Skip to main content

Posts

Showing posts from June, 2021

साई कॉम्पिटिशन अकॅडमीचा विद्यार्थी गणेश वळवी याची तटरक्षक दलात निवड

नाशिक| आदिवासी दुर्गम भागात राहणारा गणेश सिंगा वळवी डोकारे याची तटरक्षक दलात निवड झाली असून साई कॉम्पिटिशन अकॅडमीचा तो विद्यार्थी आहे, त्याला संचालक प्रा. एन जी वसावे यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येऊन सत्कार करण्यात आला. योग्य मार्गदर्शन आणि परिश्रमामुळे १०० टक्के  यशाची खात्री असते असे यावेळी प्रा. वसावे यांनी सांगितले. या निवडीमुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले छोट्या छोट्या आदिवासी गावातील विद्यार्थी ही स्पर्धा परीक्षांमध्ये मागे नाही. प्रतिकूल परिस्थिती असो किंवा साधन सामग्रीची कमतरता त्याचा त्यांच्या ध्येयावर कधीच परिणाम दिसला नाही, मेहनतीच्या जोरावर त्यांनी गाठलेले लक्ष सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे साई कॉम्पिटिशन अकॅडमी संचालक प्रा. एन जी वसावे यांनी सांगितलं.

दिवंगतांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्षरोपण: युगांतर सोशल फाउंडेशनचा उपक्रम

नाशिकरोड|प्रतिनिधी| समस्त पृथ्वी तळावरील  मानवी जीवनावर आलेला महाभिषण काळ म्हणजे 'कोरोना' महामारी या काळाचा उल्लेख होऊ शकेल. या काळात मानवी जीवनावर संकट येऊन अनेक निष्पापांच्या जीवावर बेतले. अनेक जण कुटुंब सोडून गेले. मनुष्य हे जग सोडून गेला, तरी त्यांच्या आठवणी मात्र चिरंतन राहतात. याच आठवणींना उजाळा देण्याचे महत्त्वाचे कार्य उपनगर मधील 'युगांतर सोशल फाउंडेशन'  या सेवाभावी संस्थेने सुरू करून समाजात नवा पायंडा पाडला, असेच म्हणावे लागेल.         *वाटले नव्हते कोणालाही असे अघटीत घडून जाईल*........... *चालता बोलता देव तुम्हास नेईन*........ *माणुसकी, स्नेह याची ज्यावेळी चर्चा होईल*..... *त्यावेळी सर्वात पहिली आठवण तुमची येईल*.....!! असा संदेश देऊन कोरोना काळात प्रभाग १६ मधील दिवंगत झालेले कै. किसन पुरकर, चंद्रकला पुरकर यांच्या आठवणींना त्यांच्या नावे वृक्षारोपण करून उजाळा देण्यात आला. *प्रभाग १६च्या नगरसेविका सौ सुषमा रवि पगारे, युगांतर सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री रवि पगारे (सर)*  या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत  उपनगर मधील श्रमनगर मध्ये प...

राज्य शासनाचे निर्बंधाबाबतचे स्पष्टीकरण; जमाव, मेळावे, धार्मिकस्थळ आणि पर्यटनस्थळाविषयी काय आहे निर्देश

मुंबई|राज्य आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागामार्फत ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत 4 जून 2021 पासून लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये विस्तार करताना जमाव व मेळावे, धार्मिकस्थळ, खाजगी प्रशिक्षण वर्ग कौशल्य केंद्रे, हॉटेल, पर्यटन स्थळासंदर्भात काही क्षेत्रांचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे, जेणेकरून निर्बंधांची अंमलबजावणी करता अस्पष्टता  येणार नाही. जमाव/ मेळावे 1- जमावाची व्याख्या ‘एका सामूहिक कारणासाठी पाच पेक्षा जास्त लोकांचे एकत्रित येणे’ अशी करण्यात आली आहे. यामध्ये लग्न समारंभ, पार्टी, निवडणुका, प्रचार, सोसायटी बैठका, धार्मिक कार्यक्रम, मनोरंजनात्मक कार्यक्रम, क्रीडा सामने, सामाजिक कार्यक्रम यांचा अंतर्भाव असेल. यामध्ये काही अस्पष्टता असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासन जिल्हाधिकारी अंतिम निर्णय घेतील. सदर मार्गदर्शक तत्त्वे अशा अन्य जमवासाठीही लागू पडेल की ज्याचा इथे उल्लेख करण्यात आलेला नाही. 2-आपत्ती म्हणून कोविड-19 जोपर्यंत अस्तित्वात असेल, तोपर्यंत 100 पेक्षा जास्त लोकांच्या जमावावर पूर्णपणे बंदी असेल. फक्त स्थानिक प्रशासन आणि वैधानिक स्वरूपाच्या जमावाला यातून सूट असे...

