Skip to main content

Posts

Showing posts from November, 2020

प्राचीन नाणी आणि शिलालेखातील निसर्ग

इतिहास नेहमी काही तरी सांगत असतो. इतिहासाची ती  हाक तो आवाज आपण ऐकला पाहिजे तर आपले भविष्य चांगले होऊ शकेल.म्हणजेच इतिहास संशोधनाचा एक दुवा असलेल्या एक स्तंभाचे आपण प्रेमी आहोत. नाण्यांतून इतिहासाचे धागे गवसतात.सातवहान कालीन नाण्यांतून व शिलालेखात जसा इतिहास समोर येतो व पर्यावरन सवर्धनाचा आपल्याला संदेशच देत आहेत. तसेच ही नाणी आपल्याला निसर्गाकडेही घेऊन जातात.  प्राचीन नाणी व लेणीवरील शिलालेख जणू मानव निसर्गपूजक होता याची साक्ष देतात. नाण्यातून व शिलालेखात दिसणारा त्यावेळचा निसर्ग हा माझ्या विषयाचा हेतू आहे. निसर्ग हा वैविध्याने भरलेला आहे. इतिहास,भूगोल, निसर्ग, पर्यावरण, समाज, साहित्य,संस्कृती असे अनंत विषय या निसर्गाच्या पोटात दडलेले असतात. सृष्टीतील या अनंत गुपितांचा शोध घेण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने प्रयत्नशील असतो. हा शोध फक्त निसर्गावर प्रेम असणारे मंडळीच घेतात अथवा संशोधक निसर्गाचा शोध घेत आहेत, असे नाही तर अगदी दोन हजार वर्षांपूर्वी सत्तास्थानावर अधिराज्य करणाऱ्या राजामहाराजांना निसर्गाने भूरळ घातली होती. सुरूवातीच्या काळात याचे प्रतिबिंब राजेमहाराजांच्या नाण...

आनंदवनच्या डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या

चंद्रपूर| ज्येष्ठ समाजसेवक स्व. बाबा आमटे यांची नात आणि डॉ. विकास आमटे यांची कन्या डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याचे धक्कादायक वृत्त आहे. त्यांनी विष घेऊन आत्महत्या केल्याचे समोर येत आहे.  त्यानंतर उपचारासाठी त्यांना वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्यावर मृत घोषित केले. त्यांनी विषचे इंजेक्शन घेतल्याची  माहिती समोर येत आहे. त्या आनंदवनची जबाबदारी सांभाळत होत्या, महारोगी सेवा समितीच्या ही त्या सीईओ म्हणून काम बघत होत्या. त्या मानसिक तणावात असल्याचं ही त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले होते.

गोविंद बोरसे यांची भाजपा उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्धी प्रमुखपदी नियुक्ती

नाशिक| गोविंद बोरसे यांची भाजपा  उत्तर महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. नुकतेच त्यांच्या निवडीचे पत्र भाजप महाराष्ट्र माध्यम विभागप्रमुख विश्वास पाठक यांनी दिले.  यापुर्वी त्यांनी भाजपा महाराष्ट्र प्रदेशामध्ये भाजप महाराष्ट्र  प्रदेश सोशेल मीडिया सह सयोंजक  म्हणून  २०१२ ते २०१५ च्या पहिल्याच भाजपच्या सोशल मीडिया टीम मध्ये काम केले तसेच आत्तापर्यंत ४ वेळा भाजप महानगर प्रसिद्धी प्रमुखपदी काम केले त्यांच्या या कामाची दखल घेत नाशिक महानगर भाजप प्रसिद्धी प्रमुख पदाबरोबरच भाजप उत्तर महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. २०१४च्या  लोकसभा निवडणुकीत त्यांनी सोशेल मीडियाची प्रभावीपणे धुरा सांभाळली होती आणि त्या नंतर झालेल्या २०१४च्या विधानसभा निवडणुकांमध्ये ही उत्तर महाराष्ट्र सोशेल मीडिया सयोंजक म्हणून प्रभावीपणे काम केले व सोशेल मीडियाच्या माध्यमातून आपल्या कामाचा ठसा उमटवला होता, त्यांच्यावर उत्तर महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख म्हणून नाशिक महानगर, नाशिक जिल्हा ग्रामीण, मालेगाव, धुळे शहर, धुळे  ग्रामीण,नंदुरबार,जळगाव...

