Skip to main content

Posts

Showing posts from July, 2020

मिशन बिगिन अगेनचा पुढचा टप्पा नियमावली जाहीर; काही अटींवर मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सला परवानगी

मुंबई| कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत वाढवण्यात आला असला तरी मिशन बिगिन अगेन अंतर्गत टप्प्याटप्प्याने निर्बंध उठवण्यासाठी काही सुधारणा जाहीर करण्यात आल्या आहेत.   फोटो:फाईल काही सवलतींमध्ये वाढ करत राज्यातील मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सेस काही अटींच्या अधीन राहून 5 ऑगस्ट 2020 पासून सुरु करण्यास संमती देण्यात आली आहे. तसेच खेळाडुंचा संघ नसलेल्या काही आऊटडोअर खेळांना काही अटींच्या अधीन राहून 5 ऑगस्ट 2020 पासून संमती देण्यात आली आहे.  कोवीड विषाणू नियंत्रणासाठी राष्ट्रीय स्तरावरील सूचना मास्कचा वापर- सार्वजनिक ठिकाणे, कार्यस्थळे या ठिकाणी तसेच प्रवासादरम्यान मास्क वापरणे बंधनकारक आहे. सामाजिक अंतर पाळणे (सोशल डिस्टंसिंग) : प्रत्येक व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी वावरताना इतरांपासून किमान 6 फुटाचे (दो गज की दूरी) अंतर राखावे. ग्राहक सुरक्षित अंतर राखतील याची दुकानदारांनी काळजी घ्यावी, दुकानांमध्ये एका वेळी 5 व्यक्तिंपेक्षा अधिक ग्राहकांना प्रवेश देऊ नये. जमावाबाबतची बंधने : मोठ्या प्रमाणावर जमाव होऊ शकणारे...

रेशन तांदळाच्या काळाबाजाराची सीआयडी मार्फत चौकशी: ना. भुजबळ

मुंबई| कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना करत राज्यातील नागरिकांना अन्न, धान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच काळाबाजार करणाऱ्यांवर विशेष पथकांच्या माध्यमातून लक्ष ठेऊन कारवाई देखील करण्यात येत आहे. फोटो:फाईल त्याच पार्श्वभूमीवर मौजे सोनेगाव, ता. जामखेड, जिल्हा अहमदनगर येथील स्वस्त धान्य दुकानातील तांदळाच्या अवैध व्यवहाराबाबत तसेच शेगाव तालुक्यातील बुलढाणा-अकोला सीमेवर ४१० कट्टे भरलेला तांदूळाचा ट्रक पकडून जप्त करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणाची सी.आय.डी. मार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. राज्यातील एकही नागरिक अन्न, धान्यांपासून वंचित राहणार नाही यासाठी राज्याच्या अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. तसेच या काळामध्ये अन्न,धान्याचा काळाबाजर करणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या पथकातील पोलीसांनी जामखेड तालुक्यातील सोनेगाव येथून गुजरातला जाणारा स्वस्त धान्य दुकानातील २४ टन भरलेला तांदळाचा ट्र...

'सच ऍप' प्रणालीद्वारे कोविड रुग्ण शोधण्यास आणि उपचारास मदत: झेडपी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर

नाशिक| 'सच ऍपद्वारे' शारिरीक दृष्ट्या दुर्धर तथा इतर आजाराने बाधित असलेले आणि कोविड बाधीत रुग्ण तत्काळ शोधण्यास आणि उपचार करण्यास मदत होणार आहे. भविष्यात कोविड आजारावर मात करण्यासाठी सदर "सच  ऍप" प्रणालीचा चांगला उपयोग होणार आहे असे मत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ना. बाळासाहेब क्षीरसागर यांनी व्यक्त केले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्यातील आढावा सभेप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ना. बाळासाहेब क्षिरसागर यांच्यासह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लीना बनसोड, जिल्हा परिषद सदस्य श्री.निलेश केदार, श्रीमती सीमंतिनी कोकाटे,पंचायत समिती सभापती सौ.शोभाताई बरके, उपसभापती श्री.संग्राम कातकाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा माता बाल व संगोपन अधिकारी डॉ. चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मोहन बच्छाव, गटविकास अधिकारी डॉ.लता गायकवाड, ग्रामीण रुग्णालय सिन्नर येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. निर्मला गायकवाड, पंचायत समिती सदस्य श्री.जगन भाबड, सौ.संगीता पावसे, श्री.भगवान पथवे, सौ. सुमन बर्डे, अधिकारी व कर्मचारी उपस्थित...

