Skip to main content

Posts

Showing posts from July, 2021

संकटग्रस्तांची आधार जिजाऊ संस्था :आ रोहीत पवार यांच्याकडून कार्याची प्रशंसा

मोखाडा|प्रतिनिधी|संकट आलं की मदतीला धावणाऱ्या जिजाऊ बद्दल नेहमीच कळाले, अशा संस्थांची महाराष्ट्राला नेहमीच गरज आहे. आम्ही सर्व सदैव जिजाऊ सोबत आहोत. संकटातील आधार म्हणजे जिजाऊ एक आधारवड अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि कर्जत जामखडचे आमदार रोहीत पवार यांनी जिजाऊ संस्थेचे कौतुक केले आहे. चिपळूण दौऱ्यावर असताना आ. रोहीत पवार यांनी जिजाऊ संस्थेची रुग्णवाहिका पाहिली व ते आपुलकीने जवळ आले आणि रुग्णवाहिका व जिजाऊच्या टीम सोबत त्यांनी फोटो काढला.  जेथे जेथे संकट येते तेथे तेथे मदतीला धावुन येणारी जिजाऊ. कुपोषणग्रस्त, वादळग्रस्त, कोरोनाकाळ असो भूकंप असो प्रत्येक संकटात कोकणाला आधार देते ती जिजाऊ संस्था. अशी जिजाऊची महाराष्ट्र भर ओळख निर्माण झाली आहे. कोकण विभागात नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. गावच्या गावे ओसाड झाली तर अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले या अशा संकटात जिजाऊ संस्था पुढे येऊन कोकणवासीयांना जीवनावश्यक वस्तु देत आधार दिला आहे.

माजी आ. गणपतराव देशमुख यांचे निधन

मुंबई| सोलापूरमधील सांगोला विधानसभेचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचने निधन झाले आहे. सोलापुरातील अश्विनी हॉस्पिटलमध्ये वयाच्या 94 व्या वर्षी उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गणपतराव देशमुख हे तब्बल 11 वेळा आमदार होते. त्यांना राजकारणाचा दांडगा अनुभव होता. त्यांच्या निधनामुळे राजकीय विश्वावर शोककळा पसरली आहे. गणपतराव यांनी तब्बल 54 वर्ष सांगोला विधानसभा मतदार संघांच प्रतिनिधित्व केले. एकाच मतदारसंघातून 11 वेळा आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम देशमुख यांनी केला. गणपतराव यांच्या निधनाने राज्यातील राजकारणातला ध्रुवतारा हरपल्याची भावना जनसामांन्यातून व्यक्त केली जात आहे. त्यांची सामािजक, राजकीयक कारकीर्द मोठी होती्र ते 1950-54 शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत विद्यार्थी सभेचा कार्यकर्ता होते. पुढे त्यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात सहभाग व अनेक वेळेस कारावासही भोगला आहे. 1962- पासुन शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती समिती व चिटणीस मंडळाचे सदस्य होते. 1965- अन्नधान्य चळवळीत येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते.  1969-1975 महाराष्ट्र राज्य शेतकरी सभेचे सरचिटणीस  होत...

कोकण नुकसानग्रस्त उद्योजकांशी चर्चा: बँकांमार्फत कमी व्याजदराने कर्ज, तात्काळ विमा रक्कम मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील: संतोष मंडलेचा

