Skip to main content

Posts

Showing posts from October, 2021

राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक: तुषार भोसलेवर गुन्हा दाखल करण्यासाठी विविध पोलीस ठाण्यात तक्रारी

नाशिक| सोशल मिडीयावर पोस्ट टाकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते खा. शरदचंद्र पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपाच्या तुषार भोसले यांच्या विरोधात जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाली असून जिल्हयात त्याचे पडसाद उमटले आहे. भोसले विरोधात पोलिसात तक्रार करण्यात आली आहे, असे रायुकाचे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कडलग यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार  यांच्या विषयी भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी बुधवारी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्या घरी गेले असता ते पळून गेले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात जाऊन त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग याच्या मार्गदर्शनाखाली सर्व तालुकाध्यक्ष व पदाधिकारी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली असुन वरिष्ठ अधिका-यांशी चर्चा करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तर गुन्हा दाखल न केल्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.  ...

मयत सभासदांच्या कुटुंबांना दिवाळीपूर्वी आर्थिक सहाय्य मिळावे: रेशनिंग संघटनेची शासनाकडे मागणी

नाशिक| नाशिक जिल्हा रास्त भाव दुकानदार संघटनेतर्फे शासनाकडे कोरोनाने निधन झालेल्या सभासदांच्या कुटुंबाला आर्थिक मदत व विमा कवच  देण्याची मागणी केली होती. दिवाळी सणापूर्वी ही मदत मिळावी अशी मागणी पुन्हा संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष गणपत डोळसे पाटील आणि नाशिक जिल्हाध्यक्ष ह. भ. प. निवृत्ती महाराज कापसे यांनी शासनाकडे स्मरणपत्राद्वारे केली आहे. शासनाला देण्यात आलेल्या स्मरणपत्रात म्हटले आहे की, कोरोना महामारीच्या काळात महाराष्ट्रातील स्वस्त धान्य दुकानदरांनी धान्याचे वितरण केले, या दरम्यान शेकडो दुकानदार या आजाराच्या कचाट्यात सापडून त्यांना आपला जीव गमवावा लागला. घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने अनेक कुटुंबांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला. अशा कुटुंबांना दिवाळी या महत्वाच्या सणाला आर्थिक सहाय्य देण्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी विनंती करण्यात आली आहे. जेणे करून त्यांची ही दिवाळी सुखाची आणि समाधानाने जाईल.  शासनाने इतर विभागांना घोषित केलेल्या विम्याप्रमाणेच स्वस्त धान्य दुकानदारांना विमा द्यावा आणि आर्थिक सहाय्य करावे अशी विनंती मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत...

सोन्याची चमक आणखी वाढणार, सणासुदीसह लग्नसराईच्या खरेदीला मिळणार पसंती

नाशिक| लसीकरणावर भर दिल्याने कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून सराफबाजार ही आता पूर्वपदावर येत आहे. आगामी दिवाळी, पडवा आणि लग्नसराईच्या दृष्टीने सोन्याची चमक आणखी वाढण्याची शक्यता असून भावात साधारण दोन ते अडीच हजारांनी वाढ होण्याची शक्यता सराफी व्यवसायातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे . सध्या सोने भाव २४ कॅरेटला ४९८०० इतका आहे. त्यामुळे सोने खरेदीला ही चांगली संधी मानली जात आहे. आरोग्य यंत्रणेने लसीकरणावर भर दिल्याने कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असून निर्बंध हळूहळू शिथिल होत आहे. त्यामुळे सणासुदीच्या वातावरणामुळे बाजारपेठा गजबजू लागल्या आहे. गेल्या वर्षभरापासून लॉकडाऊनमुळे आर्थिक उलाढाल ठप्प होती. ती आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. सराफ बाजारात आगामी दिवाळी आणि लग्नसराईच्या खरेदीसाठी ग्राहकांची पावले सरफाबाजारकडे वळत असून गेल्या वर्षी मार्च २०२० ला सोन्याने ५६,२०० रुपये १ तोळा इतका उच्चांकी भाव गाठला होता. लोकांना खरेदीची इच्छा असली तरी निर्बंधांमुळे शक्य होत नव्हते. त्यामुळे व्यवसायावर त्याचा परिणाम दिसून आला.  गत वर्षीच्या तुलनेत ५ ते ७ सात हजारापर्यंत सोने भाव उतरला आहे. आज(...

