Skip to main content

Posts

Showing posts from August, 2020

माजी राष्ट्रपती मुखर्जी यांच्या स्मृतिनिमित्त देशात ७ दिवसांचा शोक

नवी दिल्ली| माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे आर्मी रिसर्च अँड रेफरल हॉस्पीटल येथे आज 31 ऑगस्ट रोजी निधन झाले. दिवंगत मान्यवराच्या सन्मानार्थ 31 ऑगस्ट ते 06 सप्टेंबर 2020 असा सात दिवसाचा शासकीय शोक देशभर पाळण्यात येईल. देशभरातील इमारतींवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला जाईल, मनोरंजनाचा कोणताही शासकीय कार्यक्रम होणार नाही.शासकीय इतमामात करण्यात येणाऱ्या अंत्यसंस्काराची तारीख आणि वेळ नंतर जाहीर करण्यात येईल. सौ. पीआयबी

नाशिकच्या श्रीया तोरणे हिस राष्ट्रीय स्पर्धेत मिस अर्थ इंडिया इको टुरिझम किताब

नाशिक| दिल्ली येथील डिव्हाइन ग्रुप यांच्यातर्फे होत असलेल्या मिस अर्थ इंडिया-2020 स्पर्धेत नाशिकच्या श्रीया स्वप्नील तोरणे हिने मिस अर्थ इंडिया इको टुरिझम - 2020 हा किताब  आणि मुकूट पटकविला आहे. या अगोदरच्या फेरीमध्ये बेस्ट रॅम्पवॉक हे सबटायटल देखील जिंकले होते. या स्पर्धेत मिळालेल्या यशानंतर तिला भारताचे प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्याची संधी आहे.  मिस अर्थ इंडिया-2020 स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत देशभरातील असंख्य युवतींनी सहभाग नोंदविला होता. यातून पात्रता फेरीसाठी 40 युवतींची निवड करण्यात आली होती.  पुढील 15 स्पर्धकांची निवड करत त्यांच्याकडून विविध आव्हाने पार पाडण्यात आली. या स्पर्धेकरिता वेगवेगळया क्षेत्रातील तज्ज्ञांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.  दरम्यान, या पंधरा स्पर्धकांमधून अंतिम सहा उमेदवारांची निवड करण्यात आली होती.  तिने यापूर्वी मिस टीन युनिव्हर्स इंडिया, मिस टीजीपीसी इलाइट या राष्ट्रीय स्पर्धांचे विजेतेपद पटकाविले आहे. या स्पर्धेसाठी तीने इंस्टाग्रामवर सुरु केलेल्या #healwiththeearthbyst या ’निसर्ग संवर्धन करुन आपले मानसिक व शारि...

देव द्या, देवपण घ्या ! या स्तुत्य उपक्रमात नाशिककरांनी सहभागी व्हावे: विनायकदादा पाटील

नाशिक|प्रतिनिधी| विद्यार्थी कृती समितीच्या वतीने गोदावरीचे प्रदूषण रोकण्यासाठी राबविण्यात येत असलेला देव द्या, देवपण घ्या ! हा स्तुत्य उपक्रम असून नाशिककरांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन माजी मंत्री विनायकदादा पाटील यांनी केले आहे.  गेल्या दहा वर्षे हा कार्यक्रम नाशिककरांचे प्रबोधन करून प्रदूषण मुक्तीकडे झुकत आहे हे या उपक्रमाचे यश असल्याचेही ते म्हणाले. यंदाच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देव द्या, देवपण घ्या ! या उपक्रमांतर्गत गणेश मूर्ती संकलित करण्यासाठी सहभाग नोंदविणाऱ्या कार्यकर्त्यांना सुरक्षिततेसाठी विद्याथी कृती समितीच्या वतीने फेस शिल्ड, फेस मास्क, हातमोजे, सॅनिटायझर देण्यात येत आहे. या ‘फेस शिल्ड’चे प्रकाशन माजी मंत्री विनायकदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.   देव द्या, देवपण घ्या हा फक्त उपक्रम राहिला नसून गोदावरीच्या रक्षणासाठी ती एक प्रशंसनीय चळवळ* झाल्याचे देखील विनायकदादा पाटील यावेळी म्हणाले.या  फेस शिल्डवर देव द्या, देवपण घ्या ! उपक्रमाचे नाव व महिती ठळकपणे दिसून येते. यावेळी नाशिक जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ...

