Skip to main content

Posts

Showing posts from February, 2021

गडकोटांचे पर्यावरण ही सामूहिक जबाबदारी: राहुल श्रीवास्तव

पुणे| शिवरायांचे गडकिल्ले हे महाराष्ट्राचे वैभव आहे. गडांचे जतन, संवर्धन, स्वच्छता व पर्यावरण राखणे, ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन  पर्यावरण कार्यकर्ते राहुल श्रीवास्तव यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले. चिखली, मोरेवस्ती येथील शब्दब्रम्ह विविधांगी सेवा संस्था, योगेश्वर केदारनाथ सर्वधर्मसमभाव शिवमंदिर व सुरेश कृष्णा जाधव स्मृती वाचनालयाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या  वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण श्रीवास्तव यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.  अध्यक्षस्थानी कीर्तनकार प्रवीण दाऊतपुरे होते.  या वेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे काठोळे गुरुजी, संस्थेचे संस्थापक प्रभाकर चव्हाण, योगशिक्षक दत्तात्रय महापुरे, सामाजिक कार्यकर्ते राहुल वाघमारे, उद्धव साळवे आदी उपस्थित होते. वक्तृत्व स्पर्धेत अथर्व तुपे प्रथम वक्तृत्व स्पर्धेत अथर्व गणेश तुपे याने प्रथम, तर हरिओम बिरादार याने द्वितीय क्रमांक पटकावला. मोनिका बिरादार, ओंकार बोरकर, संजय नवगिरे, गौरी माने, आनंद बिरादार यांना प्रोत्साहनार्थ पारितोषिक देण्यात आले.  या वेळी मुलांनी पोवाडे,...

मंत्री संजय राठोड यांचा अखेर राजीनामा

मुंबई| पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मंत्री संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला आहे. संजय राठोड यांनी वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि राजीनामा सादर केला आहे. मुख्यमंत्री आणि संजय राठोड यांच्यात दीर्घकाळ चर्चा झाली आणि त्यानंतर संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला. राजीनामा देतो पण या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर त्याचा स्वीकार करावा अशी काहीशी भूमिका संजय राठोड यांनी घेतली होती. आपले मंत्रिपद टिकावं म्हणून संजय राठोड शेवटपर्यंत प्रयत्नशील होते, संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मोठा दबाव होता. या प्रकरणावरुन शिवसेना, महाविकास आघाडीवर टीकेची झोड उडवली होती. संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत शनिवारी संजय राऊत यांनी सूचक विधान केलं होतं. संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं की, "छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातातला राजदंड काय सांगतो? महाराष्ट्र धर्म म्हणजे राजधर्माचे पालन!" पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी संजय राठोडांचा राजीनामा घेण्यासाठी विरोधकांचा दबाव वाढत आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीने देखी...

राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे आयोजित 'वाण आरोग्याचं' उपक्रमास मोठा प्रतिसाद

नाशिक| राष्ट्रवादी महिला काँग्रेस व राष्ट्रवादी डॉक्टर सेल आयोजित "वाण आरोग्याचं" या कार्यक्रमाचे आयोजन नाशिक तालुक्यातील विल्होळी गाव येथे झाला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे होत्या. या कार्यक्रमाचे राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या नाशिक जिल्हाचिटणीस प्रो.सुवर्णा भिकचंद दोंदे यांच्या वतीने आयोजन करण्यात आले. नाशिक तालुक्यातील विल्होळी गटात कार्यक्रम घेण्यात होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, डॉक्टरसेलचे डॉ.सागर तांबोळी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.ज्योती म्हस्के यांचे प्रमुख मार्गदर्शन महिलांना लाभले.तसेच डॉ.सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. योगेश गोसावी यांचे विशेष सहकार्य लाभले.  डॉ.ज्योती म्हस्के यांनी महिलांना स्तन व गर्भपिशवी कॅन्सर बद्दल मार्गदर्शन केले तसेच महिलांचे हिमोग्लोबीन, शुगर व कॅन्सरच्या प्राथमिक टेस्ट केल्या.

