Skip to main content

Posts

Showing posts from May, 2020

नाशिकचे शेतकरी राजेंद्र जाधव यांच्या संशोधनाची प्रधानमंत्री यांच्या 'मन की बात' मध्ये दखल

नाशिक : नाशिकच्या बागलाण तालुक्यातील शेतकरी आणि व्यावसायिक असलेले राजेंद्र जाधव संशोधक आहेत, त्यांनी कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी अनोखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सॅनिटायझर फवारणी यंत्र विकसित केले आहे. या यंत्रामुळे कोरोनाच्या लढ्यासाठी मोठी मदत झाली झाली आहे व होणार आहे, त्यामुळे या उल्लेखनीय निर्मिती कार्याचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज  ‘मन की बात’ कार्यक्रमात विशेष कौतुक करुन संशोधकांचा गौरव केला आहे. फोटो: जिमाका नाशिक कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी मेक इन इंडिया अंतर्गत संशोधित सॅनिटायझर मशीनमुळे कोरोना उच्चाटनाच्या युद्धात मोठे बळ मिळाले आहे. राष्ट्रपती पुरस्कार विजेते संशोधक राजेंद्र जाधव यांच्या या शोधामुळे नाशिक जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य आणि पोलीस यंत्रणेकडून कोरोना विरोधात लढा सुरू आहे. असे असले तरी रस्ते, वसाहती, लिफ्ट, घरांचे दरवाजे, कंपाऊंड गेट, भिंती आदींना माणसांचा स्पर्श झाल्याशिवाय राहत नाही. कोणत्याही मार्गाने स्पर्श होणाऱ्या विविध जागांवर निर्जंतुकीकरण करून संसर्ग टाळणे शक्य आहे. हे आव्हाना...

'शाळा'....कवी जी पी खैरनार

!! 🌹🌹 "शाळा" 🌹🌹 !! ************************ नेसायचा रामु पट्टयाची चड्डी ! चड्डीला सारखा कमरेवर वढी !! चड्डीला असती पिळदार नाडी ! हुतुतु खेळतांना लावतसे काडी !! चिऊताई म्हणे चिव चिव म्हणा ! कावळेराव सांगे सुट्टीचं घ्याना !! खेळ खेळुन रामु दमतसे गडी ! हळुच भाकरीचं पेंडकच सोडी !! मित्रांना सांगे चला रे जोडी ! वाटून खाऊ कैरीच्या फोडी !! चिऊताई म्हणे चिव चिव म्हणा ! कावळेराव सांगे सुट्टीचं घ्याणा !! रामुची गंमत असे खूप भारी ! जोराचा पाऊस येता जातसे घरी !! श्रावणात येती पावसाच्या सरी ! बारदान घोंगडी घेई अंगावरी !! चिऊताई म्हणे चिव चिव म्हणा ! कावळेराव सांगे सुट्टीचं घ्याना !! रामुच्या शाळेची तऱ्हाच न्यारी ! पनाळी कौलांची छत दिसे भारी !! शाळेची घंटा टांगे अढयावरी ! सुटती भरती शाळा टणटण करी !! चिऊताई म्हणे चिव चिव म्हणा ! कावळेराव सांगे सुट्टीचं घ्याना !! रामुला पाहून चिव चिव करी ! पिलांची किलबिल असे ती भारी ! चिमणीचा खोपा दिसे भिंती वरी ! खोप्यात दिसती पिलं तर भारी !! चिऊताई म्हणे चिव चिव म्हणा ! कावळेराव सांगे सुट्टीचं घ्याना !! रामुला...

शासनाच्या आदेशानंतरच साईमंदिर उघडण्याबाबतचा निर्णय; अफवांना सीईओंकडून पूर्णविराम

माधव ओझा   शिर्डी: जगभरातील भाविकांची पंढरी साईबाबा समाधी मंदीर उघडण्याच्या अफवेने परिसरात जोर धरला होता. त्यामुळे नवनवीन उपाय व योजनांची चर्चा रंगू लागली होती.काल सकाळी साईबाबा संस्थान प्रशासनाचा मंदीर उघडण्याबाबत कुठलाही निर्णय झालेला नव्हता. याबाबत केंद्र सरकार व राज्य सरकारचे आदेश साईबाबा संस्थानला आल्यानंतरच सईमंदिर उघडण्याबाबतचा निर्णय घेणार असल्याची माहिती संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली आणि अफवांना पूर्णविराम दिला.