श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी खा.भारती पवार यांच्या उपस्थितीत घंटानाद आंदोलन

नाशिक| भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाविकास आघाडी  सरकारला जागे करून भाविकांसाठी देवस्थाने खुली करण्यासाठी  श्री क्षेत्र सप्तशृंगी निवासीनी भगवती गडाच्या पायथ्याशी घंटानाद आंदोलन  करण्यात आले. देशभरातील प्रमुख धार्मिक स्थळे, देवालये सुरू करण्याबाबत केंद्र सरकारने परीपत्रक काढले असताना देखील, सरकारच्या अजब  निर्णयाने राज्यातील देवालये सर्वांसाठी खुले झाले मात्र मंदिरे बंद ठेवून भाविकांची कुचंबणा केली तसेच तिर्थक्षेत्र परिसरातील बहुसंख्य लोकांची उपजीविका देवस्थानावर अवलंबून आहे. त्याअनुषंगाने सर्व नियम,मान्य करून देवस्थाने, भजन, किर्तन सुरू करावे हि सर्वांची एकमुखाने मागणी होती. म्हणून भाजपच्या प्रदेशच्यावतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. श्री क्षेत्र सप्तशृंगी गड येथे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खा.डॉ.भारती पवार, जिल्हा सरचिटणीस नंदकुमार खैरनार, मा.जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, तालुकाध्यक्ष दिपक खैरनार यांच्या नेतृत्वाखाली गडाच्या पायथ्याशी घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलन प्रसंगी सप्तशृंगी गड व परिसरातील मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली...

गणेशमूर्ती दान करा, गोदेचे प्रदूषण टाळा: आकाश पगार यांचे आवाहन

नाशिक| प्रतिनिधी| गोदावरीचे प्रदूषण रोखण्यास सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सवासाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींचे गोदावरीत विसर्जन न करता त्या दान कराव्यात, असे आवाहन विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष आकाश पगार यांनी केले आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती त्यावर केलेले रासायनिक रंगकाम व इतर सौंदर्यप्रसाधंनामुळे गोदावरीचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. गोदावरीचे प्रदूषण थांबविण्यासाठी ‘विद्यार्थी कृती समितीमार्फत गेल्या ९ वर्षापासून देव द्या, देवपण घ्या’ हा उपक्रम राबविला जात असून यंदाचे दहावे वर्ष आहे. गतवर्षी हजारो मूर्ती नाशिककरांनी देव द्या देवपण घ्या ! या उपक्रमातर्गत विद्यार्थी कृती समिती कडे सुपूर्द केल्या होत्या. समितीकडे आलेल्या गणेशमूर्ती मंगलमय व पवित्र वातावरणात नाशिक महानगरपालिकेच्या सहकार्याने कृत्रिम तलावात विधिवत विसर्जित केल्या जातात. यंदा चोपडा लॉन्स जवळील गोदापार्क येथे सकाळी ८ ते १ या वेळेत देव द्या देवपण घ्या उपक्रमाचे कार्यकर्ते मूर्ती स्विकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. अधिक माहितीसाठी ९४२१५६३५५५ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.   गणेशोत्सवातील...