राजर्षी शाहू महाराज आणि नाशिक

सन १९२० मध्ये उदोजी मराठा वस्तीगृह बांधण्यात येत होते.त्या वसतिगृहाचा कोनशिला समारंभ छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या हस्ते होणार होता म्हणून  म्हणून १५ एप्रिल १९२० मध्ये शाहू महाराज नाशिकमध्ये आले.त्यांचे नाशिक मध्ये जंगी स्वागत करण्यात आले होते तो हा क्षण. महात्मा जोतीराव फुले यांचा सत्यशोधक विचारांचा वारसा नंतर राजर्षी शाहू महाराज यांनी पुढे चालविला. त्यांचा नेतृत्वाखाली  अनके सत्यशोधक चळवळीत योगदान देणारे कार्यकर्ते जिल्ह्या-जिल्ह्यात तयार झाले. नाशिक मध्ये मोठ्या प्रमाणात सत्यशोधक समाजाच्या विचाराने तत्कालीन काळात अनेक तरुण भारावून गेले होते. यापैकी पिंपळगाव बसवंतचे कर्मवीर गणपत दादा मोरे हे सत्यशोधक जलसाकार म्हणून त्यांची पूर्ण महाराष्ट्रभर ओळख झाली होती. जलसाच्या माध्यमातून सत्यशोधकी विचार त्यांनी समाजात पेरले तसेच, मराठा शिक्षण परिषद मधील त्यांचे कार्य वाखाणण्याजोगे होते. नाशिकमध्ये कर्मवीर रावसाहेब थोरात,  कर्मवीर गणपत दादा मोरे आणि अन्य  सत्यशोधक कार्यकर्ते आणि मराठा पुढाऱ्यांच्या वतीने १९१४ पासून उदोजी मराठा बोर्डिंग सुरू करण्यात आली होती.  या वसति...

शासकीय योजनांमध्ये रेशनकार्डचे महत्त्व अधोरेखित: नगरसेविका सौ सुषमा रवी पगारे

नाशिकरोड| प्रतिनिधी| अन्न सुरक्षा योजना व इतर महत्त्वाच्या योजनेमध्ये लाभार्थ्यांना यादीत नाव समाविष्ट होण्यासाठी रेशनकार्डला अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज म्हणून शासनाने मान्यता दिली आहे. शासनाकडून लाभार्थ्यांना मिळणाऱ्या सोयी-सवलतीसाठी रेशनकार्डचे महत्त्व अधोरेखित झाले आहे, असे प्रतिपादन प्रभाग १६ च्या नगरसेविका सौ. सुषमा रवि पगारे यांनी केले. उपनगरमध्ये मातोश्रीनगर येथे युगांतर संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे रेशनकार्ड वाटप करण्यात आले. पक्षातर्फे माहे फेब्रुवारी महिन्यात उपनगर मध्ये रेशनकार्ड शिबिर घेण्यात आले होते. त्यात नवीन रेशनकार्ड नोंदणी आणि जुन्या रेशनकार्डात काही दुरुस्ती करणे, याकामासाठी नागरिकांनी  नोंदणी केली होती. त्यादुरुस्ती झालेल्या रेशनकार्डचे वाटप करण्यात आले.  राज्याचे अन्न-धान्य नागरी पुरवठा मंत्री तसेच पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशानुसार व शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली माहे फेब्रुवारी महिन्यात रेशनकार्ड शिबिर राबविण्यात आले होते. शिबिरात ज्या नागरिकांनी नवीन रेशनकार्डसाठी नोंदणी केली होती, त्यांच्या कार्डचे लवकरच वाटप क...