कुसुमाग्रजांचे साहित्य दीपस्तंभासारखे: डॉ. कालिदास चव्हाण

नाशिक| कुसुमाग्रजांचे साहित्य हे दीपस्तंभासारखे असून आरोग्य शास्त्राचा विद्यार्थ्यांनी त्याचे वाचन आणि अनुभव घेतला पाहिजे असे प्रतिपादन कुलसचिव डॉ कालिदास चव्हाण यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने कुसुमांजली  या विशेष कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली. या प्रसंगी डॉ. चव्हाण बोलत होते.  विद्यापीठातर्फे कोविड परिस्थितीमुळे यंदा हा कार्यक्रम ऑनलाईन झाला.  सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक व गायक श्री संजय गीते यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांचे गीत सादर केले. त्यांच्याशी मुलाखतीद्वारे साहित्याचा रसास्वाद आणि कवितांचे व स्वगताचे अभिवाचन संवादक डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. याप्रसंगी डॉ. अजित पाठक यांनी सांगितले की, साहित्य व्यक्तिमत्व विकास करत असतो त्यामुळे   या कार्यक्रमाचे प्रक्षेपण यू ट्यूब चॅनल वरून करण्यात आले आहे. त्याचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे सांगीतले. याप्रसंगी मा. कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण  परीक्षा नियंत्रक डॉ अजित पाठक, वित्त व लेखा अधिकारी श्री. नरहरी कळसकर, उपकुलसचिव डॉ. सुनील फुगारे, विधी...

जलजीवन मिशन यशस्वीसाठी योग्य आराखडा तयार करा: खा. डॉ. भारती पवार

नाशिक| पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रत्येक नागरिकाला स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे म्हणून जलजीवन मिशन योजना देशभरात राबवली जात आहे. सदरची योजना सन 2019 पासून सुरू झाली असून ती सन 2024 पर्यंत पूर्णत्वास नेण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहेत .हे पिण्याचे पाणी या योजने अंतर्गत  नागरिकांबरोबरच शाळा, अंगणवाडी, हॉस्पिटल यांच्यापर्यंत ही पोहचले जावे हाच या योजनेचा मूळ उद्देश आहे.  जलजीवन मिशन, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद यांच्या अधिकाऱ्यांसोबत जिल्हा अधिकारी कार्यालयात खा. डॉ भारती पवार,आमदार माणिकराव कोकाटे, आ. दिलीपकाका बनकर, आ. नितीन पवार, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, नरवडे मॅडम, शेळकंदे, मोरे यांक्यासह इतर अधिकारी, यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली. जलजीवन मिशन आराखड्यातील कामे करत असतांना पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे  त्यासाठी मायक्रो प्लॅनिंग आवश्यक असल्याचे खा. डॉ भारती पवार यांनी सांगितले. यासाठी झेड. पी. पाणीपुरवठा विभाग व एम. जी. पी .यांनी योग्य समन्वय तयार करावा, ग्रामीण भागातील खास ...

विभागीय केंद्रामध्ये संशोधन आणि प्रशिक्षण व्हावे: ना.अमित देशमुख

औरंगाबाद| नव्या जगाची गरज ओळखुन आरोग्य विद्यापीठाच्या विभागीय केंद्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र उभारण्यात यावे असे प्रतिपादन विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री मा.ना.श्री.अमित देशमुख यांनी केले.  महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या औरंगाबाद विभागीय कार्यालयात प्रशासकीय इमारतीचा शिलान्यास, ध्येय: शुन्य टक्के रॅगिंग अहवाल पुस्तिकेचे प्रकाशन आणि विद्यापीठातर्फे जीवन गौरव पुरस्काराचे वितरण या समारंभात करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी  मा.ना. श्री. अमित देशमुख यांच्या समवेत व्यासपीठावर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ नितीन करमळकर,  माजी कुलगुरू    डॉ दिलीप म्हैसेकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, डॉ. अजित पाठक, श्री. एन.व्ही.कळसकर, डॉ. सचिन मुंबरे, डॉ. जयंत पळसकर, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. धनाजी बागल आदी मान्यवर उपस्थित होते. या समारंभात अध्यक्ष स्थानावरुन बोलतांना विद्यापीठाचे मा. प्रति-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले की, विद्यापीठातर्फे विविध ठिकाणच्या विभागीय केंद्रामध्ये...

