Skip to main content

Posts

Showing posts from May, 2021

'ब्रेक दि चेन’ अंतर्गत काय सुरू आणि काय बंद राहणार..

मुंबई| ‘ब्रेक दि चेन’चे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार १५ जूनच्या सकाळी ७ पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत. फोटो: फाईल २९ मे २०२१ च्या तारखेनुसार आठवड्याच्या शेवटी असलेली पॉझिटीव्हीटी दर आकडेवारी आणि तेथील ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यासाठी गृहीत धरली जाईल. पालिका स्वतंत्र प्रशासकीय घटक असतील  २०११ च्या जनगणनेनुसार 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व महानगरपालिका जसे की, बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई-विरार, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, औरंगाबाद, नाशिक यांना कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून समजण्यात येईल. या पालिकांच्या क्षेत्रांव्यतिरिक्तचा जिल्ह्यातील उर्वरित भाग हा वेगळा प्रशासकीय घटक राहील. पॉझिटीव्हीटी दर 10 टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या जिल्हे व पालिकांसाठी : वरील ज्या पालिका किंवा जिल्हा क्षेत्रात कोविड पॉझिटीव्हीटी दर 10 टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 40 टक्क्यांपेक्षा कमी ...

केंद्राने रेमडेसिविर या औषधाचा पुरवठा थांबवला

नवी दिल्ली| रेमडेसिविर  या औषधाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असल्याने या औषधाचा केंद्राकडून होणारा पुरवठा थांबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय रसायने आणि खते राज्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या औषधाचे उत्पादन 10 पटीने वाढले असून देशाची उत्पादनक्षमता प्रतिदिन 33,000 कुप्यांवरून 11 एप्रिल 2021 रोजी प्रतिदिन 3,50,000 कुप्या झाली, असे त्यांनी सांगितले.   सरकारने केवळ एका महिन्यात रेमडेसिविरचे उत्पादन करणाऱ्या प्रकल्पांची संख्या 20 वरून 60 वर नेली. आता देशात या औषधाचा पुरेसा साठा असून त्याचा पुरवठा मागणीच्या प्रमाणात खूपच जास्त आहे, अशी माहितीही मांडविय यांनी दिली. मांडविय यांनी रेमडेसिविरच्या देशातील उपलब्धतेवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे निर्देश राष्ट्रीय औषध दरनिश्चिती संस्था आणि सीडीएससीओ ला दिले आहेत. आकस्मिक गरजेसाठी राखीव साठा म्हणून भारत सरकारने रेमडेसिविरच्या 50 लाख कुप्या खरेदी करण्याचा देखील निर्णय घेतला आहे.

पदव्युत्तर वैद्यकीय परीक्षा येत्या 16 ऑगस्टपासून होणार: अमित देशमुख

मुंबई| पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची कोविड परिस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा दि.16 ऑगस्ट 2021 पासून घेण्याचे निर्देश विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा वैद्यकीय वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. ना. श्री. अमित देशमुख यांनी दिले.  उन्हाळी सत्र 2021 मधील पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा संदर्भात विद्यापीठाचे प्रती कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. ना. श्री. अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन बैठक घेण्यात आली. या बैठकीस मा. प्रभारी कुलगुरु डॉ.नितीन करमळकर, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे मा.सचिव श्री. सौरव विजय, संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे मा. संचालक डॉ. तात्याराव लहाने, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांचे मा. अधिष्ठाता डॉ. सचिन मुंबरे, डॉ. जयंत पळसकर, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. धनाजी बागल, डॉ. राजश्री नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यापीठाचे प्रति-कुलपती मा. ना. श्री. अमित देशमुख यांनी सांगितले की, विद्यापीठाची उन्हाळी सत्र 2021 पदव्युत्तर वैद्य...