खेडलेगावचे भूमिपुत्र विठ्ठल पवार यांची 'पीएसआय'पदी निवड; साई कॉम्पिटिशन अकॅडमीचे मार्गदर्शन

नाशिक| आदिवासी दुर्गम भागातील खेडलेगावचा रहिवाशी विठ्ठल पवार यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली असून साई कॉम्पिटिशन अकॅडमीचा तो विद्यार्थी आहे, त्याला संचालक प्रा. एन. जी. वसावे यांचे मार्गदर्शन लाभले. पोलीस क्षेत्रातील निवडीबद्दल त्यांचे पंचक्रोशीसह सर्वत्र अभिनंदन होत आहे.  तो नाशिक अकॅडमीचा विद्यार्थ्यां आहे, सुरुवातीला पोलीस भरतीत निवड झाली होती, यावर्षी पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली, कालपासून नाशिक येथे ट्रेनिंगला हजर झाले आहे. अंगी जिद्द, चिकाटी बाळगत प्रतिकुल परिस्थितीवर मात करून त्याने यश संपादन केले. तसेच इतरांसमोर उदाहरण घालून दिलं. सुरुवातीला आदिवासी वस्तीगृहात शिक्षण घेऊन महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये निवड झाली, त्यानंतर अहोरात्र मेहनत करून आणि साई कॉम्पिटिशन अकॅडमीच्या मार्गदर्शनाने पीएसआयपदी निवड झाली आहे. सध्या हा विद्यार्थी ट्रेनिंग घेत आहे. अशा आदिवासी दुर्गम भागातून आलेल्या विद्यार्थ्यांची पोलीस क्षेत्रात निवड झाल्याने आजच्या तरुणांना ती प्रेरणादायक आहे. विविध भरती आणि स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शन आणि प्रवेशासाठी साई कॉम्पिटिशन अकॅडमीशी संपर्क साध...

प्रतिबंध आणि उपचार यांत योगशास्त्र उपयुक्त:पद्मश्री डॉ. एच. आर. नागेंद्र

नाशिक| प्रतिबंध आणि उपचार यांत योगशास्त्र उपयुक्त असल्याचे प्रतिपादन पद्मश्री डॉ. एच. आर. नागेंद्र यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे कोविड-19 संदर्भात ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात होते. या व्याख्यानमालेत बंगळूर येथील स्वामी विवेकानंद अनुसंधान संस्थानचे संस्थापक पद्मश्री डॉ. एच. आर. नागेंद्र यांनी मार्गदर्शन केले. विद्यापीठाचे मा. प्रभारी कुलगुरु डॉ. नितीन करमाळकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली  व्याख्यानमालेस नवी दिल्ली येथील भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. जयंत देवपुजारी, महाराष्ट्र चिकित्सा परिषदेचे अध्यक्ष तथा विद्यापीठ अधिसभा सदस्य डॉ. आषुतोष गुप्ता, विद्यापीठाचे आयुर्वेद विद्याशाखेचे मा. अधिष्ठाता डॉ. श्रीकांत देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. ’प्रिव्हेंटिव्ह ट्रिटमेंट अँड मॅनेजमेंट ऑफ पोस्ट कोविड सिंड्रोम’ या विषयावर स्वामी विवेकानंद अनुसंधान संस्थानचे संस्थापक पद्मश्री डॉ. एच. आर. नागेंद्र यांनी सांगितले की, कोविड-19 आजाराचा सामना करत असतांना आयुर्वेद शास्त्रातील योग, प्राणायम आणि ध्यान साधनेचे महत्व अधिक वाढले. र...

शिवस्मारक शिक्षण मंडळाचे सचिव श्रीकांत रावराणे यांचे निधन

नाशिक| कोल्हापूर येथील शिवस्मारक शिक्षण मंडळाचे सचिव आणि मुख्याध्यापक संघाचे माजी खजिनदार महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथील उपकुलसचिव डॉ उदयसिंह रावराणे यांचे वडील श्रीकांत मोहन रावराणे यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ८२ व्यां वर्षी नाशिक येथे दुःखद निधन झाले. शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेले उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणारे होते. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, परिवार रावराणे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.  त्यांचे सर्व धार्मिक विधी सद्य परिस्थितीत नियमांचे काटेकोरपणे पालन करून केलें जाणार आहे.