शिर्डीत महिलेला कोरोनाची बाधा; शिर्डीकर हादरले

माधव ओझा   शिर्डी: इतिहास नसलेल्या महिलेला कोरोनाची बाधा झाल्याच्या घटनेनं शिर्डीकर हादरले. शिर्डीलगत असलेल्या निमगावमध्ये निवासी संस्थान कर्मचाऱ्याने आपल्या आईला 23 तारखेला नेहमीच्या आरोग्य तपासणीकरिता साईबाबा हॉस्पिटल येथे आणले.  त्यादिवशी लक्षणे नसल्याने  डॉक्टरांनी नेहमीचा औषध उपचार सुरू केला.त्यानूसार पुढील तीन दिवसानी सदर महिलेचा सी टी स्कँन कोरोना सदृश्य जाणवल्याने त्या महिलेस अहमदनगर येथे पाठवले.  दुसरे दिवशी सदर महिला ही कोरोना पॉझिटीव्ह असल्याचा रिपोर्ट आल्यावर शिर्डी परिसर हादरला.  23 ते 26 मे या तीन दिवसात साईबाबा हॉस्पिटलचे सुमारे 12 कर्मचारी या महिलेच्या थेट संपर्कात आले होते.त्या सर्वासह परिवारातील सदस्य असे एकुण 29 लोकाना अहमदनगर येथे कोरोना तपासणी करिता पाठविले.त्यापैकी पाच जणांचे अहवाल हे कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आल्याने शिर्डीकर चांगलेच अस्वस्थ झाले आहेत. तर निमगाव पुढिल 14 दिवसाकरीता बंद करण्यात आल्याची माहिती राहाता तहसीलदार कुंदन हिरे यानी दिली.  शिर्डीच्याच हद्दीत पहिला कोरोना रुग्ण आढळला व त्यामूळे अन्य पाच बाधित झाले आह...

"माझा मृत्यू झाल्यास रावसाहेब दानवे जबाबदार !" हर्षवर्धन जाधव यांचे खळबळजनक आरोप

औरंगाबाद/प्रतिनिधी: काही दिवसांपूर्वी राजकारणातून संन्यास घेतलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी त्यांचे सासरे रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. माझा मृत्यू झाला तर त्याला रावसाहेब दानवे जबाबदार असतील, असं हर्षवर्धन जाधव म्हणाले आहेत. रावसाहेब दानवेंवर सडकून टीका करतानाचा एक व्हिडिओ हर्षवर्धन जाधव यांनी युट्यूबवर टाकला आहे.  २००४ साली मला शिवसेनेची ऑफर होती, मात्र याबाबत तुम्ही मला कळवलं नाही, कारण जबाबदारी तुमच्यावर होती. माझ्या निवडणुकीला तुम्ही पैसे दिले म्हणतात, पण मी आत्तापर्यंतच्या सगळ्या निवडणुका माझी संपत्ती विकून लढलो,' अशी टीका जाधव यांनी केली आहे.  'तुम्ही फक्त रागातून माझ्यावर खोटा अट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला. मला पोलिसांनी हे सांगितलं आहे. मी तुमच्यासोबत बोलायला दिल्लीला आलो, तर तुम्ही मला धमकावलं. माझ्या आईवर गुन्हा दाखल करायची धमकी दिली. माझ्या प्रॉपर्टीवरून तुम्ही खूप खालच्या भाषेत बोललात. तुम्ही राजकारण करताना घरं भरली, पण आम्ही लोकांचं काम केलं. तुम्ही कार्यक्रमात टेबल खुर्चीवर जेवता आणि माझ्या आईला मातीत बसवता, तिचा अपमान करता,' असे आरोप ...

