Skip to main content

Posts

Showing posts from June, 2022

शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यासह ९ मागण्या मान्य; ग्रामसभेनंतर आंदोलन मागे

पुणतांबा| दि. ७ जूनला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या  दालनात बैठक होऊन साधक बाधक चर्चा झाली. त्यात १६ ठरावापैकी ९ ठरावावर सकारात्मक विचार झाला, ७० टक्के मागण्यांवर समाधान झाल्याचे ग्रामसभेत सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांनी सांगितले. त्यामुळे पुणतांबा ग्रामसभेत तूर्तास आंदोलन थांबवण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. पुणतांबा येथे १ जूनपासून सुरू केलेले शेतकरी आंदोलन तूर्तास तरी थांबविण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला आहे. २३ मे रोजी पुणतांबा येथे विशेष शेतकरी ग्रामसभा आयोजित करून शेतकऱ्याच्या शेतमाल,विज,कर्ज व इतर अडचणीचे ठराव करून सरकारला निर्णय घेण्यासाठी १ जूनपर्यंतचे अल्टिमेट देण्यात आले होते, पण याची दखल सरकार दरबारी घेण्यात न आल्याने किसान क्रांतीतर्फे आंदोलन सुरू झाले. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी महसूल मंत्री,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी आंदोलक यांच्याशी चर्चा करत पाच दिवसानंतर संगमनेरला बैठकीला या म्हणून सांगितले त्यानंतर चौथ्या दिवशी कृषिमंत्री दादा भुसे यांनी आंदोलकांशी तीन तास चर्चा करून ७ जूनला उपमुख्य मंत्री अजित पवार यांच्या बरोबर बैठक पक्की केली.उपमुख्यमंत्री यांच्या दाल...

आरबीआयकडून रेपो दरात अर्धा टक्क्याची वाढ

मुंबई: भारतीय रिझर्व बँकेने आज 2022-23 या आर्थिक वर्षातील आपला दुसरा पतधोरण आढावा आज जारी केला. सहा ते आठ जून 2022 या काळात, आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली, पतधोरण आढावा समिती-एमपीसीची बैठक झाली. या बैठकीत, रेपो दरात अर्ध्या टक्क्याची वाढ करत तो 4.90 % करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. महागाईवर नियंत्रण ठेवण्याच्या हेतूने सलग दुसऱ्यांदा रिझर्व बँकेने रेपो दरात वाढ केली आहे.  त्यानुसार स्थायी ठेव सुविधा दर देखील आता  4.65% इतके झाले आहेत तर सीमान्त स्थायी  सुविधा दर आणि बँक दर  5.15% एवढे असतील.  पुढे वाटचाल करतांना एकीकडे विकासाला पाठबळ देत, महागाई दर निश्चित लक्ष्याच्या आत ठेवण्याच्या दृष्टीने, एमपीसीने हस्तक्षेप कमी करण्यावर (withdrawal of accommodation)वर भर देण्याचा निर्णय घेतला आहे.  आरबीआय च्या बैठकीतील ठळक मुद्दे  १)वर्ष 2022-23 साठी वास्तविकजीडीपी दर 7.2% राहण्याचा अंदाज  2) महागाई:  2022 या वर्षात मोसमी पाऊस सरासरीच्या सामान्य असेल, तसेच भारतात, कच्च्या तेलाच्या किमती प्रती पिंप 105 डॉलर्स असतील, असे गृहीत धरत...