राज्यातील अनाथांना मिळणार बीपीएल शिधापत्रिका: छगन भुजबळ

मुंबई| राज्यातील अनाथांना स्वतंत्र शिधापत्रिका मिळावी अशी मागणी अनेक वर्ष केली जात होती. याबाबत राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी बैठका घेत अनाथांना वयाच्या २८ वर्षापर्यंत तात्पुरती पिवळी (बीपीएल) शिधापत्रिका वितरण करण्याबाबतचा निर्णय प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत घेतला आहे. फोटो: फाईल राज्यातील २८ वर्षापर्यंतच्या अनाथांना बीपीएल शिधापत्रिके बरोबर त्याचे लाभ मिळतील व २८ वर्षावरील अनाथांना उत्पन्नाप्रमाणे शिधापत्रिका मिळेल व त्याप्रमाणे त्याचे लाभ देण्यात येतील. या निर्णयामुळे राज्यातील अनाथ मुलांना मोठा आधार होणार असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. कोरोना काळात अनेक मुलांच्या पालकांचे मृत्यू झाल्यामुळे ते अनाथ झाले आहेत अश्या मुलांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार असल्याचे मत देखील छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.  राज्य सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर शिधापत्रिका मिळवताना कागदपत्रांचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी अनाथ असल्याचा पुरावा म्हणून महिला व बालविकास विभागाने वितरित केलेले अनाथ प्रमाणपत्र किंवा आई व वडील यांचे मृत्यू प्रमाणपत्र यापैकी कोण...

विद्यापीठाकडून विविध विद्याशाखेतील 12 हजार 752 विद्यार्थ्याना पदवी प्रदान

नाशिक| महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून विविध विद्या शाखेतील पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे सुमारे 12 हजार 752 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली आहे. विद्यापीठाचा पुरवणी स्वरुपातील दीक्षांत  विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीत साजरा करण्यात आला. पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे विद्यापीठाचे मा. प्रभारी कुलगुरु डॉ. नितीन करमाळकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी अभिनंदन केले आहे. फोटो: फाईल विद्यापीठाचा पुरवणी दीक्षांतास मा. कुलपती तथा मा. राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांनी नुकतीच मान्यता प्रदान केली आहे. सन 2019 च्या हिवाळी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या व इंटर्नशिप पूर्ण केलेल्या पात्र विद्यार्थ्यांना पुरवणी दीक्षांत मध्ये पदवी प्रदान करण्यात आली आहे विद्यापीठ अधिनियमात निर्देशित केल्याप्रमाणे दरवर्षी दोन वेळेस पदवी प्रदानाचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक मान्यवरांच्या हस्ते जाहिरपणे पदवी प्रदान करण्यात येते तर पुरवणी दीक्षांत किंवा मिनी कॉन्व्होकेशन मध्ये विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीत त्यांना पद...

राज्यात डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण: आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई |राज्यात डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेले २१ रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. त्यातील ९ रुग्ण रत्नागिरी येथील जळगाव येथील ७, मुंबई २ आणि पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे,  या विषाणूच्या तपासणीसाठी राज्य भरातून सुमारे ७५०० नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. या संदर्भात अधिक माहिती देतांना आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले, महाराष्ट्राने जिनोमिक सिक्वेनसिंगच्या संदर्भात निर्णय घेतला आणि प्रत्येक जिल्ह्यातील १०० सॅम्पल घेण्याबाबत कार्यवाही सुरू केली आणि या महत्त्वाच्या कार्यवाहीसाठी सी एस आय आर आणि आयजीआयबी या महत्त्वाच्या संस्थेचा सहभाग यामध्ये घेतला आहे. एनसीडीसीचे देखील सहकार्य घेण्यात आहे. १५ मे पासून ७५०० नमुने घेण्यात आले आणि त्यांचे स्क्विन्सिंग करण्यात आले. ज्यामध्ये डेल्टा प्लसचे साधारणपणे २१ केसेस आढळून आले आहेत. या केसेससंदर्भात पुढील कार्यवाही अशी करण्यात येत आहे की या इंडेक्स केसेसची संपूर्ण माहिती घेतली जात आहे. म्हणजे त्यांनी केलेला प्रवास, लसीकरण झाले होते का, त्यांना कोरोनाची पुन्हा लग्न...