इंदिरानगर भागात बिबट्याचा दोघांवर हल्ला

नाशिक/ प्रतिनिधी: शुक्रवारी सकाळी कॉलेजरोड भागात बिबट्याने एका महिलेवर हल्ला करुन जखमी केले होते. मात्र त्यानंतर बिबट्या गायब झाला होता. वनविभागाने दिवसभर शोध घेतला पण त्याचा थांगपत्ता लागला नाही. यापूर्वी याठिकाणी बिबट्याचा वावर दिसून आला होता. महिलेवरील हल्ल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण होते.  शनिवारी पहाटे 2 वाजेच्या सुमारास पुन्हा तिडके कॉलनी येथील एसएसके हॉटेलच्या किचनमध्ये बिबट्या ताव मारत असल्याचे सीसीटिव्हीत दिसले. त्यानंतर पहाटे 5 वाजेच्या सुमारास राजसारथी सोसायटी येथे बिबट्याने 2 नागरिकांवर हल्ला केला. दोघे नागरिक मॉर्निंग वॉकला जात असताना हा सर्व प्रकार ही cctv कॅमेरात कैद झाला. बिबट्याचा वावर शहरीभागात वाढल्याने वनविभागाने आजूबाजूच्या भागात शोधमोहीम हाती घेतली आहे. 

फेसबुक लाईव्हद्वारे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांचा औरंगाबादकरांशी संवाद; कोरोनामुक्ती लोकचळवळ व्हावी: चौधरी

औंरगाबाद/प्रतिनिधी: कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी एकमेकांपासून शारिरीक अंतर किमान सहा फुटाचे ठेवा. मास्कचा वापर करा. वारंवार हात साबणाने धुवा या त्रिसूत्रीचा वापर कराच, हा संदेश ‍जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज प्रथमच केलेल्या फेसबुक लाईव्हद्वारे औरंगाबादकरांशी संवाद साधताना दिला. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोरोनामुक्त लोकचळवळीसाठी सर्वांनीच पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये म्हणून जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. लोकांनीही सकारात्मक प्रतिसाद देत प्रशासनाला सहकार्य केले आहे. परंतु अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नाही, त्यामुळे खबरदारी घ्यावीच लागेल. खबरदारीसाठी पल्स ऑक्सिमीटरच्या माध्यमातून शरिरातील आक्सिजनची पातळी तपासता येते. नियमितपणे तपासल्यास संभाव्य धोका टळू शकतो. मात्र, यामुळे कोरोना होणारच नाही, असे नाही. हा केवळ खबरदारीचा उपाय आहे. याचा वैद्यकीय पातळीवर उपचार घेताना बऱ्याच प्रमाणात उपयोग होऊ शकतो. त्यामुळे 50 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी या ऑक्सिमीटरचा वापर करावा. वापर करण्याची पद...

औरंगाबादेत कोरोना रुग्णांची सख्या १४५३

औंरगाबाद/प्रतिनिधी: जिल्ह्यात आज सकाळी 46 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1453 झाली आहे. यापैकी 901 कोरोनाबधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 68 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 484 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. फोटो:फाईल आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. नेहरू नगर, कटकट गेट (1), कैलास नगर, माळी गल्ली (1), एन सहा सिडको (1), भूषण नगर, पहाडे कॉर्नर (1), कैलाश नगर (2), श्रीनिकेतन कॉलनी (1), खडकेश्वर (1), उस्मानपुरा (1), खंडोबा मंदिर, सातारा गाव (2), इटखेडा (3), उस्मानपुरा (3), जुना बाजार (1), विश्रांती कॉलनी एन 2 (3), नारळी बाग गल्ली नं.2 (1), राशेदपुरा, गणेश कॉलनी (1), शिवशंकर कॉलनी, गल्ली नं.1 (1), बायजीपुरा गल्ली नं.2 (1), एन ४ विवेकानंद नगर,सिडको (1), शिवाजी नगर (1), एन सहा संभाजी कॉलनी (1), गजानन नगर एन ११ हडको (5), भवानी नगर, जुना मोंढा (1), जुना बायजीपुरा (2), किराडपुरा (1), रोशनगेट (1), राशीदपुरा (1), मोतीवाला नगर (1), दौलताबाद (2), वाळूज सिडको (2), राम नगर, कन्नड (2)  या भागातील...