चेन्नई, मुंबईसह 16 ठिकाणी प्राप्तिकर विभागाचे छापे

नवी दिल्ली| प्राप्तिकर विभागाने आयटी सेझ विकासक ,  आयटी सेझचे माजी संचालक आणि चेन्नईतील स्टेनलेस-स्टीलचे प्रमुख पुरवठादार प्रकरणात 27 नोव्हेंबर रोजी छापे टाकले . चेन्नई ,  मुंबई ,  हैदराबाद आणि कुडलोर येथील 16 ठिकाणी  शोध मोहीम राबवण्यात आली. माजी संचालक आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी गेल्या  3 वर्षात सुमारे  100 कोटी रुपयांची  बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचे पुराव्यामध्ये निष्पन्न झाले आहे.  एका  निर्माणाधीन प्रकल्पात आयटी सेझ विकासकाने काम सुरु असल्याचे 160 कोटी रुपयांचे खोटे दावे सादर केल्याचेही तपासात समोर आले आहे.  या कंपनीने  सल्लागारांचे बनावट शुल्क म्हणून सुमारे  30 कोटी रुपयांच्या भांडवली खर्चाचा आणि  20 कोटी रुपयांच्या अस्वीकारार्ह व्याज शुल्काचाही   दावा केला होता. या धाडीमध्ये आयटी सेझ विकासकाशी संबंधित काही समभाग  खरेदी व्यवहार उघडकीला आले. या संस्थेच्या समभागांची विक्री त्याच्या पूर्वीचे भागधारक ,  रहिवासी आणि अनिवासी संस्था यांनी केली होती ,  ज्यानी  2017-18 आर्थिक वर्षात मॉरीशस ...

सीआरपीएफचे असिस्टंट कमांडन्ट नितीन भालेराव अनंतात विलीन

नाशिक| भारतीय निमलष्कराच्या केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत असलेले असिस्टंट कमांडन्ट नितीन भालेराव यांचे छत्तीसगड येथील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना शहीद झाले. असिस्टंट कमांडन्ट नितीन भालेराव यांच्यावर सायंकाळी नाशिक शहरातील अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारस्थळी अन्न व नागरी पुरवठा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ ,  आमदार सीमा हिरे ,  जिल्हाधिकारी सूरज मांढरे ,  नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर ,  केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महानिरीक्षक संजय लाटकर ,  पोलीस आयुक्त दीपक पांडेय ,  छत्तीसगड सेक्टर उपमहानिरीक्षक राज कुमार ,  पुणे सेक्टर उपमहानिरीक्षक बी.के.टोपो ,   पोलीस अधिक्षक सचिन पाटील ,  जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांचेसह नागरिक उपस्थित होते. अंत्यसंस्कार स्थळी पार्थिव येताच राज्य शासनाच्या वतीने अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ ,  निमलष्करी केंद्रीय राखीव पोलीस दल...

सीरम इन्स्टिट्यूटला भेट देत पंतप्रधानांनी घेतला लसीचा आढावा; २०२१ पर्यंत ३० कोटी डोस उपलब्ध: पूनावाला

पुणे| प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज  सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट देऊन कोविड-१९ विषाणू प्रतिबंधात्मक लस विकास, उत्पादन, वितरण, साठवण आणि व्यवस्थापन प्रक्रियेची माहिती घेतली. यावेळी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ. सायरस पुनावाला, मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला, कार्यकारी संचालक नताशा पुनावाला, शास्त्रज्ञ तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी अदर पुनावाला यांनी संस्थेची माहिती दिली. त्यानंतर प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेतील कोविड-१९ प्रतिबंधात्मक लस निर्मितीच्या अनुषंगाने सुरु असलेल्या कामाची  पाहणी केली. यावेळी त्यांना लस देण्याच्या प्रयत्नांची पूर्वतयारी, आव्हाने आणि नियोजन यांची माहिती शास्त्रज्ञांनी दिली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सीरमचे सीईओ आदर पुनावाला यांनी कोविशिल्ड लसी बाबत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली, ते म्हणाले की, क्लिनिकलच्या तिसऱ्या टप्प्यात असलेली ही लस प्रथम भारतात उपलब्ध होईल. साधारण २०२१ पर्यंत ३० ते ४० कोटी डोस तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानं...

मास्क सध्या आपल्यासाठी महत्वाची व्हॅक्सीन: डॉ. तात्याराव लहाने

पुणे| कोविडला आपण यशस्वीपणे रोखू शकतो त्यासाठी मास्क लावणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करून त्याच भान ठेवलं पाहिजे. मास्क हे सद्या आपल्यासाठी महत्वाचे व्हॅक्सीन आहे असे ज्येष्ठ नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगून जनतेला मास्क घालण्याचे आवाहन केले. फोटो:फाईल ते म्हणाले की, जगात दुसरी लाट आली असून ती लाट आटोक्यात आणण्यासाठी मास्क लावणे आवश्यक आहे. त्यातून आपण या लाटेला सौम्य पद्धतीने रोखू शकतो असे सांगत नेत्ररोग्याच्या चेहऱ्यावर आलेल हासू माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. आपण स्वतःसाठी जगत असतांना समाजासाठी दुसऱ्यासाठी जगल पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

डॉ.तात्याराव लहाने यांचा प्रतिष्ठेच्या 'महात्मा फुले समता पुरस्काराने' गौरव

नाशिक|पुणे| महात्मा जोतीराव फुले यांच्या १३० व्या पुण्यतिथी निमित्ताने आज पुणे समता भूमी येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आयोजित महात्मा फुले समता पुरस्कार सोहळा हा कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करत पार पडला. यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ज्येष्ठ नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांना महात्मा फुले समता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारामध्ये रुपये एक लक्ष,मानपत्र, शाल श्रीफळ आणि स्मृती चिन्ह याचा समावेश आहे. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, माजी आ.पंकज भुजबळ, माजी आमदार कमलताई ढोले पाटील, माजी आमदार जयदेव गायकवाड, कार्याध्यक्ष बापू भुजबळ, प्रा.हरी नरके, रविंद्र पवार, शिवाजीराव नलावडे, डॉ.विठ्ठल लहाने, महिला प्रदेशाध्यक्ष मंजिरी धाडगे,राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, डी.वाय.पाटीलचे कुलगुरू एकनाथ खेडेकर, डॉ.शेफाली भुजबळ, विभागीय अध्यक्ष प्रितेश गवळी, प्रा.दिवाकर गमे, ऍड.सुभाष राऊत, बाळासाहेब कर्डक, दिलीप खैरे, पंढरीनाथ बनकर, अविनाश चौरे,मनीषा लडकत, प्रा.गौतम बेंगाळे यांच्यासह राज्यभ...

24 तासात महाराष्ट्र, दिल्ली, केरळात सर्वाधिक कोविड बाधित

नवी दिल्ली| गेल्या 24 तासात, महाराष्ट्रात सर्वाधिक 6,406 नवीन कोविड रुग्ण नोंदवले गेले. त्या खालोखाल दिल्लीत 5,475, तर केरळात 5,378 नवीन कोविड रुग्ण नोंदवले गेले. गेल्या २४ तासा ४९२ जणांचा कोविडने मृत्यू झाला आहे.   फोटो: फाईल भारताची सक्रीय रुग्णसंख्या आज 4,55,555 झाली. भारतातील एकूण बाधित रुग्णसंख्येच्या तुलनेत सक्रीय रुग्णसंख्या 4.89%.आहे. सक्रीय रुग्णसंख्येपैकी 70% (69.59%) रुग्णसंख्या ही 8 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आहे. ही राज्ये म्हणजे महाराष्ट्र, केरळ, दिल्ली, राजस्थान, उत्तरप्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगढ़. आज महाराष्ट्रातील एकूण सक्रीय कोविड रुग्णसंख्या सर्वाधिक म्हणजे 87,014 आहे, त्या खालोखाल केरळातील एकूण सक्रीय रुग्णसंख्या 64,615  तर दिल्लीतील एकूण सक्रीय रुग्णसंख्या 38,734 आहे. गेल्या  24 तासात भारतात 43,082 नवीन कोविड रुग्ण नोंदवले गेले. यापैकी 76.93% हे 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आहेत. भारतातील एकूण बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येने 87लाखांचा आकडा (87,18,517) ओलांडला. रोगमुक्तांच्या संख्येचा राष्ट्रीय दर आज 93.65% राहिला. देशात  गे...