धान्यपासून कोणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या: डॉ. स्वाती देशमुख पाटील

नाशिक| कोरोना काळात कोणीही धान्यापासून  वंचीत राहाणार नाही याची दक्षता घ्यावी असे सांगून सेनेटायझर, दोन कार्डधारक यांच्यातील सुरक्षित अंतर ठेवणे आणि मास्कचा वापर करणे बंदनकारक करावे अशा सूचना पुरवठा उपायुक्त डॉ. स्वाती देशमुख पाटील यांनी केल्या. त्यांनी आज विविध रेशन दुकानांना तपासण्या केल्या. दिंडोरी तालुक्यातील ढकांबे येथील रास्त भाव दुकानदार गणपत डोळसे पाटील यांच्या दुकानाची ही तपासणी करून माहिती घेतली आणि समाधान व्यक्त केले. तसेच विविध सूचना त्यांनी केल्या. यावेळी दुकानदारांनी आपल्या अडचणी मांडल्या, मशीनला नेटवर्क नसल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणली तसेच सर्व्हरला प्राबलेम येत असून मशीनमध्ये माल अंत्योदय व प्राधान्य हा वेगवेगळा (स्वतंत्र) टाकावा अशी मागणी केली म्हणजे स्टॉक काडायला अडचण येणार नाही. स्टॉक वेगवेगळा नसल्यामुळे समजत नाही अशी अडचण ही सांगितली. यावेळी पुरवठा उपायुक्त डॉ. स्वाती देशमुख पाटील यांच्यासह तहसिलदार सोनवणे, राज्य ग्राहक परिषद मुंबई सदस्य योगेश बत्तासे, विभागीय अध्यक्ष गणपत डोळसे पाटील, नाशिक विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समिती सदस्य तथा रेशन संघटनेचे जिल्हाध्य...

ओबीसी आरक्षण बचावासाठी समता परिषदेचा रास्तारोको; शेकडो कार्यकर्त्यांना अटक

नाशिक| स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण न्यायालयाने रद्द केल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. हे आरक्षण वाचविण्यासाठी तसेच ओबीसी जनगणनेसह विविध न्याय मुद्यांवर केंद्र सरकारच्या विरोधात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सर्व ओबीसी संघटनांच्या वतीने नाशिकच्या द्वारका चौकात आज तीव्र निदर्शने करत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे, विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक, शहराध्यक्ष संतोष सोनपसारे व कार्याध्यक्ष समाधान जेजुरकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्यानंतर काही काळाने त्यांची सुटका देखील करण्यात आली. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण कोर्टाने रद्द केल्याने समता परिषदेसह सर्व ओबीसी संघटनांच्या वतीने आज राज्यभर ओबीसी आरक्षण बचाव आक्रोश आंदोलन करत राज्यात विविध ठिकाणी रास्ता रोको करण्यात आले. आज नाशिक शहरातील द्वारका चौकात जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांच्या अध्यक्षतेखाली समता परिषदेसह विविध ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींनी तीव्र निदर्शने करत रास्ता रोको केला. यावेळी ओबीसींना पुन्हा राजकीय आरक्षण देण्यात यावे, त्यांची जनगणन...