सद् धम्म टूर्स प्रश्नमंजुषा स्पर्धेत सुवर्णा सोनवणे प्रथम तर सुधाकर मगर द्वितीय पुरस्काराचे मानकरी

नाशिक| सद् धम्म टूर्स आणि ट्रॅव्हलच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही बुद्ध पौर्णिमा निमित्त प्रश्नमंजुषा घेण्यात आली. यात चेंबूरच्या सुवर्णा सोनवणे प्रथम, तर व्दितीय गोरेगाव येथील सुधाकर मगर, तृतीय यवतमाळचे राजू पाटील हे विजेते ठरले. बुध्द पौर्णिमेचे औचित्य साधून सद् धम्म हॉलिडेतर्फे तथागत भगवान गौतम बुद्ध ह्यांच्या प्रतिमेला पुष्प व दिप प्रज्वलित करून त्रिशरण पंचशील घेतले, तसेच प्रश्नावलीचा निकाल लकी ड्रॉच्या माध्यमातून काढण्यात आला. विजेत्यांचे नावे पुढील प्रमाणे प्रथम विजेता -  सुवर्णा सोनवणे (चेंबूर) द्वितीय विजेता -  सुधाकर मगर (गोरेगाव) तृतीय विजेता - राजू पाटील (यवतमाळ) उत्तेजनार्थ प्रथम रसिका सतीशकुमार जामशेतकर (पनवेल), द्वितीय  कल्पना जनबंधु (अमरावती)  असे आहेत. सर्व विजेत्यांचे अभिनंदन करण्यात येऊन  सभासदांनचे ही आभार संयोजकांनी मानले. ज्या ज्या सभासदांनी या स्पर्धेत भाग घेतल्या त्या सर्व सभासदांना बुद्धगया धम्म यात्रे मध्ये १०% सूट असेल असे सद् धम्म टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे संचालक अभिजीत आणि सम्राट सोनवणे यांनी सांगितले.

मेट भुजबळ नॉलेज सिटीकडून अनाथ बालकांना मदतीचा हात

नाशिक| कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनाथ मुलांना सांभाळनाऱ्या आधारतीर्थ संस्थेला अन्नधान्याची व किराणा मालाची कमतरता भासत असल्याने राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नधान्य व किराणा मालाचे वाटप करण्यात आले. याबाबत आज मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या संचालिका डॉ.शेफाली भुजबळ यांनी त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ संस्थेला भेट देऊन सदर वस्तूंचे वाटप केले.  कोरोनाच्या कालावधीत मेट भुजबळ नॉलेज सिटी नाशिक यांच्या वतीने समाजिक जबाबदारीतून अनेकांना मदतीचा हात दिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंजाब, हरियाना, कर्नाटक, राजस्थान इत्यादी ठिकाणी परराज्यात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहचविण्याची व्यवस्था मेट मार्फत करण्यात आली होती. कोरोना काळात कर्तव्य बजावणाऱ्या जिल्ह्यातील पोलिसांना मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या वसतीगृहात विलीगीकरण कक्षाची निर्मिती करून त्यांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर कोविडचा प्रा...

आरोग्य विद्यापीठाचा बृहत आराखडा अद्यायावत करण्याची प्रक्रिया सुरु

नाशिक| महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा बृहत आराखडा अद्यायावत करण्याची प्रक्रिया सुरु आहे. विद्यापीठाची सहावी यथार्थदर्शी योजना (Perspective Plan)  अद्यायावत करण्यासाठी आरोग्य शिक्षण क्षेत्रातील व्यक्ती, नागरिकांकडून अभिप्राय किंवा सूचना मागविण्यात येत आहे. विद्यापीठाचा बृहत आराखडा सर्वसमावेशक असावा याकरीता विद्यापीठाचे मा. प्रभारी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, कुलसचिवडॉ. कालिदास चव्हाण, विद्यापीठाचे विविध प्राधिकरणाचे सदस्य प्रयत्नशिल आहेत . राज्यात आरोग्य विज्ञान शिक्षण सुविधांचे समन्याय वाटप व्हावे या दृष्टीकोनातून उच्चतर शिक्षणाच्या संस्थांची स्थाने निश्चित करण्यासाठी शैक्षणिक विकासाची यथार्थदर्शी विद्यापीठ योजना (Perspective Plan) तयार करण्यात येतो. शासनाने निर्देशित केल्यानुसार राज्यातील दुर्गम व आदिवासी भागात आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा मिळण्यासाठी महाविद्यालय सुरु करण्यासाठी विशेष प्राधान्य देण्यात येते. विद्यापीठाचा सन 2022 ते 2027 या कालावधी करीता बृहत आराखडा करण्यात येणार आहे. या संदर्भात आरोग्य व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींनी विद्यापीठास सूचना, मार्गदर्शन करावे. स...