फायनान्स कंपन्याकडून होणाऱ्या त्रासाविरूद्ध ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांचा रस्त्यावर उतरण्याचा सरकारला इशारा

नाशिक|  देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु अद्याप सुरु असल्यामुळे वाहतूक व्यवसाय पूर्ण क्षमतेने अद्यापही सुरु होऊ शकलेला नाही. अशातच फायनान्स कंपन्यांकडून मात्र कर्ज वसुलीच्या नावाखाली त्रास दिला जात असून यावर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अन्यता ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही असा इशारा नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र नाना फड, नाशिक गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष पी.एम.सैनी यांच्याकडून केंद्र राज्य सरकारला पाठविण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आला आहे. याबाबत नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन व नाशिक गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशन यांच्यावतीने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय अर्थ मंत्री श्रीमती निर्मला सितारामन, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री, तथा अर्थमंत्री अजित पवार,मंत्री,अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री छगन भुजबळ, परिवहन मंत्री अनिल परब यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, देशात आणि राज्यात कोरोनाचे संकट उभ असतांना  सगळीकडे लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे स...

किसान रेलला लासलगावला थांबा द्या : खा.डॉ. भारती पवार

नाशिक| लासलगाव ही आशिया खंडातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) असून येथे मोठ्या प्रमाणात कांदा, द्राक्षे, डाळिंब, भाजीपाला आदींचा व्यापार देशासह जगभरात केला जातो. त्यामुळे केंद्रासरकार मार्फत नुकतीच शेतकऱ्यांच्या शेतीमाल वाहतुकीसाठी जी किसान रेल्वे सुरू केली त्याचा थांबा लासलगाव येथे द्यावाअद्यावा अशी मागणी रेल्वे कडे केली आहे, त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) मधील शेतमाल  देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्यासाठी मदत होईल. दिंडोरी लोकसभा मतदार संघातील तसेच नाशिक जिल्ह्यातील असंख्य शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता किसान रेलला लासलगाव येथे थांबा देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असे अशी मागणी मध्य रेल्वेचे मंडळ व्यवस्थापक, भुसावळ यांना पत्राद्वारे केली आहे.

विनामास्क बैठकीस उपस्थित राहणाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी केला दंड

औरंगाबाद|कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मास्क परीधान न करणाऱ्यांना ५०० रुपये दंड लावून एक मास्क देण्याचा नुकताच आदेश काढला.  सदरच्या आदेशाचे पालन होत आहे का नाही यावर स्वत: जिल्हाधिकारी लक्ष ठेवुन आहेत. या आदेशाची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरुच आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी यांनी आज  जिल्हाधिकारी कार्यालयात रोहयो शाखेमार्फत आयोजित सामाजिक वनीकरण विभागाच्या बैठकीत विनामास्क उपस्थित असणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकारी एम. के. रहाटवळ, सोयगाव वनपरिक्षेत्र अधिकारी ए. पी. मिसाळ, कन्नड वनपरिक्षेत्र अधिकारी छाया बानखेले, वाहनचालक साईनाथ चंदनसे, या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना तसेच ज्ञानेश्वर त्रिभुवन या अभ्यागतास मास्क परीधान न केल्यामुळे प्रत्येकी 500 रुपये दंड आकारुन एक मास्क जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.

महाड दुर्घटना: आतापर्यंत १४ मृत्यू तर २६ लोक अद्याप ढिगाऱ्यात अडकल्याची भीती; बिल्डरसह दोषींवर गुन्हा दाखल

रायगड|अलिबाग| रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील काजळपुरा भागातील तारिक गार्डन ही पाच मजली इमारत पूर्णपणे ढासळून त्यात १४ जणांचा मृत्यू तर ७ जण जखमी झाले, २६ रहिवाशी अद्याप ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती आहे. बचावकार्य वेगाने करण्याचे निर्देश नगर विकास मंत्री ना एकनाथ शिंदे यांनी दिले. दरम्यान तारिक गार्डन इमारत दुर्घटने प्रकरणी बिल्डर आणि इतर दोषींवर गुन्हा दाखल झाला आहे. शासनाकडून मृतांच्या वारसांना ५ लाखाची मदत या दुर्घटनाग्रस्त ठिकाणी आज पहाटे उपस्थित राहून तेथे सुरू असलेल्या मदतकार्याची पाहणी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली तसेच संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत प्रशासकीय यंत्रणांना वेगाने मदतकार्य करण्याबाबत आवश्यक ते निर्देश दिले. यावेळी पालकमंत्री कु. आदिती तटकरे, आमदार भरत गोगावले, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, अपर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ व अन्य अधिकारी उपस्थित होते. तारिक गार्डन इमारतीच्या बिल्डर व इतर दोषींवर गुन्हा दाखल ; दुर्घटनाग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे :पालकमंत्री आदिती...