नाशिक| महाराष्ट्राच्या विविध भागात पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोकणात अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. व्यापारी उद्योजक आणि नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष श्री. संतोष मंडलेचा व व्यवस्थापन समिती सदस्य तसेच राज्यातील प्रमुख विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची शुक्रवार  ऑनलाईन बैठक झाली. याप्रसंगी व्यापारी उद्योजकांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला व  कोकण भागाचा दौरा करण्याचे निश्चित करण्यात आले. बैठकीत केंद्र सरकार व राज्य सरकारांकडून नुकसानग्रस्त व्यापारी उद्योजकांना मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणे, बँकाच्या माध्यमातून कमी व्याज दराने कर्ज  उपलब्ध व्हावे, औद्योगिक वसाहतीतील वीज व पाणी पुरवठा सुरु करणे, विमा कंपन्यांकडून लवकरात लवकर पेमेंट मिळावे, जीएसटी, आयटी रिटर्न भरण्यास मुदतवाढ मिळणे, क्रेडिट गँरंटी योजनेचा लाभ मिळवून देणे, विमा कंपन्या जर क्लेम देत नसतील तर विमा नियामक आणि विकास प्राधिकरनाकडून क्लेम मिळवून देणे.  तसेच व्यापारी उद्योजकांना तात्काळ आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी व यासह...

तात्पुरती नाही तर शक्य ती मदत कायमस्वरूपी करावी लागेल: देवेंद्र फडणवीस

सातारा| हे मोठे नुकसान असून सर्वांचे पुनर्वसन होणे गरजेचे आहे. शेती आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. नव्याने घरे बांधून त्यांना जागा द्यावी लागेल. अशा घटनांच्या वेळी मिळणारी मदत तोकडीच असते. पण त्यांना वाढीव मदत मिळणे अपेक्षित आहे. तात्पुरती नाही तर शक्य ती मदत कायमस्वरूपी करावी लागेल. आणि सरकार म्हणून जनतेच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे असे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवीस यांनी सांगितले. पूर पाहणी दौऱ्यानंतर ते माध्यमासोबत बोलत होते. निर्सगाचा फटका सातारा जिल्ह्याला मोठ्या प्रमाणांत बसला आहे. हजारो संसार उध्दवस्त झाले आहेत. हजोरा कुटुंबिय बेघर झाले आहेत. पुरग्रस्तांनी आपल्या कुटुंबातील आप्त गमाविले आहेत. पुरग्रस्तांचे सांत्वन करुन त्यांना या निर्सगाच्या संकटातून बाहेर काढून त्यांना धीर देण्यासाठी आज विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सातारा येथे भेट दिली. त्यांच्याशी संवाद साधला. त्यांना जीवनाश्यक वस्तूंची तातडीने मदत मिळवून दिली. निसर्गाच्या सकंटामुळे स्थलांतरीत झालेल्यांच्या वेदना समजावून घेतल्या. सरकार दरबारी जास्तीत जास्त म...

पोलीस कुंटुंबियांचे लसीकरण सुरू; पहिल्याच दिवशी १६० कुटुंबीयांनी घेतला लाभ

नाशिक| कोरोना महामारीच्या काळात प्रामाणिक कर्तव्य बजावणारे पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी पोलीस आयुक्तांच्या पुढाकाराने पोलीस मुख्यालयात लसीकरण सुरू करण्यात आले. पहिल्याच दिवशी १६० कुटुंबीयांनी घेतला लाभ आहे. पोलीस आयुक्त दीपक पांड्ये यांनी जास्तीत जास्त पोलीस कुटुंबीयांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन केले आहे. कोरोना महामारी व संसर्गजन्य आजाराच्या अनुषंगाने सर्वत्र भयंकर परिस्थिती असतांना शहराचे  पोलीस आयुक्त दीपक पांड्ये यांनी पोलीस अधिकारी, अमंलदार व पोलीस कुंटुंबियाच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली, पोलीस आयुक्त व पोलीस उपआयुक्त (मुख्यालय) यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि श्री. महेंद्र चव्हाण, पोलीस कल्याण विभाग व डॉ . श्री. प्रशांत देवरे, वैदयकिय अधिकारी , पोलीस रुग्णालय, नाशिक यांनी विशेष परिश्रम घेवून पोलीस अधिकारी व अमंलदार यांचे लसीकरणाचा पहिला डोस ९३.६ टक्के व दुसरा डोस ७१.५३ टक्के यशस्वीपणे पूर्ण केला. आता पुन्हा पोलीस आयुक्त दीपक पांड्ये यांच्या संकल्पनेतून पोलीस कुंटुंबियाकरीता आजपासुन पोलीस मुख्यालयातील बॅरेक क्रमांक १५ येथे कोविशिल्डचे लसीकरण सुरू करण्यात आले आले. पह...

