Skip to main content

Posts

Showing posts from August, 2019

द बर्निंग 'ॲमेझॉन'

जगात एक महत्वाची घटना घडली आहे, आपल्याकडे याविषयी फारशी चर्चा नसली तरी जगभरातील पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांनी मात्र लक्ष वेधले आहे. भारतापासून हजारो कि.मी दूर आफ्रिका खंड आणि अटलांटिक महासागराच्या पलीकडे दक्षिण अमेरिकी प्रदेशात ॲमेझॉन उष्णकटीबंधीय  वर्षावन आहे. त्याचे क्षेत्रफळ 5,500,000 कि.मी. इतके आहे. ॲमेझॉनचा सर्वात मोठा भाग ब्राझीलमध्ये असून एकूण वनक्षेत्र 60% आहे, त्यानंतर पेरू 13%, कोलंबिया 10% तसेच इक्वाडोर, वेनेझुएला, बोलेविया, गयाना, फ्रेंच गयाना, सूरीनाम आदी भाग जंगलांनी व्यापलेला आहे. ब्राझील येथील जंगलं सतत तीन आठोडयापासून जळत आहे. जागतिक पर्यावरण संतुलन राखण्याच्या दृष्टीने ती वनसंपदा महत्वाची आहे. Image sourse google | image by  copro de bomberos de mato grass via AP/ buzzfeednews.com)              सातत्याने जळणाऱ्या जंगलामुळे मोठया प्रमाणात कार्बनचे उत्सर्जन  होऊन पर्यावरणावर त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता पर्यावरणवादी संघटनांनी व्यक्त केली. छोट्या पातळीवर आग नेहमीच लागते मात्र यंदाची आग मोठी आ...

इडी आणी 'राज'कारण

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीला दोन महिन्यांचा कालावधी आहे. निवडणुकीच्या तोंडावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांना अंमलबजावणी संचालनालयाने दादर येथील कोहिनूर मिल म्हणजे आताचे कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी नोटीस पाठवली आहे. चौकशीसाठी राज यांना 22  ऑगस्ट रोजी हजर राहण्याचे आदेश आहेत. Image source -google|image by wikipedia                                                त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कोहिनूर मिल राज ठाकरे, राजेंद्र शिरोडकर आणी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेष जोशी यांनी खरेदी केली. यात इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग फायनान्शीयल सर्विसेस लि. या कंपनीने देखील मोठी गुंतवणूक केली होती,  त्यामध्ये  कंपनीला तोटा सहन करावा लागल्याने कंपनीने काढता पाय घेतला. त्यापाठोपाठ राज यानी ही आपली हिस्सेदारी विकल्याचे सांगितले जाते. त्यामुळे कोहिनूर मिलमध्ये जे व्यवहार झाले ते व्यवहार ईडीला तपासायचे असल्याचे बोललं जात...

मदतीचे हात; मायेची फुंकर !

पूरग्रस्तांपर्यंत खरी मदत पोहचली पाहिजे, झेप फाउंडेशनच्या प्रेरणा बलकवडे या ताइने ते केले. कोल्हापूर जिल्ह्यातील पारगाव,अर्जुनवाड गावांना स्वत: जाऊन शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहचवलीय, तसेच पूरग्रस्त बाधितांच्या जखमेवर मायेने ,आपुलकीने फुंकर घातली आहे. काही पूरग्रस्तांनी स्वतः वरील आपबिती सांगता सांगता अश्रृंना वाट मोकळी करुन दिली. समता परिषद आणि भुजबळ नॉलेज सिटीतर्फे मदतीचा हात भारतीय महात्मा फुले समता परिषद व मेट भुजबळ नॉलेज सिटी मुंबई व नाशिकच्या वतीने पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी संकलित करण्यात आलेली जीवनावश्यक वस्तूंची मदत नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस पंकज भुजबळ यांच्या हस्ते सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर व वाळवा तालुक्यातील पूरग्रस्त नागरिकांसाठी रवाना करण्यात आली.  राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्रातील पूरग्रस्त नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे संकलन करून मदत करण्याचे आवाहन राज्यभरातील समता परिषदेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केलेले होते. त्यामध्ये पूरग्रस्त नागरिकांसाठ...