महाड येथे ५ मजली इमारत कोसळली; ८० लोक अडकल्याची भीती

अलिबाग| महाड शहर पोलीस ठाणे हद्दीत काजलपुरा भागात ५ मजली इमारत आज सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पत्त्यासारखी कोसळली आहे. या इमारतीत ४५ ते ४७ फ्लॅट होते. सुमारे ७० ते ८० रहिवाशी त्यामध्ये अडकल्याची शक्यता पोलिस सूत्रांनी व्यक्त केली आहे. तर १५ लोकांना जखमी अवस्थेत बाहेर काढले असून त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक प्रशासनासह नागरिकांचे बचावकार्य  सुरू आहे. फोटो क्रेडिट: डॉ. बिनू वर्गेश

नाशिकला आंतरराष्ट्रीय कुरिअर हबसाठी प्रयत्नशील: जीएसटी आयुक्त अविनाश थेटे  

नाशिक| केंद्र सरकारच्या सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेशन अँण्ड कस्टम विभागातर्फे नाशिकला राज्यातील दुसरे आंतरराष्ट्रीय कुरिअर हब बनविण्यास मान्यता दिली आहे. आंतरराष्ट्रीय कुरिअर हब लवकरात लवकर सुरु होण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन जीएसटी (कस्टम) आयुक्त अविनाश थेटे यांनी चेंबरच्या शिष्टंडळाला दिले. फोटो क्रेडिट:अविनाश पाठक महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रीकल्चरच्या नेत्तृत्वाखाली सर्व औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींनी नाशिकचे जीएसटी (कस्टम) आयुक्त श्री. अविनाश थेटे यांची भेट घेऊन आंतरराष्ट्रीय कुरिअर हब संदर्भात चर्चा केली व महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष श्री. संतोष मंडलेचा यांच्या हस्ते नाशिकचे जीएसटी (कस्टम) आयुक्त श्री. अविनाश थेटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देतांना जीएसटी (कस्टम) आयुक्त श्री. अविनाश थेटे यांनी आंतरराष्ट्रीय कुरिअर हब होण्यासाठी नाशिकला पोषक वातावरण आहे उद्योगाबरोबरच अग्रीकल्चर मालालाही जागतिक बाजारपेठेत स्थान मिळविणे आणि वेळेत माल पोचविणे शक्य होणार असल्याचे सांगितले. आंतरराष्ट्रीय कुरिअर हब लवकरात लवकर सुरु हो...

व्यापारी, उद्योजकांना प्रत्यक्ष मदतीची गरज : संतोष मंडलेचा

सरकारने जीवनावश्यक वस्तूंचा जीएसटीचा कर कमी केला. तसेच बांधकाम क्षेत्रातील काही सामग्रीवरील काही कमी केला. या सगळ्यांची अंमलबजावणी आज २४ ऑगस्ट २०२० पासून सुरु झाली. सरकारचे हे पाऊल स्वागतार्ह असून व्यापारी, उद्योजकांना प्रत्यक्ष मदत हवी आहे असं आवाहन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी केले आहे.     फोटो क्रेडिट: अविनाश पाठक जीएसटी दर कमी केल्यामुळे व्यापार उद्योग क्षेत्रातील उलाढाल लगेचच वाढेल असे सध्याचे वातावरण नाही. छोटे व्यापारी व्यावसायिक आणि एमएसएमइ क्षेत्रातील उद्योजक यांच्यासमोर सर्वाधिक महत्वाचा प्रश्न खेळत्या भांडवलाचा आहे. आतापर्यंत जी मदत जाहीर झालेली आहे ती सर्व कर्ज स्वरूपातील आहे. जुन्या कर्जावरील हप्ते फेडण्याची मुदत वाढवून मिळाली आहे. परंतु व्याज मात्र भरावेच लागणार आहे. काही बाबतीत हे व्याजावर व्याज होणार आहे. आपण परदेशातील कोरोना संकटावरील मदतीचा विचार केला तर असे लक्षात येते कि, सरकारने प्रत्यक्ष आर्थिक मदत केली आहे आणि त्यामुळे खेळत्या भांडवलाची बऱ्याचअंशी पुर्तता झाल्यामुळे उद्योजकांना उभारी घेता आली आहे. आपल्या देशामध...