राज्यस्तरीय आदर्श पत्रकार दर्पणरत्न पुरस्काराने दै.आपलं महानगरचे संतोष गिरी सन्मानित

निफाड |मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी, मुंबई यांच्या मार्फत पत्रकारिता, कृषी, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कारासाठी सन्मानित करण्यात येते.यातील राज्यस्तरीय आदर्श  पत्रकार  दर्पणरत्न पुरस्कार २०२१ पुरस्कारासाठी महाराष्ट्र गुणरत्न अवार्ड या करिता दैनिक आपलं महानगरचे निफाड तालुका प्रतिनिधी संतोष राजगिर गिरी यांना मंगळवारी नाशिकस्थित औरंगाबादकर सभागृहात सन्मानित करण्यात आले. सामाजिक बांधिलकी, जबाबदारीचे भान ठेवत पत्रकारिता करणाऱ्या संतोष गिरी यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कृष्णाजी जगदाळे व विश्वस्त मीनाक्षी जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा पुरस्कार वितरण सोहळा झाला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.स्वामी श्रीकंठानंदजी, साहित्यिक रमेश आव्हाड मुंबई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर जाधव, कायदेशीर सल्लागार सुरेंद्र सोनवणे, दैनिक सकाळचे पत्रकार विजयकुमार इंगळे, मानव धन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश कोल्हे, तर पुरस्कार वितरण सोहळ्याचे स्वागताध्यक्ष एल .एस.  दाते का...

रानवड साखर कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देऊ:आ. दिलीपराव बनकर; बनकर पतसंस्थेच्या हाती सूत्रे आल्याने रासाकाला मिळणार नवसंजीवनी

संतोष गिरी  निफाड| रासाकाला पूर्वीसारखेच गतवैभव प्राप्त करून देऊन कर्मवीरांचे थांबलेल्या विकास चक्राला गती देण्यासोबतच पुढील लक्ष निसाकावर केंद्रित करत त्याला पुनर्वैभव प्राप्त देण्यासाठी प्रयत्नशील आहे,असे सांगून तालुक्याच्या विकासासाठी सर्वांनी जात-पात, गट-तटला मूठमाती देऊन एकत्र येण्याचे आवाहन केले निफाडचे विकास पुरुष आ. दिलीपराव बनकर यांनी केले. गणेश जयंतीच्या शुभमुहूर्तावर निफाड तालुक्याचे आमदार दिलीपराव बनकर यांनी आज रासाका अर्थात कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आपले एक पाऊल पुढे टाकत कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करत तालुक्यातील ऊस उत्पादक  व कामगार यांची सभा घेत रासाका अधिकृतरित्या स्वर्गीय अशोकराव बनकर पतसंस्थेने ताब्यात घेतल्याचे जाहीर केले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या काव्यपंक्तीला अनुसरून २०१९ विधानसभा निवडणुकीत नामदार अजितदादा पवार यांनी निफाड येथे दिलेला शब्द रासाका व निसाका दिलीप बनकर आमदार झाल्यास सुरू करू हे वाक्य सत्य करत दिलीप बनकर यांनी अथक प्रयत्नातून...

