Skip to main content

Posts

Showing posts from September, 2019

डिजिटल लर्निंगचे धडे गिरवूया, स्मार्ट विद्यार्थी घडवूया!

  Brixlelant  फाउंडेशन सेवाभावी सामाजिक संघटना आहे.ही संस्था अमेरिकेतील अनिवासी तरुणांच्या प्रोत्साहन आणि प्रयत्नातून उदयास आली आहे. तिचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. संस्थेने सामाजिक बांधीलकी जोपासण्याच्या हेतूने विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना डिजिटल ई-शिक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी क्यूजली ( Qeasily ) नावाचे ऍप आणले आहे. ऑनलाइन शिक्षणावर भर देत स्मार्ट विद्यार्थी आणि स्मार्ट शाळा घडवण्याच्या मार्ग दाखवण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे    त्यासाठी  ब्रिक्सेलेंट  Qeasily .com या कंपनीचे सहकार्य घेतले आहे,  संस्थेने घोषणा केली आहे की डिजिटल शिक्षणाचे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी आगामी काळात 1 मिलियन डॉलरची गुंतवणूक केली जाणार आहे. ब्रिक्सेलेंट अभ्यासक्रमावर आधारित सर्वसामग्री ही शाळा आणि विद्यार्थ्यांना पूर्णपणे विनामूल्य , डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून उपलब्ध करुन देेत आहे. त्यातून विद्यार्थी शाळा, शिक्षक यांना एक व्यासपीठ आणि आवश्यक अभ्यासक्रमाचे समाधान प्राप्त करता येणार आहे, त्याला विद्यार्थी, शिक्षक  व शाळेच्या विश्वस्तांकडून चां...

उपासमार, अन्न नासाडीचे भीषण वास्तव

नाशकात  गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो, गणपतीचा निरोप देखील हा या उत्सवाचा एक महत्वाचा भाग आहे  महानगरपालिकेच्या "गो ग्रीन" या संदेशाची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने या गणेश विसर्जनाला बघायला मिळाली. संभाजी स्टेडियममध्ये मनपासोबत नागरिक आणि सामाजिक संस्थानी भागीदारी करत सर्व गणेश भक्तांच्या सोयीकरीता विसर्जन टाक्या व निर्माल्यासाठी स्वतंत्र गाडीची व्यवस्था करण्यात आली होती. फीडिंग इंडिया नाशिक संस्थेने त्याठिकाणी प्रसाद व इतर खाद्यपदार्थ वाया जाऊ नये म्हणून ते जमा करण्यासाठी स्टॉल लावला होता .  फीडिंग इंडियाचे  प्रसाद कुलकर्णी, निशा देशमुख, मंगल दंगल, अंजली कुलकर्णी, अजय कणव, शहराध्यक्ष पूनम कणव या  विसर्जनाच्या दिवशी दिवस भर मुसळधार पावसात ही सेवा करत कार्यक्रमाला उपस्थित होत्या मोदक,नारळ,  खारपाट, पोळी, भात यांचे मिश्रण असलेले सर्व प्रसाद एकत्रित केला आणि प्रसादाचे सर्व अन्न हे वाया न घालवता कामटवाडी झोपडपट्टी, मुंबई महामार्गावर आणि 'शरण' जनावरांच्या निवाऱ्याला दिले. तसेच भुकेल्या व गरजू लोकांना अन्न  दिल्याने त्यासर्वांचे आशीर्वाद मिळाल्...

