Skip to main content

Posts

Showing posts from September, 2021

देवगिरी बँकेचा बारावा वर्धापन दिन उत्साहात साजरा

औरंगाबाद| प्रतिनिधी| देवगिरी बँकेचा बारावा वर्धापन दिन मयूरपार्क शाखेत उत्साहात पार पडला. यावेळी सर्वप्रथम भारतमातेच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. देवगिरी बँकेचे उपाध्यक्ष संजय गायकवाड, संचालक राजेश जैन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रुपेंद्र कोयाळकर,बँक व्यवस्थापक सुबोध राऊत यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राजेश जैन यांनी बँकेच्या सेवा सुविधा विषयी माहिती दिली. यूपीआय पेमेंटसेवा देखील बँकेने आता सुरू केली असून ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील त्यांनी केले. रुपेंद्र कोयाळकर म्हणाले की खातेदाराच्या काही अडीअडचणी असतील तर त्यांनी माझ्यासमोर मांडाव्या.आपल्याला सेवा देन्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.उत्कृष्ट सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ग्राहकाचे समाधान हेच आमचे ध्येय असे ते म्हणाले.देवगिरी बँकेने आतापर्यंत दोन हजार कोटीचा टप्पा पार करून तीन हजार कोटीकडे बँकेची वाटचाल सुरू आहे. अर्थातच ग्राहकांच्या सहकार्य आणि कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे ही यशस्वी वाटचाल आम्ही करु शकलो.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता सिंपले यांनी केले तर आभार हरिबा भुईंगड यांन...

गोदाकाठ पाहणी दौरा: अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा: ना. भुजबळ

नाशिक| गेल्या 24 तासात नाशिक जिल्ह्यात काही भागात प्रचंड पाऊस झाला असून, काल रात्रीपासून सर्व शासकीय व निमशासकीय यंत्रणांशी समन्वयाने माहिती संकलनाचे काम सुरू असून, शासन-प्रशासनाला मनुष्यासह सर्व जिवीतांची काळजी असून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच नागरिकांनीही  प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन आज राज्याचे अन्न नागरी पुरवठव व ग्राहक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. आज 28,29 सप्टेबर या दिवशी झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त भागाची नाशिक शहरातील मालेगाव स्टॅण्ड पंचवटी परिसरात पाहणी करतांना पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस उपायुक्त अमोल तांबे, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे व विविध यंत्रणांचे अधिकारी व पदाधिकारी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे आदि उपस्थित होते. यावेळी बोलतांना पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीला महापूर येण्याचे प्रसंग वेळ...

रक्तातील साखरेच्या पातळी संदर्भात रुग्णांनी काळजी घ्यावी: नगरसेविका सुषमा पगारे

नाशिकरोड| प्रतिनिधी| हृदयरोग आता तिशीच्या उंबरठ्यावर असतांना देखील होतो. हृदयरोगाला शरीरात साखरेची वाढलेली पातळी कारणीभूत असते. समतोल रक्तपातळी ठेवण्यासाठी योग्य आणि वेळच्यावेळी आहार, व्यायामाची नितांत आवश्यकता गरजेची असून वाढत्या वयात रुग्णांनी यासंदर्भात जास्त काळजी घ्यावी, असे प्रतिपादन प्रभाग १६च्या नगरसेविका सौ सुषमा रवि पगारे यांनी केले. उपनगर येथील युगांतर संपर्क कार्यालयात ईच्छामणी क्लिनिक आणि युगांतर सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हृदयरोग दिनानिमित्त 'आरोग्य तपासणी शिबिराचे' आयोजन करण्यात आले होते. शिबिरात रक्तातील साखरेची पातळी, रक्तातील चरबीचे प्रमाण, ३ महिन्यातील साखरेच्या पातळीची सरासरी, रक्तदाब यासंदर्भात सखोल तपासणी करून गरजू रुग्ण, वयोवृद्ध, तरुणांना मार्गदर्शन करण्यात आले. डॉ सौ रेश्मा घोडेराव, डॉ समीर लासुरे यांनी स्वतः रुग्णांची तपासणी करून वाढत्या वयानुसार जीवनशैलीत बदल, नित्य व्यायामाची आवश्यकता, जेवणाच्या योग्य वेळा, व्यसनाचे दुष्परिणाम, हृदयरोग प्रतिबंध कसा करावा याची माहिती सादर केली. १३५ ते १५० रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला.  याशिबिराचे व...