नागपूर आणि गडचिरोली जिल्हा पुरवठा अधिकारी निलंबित; खातेनिहाय चौकशीचे ना भुजबळ यांचे आदेश

मुंबई: कोविड-१९ साथरोग काळात  सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत लाभार्थ्यांना निकृष्ट प्रतीचा तांदूळ पुरविल्याने नागपूर व गडचिरोलीच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यासोबत ज्या राईस मिल मधून निकृष्ट प्रतीचा तांदूळ प्राप्त झालेला आहे, त्या राईस मिलवर जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा व त्यांची मिलिंग परमिशन रद्द करण्यात यावी. तसेच अनेक जिल्ह्यातून अशाच प्रकारच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने राज्यस्तरीय उपनियंत्रक अंमलबजावणी आणि एफसीआय प्रतिनिधी यांच्या नियंत्रणाखाली संयुक्त तपासणी पथके तयार करून सीएमआर (CMR) साठवलेल्या सर्व गोदामांची सखोल तपासणी करण्यात यावी असे आदेश राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना.छगन भुजबळ यांनी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव संजय खंदारे यांना दिले आहेत. ना.छगन भुजबळ हे सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे वितरीत होणाऱ्या धान्याची नियमितपणे पाहणी करीत असता. आता प्राप्त झालेल्या तांदूळ व डाळीचे त्यांनी नाशिक जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून नमुने पाहणीसाठी मागवले असता. ...

राज्यात ३४ लाख गरजूंना शिवभोजन थाळी, श्रमिकांसाठी मुख्यमंत्री निधीतून ५५ कोटींचे मदत: रविकांत वरपे

त्र्यंबकेश्वर/ प्रतिनिधी: राज्यात ३४ लाख गरजूंना शिवभोजन थाळीचा लाभ झाला असून श्रमिक कामगारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विविध प्रकारची व्यवस्था करण्यासाठी ५५ कोटींची मदत देण्यात आली अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी दिली. नाशिक  राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा, तालुकाध्यक्ष आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांची व्हिडिओ आढावा बैठक नुकतीच प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली तर जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांच्या अध्यक्षतेत पार पडली. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. फोटो:रायुकाँ, नाशिक जिल्हा या बैठकीमध्ये मोठ्या संख्येने तालुका अध्यक्षांनी सहभाग घेतला होता. यावेळी संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यामध्ये covid-19 च्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या मदतीचा आढावा घेण्यात आला. तसेच covid-19 चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठीच्या उपाययोजना व जनतेच्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने सखोल माहिती व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून प्रदेश कार्याध्यक्ष व जिल्हाध्यक्षांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला....

कोविड-१९: मुलांच्या मानसिक स्वास्थ्याविषयी जागरुक रहा: बाल मानसशास्त्रज्ञ तरुणा समनोत्रा

डब्ल्यूएचओच्या युरोपीय विभागातर्फे १९ मे २०२० रोजी एक अहवाल प्रसिद्ध झाला होता. २०१४ ते २०१८ कालावधीतील हा अहवाल  ११ ते १५ वर्षीय मुलांच्या मानसिक आरोग्यावर आधारीत होता. साहजिकच तो महामारीच्या आधीच्या कार्यकाळातील अहवाल आहे. मात्र या अहवालातील अभ्यास ध्यानात ठेवून आपल्याला भारतातील मुलांसाठी कोविड-19 च्या काळात काम करावे लागणार आहे. या महामारीचा परिणाम हा शाळांमधील मुले आणि किशोर-किशोरींच्या मानसिक स्वास्थ्यावर होण्याची शक्यता आहे.  आपल्यातील बहुतेक लोकांना माहित आहे की मोठ्या शहरांमध्ये शाळा ऑनलाईन झाल्या आहेत. विद्यार्थी गॅजेट्सच्या सहाय्याने शाळांशी कनेक्ट होत आहे, त्यांचा जास्त वेळ हा ' गॅजेट्स हाताळण्यात  जात आहे. या आभासी जगाने 'वास्तविक जग' बदलले आहे. विद्यार्थ्यांची दिनचर्या अचानक बदलली आहे. त्यांच्यात बदल घडवून आले आहे. त्यांच्यात विचार, चिंता आणि अवसाद दिसून येत आहे. काही गोष्टी मला चिंतित करतात, आम्ही पहिल्यांदा चर्चा केलेल्या लोकांपेक्षा ही परिस्थिती भिन्न आहे.   माझ्यामते कोविड-१९ या कालावधीनंतरच्या शालेय जीवनात काही नवीन अडचणींना मु...