सामाजिक न्यायाच्या शैक्षणिक शिष्यवृत्त्या!

महाराष्ट्र राज्य पुरोगामी विचारधारा घेऊन समाजातील दुर्बल घटकांच्या विकासासाठी कार्यरत आहे. या दुर्बल घटकांचा विकास करायचा असेल तर या समाजातील मुला-मुलींना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. या दृष्टीकोनातून सामाजिक न्याय विभागामार्फत शैक्षणिक सुविधा, शैक्षणिक योजना राबविण्यात येत आहेत. सामाजिक न्याय विभागामार्फत फक्त शैक्षणिकच नव्हे तर सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचाविण्यासाठीही योजना राबविण्यात येत आहेत. तेव्हा या शैक्षणिक शिष्यवृत्त्या व योजना आपण या लेखात पाहणार आहोत. राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती  - अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील 100 विद्यार्थ्यांना दरवर्षी देशातील नावाजलेल्या शिक्षण संस्थांमध्ये मोफत उच्च शिक्षण देण्यासाठी ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना संस्थेने आकारणी केलेले शैक्षणिक शुल्क दिले जाते.  वसतीगृह व भोजन शुल्क दिले जाते. तसेच क्रमिक पुस्तके व शैक्षणिक साहित्य यांच्या खर्चासाठी प्रतिवर्षी 10 हजार रुपये लाभ देण्यात येतो. या योजनेसाठी शासनाने मान्य केलेल्या संस्थेत प्रवेशित असावा, तसेच विद्यार्थ्यांच्या पालकाचे सर्व मार्...

व्हीआयपींनी पूरग्रस्त भागात दौरे टाळावे: शरद पवार

मुंबई|  व्हीआयपींनी पूरग्रस्त भागात जाणे टाळले पाहिजे असे आवाहन करून यामुळे मदत आणि बचाव कार्यात अडथळा निर्माण होतो असे  पत्रकारांशी बोलताना पवार यांनी सांगितले.  राष्ट्रवादी वेल्फेअर  ट्रस्टकडून करण्यात येणाऱ्या मदतीची रूपरेषा त्यांनी जाहीर केली. खा.  पवार म्हणाले की, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यानी  महाराष्ट्रातील पूरग्रस्तांचा दौरा केला तर माझी काही हरकत नाही. परंतु माझा वैयक्तिक अनुभव सांगतो की व्हीआयपी भेट बचाव आणि मदत कार्यात अडथळा आणते. जे लोक मदत कार्यात थेट सामील नाहीत त्यांनी अशा भेटी टाळल्या पाहिजेत. पवार म्हणाले, व्हीआयपी भेटीमुळे स्थानिक यंत्रणा आणि अधिकाऱ्यांवर अनावश्यक दबाव निर्माण होतो आणि बचावकार्यातून त्यांचे लक्ष विचलित होते. पूर बाधितांना राष्ट्रवादीकडून तातडीची मदत महाराष्ट्रातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि अमरावतीच्या काही भागात घरांचे नुकसान आणि अन्य नुकसान झाले आहे. संपूर्ण राज्य या संकटाच्या काळात पूरग्रस्तांच्या सोबत आहे. हे जिल्हे सोडल्यास राज्याच्या उर्वरीत भागात अतिवृष्टीमुळे शेतीचेही नुकसान झाले आ...