पावणभूमी बुद्धगया: लेखक अभिजित भोसले

भगवान गौतम बुद्धाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीची माझी पहिली वहिली टूर होती.  2007 साली मी इयत्ता 7 वीला असताना माझा परिवाराने ठरवलं की भगवान गौतम बुद्धाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीला भेट द्यायची.  यासाठी 6 जुलै 2007 साली आम्ही बुद्धगयासाठी रेल्वेने प्रवास सुरू केला. प्रवासासाठी साधारण 26 तास लागतात. बुद्धगया जाण्यासाठी (बिहार)मध्ये गया जं. रेल्वे स्टेशनवर आम्ही उतरलो आणि  तेथून बुद्धगया असा 11 किमीचा संपूर्ण प्रवास सुमो कारद्वारे केला. गया हे भगवान गौतम बुद्धांचे ज्ञान प्राप्तीचे ठिकाण असून हे जागतिक, ऐतिहासिक ठिकाण आहे. या ठिकाणी देशी-विदेशी पर्यटक, लोक, धर्मगुरू मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी आलेले दिसले. बुद्धगयामध्ये सर्वात मुख्य ठिकाण म्हणजे पिंपळाचे झाड, 2558 वर्षापूर्वी येथे वैशाख पौर्णिमेला झाडाखाली भगवान गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली होती ते झाड आज बघण्यास मिळाल्याचे समाधान लाभले, इथला परिसर 25 एकरमध्ये आहे, येथे भगवान गौतम बुद्धांनी ज्ञान प्राप्तीचा काही काळ घालवला, या परिसरमध्ये सम्राट अशोकाने निर्माण केलेले 120 उंची असलेलं महाबोधी बुद्धविहार...

देशात 'स्पुतनिक व्ही' लसीचे ऑगस्टपासून उत्पादन

मुंबई| कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी आपल्याकडे लसी हा एकच पर्याय उपलब्ध आहे. देशात कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या दोन लसी आपत्कालीन वापरासाठी उपलब्ध आहेत. मात्र आता कोरोना विरुद्ध लढण्यासाठी भारताला आणखी एक शस्र मिळणार आहे. रशियाच्या स्पुतनिक व्ही लसीचे देशात ऑगस्ट महिन्यापासून उत्पादन सुरु करणार आहे. भारतात स्पुतनिक व्ही लसीचे ८५ कोटी डोस सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत तयार केले जातील. जगातील ६५ ते ७० टक्के स्पुतनिक व्ही लस भारतात तयार होईल,असे रशियामधील भारतीय राजदूत डीबी व्यंकटेशन वर्मा यांनी सांगितले आहे. भारतातील स्पुतनिक लसीची गरज पुर्ण झाल्यानंतर रशिया इतर देशांमध्येही लस निर्यात करणार आहे,असेही त्यांनी सांगितले. कोव्हिशिल्ड आणि कोव्हक्सिन नंतर भारतात आपत्कालीन वापरसाठी मान्यता मिळालेली स्पुतनिक ही तिसरी लस आहे. देशात कोरोनानंतर रुग्णांना भेडसावणाऱ्या म्युकरमायकोसिस या  बुरशीजन्य आजाराच्या संदर्भातही भारत रशियाशी संपर्कात आहे. म्युकरमायकोसिसवर उपचारांसाठी रशियामधूनही औषधे मागवली जाऊ शकतात,असेही रशियामधील भारतीय राजदूत डीबी व्यंकटेशन वर्मा म्हणाले आहेत. रशियन डायरेक्टर इनव्हेस्...

तोक्तेनंतर 'यास' चक्रीवादळाचे आव्हान; पंतप्रधानांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा

नवी दिल्ली| ‘यास’ चक्रीवादळामुळे  निर्माण  परिस्थितीचा  सामना करण्यासाठी  संबंधित राज्ये आणि केंद्रीय मंत्रालये, संस्थांच्या  सज्जतेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज उच्चस्तरीय बैठक घेतली. फोटो सौजन्य:IMD दिल्ली ‘यास’ चक्रीवादळ 26 मे रोजीच्या संध्याकाळपर्यंत  पश्चिम बंगाल व उत्तर ओडिशाची किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता  भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवली आहे.  यावेळी वाऱ्याचा वेग ताशी 155- 165 किमीपासून 185  किमीपर्यंत राहण्याची शक्यता आहे.  यामुळे पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशाच्या  किनारपट्टीवरच्या  जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.  आयएमडी सर्व संबंधित राज्यांसाठी अद्ययावत  अंदाजाचे  नियमित बातमीपत्र जारी करत आहे. कॅबिनेट सचिवांनी 22 मे 2021 रोजी  राष्ट्रीय संकट व्यवस्थापन समितीची (एनसीएमसी) बैठक घेतली असून संबंधित  सर्व किनारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय मंत्रालये, संस्थांच्या मुख्य सचिवांची बैठक घेतली असल्याची माहिती पंतप्रधानांना यावेळी देण्य...