आ. रोहीत पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य आणि अन्न वाटप

त्र्यंबकेश्वर| तळवाडे तूपादेव त्र्यंबकेश्वररोड येथील आधारतीर्थ अनाथाश्रमात लोकप्रिय आमदार रोहित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वह्या व अन्न वाटप करण्यात आले या प्रसंगी व्यवस्थापकीय संचालक श्री त्र्यंबकराव गायकवाड उपस्थित होते आश्रमातील मुलांनी रोहित दादा पवार यांच्या दीर्घायुष्यासाठी व उत्तम आरोग्यासाठी महामृत्युंजय मंत्र तसेच कालभैरव स्तोत्र पठण करून शुभेच्छा दिल्या. त्याप्रसंगी पुरुषोत्तम भाऊ कडलक  जिल्हाअध्यक्ष, कैलास मोरे  तालुका अध्यक्ष युवक, बाळा निगळ विधानसभा अध्यक्ष सातपूर, कपिल भावले जील्हा उपाध्यक्ष, विजय गांगुर्डे शहर अध्यक्ष, गोरख ढोकणे अमोल वाघमारे , अक्षय भोसले, कारभारी कोठूळे, अमोल महाले, संदेश भागवत,अर्जुन खांडबहाले आदी उपस्थित होते.

गोदावरीला महापूर: प्रशासनातर्फे अलर्ट जारी; पूर बघण्यासाठी नागरिकांची गर्दी

नाशिक| नाशकात गेल्या दोन दिवसांपासून गोदावरी आणि दारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने नदी,नाले तुडूंब भरून वाहत आहे, तसेच गंगापूर धरण भरल्याने गोदावरी नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ झाली आहे. नाशिक शहरातील दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी वाढलं आहे. रामसेतू ब्रिजपर्यंत पाणी वाढलं आहे. त्यामुळे सराफ बाजारही पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यावसायिकांची एकच धावपळ उडाली आहे. दुकानं हटवण्याची धावपळ सुरू आहे. तर प्रशासनाकडून नागरिकांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम आहे. फोटो: मेहुल थोरात पावसाचा जोर वाढत असल्यामुळे नाशिक शहराला महापुराचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पावसाने नाशिकच्या ग्रामीण भागात अक्षरशः हैदोस घातला असून सलग होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मनमाड, नांदगाव, मालेगाव, चांदवड, सटाणा, देवळा भागातील सर्वच नदी, नाले, ओढ्यांना पूर आला आहे. जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.गंगापूर धरणातून विसर्ग वाढण्याची शक्यता गंगापूर धरणातून 5 हजार ...

मराठवाड्यात अतिवृष्टी; मदत आणि बचाव कार्याचा मुख्यमंत्र्यांनी घेतला जिल्हानिहाय आढावा

मुंबई| मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली, मात्र आम्ही सरकार म्हणून या  शेतकऱ्यांच्या पाठीशी असून सर्वतोपरी मदत त्यांना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत,  असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.  मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीचा जिल्हानिहाय आढावा  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत व पुनर्वसन विभागाकडून घेतला.  कोणत्याही परिस्थितीत बाधित शेतकरी, नागरिक यांना प्रशासनाने तातडीची सर्वतोपरी मदत पोहचवावी असे निर्देश त्यांनी  दिले. फोटो: मेहुल थोरात (गोदावरी) काही ठिकाणी पुराच्या पाण्यातून जवानांनी ग्रामस्थांची सुटका केली आहे, तसेच या भागातून लोकांचे स्थलांतर व्यवस्थित व्हावे, असेही त्यांनी आज सांगितले. मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्तांशी देखील चर्चा केली असून या नैसर्गिक आपत्तीत प्रशासनाने नागरिकांच्या बचाव कार्यावर लक्ष द्यावे तसेच सर्व यंत्रणांत समन्वय ठेवावा, असे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी काल सायंकाळी आणि आज सकाळी देखील मराठवाड्यातील जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांशी या परिस्थितीवर चर्चा केली. म...