नाशिकमधील ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ३, ४ व ५ डिसेंबरला: स्वागताध्यक्ष मंत्री छगन भुजबळ

नाशिक| लोकहितवादी मंडळ, नाशिक आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 'कुसुमाग्रज नगरी’, भुजबळ नॉलेज सिटी, आडगाव नाशिक येथे दि. ३, ४ व ५ डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलानाचे स्वागताध्यक्ष, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. लोकहितवादी मंडळ, नाशिक आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत माहिती देण्यासाठी आज भुजबळ फार्म कार्यालय नाशिक येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी स्वागताध्यक्ष छगन भुजबळ बोलत होते. यावेळी निमंत्रक प्रमुख कार्यवाहक जयप्रकाश जातेगावकर, मुख्य समन्वयक विश्वास ठाकूर, सह कार्यवाहक मुकंद कुलकर्णी, कार्यवाह प्रा.डॉ. शंकर बोऱ्हाडे, संजय करंजकर, सुभाष पाटील, सह कार्यवाह किरण समेळ, कार्यालयीन प्रमुख दिलीप साळवेकर, अमोल जोशी आदी उपस्थित होते.   यावेळी भुजबळ म्हणाले की,कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे केवळ महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात एक अभूतपूर्व...

१०० कोटी लसीकरण टप्पा पार: कोरोना योद्ध्यांप्रती कृज्ञतेचे प्रतीक म्हणून १०० स्मारकांवर विद्युत रोषणाई

नवी दिल्ली| भारताने 100 कोटी लसीकरणाचा  महत्त्वपूर्ण टप्पा गाठल्याबद्दल संस्कृती मंत्रालयाचे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण देशभरात 100 स्मारके तिरंगी रोषणाईने झळाळून टाकत आहे. कोविड महामारीविरूद्धच्या लढाईत अथक योगदान देणाऱ्या कोरोना योद्ध्यांबद्दल आदर आणि कृतज्ञतेचे प्रतीक  म्हणून रोषणाई केली जात आहे. तिरंगी रोषणाईने न्हाऊन निघालेल्या 100 स्मारकांमध्ये युनेस्कोच्या पुढील जागतिक वारसा स्थळांचा समावेश आहे. दिल्लीतील लाल किल्ला, हुमायूनचा मकबरा आणि  कुतुबमिनार, उत्तर प्रदेशातील आग्रा किल्ला आणि फतेहपूर सीकरी, ओडिशामधील कोणार्क मंदिर, तामिळनाडूतील ममल्लापुरम रथ मंदिरे, गोव्यातील सेंट फ्रान्सिस  असीसी चर्च, खजुराहो, राजस्थानमधील चित्तोड  आणि कुंभलगडचे किल्ले, बिहारमधील प्राचीन नालंदा विद्यापीठाचे खोदलेले अवशेष आणि गुजरातमधील धोलाविरा (अलीकडेच जागतिक वारसा दर्जा प्राप्त) भारताने 100 कोटी लसीकरण टप्पा गाठल्याच्या पार्श्वभूमीवर ज्यांनी देशाला महामारीचा प्रभावीपणे सामना करण्यास मदत करण्यासाठी अहोरात्र काम  केले आणि मानवजातीसाठी निःस्वार्थ भावनेने सेवा केली अशा कोरोना य...

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ % वाढ

नवी दिल्ली| केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या महागाई दिलासा निधीत वाढ करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी; नवा भत्ता 01 जुलै 2021 पासून लागू असेल, मूळ वेतन/निवृत्तीवेतन यांच्यावरील सध्याच्या 28% दराव्यतिरिक्त 3% वाढ होणार आहे. या निर्णयाचा लाभ देशातील सुमारे 47 लाख 14 हजार केंद्र सरकारी कर्मचारी आणि 68 लाख 62 हजार निवृत्तीवेतनधारकांना होणार आहे. फोटो: फाईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तर निवृत्तीवेतन धारकांच्या महागाई दिलासा निधीत वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली. या निर्णयानुसार वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी मुलभूत वेतन/निवृत्तीवेतन यांच्यावर सध्या 28% दराने दिल्या जाणाऱ्या महागाई भत्त्याव्यतिरिक्त हा अधिकचा 3% भत्ता असेल आणि तो 1 जुलै 2021 पासून देय असेल. सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारसीवर आधारित स्वीकृत सूत्रांनुसार ही वाढ देण्यात आली आहे. महागाई भत्ता आणि दिलासा निधीपोटी देशाच्या तिजोरीवर दर वर्षी 9,488.70 कोटी रुपयांच...