महिला कामगारांनी आरोग्याची काळजी घ्यावी: प्रेरणा बलकवडे

भगूर/प्रतिनिधी: कोरोना महामारी विरूद्ध लढत असतांना महिला कामगारांनी आपल्या आरोग्याची निगा ठेवणे महत्वाचे आहे. तसेच मासिक पाळी हा खासगी विषय न मानता तो महिला भगिनींचा निसर्गदत्त अधिकार असून त्यावर उघडपणे चर्चा होणे काळाची गरज आहे असे  मत महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी आज येथे व्यक्त केले. जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त महिला कामगारांना त्यांच्या हस्ते सॅनिटरी पॅडचे वाटप झाले त्याप्रसंगी त्याबोलत होत्या. नागरीकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी महिला स्वच्छता कर्मचारी आणि अंगणवाडी सेविका आपला जीव धोक्यात घालून काम करत आहे. त्यांच्या कार्याला सलाम करत कोरोना विरूद्धचा लढा अधिक सक्षमतेने देता यावा यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. त्यांचा आत्मविश्वास असाच अबाधित राहो यासाठी आपले ही काही दायित्व आहे.  त्यासाठी जागतिक मासिक पाळी दिनाचे औचित्य साधून महिला कामगारांच्या आरोग्याचा विचार करुन   झेप फाऊंडेशनच्या वतीने सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सेफऐव्हर कंपनीचे संचालक उपस्थित होते,  यावेळी मार्गद...

कोरोनाचा धोका अद्याप कायम; तातडीच्या उपायांवर भर: ना भुजबळ

नाशिक:   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना करत त्यावर आपण मात केली आहे. मात्र अद्यापही कोरोनाचा धोका कायम असून या परिस्थितीत निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत तातडीने उपाययोजना केल्या जातील असा विश्वास राज्याचे  अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. फोटो क्रेडिट:विकास भुजबळ ना. छगन भुजबळ यांनी आज नाशिक येथील भुजबळ फार्म कार्यालय येथे कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील परिस्थितीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे आमदार आणि पदाधिकारी यांची बैठक घेत आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधानसभेचे उपसभापती ना.नरहरी झिरवळ, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार दिलीपकाका बनकर, आमदार नितीन पवार, काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर, नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ,देविदास पिंगळे,माजी आमदार दीपिका चव्हाण,जिल्हा परिषद उपाध्यक्ष डॉ.सयाजीराव गायकवाड, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, शहराध्यक्ष रंजन ठाकरे,विजय पाटील, संदिप पवार, यशवंत शिरसाठ आद...