मुंबई ते हैद्राबाद, पुणे ते औरंगाबाद हाय स्पीड रेल्वेसाठी मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र

मुंबई| मुबई- नाशिक- नागपूर हाय स्पीड रेल्वेच्या कामाला गती देताना राज्य सरकार पूर्ण सहकार्य करेल मात्र याच जोडीने जालना आणि नांदेड मार्गे मुंबई ते हैद्राबाद तसेच पुणे ते औरंगाबाद देखील हाय स्पीड रेल्वेने जोडावेत अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे. मुख्यमंत्री आपल्या पत्रात म्हणतात की, प्रस्तावित मुंबई ते नागपूर हाय स्पीड रेल्वे मार्ग जालन्यापर्यंत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या जोडीनेच जात आहे. राज्य शासनाने जालना ते नांदेड दरम्यान द्रूतगती महामार्ग सुरु करण्याचे टाकण्याचे ठरविले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने यापूर्वीच नांदेड ते हैद्राबाद ही शहरे द्रूतगती महामार्गाने जोडण्याचे ठरविले आहे. त्यामुळे जालना आणि नांदेड मार्गे मुंबई ते हैद्राबाद हा हाय स्पीड रेल्वे मार्ग संयुक्तिक ठरेल. याशिवाय पुणे आणि औरंगाबाद ही शहरे देखील हाय स्पीड रेल्वे मार्गाने जोडावीत म्हणजे केवळ या दोन शहरांनाच नव्हे तर नाशिक लाही त्याचा मोठा फायदा होईल. कारण सध्या मुंबई आणि नागपूर मार्गामुळे मुंबई –नाशिक- ...

केवळ महाराष्ट्रच नाही, मध्य भारताच्या सीमेलगतच्या राज्यांमधील रुग्णांना परवडणाऱ्या आणि आधुनिक वैद्यकीय सुविधा मिळतील: नितीन गडकरी

नवी दिल्ली|केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती प्रवीण पवार यांच्या उपस्थितीत एम्स, नागपूरच्या तिसऱ्या स्थापना दिनानिमित्त आयोजित डिजिटल कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले. राज्यसभा खासदार डॉ.विकास महात्मे आणि राज्याचे ऊर्जा मंत्री आणि पालकमंत्री (नागपूर) डॉ.नितीन राऊत हे   देखील उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष, संचालक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन व्यक्त करताना  गडकरी म्हणाले, “विदर्भ प्रांताच्या गरजा लक्षात घेऊन, नागपूर येथे एम्स, नागपूर सारख्या प्रतिष्ठित संस्थेच्या स्थापनेमुळे  मध्य भारताच्या सर्व सीमावर्ती राज्यांमधील रुग्णांना  परवडणाऱ्या आणि आधुनिक वैद्यकीय सुविधा मिळतील. मात्र आपण हे सुनिश्चित केले पाहिजे की या सुविधांचा लाभ केवळ शहरांपर्यंतच नाही तर आपल्या भागातील दुर्गम गावांमधल्या  लोकांपर्यंत देखील पोहोचला पाहिजे. ” अलीकडेच बांधण्यात आलेल्या एम्स संस्था दीर्घकालीन प्रादेशिक असंतुलन दूर करण्याच्या उद्देशाने बांधल्या आहेत हे अधोरेखित करत ते म्हणाले की, सध्याच्या एम्स संस्थांची ...

कीर्तन, प्रवचन अशा धार्मिक कार्यक्रमांना ही काही अटींवर शासनाने परवानगी द्यावी: हभप कापसे महाराज यांची मागणी

नाशिक| प्रतिनिधी| राज्यातील धार्मीक कार्यक्रम . किर्तन, प्रवचन व भजन सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँगसचे नाशिक तालुका कार्याध्यक्ष ह.भ.प. श्री. निवृत्ती कापसे महाराज यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.  राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सांस्कृतीक कार्यमंत्री अमित देशमुख, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ यांना देण्यात आलेल्या निवेदनात कापसे महाराज यांनी म्हटले आहे की, राज्यात ७ तारखेपासून मंदिर दर्शनासाठी खुले करण्याचा निर्णय शासनाने  घेतला आहे . घेतलेला निर्णय योग्य आहे .परंतु आपण धार्मिक कार्यक्रम किर्तन, प्रवचन यावर पूर्ण बंदी घालण्याचा निर्णय योग्य वाटत नाही. या कार्यक्रमामुळे लोकांवर चांगले संस्कार होतात, अशा जनजागृतीतून लोकांना  व्यसनापासून परावृत्त करता येते.  अजाराच्या काळात लोकांचे मानसीक संतूलन स्थीर राहाण्यास मदत होते. त्यामुळे  काही निर्बंध शिथिल करून धार्मिक कार्यक्रमांना परवानगी दयावी अशी मागणी करण्यात आली आहे.  निर्बध घातल्यामुळे वारकरी मंडळी नाराज आहे . म्हणून आपण काही नियम घालून द...

रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवावा: भुजबळ

नाशिक| काही दिवसांपासून हजारांच्या आत असलेली रुग्णसंख्या वाढत असल्याने या परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. त्याकरिता जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढविण्यात यावा, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित कोरोना आढावा बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते. यावेळी आमदार नरेंद्र दराडे, माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, हिरामण खोसकर, सरोज अहिरे, सुहास कांदे, नितीन पवार, पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय्, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अपर पोलीस अधिक्षक माधुरी कांगणे, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अशोक थोरात, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे आदी उपस्थित होते. पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, ग्रामीण भागात लसीकरण वाढविण्यासाठी व नागरिकांच्या सोयीच्या दृष्टिने लसीकरण केंद्राची संख्या वाढविण्यात यावी. त्याच...

तुझ्या आत्मकथेत... एखादा उल्लेख माझाही असेल

तुझ्या आत्मकथेत... एखादा उल्लेख माझाही असेल...   तुझ्या आत्मकथेत... कधीतरी आठवण       माझीही असेल... तुझ्या आत्मकथेत... कुठेतरी ओळख             माझीही असेल... तुझ्या आत्मकथेत... शाहित माझाच रंग असेल... तुझ्या आत्मकथेत... सदैव मी जिवंत असेल... तुझ्या आत्मकथेत... खरंच आत्मा माझा आणि कथा तुझी असेल... रचना: राहुल बर्वे

कोरोना योद्धा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे निळे प्रतीक संस्थेचे आवाहन

औरंगाबाद |प्रतिनिधी| निळे प्रतिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था औरंगाबादच्या वतीने, स्मृतीशेष नामदेव सांडूजी साळवे यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त, कोविड योद्धा पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दिनांक १३ऑक्टोबर २०२१ रोजी मौलाना आझाद संशोधन केंद्र,टी. व्ही सेंटर हडको औरंगाबाद येथे मान्यवराच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. कोरोना महामारीच्या लॉकडाऊन काळात नागरिक रस्त्यावर येण्यासाठी देखील घाबरत असत.अशा कठीण परिस्थितीत आपल्या जीवाची,आणि आपल्या परिवाराची पर्वा न करता अनेकजण कोविड रुग्णालयात कोविड रुग्णाची सेवा करत आपले कर्तव्य चोखपणे बजावत होते. त्यात अनेक कोरोना योद्ध्याचा कोरोनाने बळी घेतला. याची निळे प्रतीकने गंभीर दखल घेतली आहे. लॉकडाऊन काळात देखील निळे प्रतीकच्या वतीने अनेक गरजूना अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले होते.  कोरोना काळात ज्यांनी आपलं योगदान दिलं, माणुसकी जपुन आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या कोविड योद्धा्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करत त्यांना सन्मानपत्र आणि आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.कोविड रुग्णालयात ज्यांनी प्रत्यक्ष काम केले आहे. ...

गोदा प्रदूषण रोखण्यास सहाय्य ठरणारा 'देव द्या, देवपण घ्या,' उपक्रमाचा उत्साहात समारोप

नाशिक| प्रतिनिधी| सोशल डिस्टींक्शनचे नियम पाळत, फेस मास्क, हातमोजे व सॅनिटायझरचा वापर करत सलग  ११ व्या वर्षीचा देव द्या, देवपण घ्या उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. गणेश विसर्जनाच्या निमित्ताने चोपडा लाँन्सजवळील गोदापार्क येथे सकाळी ८ वाजेपासून “देव द्या देवपण घ्या” या उपक्रमाचे कार्यकर्ते मूर्ती स्विकारण्यासाठी उपस्थित होते. यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश मूर्ती संकलित करणाऱ्या कार्यकर्त्यांनी फेस मास्क व हातमोजे घातले होते. घरगुती गणेशोत्सवातील गणेश मूर्ती  दान करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या हातावर सॅनिटायझर देण्यात येत होते. तसेच गणपती मूर्तीवर देखील सॅनिटायझरचा फवरला केल्यानंतरच ती स्वीकारण्यात येत होती. मराठी अभिनेता अभिजित खांडकेकर यांनी देखील मूर्ती दान करत देव द्या, देवपण घ्या उपक्रमात सहभाग घेतला. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, रासायनिक रंगकाम व इतर सौंदर्यप्रसाधने व निर्माल्यामुळे गोदावरीचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. त्यामुळे विद्यार्थी कृती समिती तर्फे गेल्या ११ वर्षांपासून “देव द्या, देवपण घ्या” हा उपक्रम राबविण्यात येतो. गणेशोत्सवातील ...