विद्यार्थ्यांना बैलगाडीतून कॉलेजमध्ये सोडत शहर रायुकाचा इंधन दरवाढी विरोधात अनोखा निषेध

नाशिक| पेट्रोल डीझेलची सातत्याने होत असलेल्या दरवाढ रोखण्यात यावी अशी मागणी करत आज राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक शहरात महविद्यालयीन विद्यार्थ्यांना बैलगाडीच्या माध्यमातून महाविद्यालयात सोडत अनोख्या पद्धतीने पेट्रोल डीझेल दरवाढीचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी बोलतांना युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे म्हणाले की, गेल्या पंधरा दिवसात सातत्याने पेट्रोल डीझेलची दरवाढ कायम असून नाशिकमध्ये आज पेट्रोलचा ११२.४६ तर डीझेल १०१.६५ रुपयांवर पोहचले आहे. पेट्रोल डीझेलच्या दरवाढीचा परिणाम शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. सर्वसामान्य नागरिकाच्या कुटुंबाचे बजेट यामुळे संपूर्णपणे कोलमडून गेलेले आहे. याबाबत सातत्याने आम्ही केंद्र सरकारकडे याबाबत मागणी करत आहोत. पाठपुरावा देखील करण्यात येत आहे. तरी देखील पेट्रोल डीझेलची दरवाढ थांबत नसून सर्व सामान्य नागरिक अडचणीत सापडला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर पेट्रोल डीझेलची सातत्त्याने होत असलेली दरवाढ रोखण्यासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने आज महाविद्यालय सुरु होण्...

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ रायुकातर्फे जिल्ह्यात पेट्रोलपंपासमोर "ढोल बाजावो, सरकार को जगावो" आंदोलन

नाशिक|  इंधन दरवाढीने सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आली आहे. दिवसेंदिवस इंधनाचे दर वाढतच असून याविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे जिल्हाभर विविध पेट्रोल पंपावर केंद्र सरकारच्या निषेधार्थ ढोल बजावो सरकार को जगावो अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनात पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कडलग यांच्या नेतृत्वात जिल्हयात महागाईच्या निषेधार्थ लाखलगाव, (नाशिक)देवळा, दिंडोरी ,सिन्नर शहर, सिन्नर, ओझर, (निफाड) पिंपळगाव (ब), (निफाड), चांदोरी, (निफाड  )आदि तालुक्यांतील ठिकाणी पेट्रोल पंपावर ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी सर्व तालुका अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनांप्रसंगी सुनिल आहेर, दिंडोरी तालुका अध्यक्ष श्याम हिरे डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर योगेश गोसावी युवक विधानसभा अध्यक्ष संदीप भेरे किसान सेलचे तालुकाध्यक्ष  छबुराव मटाले भटके-विमुक्त सेलचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद सय्यद पालखेड प्...

तपोवन-टाकळीमार्गे मनपाची बस सेवा सुरू; नागरिकांमध्ये समाधान

नाशिकरोड| प्रतिनिधी| नाशिक महानगरपालिका अंतर्गत नाशिक शहर बससेवा तपोवन-टाकळीमार्गे सुरू झाल्याने प्रभाग १६ मधील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. प्रभाग १६ मधील ज्येष्ठ नागरिक,  लोकप्रतिनिधींच्या हस्ते बसची पुजा करण्यात येऊन झेंडा दाखवून टाकळीमार्गे बससेवेला प्रारंभ झाला. प्रभाग १६च्या नगरसेविका सौ सुषमा रवि पगारे, नगरसेवक श्री राहुल दिवे, नगरसेवक श्री अनिल ताजनपुरे यांनी आगरटाकळी ते रामदास स्वामी नगर थांब्यापर्यंत प्रवाशांसमवेत बस मध्ये प्रवास केला. याप्रसंगी सर्व  लोकप्रतिनिधींच्या हस्ते बस मधील चालक, वाहक यांचा सत्कार करण्यात आला. मागील दिड वर्षांपासून कोविड १९ मुळे टाकळीमार्गे  बससेवेला खंड पडला होता. बससेवा सुरू होण्यासाठी परिसरारातील लोकप्रतिनिधी यांनी विशेष प्रयत्न केल्याने सर्व नागरिकांच्यावतीने नगरसेविका सौ सुषमा रवि पगारे, नगरसेविका सौ आशा तडवी,  नगरसेवक श्री राहुल दिवे, नगरसेवक श्री अनिल ताजनपुरे यांचे विशेष आभार मानण्यात आले. याप्रसंगी युगांतर सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री रवि पगारे (सर), रफिक तडवी, अनिल जोंधळे, सुनील जोंधळे, जयेश सोनवणे, यशवंत साळवे...