केंद्रीय गृह मंत्रालयाकडून अनलॉक ३ मार्गदर्शक तत्वे जारी; शाळा, महाविद्यालयं ३१ ऑगस्टपर्यंत बंदच!.. वाचा काय सुरू होणार..

दिल्ली| केंद्रीय गृह मंत्रालयाने आज अनलॉक ३  ची नवी मार्गदर्शक तत्वे जारी केली , त्यामध्ये  प्रतिबंधित क्षेत्राबाहेर आणखी व्यवहारांना मुभा देण्यात आली आहे ,   येत्या 1 ऑगस्ट 2020 पासून अनलॉक ३ अमलात येणार असून टप्याटप्याने व्यवहार पुन्हा सुरू करण्याच्या प्रक्रियेची व्याप्ती अधिक व्यापक करण्यात आली आहे. फोटो: फाईल राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांकडून आलेला प्रतिसाद आणि संबंधित केंद्रीय मंत्रालये आणि विभागांशी व्यापक चर्चा केल्यानंतर त्यावर ही नवी मार्गदर्शक तत्वे आधारित आहेत. नवीन  मार्गदर्शक तत्त्वांची ठळक वैशिष्ठ्ये :- व्यक्तींच्या रात्रीच्या ये- जा करण्यावरचा निर्बंध (नाईट कर्फ्यु) रात्रीची संचारबंदी हटवण्यात आली. योग संस्था आणि जिम्नॅशियम 5 ऑगस्ट 2020 पासून उघडण्यासाठी परवानगी. या संदर्भात ,  शारीरिक अंतर राखण्यासाठी आणि कोविड -19 चा संसर्ग रोखण्यासाठी , आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय मानक संचालन पद्धती जारी करेल. स्वातंत्र्य दिन कार्यक्रमांना शारीरिक अंतर आणि मास्कचा वापर यासह इतर आरोग्य नियमांचे पालन करत परवानगी.या संदर्भात गृह मंत्...

विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन ७ सप्टेंबरपासून

मुंबई| महाराष्ट्र विधानमंडळाचे आगामी तिसरे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे सोमवार 7 सप्टेंबरपासून बोलविण्यात येण्याची शिफारस राज्यपालांना करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.  फोटो:फाईल यापूर्वी 3 ऑगस्टपासून हे अधिवेशन घेण्याचे कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ठरले होते.  परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात प्रशासकीय यंत्रणा कार्यरत असल्याने हे अधिवेशन 7 सप्टेंबरपासून घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

कृषी आणि अन्न प्रक्रिया उद्योगांना अधिक प्रोत्साहन देण्याचा निर्णय

मुंबई|राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कृषीवर आधारित अन्न प्रक्रिया उद्योगांना अधिकाधिक प्रोत्साहन देण्यासाठी सुधारित निकषास मान्यता देण्याचा आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. फोटो:संदीप नाझरे कृषीवर आधारित व अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी मोठे व विशाल प्रकल्प निकष खालीलप्रमाणे सुधारीत  करण्यात आले. आकांक्षित जिल्हे- गडचिरोली, नंदुरबार, उस्मानाबाद, हिंगोली यांच्यासाठी मोठ्या प्रकल्पातील गुंतवणूक 50 ते 100 कोटी रुपये असेल तर 100 कोटीपेक्षा अधिक अथवा 200 रोजगार असलेला प्रकल्प हा विशाल प्रकल्प असेल. मराठवाडा , विदर्भ, धुळे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी मोठ्या प्रकल्पातील गुंतवणूक  50 ते 200 कोटी रुपये असेल तर 200 कोटीपेक्षा अधिक अथवा 300 रोजगार असलेला प्रकल्प हा विशाल प्रकल्प असेल. उर्वरित महाराष्ट्रासाठी मोठ्या प्रकल्पातील गुंतवणूक आता      50 ते 250 कोटी रुपये असेल तर 250 कोटीपेक्षा अधिक अथवा 500 रोजगार असलेला प्रकल्प हा विशाल प्रकल्प असेल. राज्य वस्तू व सेवा करावर आधारित प्रोत्साहने आकांक्षित जिल्हे- गडचिरोली, नंदुरबार, उस्मान...