चालकांनी तणावमुक्त राहून वाहने चालवावीत: प्रादेशिक परिवहन अधिकारी वासुदेव भगत

नाशिक| देशाच्या अर्थव्यवस्थेत चालक हा अतिशय महत्वाचा घटक असून दररोज आवश्यक त्या गरजू वस्तूंची उपलब्धता करून देण्यात त्यांचा मौलाचा वाटा आहे. वाहतूक क्षेत्रात काम करत असतांना चालकाची भूमिका ही अतिशय महत्वाची आहे. त्यामुळे चालकांनी आपण करत असलेल्या कामाबाबत न्यूनगंड बाळगण्याची आवश्यकता नाही. चालक करत असलेले काम हे अतिशय महत्वपूर्ण असून चालकांनी तणावमुक्त राहून वाहने चालवावीत असे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी वासुदेव भगत यांनी केले. नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन, नाशिक यांच्या वतीने चालक दिनाच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मी नारायण लॉन्स, कोणार्कनगर, नाशिक येथे आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक सुभाष पवार, ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्टचे उपाध्यक्ष विजय कालरा, नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, वरिष्ठ उपाध्यक्ष पी.एम.सैनी, माजी अध्यक्ष जयपाल शर्मा, सुभाष जांगडा, भारत टाकेकर, इंद्रपाल सिंग चड्डा, संजय सोनवणे, कल्पना शिंपी,महावीर मित्तल,सुनील बुरड,...

बलकवडे कुटुंबाचा फुलांची सजावट असलेला लक्षवेधी गणेश देखावा

भगुर| सालाबादप्रमाणे याही वर्षी बलकवडे कुटुंबीयांकडे श्रीगणेशाचे आगमन झाले आहे, यंदा गणेशाच्या आजुबजूला फुलांची केलेली सजावट लक्ष वेधून घेत आहे. संपुर्ण कुटुंबात भक्तीमय वातावरण दिसत आहे. गतवर्षी कोविडमुळे खुल्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करता आला नाही, मानवी जीवनावर आलेले संकट टळणे महत्वाचे होते.  त्यामुळे नियम पाळून सर्वच सण साध्या पद्धतीने साजरे झाले,त्यामुळे  बाप्पा कोरोनाचे विघ्न लवकर दूर करेल अशी प्रत्येक गणेश भक्तांची मनोकामना आहे. यंदा सार्वजनिक गणेशोत्सवामुळे घरघुती गणेश बाप्पा बसवण्याला गणेश भक्तांनी पसंती दिली. कोरोनाचे संकट अद्याप पूर्णपणे संपलेले नाही, त्यामुळे घरोघरी बाप्पा विराजमान झाले आहे.  आपण सर्व कोविडग्रस्त परिस्थितीतही कोरोनाचे नियम पाळून श्रद्धापूर्वक हा उत्सव साजरा करत आहोत. भगुर येथील बलकवडे कुटुंबीयांनी घरघुती गणेशासमोर फुलांची सजावट असलेली सुंदर आरास साकारली आहे. घरगुती बाप्पा हा घरच्या सदस्या सारखा असतो, त्यामुळे हे दहा दिवस  बाळ गोपाळांचे आनंदी आणि उत्साहाने भरलेली असतात.  सगळ्यांना सुख, शांती आणि चांगले आरोग्य लाभो असे साकडे ही यावेळ...