सामाजिक जाणीवेचा जागर , गोदामाईचा सन्मान

नाशिक हे तसे मंत्रभूमी ते यंत्रभूमी म्हणून सर्वत्र परिचित आहे. एक पौराणिक महत्व असलेली पुण्यभूमी आहे.उत्तर महाराष्ट्राची जीवनवाहिनी  गोदावरीचा उगम ही येथेच होतो, त्यामुळे सर्वधर्म समभाव, पावित्र्य आणि ऋणानुबंध जपणे ही नाशिकची परंपरा आहे. या परंपरेची साक्ष घेऊन दरवर्षी मोठया उत्साहाने गणेशोत्सव नाशिककर साजरा करतात. या उत्साहात गणेशोत्सवाचे दहा दिवस कसे निघून जातात हे देखील कळत नाही.                      "देव द्या, देवपण घ्या" एकता, बंधुता व समतेची जाणीव करुन देणारा गणेशोत्सव हा सण आहे. परंतु गणेशोत्सवाच्या उत्साहामध्ये आम्ही एवढे तल्लीन होऊन जातो की प्लॅस्टर ऑफ पॅरिस व रासायनिक रंगांपासून तयार केलेल्या आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन “गोदामाईत” करतो, त्यामुळे गोदा प्रदुषण होते. या प्रदुषणामुळे गोदावरीचे पावित्र्य भंग झाल्याची जाणीवही आम्हाला होत नाही. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती त्यावर केलेले रासायनिक रंगकाम व इतर सौंदर्यप्रसाधनांमुळे गोदावरी मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होतेय. गोदावरीचे प्रदूषण थांब...

विक्रम थांबले, इस्रो नाही !

 चंद्रयान मोहिमेने संपूर्ण जगाचं लक्ष वेधले आहे. त्यामुळे  भारतासह  संपूर्ण जगाला या मोहिमेविषयी कुतुहूल होते.  22 जुलैला चंद्रयान-2 मार्क।।। जीएसएलवी प्रक्षेपण यानाद्वारे चंद्रमोहिमेला प्रारंभ झाला.  त्यानंतर 20 ऑगस्टला यशस्वीपणे  यानाने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. दोन दिवसानंतर म्हणजे 22 ऑगस्टला चंद्राच्या पृष्ठभागाचे पहिले छायाचित्र यानावरील कॅमेऱ्याने टिपले, 26 ला दुसरे छायाचित्र घेतल्यावर पुढील प्रवासाला सुरुवात झाली. २ सप्टेंबर रोजी विक्रम लँडर चंद्रयानापासून (रॉकेट) वेगळे झाले    चंद्राभोवती 100 किमी x 30 किमी अंतरावर विभक्त करण्याचा इस्रोचा प्रयत्न होता,   गुंतागुंतीचे सर्व टप्पे सुरळीत पार करत असतांना  7 सप्टेंबरला पहाटे 2 वा. विक्रम लँडर  चंद्राच्या दक्षिण भागावर उतरणार होते, मात्र  पहाटे 1. 55 वा. लँडरचा इ स्रोच्या ग्राउंड  स्टेशनशी संपर्क तुटला आणि सर्वच जण हताश झाले. यामोहिमे प्रसंगी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. त्यांनी शास्त्र ज्ञ  आणि तेथील प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील  निर...

संयमी पवार,उद्विग्न पवार!

विधानसभेच्या २८८ जागांसाठी निवडणुकीची घोषणा केव्हाही होऊ शकते. भाजपा-सेनेची युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी निश्चित आहे. काँग्रेस आघाडीने 252 जागांवरचा तिढा सोडावलाय, दोन्ही काँग्रेसने प्रत्येकी 106 जागा व मित्रपक्ष स्वाभिमानी शेतकरी पक्षाला 40 जागा सोडल्या, उर्वरित 36 जागांचा निर्णय ही लवकर होईल, मात्र भाजपा -सेनेचे  जागा वाटप अंतिम झाले नसले तरी मित्र पक्ष धरुन भाजप 162 ते 168 जागांसाठी आग्रही आहे. 2014 निवडणुकीत भाजपला 122 जागा मिळाल्या होत्या तर शिवसेनेला 63 जागा होत्या. भाजपा त्यांना 120 ते 125 जागा सोडेल अशी शक्यता आहे. त्यामुळे यंदा भाजपा मोठयाभावाची भूमिका निभवण्याच्या तयारीत आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे भाजपा फॉर्मात आहे. मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीनंतर विरोधी पक्ष शिल्लक राहणार नसल्याचे सांगून राजकीय वातावरण तापवलेय तसेच भाजपा पुन्हा सत्तेवर येईल असा ठाम विश्वास बोलून दाखविला.        महाजनादेश  यात्रेच्या माध्यमातून  मुख्यमंत्र्यांनी  महाराष्ट्र ढवळून काढला आहे. तर विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांनीही भाजप मंत्र्य...