तिसऱ्या लाटेच्या धोक्याबाबत काय आहेत मुख्यमंत्र्यांच्या सूचना

मुंबई| कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून राज्य शासनाने आधीच पाऊले उचलण्यास सुरुवात केली असून आवश्यक त्या औषधी, वैद्यकीय उपकरणे यांची उपलब्धता राहील तसेच ग्रामीण भागातही याचा पुरेसा साठा राहील हे पाहण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दिल्या. Photo-DGIPR यासंदर्भात टास्क फोर्समधील डॉक्टर्स, वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेतच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी टास्क फोर्सच्या डॉक्टर्सनी राज्यभर सिरो सर्व्हेक्षण करणे, मोठ्या प्रमाणावर लसीकरण पूर्ण करणे यावर भर देताना निर्बंधांचे पालन काटेकोरपणे होणे गरजेचे आहे असे सांगितले. गर्दी वाढली आणि आरोग्याचे नियम पाळले गेले नाहीत तर दुसऱ्या लाटेतून सावरता सावरता आपण महिन्या दोन महिन्यात तिसऱ्या लाटेलाही सामोरे जाऊ अशी अशी भीती व्यक्त केली. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, प्रधान सचिव वित्त राजगोपाल देवरा, प्रधान सचिव आरोग्य डॉ प्रदिप व्यास, डॉ रामास्वामी, डॉ संजय ओक, डॉ.शशांक...

नव्या डेल्टा व्हेरीयंटचाही धोका; तिसऱ्या लाटेत रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता: आरोग्य विभाग

मुंबई| पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत अतिशय कमी कालावधीत रुग्ण संख्या दुप्पट झाली. नव्या डेल्टा प्लस व्हेरीयंटचाही धोका असल्याने तिसरी लाट आल्यास राज्यात रुग्ण संख्या परत दुपट्टीने वाढू शकते. पहिल्या लाटेत १९ लाख रुग्ण होते, दुसऱ्या लाटेत ही संख्या ४० लाखापेक्षा जास्त झाली होती. सक्रीय रुग्णांची संख्याही ८ लाख होऊ शकते तसेच १० टक्यांच्या आसपास संसर्गग्रस्त मुलांची संख्या असू शकते असे आरोग्य विभागाने सादरीकरणात सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी ही माहिती दिली आहे. फोटो: फाईल १७ सप्टेंबर २०२० रोजी पहिल्या लाटेत सर्वाधिक म्हणजे ३ लाख १ हजार ७५२ रुग्ण होते. तर २२ एप्रिल २०२१ मध्ये दुसऱ्या लाटेत सर्वोच्च रुग्ण संख्या ६ लाख ९९ हजार ८५८ होती. १३ सप्टेंबर २०२० रोजी सर्वांधिक ५१७ मृत्यू झाले होते. दुसऱ्या लाटेत २६ एप्रिल २०२१ रोजी सर्वाधिक १११० मृत्यू झाले. साप्ताहिक पॉझिटीव्हिटी ९ सप्टेंबर २०२० रोजी सर्वाधिक म्हणजे २३.५३ टक्के होती तर दुसऱ्या लाटेत ८ एप्रिल २०२१ रोजी २४.९६ टक्के पॉझिटीव्हिटी दर होता. युके  व इतर काही देशांत परत विषाणूचा संसर्ग वाढून निर्बंध ...

नाशिकमधील निर्बंध जैसे थे; शनिवार, रविवार दु. ४ पर्यंत लग्न सोहळ्यास ५० व्यक्तींना परवानगी: ना. भुजबळ

नाशिक|ब्रेक द चेन अंतर्गत लागू करण्यात आलेले लेव्हल तीनचे सर्व निर्बंध सध्या जसेच्या तसे लागू राहतील. परंतु शनिवार व रविवार या दोन दिवशी 50 व्यक्तिंच्या उपस्थितीत दुपारी 4 वाजेपर्यंत लग्न सोहळ्यांना परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात जिल्हा व शहर कोरोना सद्यस्थिती उपाययोजना व कोरोना पश्चात आजारांबाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते.  यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय्, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, निलेश श्रींगी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, डॉ. निखिल सैदाणे, डॉ. आवेश पल्लोड, डॉ. उत्कर्ष दुधडीया आदी उपस्थित होते. कोरोनाच्या दुसऱ्याचा लाटेचा...