आरोग्य विद्यापीठाच्या औरंगाबाद विभागीय केंद्र प्रशासकीय इमारतीचा १६ फेब्रुवारीला शिलान्यास, ना.अमित देशमुख यांची उपस्थिती

औरंगाबाद| महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या औरंगाबाद विभागीय कार्यालयात प्रशासकीय इमारतीचा शिलान्यास समारंभ विद्यापीठाचे मा. प्रति-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते मंगळवार दिनांक 16 फेब्रुवारी 2021 रोजी औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आला आहे. संध्याकाळी साडेचार वाजता संपन्न होत असलेल्या या कार्यक्रमास विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ नितीन करमळकर, माजी कुलगुरू डॉ दिलीप म्हैसेकर,  कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण व विविध प्राधिकरण सदस्य आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाच्या सेक्टर एन 2 , सर्व्हे क्रमांक 60, मुकुंदवाडी येथे औरंगाबाद विभागीय केंद्राची ईमारत होणार आहे. येथेच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या समारंभात मान्यवरांच्या हस्ते ध्येय: शून्य टक्के रॅगिंग या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. तसेच आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ताींना विद्यापीठातर्फे जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात येतो. यावर्शी वैद्यकीय विद्याशाखेतील जीवनगौरव पुरस्कार डॉ. अरुण महाले, डॉ. इंदुप्रकाश गजभिये, डॉ. शरद कोकाटे यांना तर दंत विद्याश...

शेतकऱ्यांसह जनतेचा वीज पुरवठा खंडित करू नये: खा. डॉ. भारती पवार

नाशिक| शेतकऱ्यांचे शेतात रब्बी पिकांचे कामे सुरू आहे, अशातच वीज बिल भरले नाही तर कनेक्शन कट केले जाईल असा आदेश सरकारने काढला आहे. त्यामुळे कोरोना काळाच्या संकटातून शेतकरी हळुहळू सावरत असताना हा प्रकार शेतकऱ्यांना अडचणीत भर टाकणारा आहे. शेतकऱ्याला आता खरी मदतीची गरज असून शेतकऱ्यांसह जनतेचा ही वीज पुरवठा तोडू नये अशी मागणी खा. डॉ. भारती पवार यांनी लोकसभेत केली आहे.  शेतकऱ्यांचं सामान्य जनतेच्या गंभीर मुद्यावर खा. डॉ.भारती पवार यांनी संसदेत प्रश्न मांडले, कोरोनाचे संकट असेल किंवा निसर्गाचे संकट असेल शेतकरी मोठ्या धैर्याने हे संकट पेलत आज आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये योगदान देत आहे. खा. डॉ.भारती पवार यांनी नाशिक जिल्ह्याचे उदाहरण देत आज गहू, द्राक्ष, कांदा, हरभरा इतर रब्बी पिकांची काढणी चालू आहे. याकरता वेळेवर शेतीला पाणी देणे गरजेचे असताना महाराष्ट्र राज्य सरकारने एक शासन निर्णय (जी.आर.) असा काढला आहे की, जर विज बिल भरले नाही तर कनेक्शन कट करायचं.  शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आज विजेची गरज आहे. त्यांना नोटीस दिली पाहिजे, सवलत दिली पाहिजे. परंतु चार शेतकऱ्यांनी वीज बिल भरले नाह...

..तर मुख्यमत्र्यांनी ठाकरीबाणा दाखवून त्या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा: प्रवीण दरेकर

शिर्डी| विशेष प्रतिनिधी| राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील एका मंत्र्याच्या बाबतीत जनतेच्या मनात संशय निर्माण होत असेल आणि त्याला आधारित काही क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाले असतील तर लोकांच्या मनात आता फार काळ संभ्रम असता कामा नये, याच सरकारमधील मागे एका मंत्र्याच्या बाबतीत अशीच घटना घडली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धाडसाने ठाकरीबाना दाखवून तातडीने राजीनामे घ्यायला हवे अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली. दरम्यान विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शनिवारी शिर्डी येथे साईदरबारी मध्यान्ह आरतीनंतर हजेरी लावत साईसमाधीचे मनोभावे दर्शन घेतले. याप्रसंगी शिर्डी शहर भाजपच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, नगराध्यक्ष शिवाजीराजे गोंदकर, मा.उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन,साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे, भाजपचे नगरसेवक अशोक गोंदकर आदीसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पत्रकार परिषदेत बोलतांना दरेकर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन जो पक्ष उभा राहिला आणि आज छत्र...