पूरस्थिती अहवाल: पूरदुर्घटनेत आतापर्यंत १९२ लोकांनी जीव गमवला, 'रायगड'मध्ये सर्वाधिक ९५ मृत्यू

नाशिक| कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांना अतिवृष्टीमुळे मोठा तडाखा बसला आहे. पूरदुर्घटनेत आतापर्यंत १९२ लोकांनी जीव गमावला आहे. त्यात सर्वाधिक जीवितहानी ही रायगड आणि सातारा या दोन जिल्ह्यात झाली असून, रायगडमध्ये ९५ तर साताऱ्यात ४५ जणांनी जीव गमावला आहे. अद्यापही २५ जण बेपत्ता आहे. आतापर्यंत ३ लाख ७५ हजार लोकांना बचाव पथकाने सुरक्षितस्थळी हलविले आहे.  राज्याच्या पूरस्थिती अहवालात देण्यात आलेल्या माहितीनुसार, पूरप्रभावित रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, मुंबई उपनगर या ९ जिल्ह्यात आता पूरपरिस्थिती नियंत्रणात आहे.पूरग्रस्त जिल्ह्यात एनडीआरएफ ३४ आणि लष्कराच्या ३ तुकड्या बचाव कार्यात कार्यरत आहे. दि. २२ ते २६ तारखेपर्यंत या चार दिवसात एनडीआरएफ, लष्कर आणि सरकारी बचाव पथकाने पूरग्रस्त भागातील ३ लाख ७५ हजार १७८ लोकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. महत्वाचं म्हणजे २४ तासात कोल्हापूर येथून १,०९,४८३ लोकांना सुरक्षित हलविण्यात बचाव पथकाला यश आले. अद्यापही २५ जण बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे. पुरामुळे १०२८ गावे बाधित झाली आह...

राज्यात नाशिक विभाग आघाडीवर: १६३१ भूमिहीनांना मिळाल्या जमिनी

नाशिक| कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभीमान योजनेअंतर्गत नाशिक विभागातील 1631 भूमिहीन व शेतमजुरांना हक्काच्या जमिनी मिळाल्या असून, या योजनेचा लाभ घेणाऱ्यांमध्ये नाशिक विभाग राज्यात आघाडीवर आहे . राज्यशासनाने 1 एप्रिल 2008 पासून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील दारिद्रय रेषेखालील भूमिहीन शेतमजुरांसाठी दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना सुरु केली आहे. अनुसूचित जाती व नवबौध्दांमधील दारिद्ररेखालील भूमिहीन शेतमजुरांच्या कुटूंबासाठी उदरनिर्वाहाचे साधन नसल्याने त्यांना रोजगार हमी योजना अथवा खासगी व्यक्तीकडे मजुरी करावी लागते. त्यामुळे अशा शेतमजुरांच्या राहणीमानावर प्रतिकूल परिणाम होत असतो. अशा कुटूंबाच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढून त्यांच्या राहणीमानात बदल व्हावा, कुटूंबाचे मजुरीवर असलेले अवलंबित्व कमी होऊन त्यांना कायमस्वरुपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे, व त्यांना स्वाभिमानाने जगता यावे या उद्देशाने ही योजना राबविण्यात येते. सदर योजनेअंतर्गत लाभार्थींना 4 एकर जिरायती (कोरडवाहू) अथवा 2 एकर बागायती जमिनीचे वाटप करण्यात येते. या योजनेअंतर्गत आतापर्यंत नाशिक विभागात (बागाईत 224...

एमआयडीसीत ट्रक टर्मिनलसाठी राखीव असलेला भूखंड उपलब्ध करून द्या: ट्रान्सपोर्ट असोसिएशन