पूरग्रस्तभावांसाठी बहीणींची धाव

महापूरामुळे कोल्हापुर आणि सांगली भागामध्ये जिवीत आणि वित्तहानी झालेली आहे. तेथील पूरग्रस्त बांधवांचा जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे. त्यांच्या वेदना समजून घेत पुराने दिलेल्या जखमांवर मायेची फुंकर घालता यावी म्हणून नाशिकमधील महिला भगिनीं ही सरसावल्या आहे. सांगली-कोल्हापूरकडे मदतीचा ओघ वाहत असतांना पूरग्रस्तांसाठी “झेप फाऊंडेशन”तर्फे रॅली काढून मदत जमा करण्यात आली. राखी पोर्णिमेच्या दिवशी  पुरग्रस्त बांधवांना ही मदत पोहचेल . संवेदनशील 'झेप' महापूरामुळे नाशिक गोदाकाठचे गावे सावरली पण कोल्हापुर आणि सांगली भागामध्ये मोठया प्रमाणावर नुकसान झाले असून तिथल्या लोकांना नव्याने संसार उभा करणं कठीण झालं आहे, मात्र त्यांची पुन्हा उभे राहण्याची जिद्द, धडपड बघून त्यांना खंबीर साथ देण्याची गरज आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी नव्यानेच स्थापन केलेल्या “ झेप फाऊंडेशन” या संस्थेतर्फे मदत जमा अभियान हाती घेत साथ देण्याचा निश्चय केला. काही महिला भगिनींना सोबत घेत घरोघरी जात पुरग्रस्त बांधवांसाठी मदत मागितली, नागरिकांनी या कार्याला उस्फूर्त प्रतिस...

फक्त लढ म्हणा!

भिंत खचली चुल विझली होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पानी थोडे ठेवले'' महापुरानंतर विदारक व काळजाला वेदना देणारी परिस्थिती आहे, त्याच्याशी साम्य दर्शवणाऱ्या कुसुमाग्रज यांच्या 'फक्त लढ म्हणा'  या कवितेच्या पंक्ती मनात लागलीच तरळल्या. महापुराला आता आठोडा झालाय. पुराचे पानी अद्याप काही ठिकाणी ओसरले नसल्याने मदतकार्यात अडचणी येत आहेत.विशेष करुन पूराने वेढलेल्या ग्रामीण भागात पूरग्रस्तांची उपासमार तसेच रोगराईच्या संकटाला सामोरं जावं लागण्याची भिती आहे. प्रथम कोल्हापूर, सांगलीकरांसमोर रोगराई आटोक्यात ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आव्हान आहे.प्रशासनासह दानशूर व्यक्ती संघटना मदत करीत आहेत. "संसार मोडून पडला तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवूणी फक्त लढ म्हणा!"  महामार्गावरील पानी ओसरू लागल्याने हळूहळू कोल्हापूर शहर पूर्वपदावर येत आहे.दूध, इंधन, गॅस, दैनंदिन गरजेच्या वस्तू पोहचत आहेत.पुरात अनेकांचा संसार वाहून गेलाय त्यामुळे शिधा शिजवण्यासाठीची भांडी आणी धान्य भरडणाऱ्या गिरण्या सुस्थितीत असण्याची शक्यता नाही, त्यामुळे तयार अन्नाची पाकिटे पोहचते...

आपत्तीचा महापूर

नाशिकमध्ये गोदावरीला महापूर आला. त्यापाठोपाठ कृष्णाखोऱ्यात सांगली, कोल्हापूर आणी सातारा या जिल्ह्यांना पूराने वेढा दिला. सन 2005 च्या महापुरानंतर हा सर्वात मोठा महापूर ठरला. सुरुवातीला कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाणी सोडल्याने हा महापूर आल्याची अफवा पसरली होती, मात्र त्यानंतर जाणकारांच्या वस्तुस्थिती लक्षात आली. अचानक झालेल्या अतिवृष्टीचा तो फटका होता. आता हळूहळू पुराचे पानी ओसरत आहे, शासकीय आणी सामाजिक संस्थानी स्वतःला मदत कार्यात झोकून दिले आहे.मात्र वित्त व जीवितहानी मोठी आहे. त्यातून सावरणे आपत्तीग्रस्त जिल्ह्यांना कठीण आहे.10 जिल्ह्यात ओला दुष्काळ आहे तर 27 जिल्ह्यात कोरडा दुष्काळाचा सामना करावा लागत आहे असे विचित्र चित्र महाराष्ट्रात आहे.  फोटो :उदय रांजणगावकर नाशिक, इगतपुरी अतिवृष्टीमुळे महापूर नाशिकला जुन्या जाणत्या लोकांच्या माहितीप्रमाणे सन 1972 ला सर्वात मोठा महापूर आल्याचे सांगण्यात येतं. 2008, 2016  नंतर आताचा ऑगस्ट 2019 चा महापूर हा त्यापेक्षा मोठा आहे. ऑगस्ट महिन्याच्या 9 दिवसातच विक्रमी पावसाची नोंद झाली. नाशिक 277 %, त्र्यंबक 243% आणी पेठ 157 % तर...