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी नऊ रुग्णवाहिका सेवेत दाखल

नाशिक| जिल्हातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी नऊ रुग्णवाहिका महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत नाशिक जिल्ह्यातील नव्याने मंजूर झालेल्या व रुग्णवाहिका नसलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी पुरविण्यात आल्या आहेत.  नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य लहवित, सय्यदपिंप्री, अंजनेरी, पळसन, करंजाळी, चिंचओहळ, दळवट व उंबरगव्हान या आरोग्य संस्थांना १०२ क्रमांकाच्या फोर्स कंपनीच्या बी टाइप रुग्णवाहिका प्राप्त झाल्या आहेत. नाशिक जिल्हा परिषदेसाठी प्राप्त रुग्ण वाहिकांचा लोकार्पण सोहळा कोरोना नियम पाळून प्रातिनिधिक स्वरूपात नाशिक जिल्हा परिषद आवारात नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नामदार श्री. बाळासाहेब क्षिरसागर  व नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांचे शुभहस्ते वाहन चालकांचे हाती रुग्णवाहिकांच्या चाव्या व रुग्णवाहिकेचे नोंदणी प्रमाणपत्र देऊन करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य श्री.यशवंत ढिकले, माजी बांधकाम सभापती विलास बच्छाव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे उपस्थित होते. ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना प्राप्...

आरोग्यसेविकांना अखेर पदोन्नतीचा लाभ

नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागा मार्फत १५ आरोग्य सेविका यांना पदोन्नती मिळून आरोग्य सहाय्यीकापदी विराजमान झाल्या आहेत. बरेच दिवसापासून आरोग्यसेविका पदोन्नतीच्या प्रतीक्षेत होत्या. अखेर दिनांक २१मे, २०२१ रोजी प्रतिक्षेतील आरोग्यसेविका यांना  आरोग्य सहाय्यीका झाल्यामुळे त्यांच्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. नियमित पदोन्नती प्रक्रिया अंतिम करणेकामी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड(भाप्रसे), मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश बच्छाव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) आनंद पिंगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर व सहाय्यक प्रशासन अधिकारी  प्रकाश थेटे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी अनिल गीते, सर्व कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी यांचे सहकार्य लाभल्याने त्यांचे पदोन्नती झालेल्या आरोग्यसेविका भगिनी यांनी आभार मानले आहे. फोटो: फाईल पदोन्नती झालेल्या आरोग्यसेविका यांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दूरध्वनी करुन रिक्त पदावर इच्छेनुसार पदोन्नती पदास्थापणा दिली त्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांचे विशेष आभार व्यक्त केले आहे. कोरोना साथरोग काळात पहिल्या ...

तोक्ते चक्रीवादळ: नुकसानग्रस्तांना पंचनामे होताच मदत जाहिर करू: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सिंधुदुर्गनगरी| तोक्ते चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पंचनामे पूर्ण होताच राज्यस्तरावर याबाबत आढावा घेऊन नुकसानग्रस्तांना मदत जाहीर केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तोक्ते चक्रीवादळामुळे मालवण येथे चिवला बीच परिसरात झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी आज पाहणी केली. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, मालवण नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मुख्य सचिव सीताराम कुंटे, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी उपस्थित होत्या.

जिल्ह्यातील लॉकडाऊन 23 मे नंतर शिथिल; ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्य शासनाच्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी

नाशिक| जिल्ह्यात लॉकडाऊन 23 मे नंतर शिथिल;‘ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्य शासनाचे निर्बंधांची कडक अंजिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कोरोनाबाधिंताची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेटही कमी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात 12 ते 23 मे पर्यंत लागू असलेला कडक लॉकडाऊन 23 मे च्या मध्यरात्री 12 वाजेनंतर अटी शिथिल करण्यात येणार आहे.  परंतु राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत लागू  केलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्र व बाजार समित्या कोरोना नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या आधीन राहून सुरु करण्याची परवानगी देण्यात येणार आहे, असे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे. आज पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मुंबई येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे कोरोनाबाबत जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय्, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अपर पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा ...