नाशिक| अंबड एमआयडीसी येथील ट्रकटर्मिनलसाठी राखीव असलेला भुखंडाचे वापरात बदल करून त्याचे विक्री बाबत सुरू असलेली प्रक्रिया थांबवुन सदर भुंखड नाशिक ड्रिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट संस्थेस उपलब्ध करून द्या अशी मागणी नाशिक ड्रिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र फड व कार्याध्यक्ष पी.एम.सैनी यांनी याबाबत उद्योग मंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार सिमाताई हिरे, आमदार देवयानी फरांदे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, आयुक्त एमआयडीसी विभाग मुंबई, एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांना निवेदन दिले आहे.   नाशिक ड्रिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक महानगरपालिका हद्दीमधील सातपूर, अंबड या दोन एमआयडीसी असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात औद्योगिक कारखाने आहेत. त्यामुळे या परिसरात मोठयाप्रमाणात अवजड वाहतूक होते. नाशिक शहर भारताचे स्मार्ट सिटीचे यादीत समाविष्ट झालेले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या शहरामध्ये मोठी गुंतवणूक होऊन शहराचे औद्योगिकीकरणात मोठी भर पडणा...

भारत एक राष्ट्र निर्माण करण्यासाठी आरक्षणाची निर्मिती: प्रा.रावसाहेब कसबे

नाशिक| भारत एक राष्ट्र निर्माण करण्यासाठी आरक्षण निर्माण करण्यात आले. भारत एक राष्ट्र निर्माण करण्याची पहिली प्रक्रिया ही आरक्षण आहे. त्यामुळे आरक्षणाची गरज आहे. आरक्षण नावाची गोष्ट केवळ ओबीसी आणि अनुसूचित जाती जमाती यांच्या फायद्याची नाही तर ही एक राष्ट्र बनविण्याची प्रक्रिया आहे. ही जर प्रक्रिया नाकारली तर भारत कधीही एक राष्ट्र बनू शकणार नाही असे मत ज्येष्ठ विचारवंत लेखक प्रा. रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केले. ओबीसी राजकीय आरक्षण संदर्भात होत असलेल्या घडामोडी व वस्तुस्थिती जाणुन घेण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय शिबिराच्या प्रथम सत्रात ज्येष्ठ विचारवंत लेखक रावसाहेब कसबे यांनी ओबीसी जनगणना व समाज जागृती या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी ते बोलत होते. यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने नाशिक येथे आयोजित केलेल्या ऑनलाईन एकदिवसीय प्रबोधन शिबिराचे उदघाटन ज्येष्ठ विचारवंत लेखक रावसाहेब कसबे, ज्येष्ठ विचारवंत लेखक उत्तम कांबळे, ज्येष्ठ विचारवंत लेखक प्रा.हरी नरके, माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्...

तळीयेगाव बाधितांचे पंतप्रधान आवास योजनेतून पुनर्वसन करणार: नारायण राणे

मुंबई|एकाही आपत्तीग्रस्ताला बेघर राहू देणार नाही आणि दरड कोसळल्याने बाधित झालेल्या सर्वांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घर बांधून दिले जाईल असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तळीये येथे जाहीर केले. या वेळी महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर, जिल्हाधिकारी निधी चौधरी उपस्थित होते. आज सकाळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दरड कोसळल्याने बाधित तळीये गावाची पहाणी केली. ग्रामस्थांना आणि मृतांच्या नातेवाईकांना दिलासा देत नारायण राणे यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यथोचित मदत करेल तसेच प्रत्येक आपत्तीग्रस्ताचे पुनर्वसन केले जाईल असे सांगितले. नारायण राणे यांनी पूरग्रस्त चिपळूण शहरात देखील पाहणी करून नुकसानग्रस्तांशी चर्चा केली. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, अतिवृष्टीमुळे आणि आलेल्या पुरामुळे चिपळूणमध्ये बाजारपेठेत पाणी घुसले. व्यापाऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. म्हणून पंतप्रधानांच्या निर्देशानुसार मी कोकणात पाहणी करून त्यासंदर्भात अहवाल देणार आहे. 

''गोदामाई तू सदा अविरल निर्मल वहावी'' : जलपूजन करुन पर्यावरणप्रेमी संस्थांची प्रार्थना

नाशिक| पर्यावरणाचा असमतोल पावसाचा लहरी पणा मानवाने केलेले निसर्गावर अतिक्रमण व त्यामुळे घडणाऱ्या दुर्घटना जर बघितल्या व ब्रम्हगिरी सह्याद्रीचा चालू असलेला लढा याचाच एक भाग म्हणून सांय. ७ वाजता गोदावरी पूजन व आरतीमध्ये सर्व पर्यावरण प्रेमी संस्था आणि संघटनांनी  सहभागी होऊन माता गोदावरीला विनवले की, गोदामाई तु सदा अविरल निर्मल वहावी ही अशी इच्छा प्रकट केली. अर्धा पावसाळा निघुन चालला अजुन ही तुझे पात्र अपुरेच आहे.म्हणूनच डोंगर वाचले तर नदी वाचेल आम्ही सर्व पर्यावरण प्रेमी डोंगर,गड़,किल्ले प्रेमी एकत्र येवुन तुला आश्वासीत करीत आहोत तु ही निरंतर अविरल निर्मल सौंदर्य आम्हाला दे यासाठी नाशिक मधील पर्यावरण प्रेमी संस्था संघटना गोदावरी गटारीकरण विरोधी मंच,कपिला नदी संवर्धन समिती, वालदेवी निर्मूलन समिती, अस्था-अनादी फॉन्डेशन, आदी संस्थानी प्रातिनिधिक स्वरुपात पुजा करुन नाशिकला ही पर्जन्यवृष्टी व्हावी व गोदामाता दुथडी भरुन वाहत जावी अशी प्रार्थना करण्यात आली. यावेळी निशिकांत पगारे, योगेश बर्वे, उदय थोरात, योगेश कापसे , स्वप्नील घीया, वैशाली चव्हाण, विनोद संसारे, प्रकाश बेळे, मनपाचे जमदाडे सह आ...

नाशिककरांना दिलासा: गंगापूरधरण @ ६१ %, पर्यटकांचे आकर्षण असलेले भावली ओव्हरफ्लो

नाशिक | जिल्ह्यातील पर्यटकांच आकर्षण असलेल भावली धरण १०० टक्के भरून ओव्हरफ्लो झाले असून सकाळी ७३ क्यूसेस ने विसर्ग करण्यात आला  तर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचा जलसासाठा ६१.१३ टक्क्यांवर गेल्याने दिलासा मिळाला असून,  त्यामुळे नाशिककरांवरचे पाणी कपातीचे संकट टाळणार आहे. नाशकात ही गेल्या तीन ते चार दिवसांपासून संततधार सुरू आहे. धरणांची पाणी पातळी कमी झाल्याने नाशिककरांवर पाणी कपातीचे संकट आले. दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. हे संकट पुढे आणखी गडद होण्याची चिन्हे दिसत असतानाच वरून राजाने कृपा केली. नाशिकमध्ये गेल्या तीन ते चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नाशिकला पाणी पुरवठा करणारे गंगापूरधरण ६१.१३ टक्के भरले आहे. त्यामुळे तुर्तास तरी नाशिककरांवरचे पाणी कपातीचे संकट टळणार   आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे १२५ जणांचा मृत्यू राज्यातही गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाने थैमान घातले असून अतिवृष्टीमुळे दरडी कोसळणे आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. पूरग्रस्त भागातील बचाव कार्याचा अहवाल मदत व पुनर्वसन विभा...

जेईई मेन-सत्र ३: महाराष्ट्रातील अतिवृष्टीचा फटका बसलेल्या विदयार्थ्यांना परीक्षेसाठी आणखी एक संधी