इ.१२ वीची परीक्षा रद्द; शासन आदेश जारी

मुंबई| महाराष्ट्र शासनाने राज्य मंडळाच्या इयत्ता 12 वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबधीचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. सुधारित मूल्यमापनाचे धोरण व निकालाची तारीख मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. जागतिक महामारीच्या काळात विद्यार्थ्यांची आरोग्य सुरक्षितता आणि मानसिक स्वास्थ्य यांनाच प्राधान्य देण्याची राज्य शासनाची भूमिका आहे. इयत्ता 12 वीच्या परीक्षेचे महत्त्व लक्षात घेता मूल्यमापनाचे एकसमान सूत्र निश्चित करावे, अशी मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली होती. सीबीएसई आणि आयसीएसईच्या परीक्षा रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. सर्व संबंधित घटकांशी केलेल्या चर्चेअंती सध्याचे वातावरण परीक्षेसाठी पोषक नसल्याने परीक्षा रद्द करून पर्यायी मूल्यमापनाच्या आधारे निकाल घोषित करावा, असे महाराष्ट्र शासनाने केंद्राला यापूर्वीच सुचवले होते, असेही प्रा.गायकवाड यांनी सांगितले आहे.

कोरोना काळात वित्तीय संस्थांकडून केल्या जाणाऱ्या सक्तीच्या वसुलीला चाप लावा: राजेंद्र फड

नाशिक| देशात आणि राज्यात अद्यापही कोरोना महामारीच्या संकटामुळे उद्योग व्यवसाय पूर्ण क्षमतेने सुरु झालेले नाही. त्यामुळे वाहतूक व्यवसाय देखिला अडचणीत आला असून वाहतूकदारांना वाहनांचे हफ्ते भरण्यात कठीण झाले आहे. मात्र वित्तीय संस्थाकडून कुठलीही मुदत न देता सक्तीची वसुली करून गाड्यांचे लिलाव केले जात आहे. वित्तीय संस्थांच्या या मुजोरीला चाप लावून वाहन कर्जाचे हफ्ते भरण्यास मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन कडून करण्यात आली आहे.  याबाबत नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड आणि कार्याध्यक्ष पी.एम.सैनी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन व राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार तसेच नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना निवेदन दिले आहे.  याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मल सितारामन, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार तसेच जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशात आणि राज्यात कोरोना महामारीच्या संकटामुळे सर्व उद्योग व्यवसाय अडचणीत सापडले आहे. त्याचा मोठा ...

आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्व युवक पदाधिकाऱ्यानी सज्ज व्हा: अंबादास खैरे

नाशिक| आगामी महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्व युवक पदाधिकाऱ्यानी तयारी सुरु करण्याच्या तसेच  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम घेण्याच्या सूचना देत राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी कोरोनाचे सर्व नियम पाळत राष्ट्रवादी भवन येथे ५० टक्के युवक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली. यावेळी युवक पदाधिकारी कै.शिवराज (सनी) ओबेरॉय यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली . आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी तसेच १० जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वर्धापनदिन असून यानिमित्ताने शहरात घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आखण्यासाठी राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी भवन येथे बैठक घेण्यात आली. जवळपास दीड वर्षापासून कोरोना महामारीने देशात थैमान घातले असून नाशिक मध्ये रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत होती. सद्यस्थितीत कोरोनाला आळा घालण्यात सर्वांना यश प्राप्त होत असून जनजीवन पूर्ववत होत आहे. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात असल्यास आगामी महानगरपालिका निवडणुक वेळेत होण्याची शक्यता असल्याने महापालिकेतील सत्ता काबीज करण्यास...

कोविडमुळे अनुपस्थित राहणाऱ्यांना पुन्हा परीक्षेची संधी; वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचा निर्णय

मुंबई| महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठा मार्फत घेण्यात येणाऱ्या हिवाळी 2020 परीक्षा येत्या 10 जून पासून सुरू होणार आहेत. या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह निघाल्यामुळे परीक्षेस अनुपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परिक्षा घेण्यात येईल.  अशा विद्यार्थ्यांचा अनुपस्थितीत राहिल्या बद्दल  प्रयत्न (attempt) मोजण्यात येऊ नयेत अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केल्या आहेत. यानुसार विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. कोविड-19 परिस्थितीच्या अनुषंगाने,  विद्यार्थी दि.10 जून 2021 पासुन सुरु होणाऱ्या विद्यापीठाच्या हिवाळी-2020 लेखी परीक्षेस कोविड-19 आजाराचा अहवाल सकारात्मक (Positive)  आल्यामुळे अनुपस्थित राहतील, अशा विद्यार्थ्यांची सदर हिवाळी-2020 लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा झाल्यानंतर, विशेष परीक्षा घेण्यात येईल. सदरील परीक्षेसाठी अनुपस्थित असलेल्यांचा  प्रयत्न (Attempt) ग्राहय धरला जाणार नाही. विशेष परीक्षेचा दिनांक यथावकाश जाहीर करण्यात येईल.         कोविड 19...