देव द्या, देवपण घ्या! उपक्रमाच्या शर्ट्सचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रकाशन

नाशिक|प्रतिनिधी| गोदावरीचे प्रदूषण रोकण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून राबविण्यात येत असलेला देव द्या, देवपण घ्या ! हा उपक्रम स्तुत्य असून नाशिककरांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे. देव द्या, देवपण घ्या ! या उपक्रमांतर्गत गणेश मूर्ती संकलित करण्यासाठी सहभाग नोंदविणाऱ्या कार्यकर्त्यांना मोफत देण्यात येणाऱ्या शर्टचे प्रकाशन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. यावेळी मांढरे बोलत होते. पोपटी रंगाच्या या  शर्टवर देव द्या, देवपण घ्या ! उपक्रमाचे नाव व महिती आहे. विद्यार्थी कृती समितीच्या माध्यमातून युवकांची शक्ती विधायक कार्यात सहभागी होत आहे हे कौतुकास्पद असल्याचे देखील जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी यावेळी बोलतांना सांगितले. प्रास्ताविकात विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष आकाश पगार यांनी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची महिती दिली. गोदावरी नदीचे प्रदूषण रोकण्यासाठी जनजागृती करणाऱ्या माहितीपत्रकांचे देखील विद्यार्थी कृती समितीच्या वतीने घराघरात वाटप करण्यात आले आहे. देव द्या, देवपण घ्या ! ह्या उपक...

भारत हाच एकमेव आधार

संपूर्ण जगात भारत देशालाच गौरवशाली, शौर्यशाली परंपरा लाभलेली आहे. भारतालाच इतिहासाचे अमूल्य कोंदण लाभलेले आहे. पुरातन काळातील ऋषी-मुनी, संत, महंत, सद्गुरू, परात्पर गुरू यांनीच भारताला घडवले आहे. जिथे प्रभू श्रीरामचे अस्तित्व आहे, तिथेच रावण सारखी प्रवृत्ती असते. कालांतराने या प्रवृत्तीचा नाश होतोच. तीच रावणाची प्रतिकृती (प्रवृत्ती) आज तालिबानने जगाला दाखवून दिली आहे. त्यांचे रोज नवनवीन (एका रात्रीतून) निघणारे 'फतवे' पाहिल्यानंतर जगात 'लोकशाही' हा शब्द तरी अस्तित्वात आहे का ?? असा प्रश्न कोणालाही पडल्यावाचून राहणार नाही. तालिबान म्हणजे 'कट्टर' एका पंथ (धर्म) यांना मानणारा विद्यार्थी, असा साधा सरळ सोपा अर्थ आहे. परंतु तालिबानने 'विद्यार्थी' या शब्दाचा नायनाट करून टाकला आहे. तालिबानचे जे म्होरके आहेत, त्यांनी सरळ महिलांना कुठलेच अधिकार नसून त्यांचे काम केवळ मुले जन्माला घालणे एवढेच आहे, असा अजब फतवा काढून महिलांचेच 'तुष्टीकरण' केले. पण या तालिबानी म्होरक्याना हे देखील कळले नाही, की त्यांनी ही एका महिलेच्या पोटीच जन्म घेतला आहे. अत्यंत क्रूर मानसिकते...

देव द्या, देवपण घ्या ! पाचव्या दिवशी ही गणेश मूर्तीदान स्वीकारले

नाशिक| प्रतिनिधी| प्लॅस्टर ऑफ पॅरिस व रासायनिक रंगांच्या मूर्तीपासून होणारे गोदावरीचे प्रदूषण थांबविण्यासाठी नाशिककरांनी गणेश मूर्ती दान करुन देव द्या, देवपण घ्या ! उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष आकाश पगार यांनी केले आहे. देव द्या, देवपण घ्या ! या उपक्रमांतर्गत पाच दिवसाच्या गणेशोत्सवातील गणेश मूर्ती स्विकारतांना ते बोलत होते. विद्यार्थी कृती समितीच्या वतीने गेल्या दहा वर्षापासून हा उपक्रम राबविण्यात येत असून यंदाचे या उपक्रमाचे अकरावे वर्ष आहे. पाचव्या दिवशी घरगुती गणेशोत्सवातील गणेश मुर्ती देव द्या, देवपण घ्या ! उपक्रमांतर्गत विद्यार्थी कृती समितीच्या वतीने स्वीकारण्यात आल्या आहेत. याआधी दिड दिवसाच्या गणेशोत्सवातील गणेश मूर्ती देखील संकलित करण्यात आल्या आहेत. अनंत चतुर्दशीच्या दिवशी रविवार दि.१९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपासून चोपडा लॉन्स जवळील गोदापार्क येथे देव द्या, देवपण घ्या ! उपक्रमाचे कार्यकर्ते मुर्ती स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती व त्यावर केलेले रासायनिक रंगकाम व विविध सौंदर्यप्रसाधनांची मुतीचे गोदावरी नदी...