मुंबई| महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे जे विद्यार्थी 25 आणि 27 जुलै रोजी होणारी जेईई परीक्षा देऊ शकणार नाहीत ,  त्यांना ही परीक्षा देण्याची आणखी एक संधी दिली जाईल ,  अशी घोषणा राष्ट्रीय चाचणी यंत्रणा- एनटीए ने केली आहे. नव्या तारखा लवकरच घोषित केल्या जातील. कोल्हापूर ,  पालघर ,  रत्नागिरी ,  रायगड ,  सिंधुदुर्ग ,  सांगली आणि सातारा या सात शहरांमध्ये  ज्या उमेदवारांची परीक्षा केंद्रे आहेत ,  आणि जे  विद्यार्थी तिसऱ्या टप्प्यातल्या परीक्षेसाठी 25 आणि 27 जुलै रोजी पावसामुळे केंद्रांवर जाऊ शकत नाहीत ,  अशा सर्व विद्यार्थ्यांना आणखी एकदा ही परीक्षा देण्याची संधी दिली जाईल. महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी आणि दरडी कोसळण्याच्या घटनांच्या पार्श्व भूमीवर,   कोल्हापूर ,  पालघर ,  रत्नागिरी , रायगड ,  सिंधुदुर्ग ,  सांगली आणि सातारा या सात शहरांमध्ये  ज्या उमेदवारांची परीक्षा केंद्रे आहेत ,  आणि जे  विद्यार्थी तिसऱ्या टप्प्यातल्या परीक्षेसाठी या केंद्रांवर जाऊ शकत नाहीत ,  अशा सर्व विद्यार्थ्यांना आणखी ए...

टोकियो ऑलिम्पिक भारताचे खाते उघडले: वेटलिफ्टर मीराबाई चानूला सिल्वरपदक

दिल्ली|भारोत्तोलक मीराबाई चानूने आज महिलांच्या 49 किलो गटात रौप्य पदक जिंकून टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारताला  पहिले पदक मिळवून दिले.  मीराबाईने  एकूण 202 किलो वजन उचलले ,  ज्यात स्नॅचमध्ये 87 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 115 किलो होते.  मूळच्या माणिपूरच्या 26 वर्षीय मीराबाईने  2018 मध्ये पाठीला झालेल्या दुखपतीनंतर खूप काळजी घेत आपला सराव केला.  पहिले पदक मिळवून देत संपूर्ण देशाच्या कौतुकास पात्र ठरलेल्या   मीराबाईचे तिच्या यशाबद्दल  पंतप्रधान नरेंद्र मोदी ,  क्रीडामंत्री  अनुराग ठाकूर यांनी अभिनंदन केले आहे.  देशाच्या कानाकोपऱ्यातून तिचे अभिनंदन होत आहे.

कोणताही रेशनकार्डधारक वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या: आ. सरोज अहिरे

नाशिक| कोणत्याही रेशन कार्डधारकांची तक्रार येणार नाही, तो वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना महिला  बालकल्याण समिती अध्यक्ष आ. सरोज अहिरे यांनी काल येथे दिल्या. नाशिक तालुका पुरवठा दक्षता समीतीची बैठक महिला व बालकल्यान समिती अध्यक्ष आ. सरोज अहिरे  तथा अमदार  अध्यक्षतेखाली तहसिल कार्यलयात झाली त्यावेळी बोलत होत्या. चांगल्या प्रतीचे धान्य गोदामातून उचल करावी याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी दुकानदार प्रतिनिधींनी आपल्या अडचणी निवेदनाद्वारे अवगत करुन दिल्या, करोनाने निधन झालेल्या दुकानदारांना शासनाकडून विमा कवच अथवा आर्थिक मदत मिळवून देऊ असे त्यांनी सांगितले. यावेळी तहसिलदार अनिल दौडे, पंचायत समीती गटविकास अधिकारी सारिका बारी, पुरवठा निरिक्षक स्वप्नील थोरात, वसंत केदार . मौंडे भाऊसाहेब, ढवळू फसाळे, पंचायत समिती सदस्य . निवृती महाराज कापसे, मारूती बनसोडे, माधव गायधनी , दिलीप नवले व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्जाची मुदत १ ऑगस्टपर्यंत