सरकारवाडा आणि विनयनगर पोलिस चौकीचे पोलिस आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन

नाशिक| सरकारवाडा पोलीस स्टेशन अंकित नुतनीकरण केलेल्या सराफ बाजार पोलिस चौकीचा उद्घाटन सोहळा पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांच्या हस्ते आज सोशल अंतर पाळून पार पडला.   फोटो: नाशिक प्रेस ग्रुप यावेळी परिमंडळ 1 पोलीस उपायुक्त अमोल तांबे, परिमंडळ 2 पोलिस उपायुक्त विजय खरात,  मुख्यालयाच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त मंगलसिंंग सुर्यवंशी, पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी, पोलीस निरीक्षक साजन सोनवणे,भद्रकाली पोलीस ठाणे, पोनि इनामदार साहेब ट्राफिक युनिट 2 इतर अधिकारी व कर्मचारी तसेच पुरातत्त्व विभागाचे उपसंचालक सौ आरती आळे या ठिकाणी उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते. तसेच सराफ बाजार असोसिएशनचे अध्यक्ष चेतन राजापूरकर, नगरसेविका वैशाली भोसले, किराणा मर्चंट असोसिएशन'चे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, शिल्पकार प्रसन्ना तांबट, श्याम तांबोळी, सचिन साकुरकर, कृष्णा नागरे, पवन महालकर आदी शुभेच्छा देण्याकरता हजर होते.  यावेळी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी चौकीचे अधिकारी सहा पोलीस निरी...

केंद्राकडून दागिन्यावरील हॉलमार्कच्या मुदतीत वाढ: कॅट आणि एआयजेजीएफ'तर्फे निर्णयाचे स्वागत!

नाशिक| केंद्र सरकारने ज्वेलर्ससाठी दागिन्यांवर हॉलमार्क करणे अनिवार्य केले आहे,  त्यामुळे हॉलमार्क करण्यासाठी कॅट तर्फे मुदतवाढ देण्याची विनंती करण्यात आली, त्याप्रमाणे केंद्राने अंतिम तारीख सप्टेंबर ते जून २०२१ पर्यंत वाढविली आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स आणि देशातील ज्वेलरी व्यापारयांची सर्वात मोठी संस्था, ऑल इंडिया ज्वेलर्स अँड गोल्डस्मिथ फेडरेशन यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. हा देशाच्या ज्वेलर्स व्यापाऱ्यांसाठी एक मोठा दिलासा आहे. फोटो:फाईल CAIT & AIJGF संघटनानी काही दिवसांपूर्वी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि ग्राहक व्यवहार मंत्री  रामविलास पासवान यांना निवेदन पाठविले होते. कोरोनामुळे चालू वर्षात बंद पडलेल्या व्यापाराचे कारण सांगून हॉलमार्कसाठी आवश्यक असलेली मुदत वाढवावी अशी मागणी केली. कॅटचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी स्वत: केंद्रियमंत्री गोयल यांच्याकडे हा मुद्दा उपस्थित केला आणि त्यांच्या हस्तक्षेपाची विनंती केली जी मान्य करण्यात आली आणि निर्णय घेण्यात आला. देशभरात ३ लाखाहून अधिक दागिने व्यापारी आहेत, त्याप...

सिन्नर नगरपालिकेकडून वाहतूकदारांची बेकायदेशीर लूट:नाशिक ट्रान्सपोर्ट आणि गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा आरोप

नाशिक|सिन्नर शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. या काळात अत्यावश्यक सेवा बाजवणाऱ्या वाहतुकदारांची मात्र बेकायदेशीर लूट केली जात असून सदर लूट थांबाबवी तसेच लॉकडाऊन मधून अत्यावश्यकत सेवेत काम करत असलेल्या वाहतूक क्षेत्राला वगळण्यात यावे अशी मागणी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, नाशिक गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष पी. एम सैनी व सिन्नर नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष सुनील ढाने यांनी केलेली आहे. फोटो: फाईल नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन व गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता सिन्नर शहरात लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. मात्र या भागात एमआयडीसीक्षेत्र नियमित सुरु आहे. असे असतांना या ठिकाणाहून मालवाहतूक करणाऱ्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना नगरपालिका विभागाकडून नोटीस देण्यात येत असून याठिकाणी येण्या जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.  वास्तविक ट्रान्सपोर्ट करणाऱ्या वाहनांचा सिन्नर शहरातील लॉकडाऊन विभागास कुठलाही अडथळा निर्माण झालेला नाही. या भाग...