कोरोना संकट आणि कायदा दोन्ही झाले डोईजड

दिवसरात्र एकच धास्ती! कोरोना ,कोरोना आणि कोरोना... अशा स्थितीत समाज मनाची स्थिती कशी असेल किंवा समाजाची क्रियाशीलता संपते की काय असे अनेक प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात. या महामारीला सामोरे जाण्यासाठी केंद्र सरकारने संसर्गरोग प्रतिबंध कायदा,आपत्ती व्यवस्थापन कायदा देशभर लागू केला आहे. यासोबतच नागरी प्रतिबंधासाठी स्थनिक जिल्हा प्रशासनांकडून ही आठ दहा अन्य कायद्यानुसार आपले अधिकार वापरले जात आहे, हा प्रकार म्हणजे रोगा पेक्षा इलाज भयंकर अशी अवस्था होऊन बसली आहे. देशाची व नागरिकांसाठीचे विशेषतः इंग्रजांच्या जाचक व त्याहून आपले नागरी अधिकार शून्य करणारे कायदे हे समाज हिताचे नसताना ते वापरले जात आहेत, हे दुर्दैव आहे. फोटो:फाईल या संकटात एवढे सर्व कायदे वापरुनही प्रशासकीय भोंगळ कारभार कुठेही रोखता आला नाही. याच आत्मपरिक्षण हे सर्व कायदे वापरत असलेल्या राजकिय, प्रशासकीय यंत्रणेने जरुर करावेत.या दरम्यान ६३ दिवसात अनेक गोष्टी समोर आल्या पण अगदी आणीबाणीचे कायदे हे समाजाला शिस्त लावण्यासाठी आहे की धमकवण्यासाठी? हे उमजू शकले नाही. त्यावर चर्चा ही होतांना दिसली नाही. प्रवासी मजुरांच्या विष...

जिल्ह्यात आता १००० बाधीत; दोघांचा मृत्यू

नाशिक/ प्रतिनिधी: जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून आतापर्यंत जिल्ह्यात बाधीत रुग्णांची  संख्या १००१  इतकी झाली आहे. तर आतापर्यंत ५७ जणांचा बळी गेला आहे. आज दिवसभर जिल्ह्यात १७ कोरोना बाधीत आढळले आहे. आज दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यात एका पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शहरात ७ जणांचा बळी गेला आहे. फोटो:फाईल(WHO) मालेगावनंतर नाशिक शहर हळूहळू दुसरं हॉटस्पॉट ठिकाण म्हणून वाटचाल करत आहे. दिवसभरातील १७ बाधितांपैकी शहरातील १०, सिन्नर ३ तर जिल्ह्याबाहेरील २ रुग्ण असून जिल्ह्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आता कोरोना बाधितांना आकडा १००१ झाला आहे. तर ७३५ जण बरे झाले आहे. सध्या २०७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. मालेगाव ६९१,नाशिक शहर १२८, नाशिक ग्रामीण १३७ आणि जिल्ह्याबाहेरील ४५ जण आहेत. 

देशांतर्गत विमान प्रवास करताय, मग जाणून घ्या प्रवाशांसाठीची आरोग्य मार्गदर्शिका

मुंबई : देशांतर्गत विमान सेवा मर्यादीत प्रमाणात आजपासून सुरु करण्यात येत आहे. या माध्यमातून राज्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी आरोग्यविषयक सूचना देणारी मार्गदर्शिका आज निर्गमित करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांच्या डाव्या हातावर शिक्का मारण्यात येईल आणि या प्रवाशांनी १४ दिवस अनिवार्यपणे गृह विलगीकरणात (होम आयसोलेशनमध्ये) राहणे बंधनकारक असून या कालावधीत त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. फोटो क्रेडिट: डीजीआयपीआर प्रवाशांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत त्यांच्या वैयक्तिक वाहनातून विमानतळावरुन निवासस्थानापर्यंत किंवा निवासस्थानापासून विमानतळापर्यंत प्रवास करता येईल. तथापी, हा प्रवास विमानतळ ते कंटेनमेंट झोन किंवा कंटेनमेंट झोन ते विमानतळ असा करता येणार नाही, ही बाब या मार्गदर्शिकेत स्पष्ट करण्यात आली आहे. राज्यात या मार्गदर्शिकेची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असून यासाठी विमानतळ असलेल्या संबंधीत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त किंवा उपायुक्त यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन आदेश आज निर्गमित करण्यात आले. प्रवाशांची ना...

!!🌹 "लेकीचं लगीन" 🌹!! वाचनीय कविता.. आजपासून कविता हे सदर आम्ही सुरू करत आहोत. कवी जी पी खैरनार यांची 'लेकीचं लगीन' हे काव्य सादर करत आहे.

_*!!🌹 "लेकीचं लगीन" 🌹!!*_ ***********************         _*(अष्टकरुपी काव्य)*_  _देव असे गणपती !_             _मांडव दारी घालती !!_  _महादेव गणपती !_              _कार्य सुलभ करती !!_  _लग्न निर्मळ लागती !_             _देवा श्रीफळ वाहती !!_  _बांबू कणात बांधती !_              _कापडी मंडप देती !!_  _वाद्य संबळ वाजती !_               _देव वराती नाचती !!_  _वऱ्हाडी मंडपा येती !_             _स्वागता नारळ देती !!_  _देवा विनंती करती !_           _बळ मिळो बारा हत्ती !!_  _बाप नवरीचा होती !_            _सोबत यह्याला घेती !!_  _कुंकु कपाळी लावती !_              _मळवट दोघे भरती !!_  _वऱ्हाडी लग्नास येती !_    ...

सुभाषरोड भागात लुटीचा प्रकार; अज्ञात संशयिताविरूद्ध तक्रार दाखल

नाशिकरोड/प्रतिनिधी: सुभाषरोड भागात संशयितांनी दोन वाहनांच्या काचा फोडून विचारणा करणाऱ्या वाहन मालकांशी वाद घालत त्यांच्या जवळी रोकड लुटली.आज रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी तपास सुरु केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष रोड भागात विक्रांत केशव थोरात (रा. देवळाली गाव) व शेखर देवरे यांच्या मारुती बलेनो व तवेरा या वाहनांच्या काचा संशयित व्यक्तींनी फोडल्या. त्यानंतर विचारणा करायला गेलेल्या वाहन मालकांसोबत वाद घालून संशयितांनी त्यांच्याकडील रोकड हिसकावली. या घटने प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.

जिल्हा परिषदेच्या सभापती अश्विनी आहेर आणि वास्तुविशारद गौरव आज लग्नाच्या बेडीत अडकले; विवाह सोहळ्यात मान्यवर आणि आप्तेष्टांचा फेसबुक लाईव्हद्वारे सहभाग

नाशिक/ प्रतिनिधी: जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते मा. आ. अनिल आहेर यांची कन्या जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती अश्विनी आहेर आणि वास्तुविशारद गौरव यांचा विवाह सोहळा आज फेसबुक लाईव्हव्दारे पार पडला. अनोख्या पद्धतीने पार पडलेल्या सोहळ्यात नवदाम्पत्याला मान्यवर आणि आप्तेष्टांनी फेसबुकवर ऑनलाईन उपस्थिती दर्शवून  आशिर्वाद आणि शुभेच्छा  दिल्या. या सोहळ्याने समाजापुढे एक नवा आदर्श घालून दिला. फोटो: उदय रांजणगावकर कोरोना महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे. त्यामुळे गर्दी होईल अशा कुठल्याच कार्यक्रमाला परवानगी नाही. लग्न कार्यात गर्दी होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. त्यामुळे  मोजकेच नातेवाईक, हितचिंतकांच्या उपस्थित लग्न सोहळे पार पडत आहे. असाच एक लग्न सोहळा ज्याने आदर्श उदाहरण सर्वांसमोर ठेवले. माजी आ. अनिल आहेर यांची कन्या  चि.सौ.का.अश्विनी(सभापती-महिला व बालकल्याण विभाग जि.प.नाशिक,सदस्य-नाशिक जिल्हा नियोजन समिती (M.Arch) आणि  चि.गौरव(M.Arch)  यांचा विवाह सोहळा आज २४ मे २०२० रविवार रोजी  फेसबुक लाईव्ह याच्या माध्यमातून संपन्न झाला. मोज...