अंबड आणि सिन्नर एमआयडीसीत ट्रक टर्मिनल विकसित करा: राजेंद्र फड

नाशिक| नाशिक शहरातील सातपूर व अंबड एमआयडीसी तसेच सिन्नर येथील माळेगाव एमआयडीसी येथे ट्रक टर्मिनल नसल्याने वाहतुकीच्या समस्या निर्माण होत आहे. तसेच दिवसेंदिवस वाहतुकीच्या नियमावलीत बदल होत असून ट्रक टर्मिनल ची नितांत आवश्यकता आहे. या अगोदर देखील संघटनेच्या वतीने वारंवार मागणी करण्यात आली असून अद्याप हा प्रश्न मार्गी लागलेला नाही. त्यामुळे लवकरात लवकर अंबड आणि सिन्नर माळेगाव येथील राखीव भूखंडावर ट्रक टर्मिनल विकसित करण्यात यावे अशी मागणी नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आलेली आहे. याबाबत संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र फड व वरिष्ठ उपाध्यक्ष पी.एम.सैनी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ व एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की,नाशिक महानगरपालिका हद्दीमधील सातपूर, अंबड आणि सिन्नर (माळेगाव) येथे एमआयडीसी असून याठिकाणी मोठ्याप्रमाणात औद्योगिक कारखाने आहेत. त्यामुळे या परिसरात मोठयाप्रमाणात अवजड वाहतूक होते. नाशिक शहर भारताचे स्मार्ट सिटीचे यादीत समाविष्ट झालेले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या...

इगतपुरी रेशन दुकानदार संघटनेतर्फे विविध प्रश्नांसंदर्भात बैठक; तहसीलदारांना निवेदन

नाशिक| इगतपुरी तालुका रास्त भाव दुकानदार संघटनेने रास्त भाव दुकानदारांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी इगतपुरीत बैठक आयोजित करण्यात होती. या बैठकीत विविध मागण्यांवर चर्चा करण्यात येऊन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या बैठकीत लायसन नूतनीकरण, रास्त भाव दुकानात वाढीव धान्याचा निष्ठांक, मे महिन्यापासून मोफतचे धान्य वाटपाचे कमिशन मिळणे, रास्त भाव दुकानात खराब धान्य प्राप्त न होणे यासह इतर मागण्यांबाबत  सकारात्मक चर्चा झाली. तसेच नाशिक जिल्हा रास्त भाव दुकानदार संघटनेने हे प्रश्न सोडवण्यासाठी इगतपुरीचे तहसीलदार श्री परमेश्वर कासुळे यांची जिल्हा संघटनेच्या वतीने भेट घेऊन प्रश्न सोडविण्यास मदत करावी अशी विनंती केली. तहसीलदारांनी हे प्रश्न तात्काळ सोडण्यात येतील असे आश्वासन दिले. यावेळी संघटनेच्या वतीने सर्व दुकानदारांना मार्गदर्शन करण्यात आले व दुकानदारांनी संघटनेच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.यावेळी  विभागीय अध्यक्ष  गणपतराव डोळसे, जिल्हाध्यक्ष  निवृत्ति महाराज कापसे, इगतपुरी तालुका अध्यक्ष शशी उबाळे, उपाध्यक्ष अरुण बागडे, सचिव संजय गोवर्धनी, इगतपुरीचे प्रकाश नाटे, त्र्यंबक ...