देशात २१ जूनपासून १८ वर्षांवरील सर्वांचे विनामूल्य लसीकरण: पंतप्रधानांची घोषणा

दिल्ली| सोमवार 21 जूनपासून देशाच्या प्रत्येक राज्यात, 18 वर्षांवरील वयाच्या सर्व नागरिकांसाठी भारत सरकार राज्यांना लसींचा विनामूल्य पुरवठा करेल. लसींच्या एकूण उत्पादनाच्या 75% भाग भारत सरकार लस-उत्पादकांकडून स्वतः खरेदी करून राज्य सरकारांना विनामूल्य देईल. देशाच्या कोणत्याही राज्य सरकारला लसीवर काहीही खर्च करावा लागणार नाही. आजपर्यंत देशाच्या कोट्यवधी लोकांना लस विनामूल्य मिळाली आहे. आता 18 वर्षे वयाचे लोकही यात समाविष्ट होतील. भारत सरकारच सर्व देशवासीयांसाठी मोफत लस उपलब्ध करून देईल. फोटो : फाईल गरीब असो, कनिष्ठ मध्यमवर्गीय असो मध्यमवर्गीय असो की उच्चवर्गीय, भारत सरकारच्या अभियानात लस मोफतच दिली जाईल. हां, ज्या व्यक्तींना मोफत लस घ्यायची नसेल, खासगी रुग्णालयात लस घ्यायची असेल, त्यांचाही विचार केला गेला आहे. देशात तयार होणाऱ्या लसींपैकी 25% लसी, खासगी क्षेत्रातील रुग्णालयांना थेट खरेदी करता येण्याची व्यवस्था अशीच सुरु राहील. खासगी रुग्णालये, लसीच्या निर्धारित किंमतीखेरीज प्रत्येक मात्रेमागे जास्तीत जास्त 150 रुपये इतकेच सेवाशुल्क आकारू शकतील. यावर देखरेख करण्याचे काम राज्य सरकारांकडेच ...

औरंगाबाद शहर अनलॉक! शहरातील सर्व निर्बंध शिथिल

औरंगाबाद| महानगरपालिका क्षेत्रातील निबंध पूर्णतः उठवण्याचा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने घेतला असून त्याबाबतचे आदेश आज जारी करण्यात आले आहेत. यामुळे औरंंगाबाद शहर तब्बल १०० दिवसांनी पुन्हा एकदा पुर्ववत सुरू होणार आहे. औरंगाबाद महापालिका क्षेत्रातील कोरोना पॉझिटिव्हिटी दर २.२४ टक्के आणि भरलेल्या ऑक्सीजन बेड्सची संख्या २२.१९ टक्के असल्यामुळे औरंगाबाद महापालिका क्षेत्र शासनाने निर्धारित केलेल्या पहिल्या गटात समाविष्ट झाले आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील निबंध पूर्णतः शिथील करण्यात आले आहेत. औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात ७ जूनच्या सकाळी ७ वाजेपासून नवीन सुधारित आदेश लागू होतील.  फोटो: फाईल अत्यावश्यक वस्तू व सेवा संबंधी व्यवसाय व दुकाने - अत्यावश्यक सेवा आणि व्यवसायाची दुकाने नियमितपणे सुरू राहतील. मास्क, शारीरिक अंतर आणि सुरक्षा उपकरणांचा वापर अनिवार्य राहील.  इतर सर्व व्यवसाय व दुकाने - अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व प्रकारची दुकानेही नियमितपणे उघडता येतील. अत्यावश्यक सेवेच्या याही दुकानांना मास्क, सॅनिटायझर, शारीरिक अंतर आणि निर्देशांचे पालन करावे लागेल....