महाराष्ट्राच्या वाट्याचा १९ हजार २३३ कोटींचा जीएसटी निधी केंद्रातर्फे जारी

दिल्ली|आर्थिक वर्ष २०१९-२० च्या वस्तू व सेवा कर (जीएसटी) परताव्याचा महाराष्ट्राच्या वाट्याचा १९ हजार २३३ कोटी रुपयांचा निधी आज केंद्र शासनाने जारी केला.केंद्रीय अर्थमंत्रालयाने आज देशातील राज्य व केंद्रशासित प्रदेशांना आर्थिक वर्ष २०१९-२०च्या जीएसटी परताव्याचा  १ लाख ६५ हजार ३०२ रूपयांचा निधी जारी केला आहे.  याच कालावधीत देशात उपकरापोटी ९५ हजार ४४४ कोटींचा निधी संकलित झाला आहे. फोटो:फाईल देशातील एकूण ३१ राज्य व केंद्रशासित प्रदेशांना जारी करण्यात आलेल्या जीएसटी परताव्याच्या एकूण रकमेपैकी महाराष्ट्राच्या वाट्याचा १९ हजार २३३ कोटींचा निधीही जारी करण्यात आला आहे. केंद्राने यावर्षी मार्च महिन्यात जीएसटी परताव्यापोटी राज्य व केद्रशासित प्रदेशांना १३ हजार ८०६ रूपयांचा निधी जारी केला आहे.

वैतरणा धरणग्रस्तांवर अन्याय होवू देणार नाही: जयंत पाटील

नाशिक| वैतरणा धरणग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेताना शासन कोणावरच अन्याय होवू देणार नाही. शासन सर्वांच्या हिताचेच निर्णय घेणार असल्याची ग्वाही राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी धरणग्रस्तांना दिली.  थेट वैतरणा धरणावर जाऊन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली.  धरणाच्या बांधकामासाठी जमिनी अधिग्रहित केल्या गेल्या मात्र काहींचा उपयोग झाला नाही. आजही शेतकरी अशा जमिनी कसतात. त्या शेतकऱ्यांचे म्हणणे मंत्री जयंत पाटील यांनी ऐकून घेतले.  वैतरणा धरणग्रस्तांच्या विषयावर महसूल, अर्थ, विधी व न्याय विभागाच्या सचिवांसह लवकरच बैठक घेऊन काही दिवसात या विषयावर तोडगा काढण्याचा आम्ही प्रयत्न करू असे आश्वासनही मंत्री जयंत पाटील यांनी दिले.  वैतरणा धरणाची पाहणी करतांना ना. जयंत पाटील यावेळी खासदार हेमंत गोडसे, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार हिरामण खोसकर, आमदार नितीन पवार, माजी खासदार देवीदास पिंगळे, माजी आमदार जयंत जाधव आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षा स्थगित

नाशिक| महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र 2020 मधील विविध विद्याशाखांच्या पदवीपूर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा स्थगित करण्यात आलेल्या आहेत. विद्यापीठाचे मा. परीक्षा नियंत्रक डाॅ. अजित पाठक यांनी  सांगितले की,  उन्हाळी सत्रातील वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, नर्सिंग, भौतिकोपचार आदी विद्या शाखांचे पदवीपूर्व अभ्यासक्रम परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा विद्यापीठाने यापूर्वी संकेतस्थळावर जाहिर केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे घेण्यात येणार आहेत असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, अंतीम वर्षाच्या परीक्षेबाबत प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे.  परीक्षा घेण्यात येऊ नये या मागणीच्या दोन याचिका आणि पदव्युत्तर अंतिम वर्षाच्या परीक्षा लवकर घेण्यात याव्यात या मागणीसाठी एक याचिका अशा एकूण तीन याचिका परीक्षेच्या अनुषंगाने झालेल्या असून तीनही याचिका मा. उच्च न्यायालयात  याबाबत सुनावणी दि. 31 जुलै 2020 रोजी होणार आहे. त्या निर्णयानंतरच सविस्तर आदेश काढण्यात येतील असे त्यांनी सांगितले. आरोग्य...

नागरिकांनी नियमांचे पालन केले तरच कोरोनाला अटकाव शक्य: पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक|येवला| नागरिकांनी नियमांचे पालन काटेकोरपणे केले तरच कोरोनाला अटकाव शक्य असल्याचे सांगत कोरोनाला अटकाव घालण्यासाठी कोमॉर्बीड रुग्णांची नियमित तपासणी सुरू ठेवावी असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना आणि नियोजनाबाबत आज ना.छगन भुजबळ यांनी येवला शासकीय विश्राम गृह येथे आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी  आमदार किशोर दराडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश जगदाळे,  प्रांताधिकारी सोपान कासार, निफाडच्या प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे, येवल्याचे तहसीलदार रोहिदास वारुळे, निफाडचे तहसीलदार दिपक पाटील, मनमाड पोलीस उपअधीक्षक समरसिंग साळवे, गटविकास अधिकारी डॉ.उमेश देशमुख, येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ.शैलजा कृपास्वामी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एच.आर. गायकवाड, लासलगाव येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ.सूर्यवंशी, शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी, तालुका पोलिस निरीक्षक अनिल भवा...