शिरवे गावी भेट देत आ. शिरीषदादा नाईक यांनी जाणून घेतल्या ग्रामस्थांच्या समस्या

नंदुरबार| नवापूर विधानसभेचे आमदार शिरीष दादा नाईक यांनी शिरवे ग्रामस्थांना भेट देऊन गावात स्थापन केलेल्या गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी आमदार शिरीष दादा नाईक यांचे शिरवे ग्रामस्थांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. तसेच त्यांनी स्थानिक समस्या अडचणी जाणून घेतल्या. याभेटी दरम्यान आमदार साहेबांनी शिरवे गावातील सोयी सुविधांचा आढावा देखील घेतला दरम्यान शिरवे गावात स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता, फरशी पुल, गावात व्यायाम शाळेचे निर्माण तरुणांना टी-शर्ट आदी कामे लवकरच मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर प्राचीन कालीन शिरवे गड किल्ला व देवस्थानाचे सुशोभीकरणासह इतर सुविधा देणार असल्याचे ग्रामस्थांना सांगितले. गणपती उत्सवा दरम्यान आमदारांनी शिरवे ग्रामस्थांची भेट घेतल्याने गावकऱ्यांच्या वतीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थ एन जी वसावे, राजेंद्र गावित, राजू वळवी, यशवंत वळवी, अनिल गावित, दिनेश वळवी, अरविंद वळवी, लगिनदास वळवी, आनंद वळवी, महेश गावित, गोपीनाथ कोकणी, लालसिंग कोकणी आदींसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सावजी कुटुंबीयांनी साकारलीय अखंड भारत शताब्दी महोत्सव गौरी-गणेश आरास

नाशिक| गतवर्षी आपण सगळ्यांनी कोविडग्रस्त परिस्थितीत ही आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरूच ठेवली आहे. कोरोनाच्या संकटग्रस्त काळांतही जगांत एकीकडे तालिबानी, अमानवी शक्ती थैमान घालत असतांना आपण मात्र आपल्या दैदिप्यमान भारतीय संस्कृतीतील दीपस्तंभ असलेले व्रतवैकल्ये, सणवार व उत्सव कोरोनाचे नियम पाळून श्रद्धापूर्वक साजरे करत आहोत. सालाबादप्रमाणे याही वर्षी आमचेकडे श्रीगणेशाचे व गौरींचे आगमन झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सावजी कुटुंबीय गौरी व गणेशाची स्थापना करत आहेत यंदा ही त्याच्याकडे बाप्पांचे आगमन झाले. दरवर्षी जवळचे नातेवाईक आणि मित्र परिवार गौरी आणि गणेशाच्या दर्शनासाठी हजेरी लावत असतात  दिनांक १२ / १३ / १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ ते रात्री १० पर्यंत श्रीगौरींच्या दर्शनार्थ व नंतरही १८ सप्टेंबर पर्यंत सकाळी १० ते रात्री १०  श्रीगणेशाच्या दर्शनार्थ अवश्य यावे असे भाजपाचे नेते लक्ष्मण सावजी, उर्मिला सावजी, नुपूर सावजी, पूर्वा सावजी यांनी आवाहन केले आहे.

'महाराष्ट्रीयन वाडा' गणपती आरास 2021: "फडांचा राजा"

नाशिक| २३ वर्षापासून ही परंपरा अविरत सुरू आहे आणि दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आम्ही पूर्णपणे इको फ्रेंडली डेकोरेशन घरी बनवले आहे. यंदा पुण्यातील ढेपे वाड्याची पारंपरिक आरास साकार केली आहे ७x५ फूट आकारात साकार केला आहे पूर्णपणे पुठ्यामध्ये हा वाडा बनवलेला आहे.  क्लासिक मराठा आर्किटेक्चरला सर्वात विस्तृत आणि समृद्ध स्वरूपात जतन आणि प्रोत्साहन करणे फार गरजेचे आहे.ढेपेवाडा ही एकमेव नवीन रचना आहे जी गेल्या २०० वर्षात मराठा आर्किटेक्चरवर आधारित आहे. गोष्टींना परिप्रेक्ष्यात ठेवण्यासाठी, मराठा वास्तुकलेचा ३५० वर्षांचा इतिहास जवळजवळ १६४१ पासून सुरू होतो.  जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील वाडा संस्कृती आणि एकत्र कुटुंब पद्धतीस चालना देते. याला अनुसुरून आणि ही संस्कृती जतन व्हावी यासाठी यंदाच्या वर्षी ही आरास साकारलेली  आहे. नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र(नाना) फड यांचे पुतणे विशाल फड यांनी ही अप्रतिम कलाकृती साकारली आहे, विशाल व वैभव दत्तात्रय फड यांच्याकडून फडांचा राजाच्या माध्यमातून सातपूर अशोकनगर भागात गेल्या २३ वर्षापासून गणेशोत्सवाचे आयोजन केले जात आह...