मनपातील कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे आणि थकीत वेतन, विमासरंक्षण तात्काळ द्या: अंबादास खैरे

नाशिक| नाशिक मनपा रुग्णालयात नेमण्यात आलेल्या कंत्राटी  वार्ड बॉय, मल्टी स्किल हेल्थ वर्कर, आया, ए.एन.एम, स्टाफ नर्स, प्रयोग शाळा तंत्रज्ञ, आयुष अधिकारी आदींचे थकीत वेतन तात्काळ देण्यात येऊन या कर्मचाऱ्यांचे विमासंरक्षण देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडे केली आहे. याबाबत त्यांनी मनपा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. आरोग्य अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक मनपा आयुक्त यांच्या दि.२६ फेब्रुवारी २०२१ च्या आदेशान्वये  कोविड सदृश्य परिस्थित नियंत्रण होणेसाठी रोजी वार्ड बॉय, मल्टी स्किल हेल्थ वर्कर,आया,ए.एन.एम,स्टाफ नर्स, प्रयोग शाळा तंत्रज्ञ, आयुष अधिकारी या पदाची तात्पुरत्या स्वरुपात व तात्काळची नोकर भरती करण्यात आली आहे. परिस्थितीचे गांभीर्य बघता सर्व कर्मचारी वर्ग विविध आस्थपना येथे कर्तव्यावर हजर झाली. सदर कर्मचारी यांना वेळीच वेतन हा मूलभूत अधिकार आहे. तसेच कोविड अनुषंगाने त्यांना सुरक्षा दृष्टीने उपयोगी वस्तूंचे वाटप वेळच्या वेळी होणे अपेक्षित आहे. आपला जिव ध...

राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा दहा जूनपासून घेणार: अमित देशमुख

मुंबई| राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या येत्या 2 जून पासून सुरू होणाऱ्या परीक्षा आता 10 ते 30 जून दरम्यान घेण्यात येणार आहेत अशी माहिती आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रती कुलपती तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आज दिली. फोटो: फाईल राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या  परीक्षां संदर्भात  आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांच्यासोबत आज मुंबईतील मंत्रालयात झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.  या परीक्षांमध्ये एम.बी.बी.एस., बी.डी.एस., बी.ए.एम.एस., बी.यु.एम.एस. ,बी. एच.एम.एस., बी.पी.टी.एच.,बी.ओ. टी.एच.आणि बीएससी. नर्सिंग या पदवी परीक्षांच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षांच्या परीक्षांचा  समावेश आहे. या वैद्यकीय पदवी  परीक्षां सोबतच मॉडन मिड लेव्हल सर्व्हिस प्रोव्हायडर कोर्स तसेच सर्टिफिकेट कोर्स इन फर्माकॉलॉजी या परीक्षाही या कालावधीत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

देशात २४ तासात साडेतीन लाखावर रुग्ण बरे; रुग्ण संख्येत १ लाख २७ हजाराने घट

नवी दिल्ली| भारतात सलग सहाव्या दिवशी ,  दैनंदिन बरे होणाऱ्या   एकूण रुग्णांची संख्या दैनंदिन नवीन रुग्णांपेक्षा अधिक झाली असून गेल्या 24 तासांत 3,89,851 रुग्ण बरे झाले. त्यामुळे भारतात  कोविडमुक्त झालेल्याची एकूण  संख्या आज 2,19,86,363 वर पोहोचली आहे. बरे होण्याचा राष्ट्रीय दर 86.23% पर्यंत पोहोचला आहे. तसेच गेल्या  24 तासांत 1,27,046 ने घट झाली आहे.  नवीन बरे झालेल्या रुग्णांपैकी 74.94% दहा राज्यातील आहेत. भारतात सलग तिसऱ्या दिवशी 3 लाखांपेक्षा कमी नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.  गेल्या 24 तासांत 2,67,334 नवीन रुणांची नोंद झाली. गेल्या  24 तासांत नोंद झालेल्या रुग्णांपैकी 74.46% रुग्ण दहा राज्यांमधील आहेत. तमिळनाडूमध्ये सर्वाधिक नवीन 33,059 , रुग्ण आढळले आहेत ,  त्याखालोखाल केरळमध्ये 31,337 नवीन रूग्ण आढळले आहेत. आता देशातील एकूण पॉझिटिव्ह रूणांपैकी 12.66% रूग्ण सक्रीय आहेत. देशाच्या  एकूण सक्रिय रुणांपैकी 69.02% रुग्ण 8 राज्यातील आहेत. गेल्या  24 तासांत 20 लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या (ही भारतातील एका दिवसात आतापर्यंत सर्वात...