उत्तराखंड रुद्रप्रयाग येथे अडकलेल्या ३५ भाविकांना अखेर खा. गोडसेंच्या प्रयत्नामुळे मिळाले दर्शन

त्र्यंबकेश्वर| वार्ताहर| महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील ३५ भाविक चार धाम यात्रेसाठी गेले होते. त्यांच्याकडे आरटीपीसीआर रिपोर्ट आणि सींगल व्हॅक्सीन सर्टीफीकेट असून देखील त्यांना उत्तराखंड येथील रुद्रप्रयाग येथे अडवण्यात आले, अखेर राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांच्याशी एकाने संपर्क साधला त्यांनी तात्काळ नाशिकचे खा. हेमंत गोडसे यांच्या कानावर ही बाब टाकल्यावर त्यांनी तात्काळ दिल्ली, उत्तराखंड येथे फोन करून संबंधित भाविकांचे दर्शन घडवून देण्यास सहकार्य करण्यास सांगितले आणि नाशिकच्या भाविकांना दर्शन घेण्याचे समाधान लाभले. चारधाम यात्रेसाठी गेलेल्या या भाविकांचे आरटीपीसीआर रिपोर्ट आणि सींगल व्हॅक्सीन सर्टीफीकेट असून देखील त्यांना उत्तराखंड येथील रुद्रप्रयाग येथे अडवण्यात आले व त्यांची पुन्हा बळजबरीने अँटिजेंन टेस्ट केली गेली त्यात ३४ लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले परंतु १ जणाची टेस्ट पॉजीटीव्ह आली, त्यानंतर त्या व्यक्तीची पुन्हा आरटीपीसीआर टेस्ट केली असता ती निगेटिव्ह आली. तरीदेखील त्यांना १४ दिवस कॉरंटाईन ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे भाविकांना मोठा मानसिक त्रास...

पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना निळे प्रतीक संस्थेचा राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार प्रदान

औरंगाबाद|प्रतिनिधी| निळे प्रतीक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रातील गुणी जनांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. निळे प्रतीकच्या वर्धापन दिनानिमित्त सिडको पोलीस ठाण्याचे कर्तबगार पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार जाहीर झाला होता. परंतु ऐन वेळी काही कारणास्तव अशोक गिरी यांना कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही. म्हणून त्यांना सिटी चौक पोलिस स्टेशन औरंगाबाद येथे जाऊन संस्थेचे अध्यक्ष रतन कुमार साळवे, प्रा.बाळासाहेब वानखेडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.  यावेळी विविध विषयावर चर्चा करताना पोलिस निरीक्षक अशोक गिरी म्हणाले की, आशिया खंडात औरंगाबाद शहर हे अगदी झपाट्याने वाढणारे शहर म्हणून त्याची नोंद झालेली आहे . उद्योगाची या शहरामध्ये भरभराट आहे.मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षण संस्था आहेत उद्योगधंदे वाढत असतानाच गुन्हेगारी सुद्धा वाढत चाललेली आहे. सध्याच्या काळामध्ये गुन्हेगारी  वाढत असली तरी ही बाब निश्चितच चिंतेची नसून त्यासाठी पोलीस यंत्रणा सक्षम आहे.  प्रत्येकानी आपल्या मुलांवर आई-वडिलांनी लक्ष ठेवायला ह...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई |राज्यातील महा विकास आघाडी सरकारतर्फे राज्य कर्मचाऱ्यांना १ जुलै २०१९ पासून वाढीव ११ टक्के महागाई भत्तास मंजूरी दिली आहे.  ऑक्टोबर  २०२१ पासुन त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे,  अशी माहिती महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेतर्फे प्रसिद्धी पत्रकानव्ये देण्यात आली आहे. संघटनेनं प्रसिद्धी पत्रकात म्हटले की, कोरोना महामारीच्या कालावधीत केंद्र शासनाने १ जानेवारी २०२०, १ जुलै २०२० व  १ जानेवारी २०२१ पासून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली होती. कोरोना कालावधीत हा वाढीव महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिला गेला नाही. परंतु केंद्र शासनाने दिनांक १ जुलै २०१९ पासून सदर थकित महागाई भत्ता प्रत्यक्ष अदा करण्याचे घोषित करण्यात आले. त्यामुळे महागाई भत्त्याची रक्कम मूळ वेतनाच्या १७ टक्क्यावरून २८ टक्क्यांपर्यंत  वाढली. वाढलेल्या महागाई भत्त्याच्या फरकाची रक्कम केंद्राने वाचविली. या फरकाच्या रक्कमेबाबत मा. सुप्रीम कोर्टाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय दिला असून केंद्र सरकारने ही न्याय्य रक्कम कर्मचाऱ्यांना अदा करावी असे आदेश दिले आहे...

काळाराम मंदिर खुले: डॉ. शेफाली भुजबळ यांच्या हस्ते काळाराम मंदिरात अभिषेक

नाशिक| महाविकास आघाडी सरकारच्या वतीने घटस्थापनेच्या मुर्हुतावर मंदिरे उघडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यापार्श्वभूमीवर या निर्णयाचे स्वागत करत मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या संचालिका डॉ.शेफाली भुजबळ यांनी नाशिक शहरातील काळाराम मंदिरात अभिषेक व पूजन करत दर्शन घेतले. त्याचबरोबर त्यांनी पंचवटीतील गंगाघाट येथील सप्तश्रृंगी मातेच्या मंदिरातही आरती करत दर्शन घेतले. यावेळी कोरोनाचे संकट लवकरच दूर होऊदे असे साकडे त्यांनी घातले. राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, महिला शहराध्यक्षा अनिता भामरे, पंचवटी विभाग अध्यक्ष शंकर मोकळ, महेश भामरे, सचिन कळासरे, संतोष जगताप, आर्यन मोकळ, साहिल मोकळ, सरिता पगारे, प्रफुल्ल पाटील, किरण पानकर , रामेश्वर साबळे, गणेश गरगटे आदी पंचवटीतील पदाधिकारी उपस्थित होते.

नाशिक, निफाड येथे ऑक्सिजन प्लॅन्टचे डॉ. भारती पवार यांच्या हस्ते लोकार्पण

नाशिक| सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा रुग्णालय नाशिक आयोजित भारत सरकारच्या उपक्रमाअंतर्गत देशभरातील विविध ठिकाणी ऑक्सिजन प्लॅन्टचा लोकार्पण सोहळा भारताचे पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी जी यांच्या हस्ते करण्यात आला. त्याच अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय निफाड व नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन प्लँटचे लोकार्पण  केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री ना.डॉ.भारती पवार यांचे हस्ते करण्यात आले.  मोदींजींच्या नेतृत्वाखाली भारत देश हा अन्य सर्वच क्षेत्रातील प्रगती बरोबरच आरोग्य क्षेत्रातही भरीव कामगिरी करत आहे. आरोग्याच्या अनेक सुविधा सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यासाठी भविष्यातील कोविड-19 तथा अन्य आरोग्याच्या येणाऱ्या संभाव्य  रोगराईचा  सामना करण्यासाठी भारत देश सक्षमतेकडे वाटचाल करत असल्याचे ना.डॉ.भारती पवार यांनी या प्रसंगी सांगितले.  या कार्यक्रमाप्रसंगी नाशिकचे महापौर सतीश नाना कुलकर्णी, आ.देवयानी फरांदे, आ.सीमाताई हिरे, डॉ.राहुल आहेर, भाजपा शहराध्यक्ष गिरीश पालवे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, डॉ.श्रीवास, सहाय्यक ख...

भाविकांसाठी मंदिरं खुली: विधानसभा उपाध्यक्ष ना. झिरवाळ यांनी केली संत निवृत्तीनाथ महाराज आणि त्र्यंबकेश्वर मंदिरात पूजाअर्चा

नाशिक| राज्यातील महाविकास आघाडीतर्फे आजपासून प्रार्थनास्थळे आजपासून भाविकांसाठी खुली झाली. त्या  अनुषंगाने विधानसभा उपाध्यक्ष ना.नरहरी झिरवाळ, आ. हिरामण खोसकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांच्या प्रमुख उपस्थितीत त्र्यंबकेश्वर देवस्थान व संत निवृत्तीनाथ महाराज देवस्थान येथे पुजाअर्चा करून भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले.  त्यानंतर दोन्हींही मंदिरात आरती करण्यात आली. पुजेचे साहित्य, हार फुले आदी साहित्यांचे विक्रीची परवानगी देऊन छोट्या व्यवसायकांना दिलासा देण्याचे काम केले जाईल असे यावेळी सांगितले. तसेच ब्रम्हगिरी गंगाद्वार येथे पर्यटकांपैक्षा भाविकांची संख्या अधिक असते. हे लक्ष्यात घेऊन पर्यटन विभागाकडून आकारण्यात येणारा शुल्क वगळ्यासाठी ना.नरहरी झिरवाळ हे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रसंगी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस तालुकाध्यक्ष कैलास मोरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस शहराध्यक्ष मनोज कान्नव, अरुण मेढे, भिकुशेठ बत्ताशे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शहराध्यक्ष विजय गांगुर्डे, अमोल कडलग, लखन लिलक...

ओढा येथील गणपती मंदिर उघडले, प्रेरणा बलकवडे यांच्या हस्ते आरती

नाशिक| शासनाच्या वतीने आज सर्व मंदीर भाविकांसाठी उघडणात आले. या अनुषंगाने आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सौ. प्रेरणा बलकवडे यांच्या वतिने आज ओढा गावचे जाग्रुक असलेले श्री गणपतीचे मंदीर येथील कुलप ग्रामस्थांच्या हस्ते उघडून श्री गजाननांची आरती करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी अव्हाड, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, राजाराम धनवटे, जि. सदस्य यशवंत ढिकले, बाळासाहेब म्हसके, पं स. सदस्य विजया कांडेकर, प्रविण वाघ, सरपंच विष्णु पेखळे, शितल भोर, अनिता रिकामे, सायरा शेख, पुष्पलता उदावंत, साहेबराव पेखळे, विलास कांडेकर, शरद गायधनी, यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

राज्य आणि देशावरील कोरोनाचे संकट दूर होउदे; मंत्री भुजबळ यांचे सप्तश्रृंगी मातेच्या चरणी प्रार्थना

नाशिक| गेले अनेक दिवस कोरोनाचे संकट महाराष्ट्रासह देशावर आणि जगावर होतं आणि अजूनही आहे. या संकटकाळात आपण अनेक गोष्टी बंद ठेवल्या त्यात अगदी मंदिरे आणि शाळा देखील होत्या. आता परिस्थिती पूर्वपदावर येत असताना आपण पुन्हा सर्व गोष्टी सुरू करत आहोत. आज महाविकास आघाडी सरकारच्या वतीने मंदिरे सुरू करण्यात आलेली असून  राज्यावर, देशावर असलेले हे कोरोनाचे संकट दूर होउदे अशी सप्तश्रृंगी मातेच्या चरणी प्रार्थना आपण केली असल्याची प्रतिक्रिया राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्याच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी  सप्तश्रृंगी गडावरील मातेच्या मंदिरात दर्शन घेऊन महाआरती केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी त्यांच्यासोबत कळवणचे आमदार नितीन पवार होते. ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि आज  राज्यातील सर्व मंदिरे उघडण्याचा निर्णय आपण घेत आहोत. महाराष्ट्रात अनेक मंदिरे आहेत या सर्व ...

नाशिक- मुंबई प्रवास २ तासात, अडीच वर्षात काम पूर्ण करणार : नितीन गडकरी यांची घोषणा

नाशिक| केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते आज नाशिक येथे 1678 कोटी रुपये खर्चाच्या 206 किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाच्या 12 प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले. मुंबई-नाशिक महामार्गासाठी 5 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून येणाऱ्या दोन ते अडीच वर्षात नाशिक ते मुंबई हा प्रवास केवळ दोन तासात होणार असल्याचा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला....या प्रकल्पांमध्ये 1678 कोटी रुपये खर्चाच्या 206 किलोमीटर लांबीच्या 12 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा समावेश आहे. कर्कश हॉर्नमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाचा विचार करता येत्या काळात सगळ्या गाड्यांचे हॉर्न भारतीय वाद्यातच वाजले पाहिजेत यासंदर्भात नियम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात रस्ते अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे, याबद्दल त्यांनी यावेळी चिंता व्यक्त केली. नाशिकमध्येही लॉजिस्टिक पार्क बांधायला आपण तयार असून महापालिकेने याकामी पुढाकार घ्यावा असे त्यांनी नमूद केले. यावेळी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील आणि केंद्रीय आर...

नवरात्रोत्सवाचे वेध: 'चिंतामणी अलंकार'च्या शुद्ध चांदीच्या विविध रुपातील देवीच्या मूर्त्या ठरताहेत आकर्षण

नाशिक| नवरात्री उत्सव म्हणजे नवचैतन्याचा उत्सव या उत्सवात देवीचे आराधना व्रतवैकल्य भक्तिभावाने केले जातात. आपल्या महाराष्ट्रात देवीचे घट बसविले जाऊन संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन आरती पूजा केली जाते. यासाठी देवीच्या विविध चांदीच्या मूर्त्या बाजारात आल्या आहेत. या उत्सवात देवीच्या मूर्ती पूजेला खास असे महत्व आहे त्यामुळे या नवरात्र उत्सवात नवीन देव ,मूर्ती घडविल्या जातात व या मूर्तीची स्थापना केली जाते आपल्या हिंदू धर्मात मूर्ती पूजनाला अनन्यसाधारण असे महत्व आहे यामुळे नाशिकच्या सराफ बाजारात शुद्ध चांदीच्या देवीच्या सुबक मुर्त्या विक्रीसाठी आलेल्या आहेत. आपल्या नाशिकची चांदी शुद्धतेसाठी पूर्ण भारतात प्रसिद्ध आहे, यामुळे पूर्ण भारतात नाशिकच्या चांदीच्या मूर्तींला चांगली मागणी असते. या उत्सवाच्या निमित्ताने सराफ बाजारात तुळजाभवानी, महालक्ष्मी, सप्तशृंगी माता, रेणुका माता इत्यादी देवींच्या सुबक, आकर्षक कलाकुसर असलेल्या विविध वजनात मूर्त्या उपलब्ध आहेत. नवरात्रोत्सव कालावधी शुद्ध चांदीच्या मूर्त्यांना पसंती: राजापूरकर नाशिकच्या चांदीच्या सुबक मूर्त्याना नेहमीच मागणी असते त्यात नवरात्र उत्सवामुळ...

सामाजिक समर्पणाचे 'युगांतर'

सामाजिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून कार्य करणाऱ्या  मोजक्या संस्थांमध्ये युगांतर सोशल फाउंडेशन हे नाव प्रामुख्याने घेतले जाते. २० वर्षापूर्वी लावलेले छोटे वृक्ष आज त्याचे मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले ते त्यांच्या सातत्यपूर्ण कार्यामुळे, विशेष करून उपनगर भागात संस्थेचे कार्य मोठे असून सामाजिक जाण आणि समर्पणाची भावना यामुळे संस्थेने मोठे नावलौकिक प्राप्त केले आहे. यामागे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. रवी पगारे सर आणि प्रभाग १६ च्या नगरसेविका सौ. सुषमाताई रवी पगारे या दांपत्याची कठोर मेहनत आहे. आजही त्याच तळमळीने संवेदनशीलतेने कार्य सुरू आहे.  संस्थेने कोरोना महामारी काळातही सामाजिक दायित्व पार पाडले. सामाजिक सेवेचा वसा अंगीकारलेल्या 'युगांतर'ने समाजातील शोषित, पीडित, वंचितांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महामारी काळात हवी ती मदत केली. संकट डोळ्यासमोर असतांना कसली ही पर्वा न करता युगांतरने समाजाच्या प्रत्येक थरातील लोकांना मायेने जवळ केले, पोटाला आधार दिला. समाजाकडून कुठलीच अपेक्षा न ठेवता समाजसेवा कशी असते, याचा वस्तुपाठच युगांतर सोशल फाउंडेशनने घालून दिला. जगात वर्षभरापू...