साहित्य संमेलनास १६ लोकप्रतिनिधींनी दिली मदत

नाशिक| ९४ साहित्य संमेलनास १६ लोकप्रतिनिधींनी दिली मदत केली आहे, साहित्य संमेलनास आपल्या आमदार निधीमधून पालकमंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री दादाजी भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, निलम गोऱ्हे, डॉ.सुधीर तांबे, हिरामण खोसकर, देवयानी फरांदे, सीमा हिरे, सरोज अहिरे, राहुल ढिकले, दिलीप बनकर, नितीन पवार, माणिकराव कोकाटे, डॉ. राहुल आहेर, सुहास कांदे, दिलीप बोरसे अशा १६ लोकप्रतिनिधींनी साहित्य संमेलनास मदत आहे दिली. त्यासोबच इतर ही व्यक्ती संस्थांनी साहित्य संमेलनाला मदत केली आहे. नाशिक सिटीझन फोरमचे अध्यक्ष तथा रामबंधु मसाले समुहाचे हेमंत राठी यांनी सारस्वत बँकेच्यावतीने सात लाख रुपये व राम बंधु मसाले समुहाकडून ३ लाख अशी एकूण १० लाखाची मदत संमेलनासाठी जाहिर केली. तसेच संदिप फांउडेशने २०० व भुजबळ नॉलेज सिटी संस्थेने २०० पाहुण्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. तसेच हॉटेल सिटी प्राईड, हॉटेल सुर्या, हॉटेल हॉलीडे ईन, हॉटेल एमराल्ड पार्क यांनी देखील येणाऱ्या काही पाहुण्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. 

संमेलनाच्या यशस्वीतेसाठी विविध संस्थांनी आर्थिक योगदानासाठी पुढे यावे: ना. भुजबळ

नाशिक| 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास शासनाच्यावतीने जवळपास दोन कोटींची मदत उपलब्ध झाली आहे. परंतु संमेलनास अजून निधीची आवश्यकता असल्याने नाशिकमधीन विविध संस्थांनी संमेलनात आपले आर्थिक योगदानासाठी पुढे यावे, असे आवाहन अन्न राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री व संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन नाशिक येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निधी संकलनाबाबतची आढावा बैठक पालकमंत्री श्री.भुजबळ यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, उपमहापौर भिक्कुबाई बागुल, स्थायी समिती सभापती गणेश गीते, साहित्य संमेलनाचे समन्वयक माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मनपा आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी लीना बनसोड, संमेलनाचे मुख्य समन्वयक नितीन मुंडावरे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, डॉ. आवेश पलोड, लोकहितवादी मंडळाचे जयप्रकाश जातेगावकर, मुकुं...

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, नागरिकांनी सतर्क रहावे: ना. भुजबळ

नाशिक| कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करून सतर्क रहावे. तसेच शासकीय व खाजगी लॅबमधील स्वॅब तपासणी अहवालातील तुलनात्मक विश्लेषण करून कोरोना परिस्थितीबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल, असे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात जिल्हातील कोरोना उपाययोजनाबाबत आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, बिटको रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. आवेश पल्लोड, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक सतीश भामरे, अन्न, औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्त माधुरी पवार, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, डॉ. उत्कर्ष द...

द्राक्षासह इतर फळ, भाजीपाल्याच्या निर्यातीवर सबसिडी जाहीर करा: खा.डॉ.भारती पवार

नाशिक| महाराष्ट्रातील दिंडोरी लोकसभा मतदार संघासह नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर द्राक्ष शेती केली जाते. जवळपास ७५ टक्के द्राक्ष निर्यात ही भारताबाहेर नेदरलँड, रुस, बांगलादेश, जर्मनी, यु.के. यासह अनेक देशांमध्ये केली जात आहे. द्राक्षासह इतर फळ, भाजीपाल्याच्या निर्यातीवर सबसिडी जाहीर करा अशी मागणी खा.डॉ.भारती पवार यांनी केली आहे. आपल्या मार्फत निर्यात केल्या जाणाऱ्या द्राक्षांची गुणवत्ता इतर देशांच्या तुलनेत सर्वोत्तम आहे. फळांमध्ये सर्वात जास्त निर्यात द्राक्षांची केली जाते असे बोलत असताना खा.डॉ.भारती पवार यांनी केंद्र सरकारचे आभार व्यक्त करत निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी एम.इ.आय.एस.या योजनेअंतर्गत ताजे फळे आणि भाजीपाल्याच्या निर्यातीवर सबसिडी दिली ही जीएफ.ओ. बी.च्या मूल्यावर ५ ते ७ टक्के होती. ही योजना दि.३१ डिसेंबर २०२० पर्यंत लागु होती.  केंद्र सरकारने आर.ओ.डी.टी.ई.पी. नावाची एक नवीन योजना लागू केली आहे. परंतु योजनेअंतर्गत किती टक्के सबसिडी मिळणार आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही असे सांगत खा.डॉ.भारती पवार यांनी संसदेच्या सभापती महोदयांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री य...

देवळाली मतदार संघात विविध विकास कामांचे उद्घाटन

नाशिक|देवळाली मतदार संघातील विविध विकास कामांचा उद्घाटन समारंभ  आमदार सरोज अहिरे यांच्या उपस्थितीत  झाला.   यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुने राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष निवृत्ती महाराज कापसे, माजी सभापती रत्नाकर चुंबळे, पंचायत समितीचे माजी उपसभापती ढवळू फसाळे, पंचायत समितीचे सदस्य कैलास बेंडकोळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक वाघ, वामन खोसकर, रमेश डंबाळ, भाऊसाहेब पालखेडे, विशाल गायकर आदी मान्यवर उपस्थित होते.

जीएसटीतील जाचक तरतूदी विरोधात व्यापाऱ्यांचा २६ फेब्रुवारीला देशव्यापी बंद: मेहुल थोरात

नाशिक| जीएसटीतील जाचक तरतूदी, नियमांमुळे व्यापाऱ्यांना व्यापार करणे अवघड झाले आहेे. या जाचक तरतुदींविरोधात कॅटने (सीएआयटी) २६ फेब्रुवारी रोजी देशव्यापी बंदची हाक दिली आहे, अशी माहिती कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स राज्य समितीचे उपाध्यक्ष मेहुल थोरात यांनी दिली. थोरात म्हणाले की, जीएसटीतील नियमांच्या सारख्या बदलांमुळे व्यापाऱ्यांना व्यापार करणे अवघड झाले आहे. जाचक नियम व तरतुदीमुळे इन्स्पेक्टरराज आणि भ्रष्टाचार वाढीस लागेल. त्यामुळे अधिकारी केव्हाही नोंदणी रद्द करू शकता, अगदी शुल्लक चुकीमुळे केव्हाही जीएसटी नोंदणी क्रमांक रद्द करण्याची टांगती तलवार कायम लटकलेली असते. त्यातच दंड आणि शिक्षेची तरतूद ही आहे. अशा जाचक तरतुदींमुळे व्यापारी देशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाही. व्यापाऱ्यांना व्यापार करणे कठीण होईल असे थोरात यांनी स्पष्ट केले. त्यामुळे व्यापारी आणि विविध संघटनांमध्ये जनजागृती होणे गरजेचे असून सर्वांनी एकत्र येऊन जाचक नियमांना विरोध करून आपली शक्ती दाखवण्याचा निर्धार (सीएआयटी)कॅटनेे केला आहे. त्यासाठी बंद यशस्वी करण्यासाठी सर्व व्यापारी संघटनांनी कंबर कसली असून इतर संघटनांनी ही ...

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचा रास्ता रोको

नाशिक| विंचूर|  पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसचे दर कमी करण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने तातडीने हस्तक्षेप करून इंधनाचे भाव कमी करावेत व सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पगार यांनी केली आहे. पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरवाढीच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने नाशिक - औरंगाबाद राज्य महामार्गावरील विंचूर चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्याप्रसंगी अॅड. रविंद्र पगार बोलत होते. यावेळी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, पुरुषोत्तम कडलग, राजेंद्र डोखळे, हरिश्चंद्र भवर, बबन शिंदे आदींची भाषणे झाले. पेट्रोल, डिझेलची मोठया  प्रमाणात दरवाढ झाल्याने महागाईचा भडका उडाला असून केंद्रातील मोदी सरकारला सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांशी कुठलेही देणेघेणे नसल्याने सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकी पूर्वी घरगुती गॅसचे भाव वाढल्यावर टीव्हीवर येऊन गृहिणीचे बजेट कोलमडल्याचे ओरडून सांगणाऱ्य...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे १५१ व्या वर्षात शासनाची अभूतपूर्व भेट

नाशिक| नाशिक येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठाच्या अधिनस्त १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्न ४३० खाटांचे रूग्णालय सुरु करण्यास नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे, ही मान्यता म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या १५१ व्या वर्षात राज्य शासनाने जिल्हावासीयांना दिलेली एक अभूतपूर्व अशी भेट असून त्याचबरोबर ती एक मोठी उपलब्धीही आहे, येत्या शैक्षणिक वर्षात या महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव तात्काळ केंद्र सरकारला सादर करण्याच्या सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.  ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात  आज नाशिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालया संदर्भात आयोजित बैठकीत बोलत होते. यावेळी यावेळी जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मनपा आयुक्त कैलास जाधव, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव कालिदास चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, प्रांताधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी  पी.एस.मीना,उप...

भिडेवाडा वास्तु संदर्भात सांस्कृतिक कार्य विभागाने त्वरित समिती गठीत करावी: ना.भुजबळ

मुंबई| पुण्यातील भिडेवाडा येथे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पाहिली शाळा येथे सुरु केली. या वास्तुचे संवर्धन करण्यासाठी ही वास्तु स्मारकामध्ये रुपांतरित करणे आवश्यक आहे. मात्र गेल्या दहा वर्षांपासून या प्रकरणात तोडगा निघाला नसल्याने सांस्कृतिक कार्य विभागाने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समितीचे गठन करावे अशी सूचना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज दिले. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात सुरु केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेची वास्तू असणारा भिडेवाडा स्मारकामध्ये रुपांतर करण्यासंदर्भातील बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, आमदार रोहित पवार, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त  आयुक्त रुबल अग्रवाल, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून भूसंपादनाचे काम पाहणारे संबंधित अधिकारी यांच्यासह नगरविकास विभागाचे उपसचिव सतिश मोघे, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. श्री. भुजबळ यावेळी म्हणाले की, महात्मा ज्योतिबा फुले आणि साव...

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संस्थानला २५ कोटींचा निधी द्या: निवृत्ती महाराज कापसे

नाशिक| जगद्गुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या मंदिरासाठी शासनाकडून पर्यटन विकास महामंडळाकडून 25 कोटी निधी उपलब्ध करून द्यावा अशी ह.भ.प. निवृत्ती महाराज कापसे यांनी  मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, महाराष्ट्रात संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संस्थान त्रंबकेश्वर हे इतर संस्थान पेक्षा उपेक्षित राहिलेले आहे. या संस्थांचा विकास होणे अत्यंत आवश्यक आहे. मंदिराचा जिर्णोध्दारा संदर्भात शासनाकडून भरीव  निधी उपलब्ध होणे अत्यावश्यक आहे, तरी आपण या कामासाठी शासनाकडून कमीत कमी 25 कोटीचा निधी उपलब्ध करून द्यावा जेणेकरून या संस्थानचा पंढरपूर, आळंदी, शिर्डी संस्थानच्या धर्तीवर विकास करता येईल.संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचे भव्य दिव्य मंदिर व्हावे अशी संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी व महाराष्ट्राबाहेरील वारकरी यांची अपेक्षा आहे. यामुळे पर्यटनाला चालना मिळेल त्रंबकेश्वर या नगरीचाही विकास होण्यास मदत होईल याठिकाणी संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ यांच्या प्रमाणेच आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर हे या ठिकाणी आहे यामुळे या अवस्थांचा विकास होणे अत्यंत...