शेतकरी आंदोलनाची राज्य शासनाकडून दखल; मागण्यांबाबत ७ जूनला मंत्रालयात बैठक

पुणतांबा: राहाता तालुक्यातील पुणतांबा येथे  एक जूनपासून सुरू असलेल्या धरणे आंदोलनाची दाखल राज्य शासनाने घेतली असून चौथ्या दिवशी कृषीमंत्री ना.दादा भुसे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन कोअर कमिटीच्या सदस्यांची उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्यासोबत फोनवर संपर्क करून देत बंद दाराआड तीन तास चर्चा केली. ना. भुसे यांनी शासन तुमच्या मागण्यांबाबत सकारात्मक असून, ७ जून रोजी उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात चर्चेसाठी सदस्यांनी बैठीकला यावे असे निमंत्रण दिले. आंदोलकांनी निमंत्रण स्वीकारुन राज्य शासनाशी चर्चा केल्यानंतर  आंदोलनाची पुढील दिशा ग्रामसभा घेऊन ठरवण्यात येईल असे स्पष्ट करून आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय झाला. यावेळी शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा. सदाशिव लोखंडे, रावसाहेब खेवरे, कमलाकर कोते, अनिल बांगरे, सोमनाथ गोऱ्हे, राजाभाऊ झावरे, नितीन अवतडे, शिवाजी साखरे, महेश कुलकर्णी,भास्कर मोटकर, आबासाहेब नळे, तसेच कोअर कमिटीचे सदस्यडॉ.धनंजय धनवटे,धनंजय जाधव ,बाळासाहेब चव्हाण,सुहास वहाडणे,सुभाष कुलकर्णी ,सुभाष वहाडणे ,निकीता जाधव ,अमोल सराळकर, सर्जेराव जाधव ,चंद्रकांत डोखे ,गणेश बनकर ,न...

साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीवर भर द्यावा: नितीन गडकरी

पुणे| आत्मनिर्भर भारतासाठी भविष्यात पेट्रोल आणि डिझेल सारखे प्रदूषणकारी इंधन हद्दपार करण्याची गरज असून साखर कारखान्यांनी देखील आगामी काळात साखरेचं उत्पादन कमी करून इथेनॉल सारख्या पर्यायी इंधनाच्या निर्मितीकडे वळण्याची गरज असल्याचं स्पष्ट मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज पुण्याजवळील मांजरी इथं व्यक्त केलं. वसंतदादा साखर संस्थेत आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय साखर परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून गडकरी बोलत होते. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे दूरस्थ पद्धतीनं यावेळी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह साखर उद्योगातील दिग्गज नेते व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी बोलताना गडकरी यांनी साखर उद्योगाशी संबंधित अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं . सध्या 100 टक्के इथेनॉल वर चालणाऱ्या गाड्या उपलब्ध असून इथेनॉल हे हरित इंधन मानले जाते. भविष्यात इथेनॉल विक्रीचे पंप सुरू करण्याची गरज असून पुण्यात त्याची अंमलबजावणी व्हावी  अशी अपेक्षा गडकरी यांनी व्यक्त केली . बाजारात सध्या साखरेचे दर वाढलेले दिसत असले तरी ही परिस्थिती कायमस्वरूपी टिकणार नाही म्हणून साखरेचे...

किसान क्रांती आंदोलन: स्थानिक लोकप्रतिनिधींची आंदोलनाकडे पाठ

नाशिक|पुणतांबा येथे किसान क्रांतीच्या वतीने विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन सुरू आहे. आज आंदोलनाचा चौथा दिवस आहे. स्थानिक आजी माजी लोकप्रतिनिधी आंदोलनबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसते. राज्याचे महसूल मंत्री, कृषी मंत्री, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आंदोलकांना भेट देत असतांना मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी आंदोलन स्थळी फिरकले नसल्याची शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे.  आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी कांदे व फळ वाटप केले तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी उसाची होळी करत लक्ष वेधले तसेच दूध वाटप करत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारने ही आपला प्रतिनिधी पाठवून शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. तसेच राज्याचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही शिष्टाईचा प्रयत्न केला पण अयशस्वी ठरला.   आंदोलकांच्या मागण्या पुढीप्रमाणे:   1)कृषी पंपाचे वीजबिल माफी व शेतीला दिवसा पुर्ण दाबाने वीज पुरवठा करावा. 2) राज्यात मोठ्या प्रमाणात ऊस गाळपविना शेतात उभा आहे, त्याला हेक्टरी २ लाख रु. अनुदान व ऊसाच्या घटलेल्या वजनास शेतक-यांना रु. १००० प्रति टन अनुदान...