संकटात राजकारणापेक्षा जबाबदारी पार पाडणे महत्त्वाचे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई: संकटाच्या काळात राजकारण न करता मदत करणे हा महाराष्ट्राचा संस्कार आहे तो आपण पाळत असून त्यावर अधिक भाष्य न करता आपण आजघडीला जनतेच्या आरोग्यावर आलेले संकट दूर करण्यास प्राधान्य दिल्याचे तसेच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहातांना जनहितासाठी कृषी, शिक्षण, उद्योग  आणि अर्थ या क्षेत्राकडे लक्ष केंद्रीत केल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले .  Photo credit:DGIPR यावेळी त्यांनी रमजान ईद निमित्ताने राज्यातील मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. सर्वधर्मियांनी आतापर्यंत घरातच सण, उत्सव आणि समारंभ साजरे केले असल्याचे सांगतांना त्यांना घरात राहूनच नमाज अदा करण्याचे   व संपुर्ण जग कोरोनामुक्त होण्यासाठी अल्लाह कडे प्रार्थना करण्याचे आवाहन  केले. लॉकडाऊन एकदम लागू करणे जसे योग्य  नव्हते तसेच लॉकडाऊन एकदम उठवणे ही योग्य नसल्याचे, हळुहळु आपली आयुष्याची गाडी पुर्वपदावर आणतांना जपून पावले टाकत असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.  टाळेबंदी उठवतांना काळजीपूर्वक सुरु केलेल्या गोष्टी गर्दी करून आणि बेशिस्तीने वागून पुन्हा बंद होणार नाही...

कन्नडचे मा.आमदार हर्षवर्धन जाधव यांचा राजकारणातून संन्यास

औरंगाबाद/प्रतिनिधी: केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राज्याच्या राजकारणातून संन्यास घेत पत्नी रंजना हर्षवर्धन जाधव यांना राजकीय वारसदार जाहीर केले आहे.   फोटो क्रेडिट:भास्कर निकाळजे अधिक माहिती अशी,  माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे कन्नडचे माजी मंत्री कै. रायभान जाधव यांचे पुत्र आहेत. रायभान जाधव यांनी त्यांच्या कार्यकाळात चांगली कामे केली. याचा फायदा पुत्र हर्षवर्धन जाधव यांना झाला. जाधव हे दोन वेळा आमदार झाले. शिवसेनेत असताना आणि पुढे मनसेत दाखल होताच त्यांना तिकिट दिले गेले. माञ पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आर.आर.पाटील असताना त्यांच्या ताफ्यात वाहन घुसवले असता त्यांना पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचे प्रकरण घडले होते.  त्यानंतर त्यांनी पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टिका केल्याने त्यांना पक्षातून काढण्यात आले. जाधव यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सेनेचे अधिकृत उमेदवार सलग तीन वेळा खासदार झालेले चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीत अपक्ष...

प्रेसनोट हातात पडली अन् त्यात माझ्याशीच साम्य असलेल्या व्यक्तीचे वर्णन वाचले..!

औरंगाबाद- मनपाच्या ताप केंद्रातील अनास्था, सह रुग्णांचे हाल, मिनी घाटीत कर्मचाऱ्यांनी घेतलेली काळजी व काही राजकीय पुढाऱ्यांनी दाखविलेला बालीशपणा असे संमिश्र अनुभव घेतले. घाबरुन जाऊ नका, धैर्यानेच कोरोनाला हरविणे सहज शक्य आहे, कोरोनाचा पराभव करुन सुखरुप घरी परतलेले पत्रकार तुषार वखरे सांगत होते. फोटो: फाईल ते म्हणाले, आरोग्य विषयक वार्तांकन करीत असल्याने शहरात पहिला रुग्ण आढळला, तेव्हापासून दररोज घाटी व मिनीघाटी रुग्णालयात जात होतो. मागील महिन्यात आईला काही लक्षणे जाणवू लागली. फॅमिली डॉक्टरांकडे उपचार घेऊन फरक पडला नाही. मलाही शंका होती, पण पत्रकारितेतील जबाबदारीही होती. वडील आईसोबत महापालिकेच्या सिडको कम्युनिटी सेंटरमध्ये गेले. तिथला अनुभव खूपच वाईट होता, असे वडिलांनी सांगितले. दुसऱ्या दिवशी डॉ. हेडगेवार हॉस्पिटलमागील मनपा शाळेतील केंद्रात गेलो. त्यांनी शंका व्यक्त केली. लगेच मी स्वब दिले. दुसऱ्या दिवशी प्रेसनोटमध्ये माझ्याच परिसरात, माझ्याच वयाचा रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे दिसले. नावे नसल्याने फोन करुन खात्री केली. तो मीच असल्याचे कळले. आईचाही अहवाल पॉझिटिव्ह होता. लगेच मि...