कोरोना, म्युकरमायकोसिस आणि उपचार

म्युकरमायकोसिस हा आजार म्युकरमायसेट्स या फंगसामुळे होतो, हा आजार खूप दुर्मिळ आहे, परंतु तेवढाच गंभीर स्वरूपाचा आहे याला जर वेळीच ओळखलं नाही आणि औषध उपचार केला नाही तर जीवघेणा ठरू शकतो. फोटो: DGIPR हा आजार होण्याचे कोणते कारणे आहेत. याचे  मुख्य कारण म्युकरमायसेट्स या फंगी किंवा बुरशीमुळे होतो, हा आजार कोणाला होऊ शकतो , जे  कोणी डायबिटीज , एच. आय.व्ही.किंवा कॅन्सरने बरेच दिवस आजारी असतात किंवा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतात तेंव्हा त्यांची रोग प्रतिकारशक्ती खूप जास्त प्रमाणात कमी होऊ शकतो तेंव्हा हा फंगस नाकाद्वारे किंवा तोंडाद्वारे किंवा त्वचा वरील जखमा द्वारे शरीरात प्रवेश करून हा आजार होऊ शकतो. आधी हा फार कमी लोकांना आजार होत होता. आपण कधी याचे नाव हि ऐकले नव्हतो. फार दुर्मिळ असा हा आजार होता. परंतु आता कोरोनामुळे आणि त्याच्यावरील वापरण्यात येण्या-या अनेक प्रकारच्या औषधांमुळे मुख्यतः स्टेरॉईडमुळे काहींची रोगप्रतिकारशक्ती फारच कमी आहे. त्यांना हा आजार होऊ शकतो परंतु कोरोना झालेल्या सर्वांनाच हा आजार होत नाही. ज्यांचे रोग प्रतिकार शक्ती फार म्हणजे फारच कमी झाला असेल तरच हा आजार होऊ ...

नार-पारचे पाणी उत्तर महाराष्ट्रात वळविण्यासाठी ध्यास घेणे आवश्यक: ना. छगन भुजबळ

नाशिक| महाराष्ट्राच्या भूमीवर पडणारा पावसाच्या प्रत्येक थेंबावर महाराष्ट्राचा हक्क आहे. त्यामुळे आज आपण वापरात नाही म्हणून गुजरातला ह्या पाण्याचा कायमस्वरूपी हक्क जलकराराद्वारे देण्यात येऊ नये. हे पाणी उचलून उत्तर महाराष्ट्रात वळविण्यासाठी कितीही खर्च आला तरी तो करण्याची तयारी दाखवली पाहिजे. मांजरपाडा-१ चे स्वप्न मी दहा वर्षापूर्वी बघितले होते. तो प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दहा वर्ष अथक प्रयत्न करावे लागले. या वर्षी पावसाळ्यात ह्या प्रकल्पाद्वारे दिंडोरी-चांदवड-येवला व त्यापुढील तालुक्यांनाही त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे नार-पार चे पाणी उत्तर महाराष्ट्रात वळविणे शक्य आहे. हे मांजरपाडा प्रकल्पाद्वारे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे मांजरपाडा-१ ह्या प्रकल्पाकडे पथदर्शी प्रकल्प म्हणून बघितले पाहिजे. अशा प्रकारे सह्याद्रीच्या डोंगररांगेत अनेक ठिकाणी बोगदे करून समुद्राला वाया जाणारे पाणी उत्तर महाराष्ट्रात आणणे शक्य आहे. मात्र हा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी एक ध्यास घेऊन सर्वांनी एकत्र येऊन एकजुटीने प्रयत्न करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक ...