्ही निर्णयाने देशाचे मोठे नुकसान व केवळ दोन-तीन उद्योगपतींचा फायदा झाला. शेतक-यांचे कर्ज माफ होत नाही पण मोठ्या उद्योगपतींचे लाखो कोटी रुपयांचे कर्ज मात्र माफ होते. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग भांडवलदारांना विकले जात आहेत परिणामी तरुणांना नोकरी मिळणे दुरापास्त झाले आहे. देशात द...

भारत जोडो यात्रेच्या स्वागतासाठी टाकळी-नांदेड मार्गावर लोटला जनसागर

वन्नाळी,नांदेड|भारत जोडो यात्रेच्या महाराष्ट्रातील दुसऱ्या दिवशी किमान ४ ते ५ किलोमोटर पर्यंत गाड्या आणि माणसांची गर्दी दिसत होती. टाकळी नांदेड मार्गावर कित्येक किलोमीटरवर पदयात्रेतील वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. काँग्रेस कार्यकर्ते, लहान मुले मोठ्या कुतूहलाने आपल्या पालकांसमवेत यात्रेत सहभागी झाले होते. राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेला पाठींबा देण्यासाठी जनसागर रस्त्यावर उतरला होता. मंगळवार दिनांक ८ रोजी सकाळी ८.३० वाजता वन्नाळी गुरुद्वारा येथून पदयात्रेला सुरूवात झाली. छोटी मुले, महिला आणि युवा वर्ग मोठया उत्साहात यात्रेत सहभागी झाला होता. वझरगा (अटकळीजवळ) येथे आल्यानंतर साडे नऊ वाजता यात्रेने विश्रांती घेतली. पुन्हा सायंकाळी 4 वाजता खतगाव फाट्यावरून पुन्हा यात्रेला मोठ्या जल्लोषात सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन मोठ्या संख्येने युवा वर्ग या यात्रेत सामील झाला होता. ३० ते ४५ वयोगटातील तरुणांची संख्या जास्त होती. दुपारच्या कडक ऊन्हात रस्त्यावर आणि रस्त्याच्या आजूबाजूला गर्दी पदयात्रेत सामील होण्याची वाट पाहत होती. ४ वाजून १० मिनिटांनी रस्त...

भारत जोडो यात्रा: हातात मशाल घेऊन राहुल गांधींची महाराष्ट्रात एन्ट्री

नांदेड, देगलूर| कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत सुरु असलेल्या भारत जोडो यात्रेचा उद्देश देश जोडण्याचा आहे. देशात सध्या द्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे. या भारत तोडोच्या विरोधात भारत जोडो यात्रा आहे. ही पदयात्रा काश्मीरपर्यंत कोणीही रोखू शकत नाही. या पदयात्रेदरम्यान पुढील १४ दिवस महाराष्ट्रातील जनतेचे दुःख समजून घेण्यासाठी आम्ही आलो आहोत, असे खा. राहुलजी गांधी यांनी म्हटले आहे. हजारो मशाल हाती घेऊन राहुल गांधी यांच्यासह भारतयात्री सोमवारी रात्री तेलंगणातून महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे प्रवेश केला. तेलंगणातून महाराष्ट्रात पदयात्रा येताच तेलंगणा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष रेवंत रेड्डी यांनी तिरंगा झेंडा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हाती सोपवला. यावेळी राहुल गांधी यांचे मराठमोळ्या पद्धतीने औक्षण करण्यात आले. राहुलजी गांधी देगलूर येथे जमलेल्या हजारो जनसमुदाला संबोधित केले. आपल्या भाषणाची सुरुवात राहुलजी गांधी यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशी घोषणा देऊन केली. राहुलजी गांधी पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील पदयात्रेची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन ...

आरोग्य विद्यापीठाचा इक्षणा म्युझियमसाठी 'ट्रेझर हंट' उपक्रम

नाशिक|महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे ‘इक्षणा ट्रेझर हंट’ उपक्रमास नुकताच प्रारंभ करण्यात आला आहे. विद्यापीठातील वस्तुसंग्रहालयाचे नुतनीकरण करण्यात येत असून यासाठी आपल्या संग्रहातील आरोग्यशास्त्राशी संबधीत महत्वपूर्ण वस्तू, कलाकृतींचे संकलन ‘इक्षणा ट्रेझर हंट’ उपक्रमाव्दारा करण्यात येत आहे. विद्यापीठाचे मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, विद्यापीठाचा ‘इक्षणा ट्रेझर हंट’ हा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. मा. कुलगुरु महोदया यांच्या संकल्पनेनुसार इक्षणा म्युझियम मध्ये सर्व आरोग्य विद्याशाखांच्या इतिहास आणि भविष्याचा वेध अश्या सर्वच बाबींचा अंतर्भाव असणार आहे. इक्षणा म्युझियममध्ये विद्याशाखांची माहिती, पत्रके, छायाचित्र, औषधे, विद्याशाखांचा इतिहास, संशोधन आणि विकासाचे दस्तऐवजीकरण प्रदर्शित करण्यात येणार आहे.  त्या पुढे म्हणाले की, या अनुषंगाने आपल्या संग्रहात महत्वपूर्ण वैद्यकीय वस्तू, अनेक पुस्तके, डायरी, जुनी उपकरणे आणि साधने, वैद्यकीय कलाकृती, सर्जिकल, नमुने आणि स्मृतीचिन्ह असल्यास त्या भेट स्वरुपात विद्यापीठाकडे देण्यात याव्यात जेणेकरुन ही म...

नाशिक युवक राष्ट्रवादीचे अब्दुल सत्तरांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन

नाशिक|राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबाबत अपशब्द वापरून गलिच्छ भाषेत टीका करणारे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेस राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पुरुषोत्तम कडलग व शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या अध्यक्षतेखाली जोडो मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी शादाब सय्यद, चेतन कासव, निखिल भागवत, गणेश गायधनी, मुकेश शेवाळे, दत्तात्रय वाघचौरे, अमोल नाईक, सुनिल आहेर, राहुल कमानकर, प्रफुल्ल पवार, निलेश भंदुरे, दिनेश धात्रक, जितेंद्र जाधव, आकाश पिंगळे, हर्षल चव्हाण, ऋषी पिंगळे, अनिल पाटील,संतोष भुजबळ, विजय गांगुर्डे, कल्पेश जेजुरकर, रोहित मते, सुनिल घुगे, गोरख ढोकणे, अक्षय पाटील, शैलेश ठाकरे, संदीप खैरे,  ललित निकम,  रोहित जाधव, अक्षय भोसले, किशोर वडजे, रविंद्र आदी उपस्थित होते.

जेलरोड- टाकळी रस्ता कामाला अखेर प्रारंभ

नाशिकरोड|प्रतिनिधी| मोठी दुरवस्था झालेल्या जेलरोड-टाकळी रोडची अखेर महापालिकेच्या आयुक्तांनी दखल घेतल्याने खड्डे बुजविण्यास सुरुवात झाली आहे. भा जपचे महानगर सचिव राजेश आढाव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने या प्रश्नी आयुक्तांची भेट घेऊन रस्ता डांबरीकरणाची मागणी केली होती. त्यानंतर आयुक्तांनी अधिका-यांना पाठवून रस्त्याची पाहणी केली आणि त्वरित कामाला सुरुवात केली. सततच्या पावसाने गेल्या काही महिन्यांपासून हा महत्वाचा रस्ता खराब झाला होता. ठिकठिकाणी खड्डे पडले होते. दुचाकी, चारचाकी चालकांना समस्यांला तोंड द्यावे लागत होते. त्यांना मणके, पाठीचे त्रास सुरु झाले होते. गाडीचे नुकसान होत होते. नाशिकहून जेलरोडला पोहचण्यासाठी उपनगर आणि नांदुरनाका हे दोन पर्यायी मार्ग आहेत. मात्र, त्या मार्गाने जादा वेळ, पैसा खर्ची पडत असल्याने नागरीक जेलरोड-टाकळी रोडचा वापर मोठ्या प्रमाणावर करत आहेत. विद्यार्थी, नागरिक, शासकीय व खासगी कर्मचारी या रस्त्याचा वापर जास्त करतात. हा रस्ता अरुंद आहे. त्यातच पावसामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. चारचाकी तर सोडाच परंतु, दुचाकी चालवणेही अवघड झाले होते. लोकप्रतिनिधींनी या ...

भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी चित्रा वाघ

मुंबई|भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाच्या प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षपदी चित्रा वाघ यांची नियुक्ती केली. भाजपा प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्षांनी चित्रा वाघ यांना नियुक्ती पत्र प्रदान केले. यावेळी प्रदेश सरचिटणीस ॲड. माधवी नाईक, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील व मावळत्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आ. उमा खापरे उपस्थित होते. मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी चित्रा वाघ यांना नव्या नियुक्तीबद्दल शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, मा. चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा महिला मोर्चा संघटनात्मकदृष्ट्या अधिक बळकट होईल तसेच विविध पक्षांमधील महिला कार्यकर्त्या भाजपाशी जोडल्या जातील, अशी अपेक्षा आहे. मा. चित्रा वाघ म्हणाल्या की, राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महिलांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. ते राज्यातील महिलापर्यंत पोहचविण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून करण्यावर भर देणार असल्याचे सांगितले.

वडनेर दुमालारोडवरील फर्निचर गोदामाला आग; ४ लाखांचे नुकसान

नाशिकरोड| प्रतिनिधी|  पाथर्डी- वडनेर दुमाला रोडवरील फर्निचर ,  प्लास्टिक, लाकडी वस्तू व भंगारच्या गोदामाला आज पहाटे तीनच्या    सुमारास अचानक आग लागली. त्यात सुमारे चार लाखांचे नुकसान झाले. नाशिक शहरातील विविध ठिकाणच्या अग्नीशमन दलांच्या आठ बंबांनी तीन तासाच्या अथक प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात आली. अग्नीशमन दलाच्या सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, पाथर्डी-वडनेर दुमाला रोडवर मंजुर मुस्तकीन खान यांचे फर्निचर, प्लास्टिक, भंगाराचे गुदाम आहे.  आज पहाटे तीनच्या सुमारास गोदामातून धूर व आगीच्या ज्वाळा येते असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. मुस्तकीन खान व नागरिकांनी त्वरित अग्नीशमन दलाशी संपर्क साधला. नाशिकरोडच्या तीन बंबांनी पाण्याचा मारा सुरु केला. मात्र, आग आटोक्यात येत नसल्याने सिडको, पंचवटी, सातपूर, शिंगाडा तलाव, के. के. वाघ, अंबड एमआयडीसी येथील अग्नीशमन केंद्राच्या आठ बंबांनी तीन तासात आग आटोक्यात आणली. आगीचे कारण समजू शकलेले नाही. आगीत सुदैवाने जिवीत हानी झाली नाही. मात्र, चार लाखाचे नुकसान झाले आहे.  उपनगर व इंदिरानगर पोलिस ठाण्याचे अधिकारी व पोलिस घटनास्थळी...

'गांधीनगर'मध्ये श्रीजगतधात्री देवी पूजन उत्सव सोहळा

नाशिकरोड |प्रतिनिधी| नाशिक - पुणे महामार्गावरील गांधीनगर येथील रामलीला मैदानावर श्रीजगतधात्री देवी पूजन उत्सव सोहळा थाटामाटात साजरा झाला. विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होऊन दुपारी महाप्रसाद, सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम झाले. साधारण १५ वर्षांपासून येथे श्रीजगतधात्री देवीची मनोभावे आराधना केली जाते. कोरोना मुळे दोन वर्षांपासून निर्बंधनुसार कार्यक्रम खंडीत झाले होते. मात्र यावर्षी उत्साहपूर्ण वातावरणात धार्मिकविधी करण्यात आले. शंखध्वनी, ढोल वादन, पवित्र मंत्रोच्चारात देवीची मनोभावे पुष्पांजली वाहून आराधना करण्यात आली. श्रीजगतधात्री देवी श्रीदुर्गा मातेचे प्रतिरूप आहे. सिंहावर स्वार श्रीदेवीची मूर्ती भव्य स्वरूपात सजवण्यात आली होती. फुलमाळ, धूप, दीप, सुवासिक अगरबत्ती प्रज्वलित करून श्रीजगतधात्री देवीची महाआरती करण्यात आली. चैतन्यमय वातावरणात सकाळ पासूनच धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. श्रीजगतधात्री देवीला नैवैद्य अर्पण करून महाप्रसाद वाटप करण्यात आला. पौराहीत्य श्री अमिताभ मुखोपाध्याय यांनी केले.  श्रीजगतधात्री देवी  संपूर्ण विश्वाची रक्षिका समजली जाते. सिंहवाहिनी, चतुर्भुजा, त्...

वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करणार, लवकरच फोर जी मशीन देऊ: विजय वाघमारे

मुंबई|वितरण व्यवस्थेतील सर्व त्रुटी लवकरच दुर करण्यात येणार असुन संबधीतांना प्रधानमंत्री मोफत धान्य वाटपाचे कमिशन तातडीने देण्याच्या सुचना देण्यात येतील तसेच नवीन फोर जी मशिन देण्यात येणार असल्यामुळे भविष्यात वाटपास अडचणी येणार नसल्याचा विश्वास  पुरवठा विभागाचे प्रधान सचिव विजय वाघमारे यांनी व्यक्त केला. राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या अडचणी संदर्भात पुरवठा विभागाचे प्रधान सचिव मा. विजय वाघमारे यांच्या समवेत आँल महाराष्ट्र फेअर प्राईज शाँप किपर्स फेडरेशनची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आँल महाराष्ट्र फेअर प्राईज शाँप किपर्स फेडरेशनचे राज्याचे अध्यक्ष  गणपतराव डोळसे पाटील म्हणाले की ऐन सणा सुदीच्या काळात राज्यात मशिन बंद पडल्या त्यामुळे धान्य असुनही दुकानदारांना त्याचे वितरण करणे अवघड झाले अनेक जिल्ह्यात वेळेवर धान्य उपलब्ध करुन दिले जात नाही, त्यामुळे अनेक धान्य कोठा लँप्स होत आहे तसेच उशिरा धान्य आल्यामुळे ते मंशिनवर वेळेवर न टाकल्यामुळे वाटप करता येत नाही त्यामुळे गोदामातुन गाडी निघताच त्या दुकानाच्या मशिनवर धान्यसाठा टाकला जावा तसेच तीन तीन महीने माल उशिरा मिळत ...

'सैफ' झोनमध्ये 60% भारतीय कंपन्या; महिला उदोजकांसाठी खास प्रोत्साहन पॅकेज: पी राजीव

नाशिक|शारजाह एक उदयोन्मुख व्यापार केंद्र असून,  उत्कृष्ट जमीन, सागरी आणि हवाई संपर्कांद्वारे अद्वितीय लॉजिस्टिक फायदे देते.  नाशिकमधील व्यापारी समुदायाने सैफ (SAIF) झोनमध्ये आपला व्यवसाय सुरु करून युएई सरकार देत असलेल्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सैफ झोनचे अधिकारी पी राजीव यांनी केलं भारत आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांच्यात नुकत्याच स्वाक्षरी झालेल्या 'व्यापक आर्थिक भागीदारी करारांतर्गत, भारतातून 'युएई'मध्ये निर्यात केल्या जाणाऱ्या बहुतांश वस्तूंवरील आयात शुल्क कमी केले किंवा कमी करण्याचे मान्य करण्यात आले आहे. या अनुषंगाने, द असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया (ASSOCHAM) आणि शारजाह सरकार  यांच्या संयुक्त विद्यमाने व  महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चर (MACCIA) च्या पाठिंब्याने; अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (AIMA) आणि स्त्री उद्यमी फाउंडेशनने नाशिकमध्ये भारतीय उद्योगांसाठी युएई  मधील विविध व्यवसाय संधी आणि SAIF झोनमध्ये व्यवसाय सुरू करण्याच्या फायद्यांविषयी जागरुकता करण्यासाठी परिषदेचे आयोजन केले होत...