नाशिक| शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या धर्तीवर इतर मागास बहुजन कल्याण विभागाने सन 2019-20 पासून विमुक्त जाती- भटक्या जमाती (व्हीजेएनटी), इतर मागासप्रवर्ग (ओबीसी) व विशेष मागासप्रवर्ग (एसबीसी) यांच्यासाठी परदेश शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत 2021-22 शैक्षणिक वर्षाकरिता विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत 1 ऑगस्ट 2021 पर्यंत आहे. या योजनेत विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे. असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभाग (पुणे) चे संचालक दे.आ.गावडे यांनी केले आहे.  या शिष्यवृत्तीत परदेशात पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाच्या (पीएच.डी.) अध्ययन करण्यासाठी राज्यातून दरवर्षी 10 विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यात येणार आहे. पदव्युत्तर पदवी आणि पीएच.डी.साठी जागतिक स्तरावर 200 च्या आतील रँकमधील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या  विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांने जाहिरात व विहित नमुन्यातील अर्ज www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील नवीन संदेश या लिंकवरुन डाऊनलोड करून घ्यावा.  वि...

जेष्ठ नागरीकांच्या सेवेसाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध: सुंदरसिंग वसावे

नाशिक| राज्यात जेष्ठ नागरीकांच्या विविध समस्या निवारणासाठी राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि जनसेवा फौडेंशन पुणे यांच्या संयुक्त विद्यामाने राष्ट्रीय हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १४५६७ सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील जेष्ठ नागरीकांनी गरज भसल्यास या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन नाशिक समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी केले आहे. सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय भारत यांच्या मार्फत देशातील जेष्ठ नागरीकांच्या तक्रार निवारण करीता ही राष्ट्रीय हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. याकरीता जिल्हा स्तरावर क्षेत्रिय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून, जिल्ह्यातील नागरीकांना कोणतीही वृध्द व्यक्ती बेघर असल्याचे अढळल्यास त्यांना वेळेत मदत मिळावी या करीता तसेच जेष्ठ नागरीकांना काही समस्या किंवा तक्रार करावयाची असल्यास सदर हेल्पलाईन क्रमांक १४५६७ यावर संपर्क साधावा. असेही सहाय्यक आयुक्त श्री. वसावे यांनी  कळविले आहे.

तुम्ही स्वत:ला सावरा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू: मुख्यमंत्र्यांचा तळीये दुर्घटनाग्रस्तांना आधार

महाड| तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:ला सावरा. बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा. आम्ही तुमचं पुनर्वसन करू. सर्वांना मदत दिली जाईल, अशा शब्दांत आधार देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तळीये गावातील मृतांच्या नातेवाईकांचे अश्रू पुसले. मुख्यमंत्री आज दुपारी सव्वा दोनच्या सुमारास तळीये गावात पोहोचले. यावेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री आदिती तटकरे, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, परिवहनमंत्री अनिल परब, मिलिंद नार्वेकर, खासदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री भर पावसात चिखलातून वाट काढत घटनास्थळी पोहोचले.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घटनास्थळी येताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना घटनेची माहिती दिली.  मुख्यमंत्र्यांनी  स्थानिकांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यांचं सांत्वन करत त्यांना धीर दिला.

कोकण, पश्चिम महाराष्ट्रात ९ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा तडाखा; ७६ मृत्यू

मुंबई| मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईहून हेलिकॉप्टरने महाडकडे रवाना झाले असून दुपारी दीडच्या दरम्यान ते  दुर्घटनाग्रस्त तळीये गावी पोहचून पाहणी करतील. आज सकाळी त्यांनी मदत व पुनर्वसन विभागाकडून पूर परिस्थिती व मदत आणि बचाव कार्याची माहिती घेतली. बाधित जिल्हे एकूण ९                                      कोल्हापूर, रायगड, सांगली, सातारा, रत्नागिरी, मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग, ठाणे एकूण बाधित गावे - ८९०                                         एकूण मृत्यू- ७६                                                        हरविलेल्या व्यक्ती-५९                        ...