बोगस प्रमाणपत्राद्वारे खेळाडू दाखवून नोकरी लाटणाऱ्यांना बसणार चाप; लवकरच शासनाची नवी नियमावली

मुंबई| राज्यामध्ये बोगस प्रमाणपत्राच्या आधारे खेळाडू दाखवून शासकीय सेवेचा लाभ घेतल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. असे प्रकार भविष्यात होणार नाहीत यासाठी नवीन नियमावली आणणार असल्याचे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सांगितले. राज्यातील क्रीडा विभागाच्या विभागनिहाय आढावा बैठकीचे मंत्रालयात आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी क्रीडा राज्यमंत्री कु.आदिती तटकरे, क्रीडा विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्या सह क्रीडा विभागाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित होते. श्री. केदार म्हणाले, राज्यात यापुढे बोगस प्रमाणपत्र देण्याचे कोणाचे धाडस होणार नाही. कोणी मागण्याची हिंमतही करणार नाही, अशी नियमावली तयार करण्यात येणार आहे. नोकरीत प्रमाणपत्राचा लाभ घेताना प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात येणार आहे. राज्यात उभारण्यात येणाऱ्या क्रीडा संकुलासाठी जो निधी वितरित करण्यात आला. त्याची कामे तातडीने सुरु करावीत. जागेचा प्रश्न निर्माण झाला तर संबंधित विभागाशी संपर्क करून त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करावेत. यापुढे निधी वितरण झाल्यानंतर निधी खर्च करण्याची ...

राज्यातील कामगारांचा लाक्षणिक संप यशस्वी; विविध कामगार संघटनांचा सहभाग

मुंबई| अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने दिलेल्या आदेशानुसार, महाराष्ट्र राज्यातील १७ लाख सरकारी-निमसरकारी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी, राज्यातील कामगार - शेतकरी व  असंघटित कामगारांच्या साथीने आजचा देशव्यापी संप १००% यशस्वी झाला आहे अशी माहिती कामगार नेते अशोक दगडे, विश्वास काटकर यांनी दिली आहे. राज्यातील कर्मचारी - शिक्षकांनी दाखविलेल्या या भक्कम एकजुटीची नोंद नवागत राज्य शासनाला घ्यावीच लागेल. मुंबई-पुणे-नाशिक औरंगाबाद अमरावती नागपुर या शहरांसह सर्व जिल्ह्यात व तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालय कर्मचाऱ्यांविना ओस पडल्याचे दिसून आले. राज्य व केंद्र शासनांच्या कर्मचारी विरोधी धोरणांविरोधात उमटलेली, राज्यातील कर्मचारी शिक्षकांची ही तीव्र प्रतिक्रिया मानावी लागेल. मालक व कार्पोरेट जगताला सहाय्यभूत ठरतील अशी धोरणे राबवून कामगार कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावण्याचे षड्यंत्र केंद्र व राज्य शासन रचित आहे. कर्मचारी कामगारांच्या अस्तित्वालाच आव्हान दिले जात आहे. त्यामुळेच आजचा संप अस्तित्वासाठीचा लढा या भावनेतुन  झाला.  आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व जागतिक बँकेने ...

परराज्यात वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांना कोविड टेस्टची अट शिथिल करा: ट्रान्सपोर्ट असोसिएशन

नाशिक| परराज्यात वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांना कोविड टेस्टची अट शिथिल करण्याची मागणी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन व नाशिक गुड्स ट्रान्सपोर्ट यांच्यावतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.  फोटो:फाईल याबाबत नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड व नाशिक गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष पी.एम.सैनी यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब व अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना निवेदन दिले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या वतीने नव्याने नियमावली जाहीर केली आहे. सदर नियमावली नुसार राज्याबाहेरून येणाऱ्या नागरिकांना कोविड टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आलेली आहे. मात्र हा नियम वाहतूक व्यवसायाला लागू करणे अत्यंत त्रासदायक ठरणार आहे.  वाहतूक क्षेत्र हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून दररोज हजारो ट्रक राज्याबाहेर जातात आणि राज्यात येतात. अशा परिस्थितीत दररोज चालकांना कोविड टेस्ट करणे बंधनकारक करणे योग...

पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने’ यांचा ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव

मुंबई|पुणे|नाशिक| अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले पुण्यतिथीच्या दिवशी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली दिला जाणारा ‘समता पुरस्कार’ यावर्षी ज्येष्ठ नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांना देण्यात येणार आहे. या पुरस्करामध्ये रुपये एक लक्ष, मानपत्र शाल आणि स्मृतीचिन्ह यांचा समावेश आहे. सदर पुरस्कार दि.२८ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ९.३० वाजता समता भूमी, फुले वाडा, पुणे येथील कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ यांनी दिली आहे. या कार्यक्रमासाठी समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी केंद्रीय मानवसंसाधन राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह, माजी खासदार समीर भुजबळ, आ.पंकज भुजबळ, प्रदेश सरचिटणीस प्रा.हरी नरके, महिला प्रदेशाध्यक्षा मंजिरी धाडगे, प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव नलावडे, डॉ.कैलास कमोद, जी.जी.चव्हाण यांच्यासह सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर तसेच समता परिषदेचे पदाधिकारी व राज...

उपनगर खून प्रकरणातील कुख्यात गुन्हेगारास अटक: गुन्हे शाखेच्या युनिट-२ची कामगिरी

नाशिक|  उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुनाच्या व इतर ०२ गुन्हयातील हवा असलेला आरोपी नाशिक शहरातील कुख्यात गुंड जॉन पडेची (वय २८) यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. गुन्हे शाखेच्या युनिट २ विभागाने ही कारवाई करुन त्याला जेरबंद केले आहे.  नाशिक शहरातील सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय् यांनी आदेश दिले होते. पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय् , गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निषाणदार , सहाय्यक पोलीस आयुक्त मोहन ठाकुर, पो.निरी . अजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दि . मंगळवारी दि. २४ नोव्हेंबर २०२० रोजी येथील नेमणुकीला असलेले सहापो. निरीक्षक शामराव भोसले यांना गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीद्वारे सहा.पो.निरी. अभिजीत सोनवणे, सहा.पो.उपनिरी  शामराव भोसले, पोहवा यशवंत बेंडकुळे, राजेंद्र घुमरे, अन्सार सैय्यद, पो.शि. संतोष माळोदे आदीच्या पथकाने पुणे शहरातील मुंढवा पोलीस ठाणे हद्दीत सापळा रचला,  येथिल पासपोर्ट ऑफिसच्यासमोर मधुबन चायनीज हॉटेल पिंगळे वस्ती येथून वरील गुन्हयात हवा असलेला कुख्यात आरोपी जॉन चलन पडेची (वय २८...

कामगार संघटनांचा गुरुवारी देशव्यापी संप: १० राष्ट्रीय संघटना सहभागी

मुंबई| देशातील २२ कोटी कामगार, कर्मचारी त्यांच्या अस्तित्वाला आव्हान देणाऱ्या केंद्र व राज्य शासनाच्याधोरणाविरुद्ध  गुरुवार दिनांक २६ नोव्हेंबर रोजी  एक दिवसाचा देशव्यापी संप करीत आहेे. अंशदायी पेन्शन योजना रद्द करा केंद्रासमान वेतन भत्ते द्या, अनुकंपा तत्त्वावरील नोकऱ्या विनाअट द्या, कामगार कायद्यातील केलेल्या बदलामुळे कामगार कर्मचाऱ्यांच्या हक्कांचा संकोच होत असल्यामुळे फेरविचार करा, राज्यांना त्यांच्या वाट्याची जीएसटी थकबाकी तात्काळ द्या, शेतकरी समाधानी राहतील अशा धोरणांची अंमलबजावणी करा, कंत्राटी खाजगीकरण रद्द करा यासह इतर मागण्यांसाठी संप पुकारला आहे,महाराष्ट्र  राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. फोटो:फाईल शासनाच्या कर्मचारी विरोधी धोरणाला सशक्त विरोध करणे ही काळाची गरज आहे हाच भविष्यवेधी विचार घेऊन देश स्तरावरील १० राष्ट्रीय कामगार संघटनांची दिनांक दिनांक २ ऑक्टोबर २०२० रोजी भव्य परिषद संपन्न झाली व या परिषदेत दिनांक २६ नोव्हेंबर २०२० रोजी देशव्यापी संपाची घोषणा करण्यात आली. अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने या परिष...

जिल्हा बँकेकडे पीककर्ज अनुदान १२२ कोटी, वाटले केवळ ४६ कोटी! ना. भुसे यांची नाराजी

मालेगाव| जिल्हा बँकेला शेतकऱ्यांचे १२२ कोटीचे कर्जमाफीचे अनुदान वितरीत करण्यात आल्यानंतर केवळ ८ हजार ९२० शेतकऱ्यांना ४६ कोटी ४५ लाखाचे पिक कर्ज जिल्हा बँकेने वितरीत केले आहे. ही अत्यंत खेदाची बाब असून जिल्हा बँकेबाबत कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी नाराजी व्यक्त करत पिक कर्जापोटी किमान 100 कोटीची रक्कम वाटप करण्याचे निर्देश देऊन पीक कर्जाची प्रकरणे तत्काळ मार्गी लावण्याचे आदेश जिल्हा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक पिंगळे यांना दिले.   शासकीय विश्रामगृहात आयोजित सर्व बँक अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपमहापौर निलेश आहेर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनिल देवरे, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, जिल्हा उपनिबंधक सतिष खरे, महानगरपालीकेचे उपायुक्त नितीन कापडणीस, उप विभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, तालुका उपनिबंधक संगमेश्वर बदनाळे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, जिल्हा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक एस.एन.पिंगळे, मालेगावचे विभागीय अधिकारी एम.टी.डंबाळे, पंचायत समिती सदस्य भगवान मालपुरे, रामा देवरे, शशी निकम, मनोहर बच्छाव यांच्यासह सर्व...

वैज्ञानिक निकषांची खात्री करूनच सर्व नागरिकांपर्यंत लस पोहोचविणार: पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली| सरकार लस निर्मितीच्या कार्याकडे अगदी बारीक लक्ष ठेऊन आहे. भारतीय लस विकासक आणि जागतिक नियामक, इतर देशांची सरकारे, बहुपक्षीय संस्था आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या यांच्याबरोबर योग्य पद्धतीने सरकार संपर्क साधत असल्याची ग्वाही पंतप्रधानांनी यावेळी पुन्हा एकदा दिली. बाजारात लस आणताना त्यासंबंधी आवश्यक वैज्ञानिक निकषांची पूर्तता झाली आहे की नाही, याची खात्री करूनच सर्व नागरिकांपर्यंत ही लस पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही मोदी यांनी सांगितले. कोविडविरूद्धच्या लढाईमध्ये प्रत्येक जीव वाचवण्यावर लक्ष केंद्रित केले, त्याचप्रमाणे प्रत्येकापर्यंत सुरळीत, पद्धतशीर,  लस पोहोचवणे  सुनिश्चित करण्यासाठी प्राधान्य देणार येईल, हे कार्य करण्यासाठी सर्व स्तरावर सरकारला एकत्रितपणे काम करावे लागणार आहे. फोटो: फाईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज, दि. 24 नोव्हेंबर,  2020 रोजी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यासह उच्चस्तरीय बैठक झाली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीमध्ये सर्व राज्यांमधील कोविड-19 विषयीची स्थिती आणि स...

आ.प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीची कारवाई; आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं

मुंबई| शिवसेना आ. प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरी आणि कार्यालयात आज सकाळी अंमलबजावणी संचालनालयाचं पथकाकडून ( ईडी) कारवाई करण्यात आली. प्रताप सरनाईक यांचे सुपुत्र पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचं पथक पोहोचलं होतं. त्यानंतर ईडीने विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतल्याच सांगितलं आहे. घर, कार्यालयासह १० ठिकाणी छापे मारल्याचे सांगण्यात येते . आज दिल्लीतील ईडीचे अधिकारी सकाळी आठ वाजता पूर्वेश आणि विंहग सरनाईक यांच्या घरी दाखल झाले. एकूण दहा ठिकाणी मुंबई, ठाणे परिसरात शोध सुरु आहे. टॉप ग्रुपसंबंधी ही कारवाई करण्यात आली आहे. टॉप ग्रुपचे प्रमोटर्स आणि सदस्यांच्या घरी आणि कार्यालयात ही शोधमोहीम सुरु असून चौकशी केली जात आहे. दरम्यान आ.प्रताप सरनाईक सध्या परदेशात असून. महत्त्वाचं म्हणजे सरनाईक यांच्याव्यतिरिक्त शिवसेनेचे आणखी काही नेते ईडीच्या रडारवर असल्याची चर्चा आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, पत्रकार अर्णब गोस्वामी आणि अभिनेत्री कंगना रनौत प्रकरणात आ. प्रताप सरनाईक यांनी बाजू लावून धरली होती. त्यामुळेच त्यांचा आवाज दाबण्यासाठी, शिवसेनेची कोंडी करण्यासाठी ही कारवाई होत असल्...