नाशिक जिल्ह्यातील धरणांचे पाणी महाराष्ट्रालाच देणार: ना. भुजबळ

नाशिक| गेल्या काही काळात गोदावरी खोऱ्याचे पाणी गुजरातच्या प्रकल्पांना देण्याचे प्रस्ताव मांडण्यात आला होता. परंतु महाराष्ट्रातील अनेक भाग पाण्यापासून वंचित असल्याने महाराष्ट्रातील काही जिल्ह्याची तहान भागविणे आवश्यक आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्याचे पाणी महाराष्ट्राच्या बाहेर न जावू देता त्याचा फायदा महाराष्ट्राच्याच जमिनीला देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.  जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित कळमुस्ते प्रवाही वळण योजना, वैतरणा मुकणे वळण योजना उर्ध्व कडवा प्रकल्पांच्या आढावा बैठकित पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी आमदार हिरामण खोसकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अहमदनगरचे अधिक्षक अभियंता व प्रशासक अरुण नाईक, मध्यवर्ती संकल्प चित्र संघटना, नाशिकचे अधिक्षक अभियंता राजेश मोरे, कार्यकारी अभियंता आर. ए. शिंपी आदी उपस्थित होते.  पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले, प्रवाही वळण योजना कळमुस्ते ही योजना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कळमुस्ते शिवार...

“देव द्या, देवपण घ्या” या उपक्रमाद्वारे दिड दिवसाच्या गणेशमूर्तींचे संकलन

नाशिक|प्रतिनिधी| घरगुती गणेशोत्सवातील दिड दिवसाच्या गणपती मूर्तींचे आज (दि.२३) संकलन करून “देव द्या, देवपण घ्या” या उपक्रमास सुरुवात करण्यात आली आहे. गोदावरीचे प्रदूषण थांबविण्यासाठी विद्यार्थी कृती समितीच्या वतीने गेल्या ९ वर्षांपासून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमास कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समितीच्या स्वयंसेवकांनी मास्क लावत सोशल डिस्टींक्शनचे सर्व नियम पाळून सुरुवात केली असल्याची माहिती विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष आकाश पगार यांनी दिली आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती व त्यावर केलेले रासायनिक रंगकाम व इतर सौंदर्यप्रसाधंनामुळे गोदावरीचे मोठया प्रमाणावर प्रदूषण होते. हे प्रदूषण थांबविण्यासाठी विद्यार्थी कृती समितीच्या माध्यमातून गेल्या सलग ९ वर्षांपासून “देव द्या, देवपण घ्या” हा उपक्रम राबविण्यात येतो. यंदाचे या उपक्रमाचे दहावे वर्ष आहे. गतवर्षी हजारो गणेश मूर्ती नाशिककरांनी देव द्या देवपण घ्या या उपक्रमांतर्गत विद्यार्थी कृती समिती कडे सुपूर्द केल्या होत्या. समितीकडे आलेल्या गणेशमूर्ती मंगलमय व पवित्र वातावरणात नाशिक महानगरपालिकेच्या सहकार्याने कृत्रिम तलावात विधिवत ...

जनसुविधा योजनेतील निधी वेळेत खर्च करा: झेडपी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर

नाशिक| चालू आर्थिक वर्षातील जनसुविधा योजने अंतर्गत कामांवरील निधी वेळेत खर्च करा अशा सूचना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी केल्या आहे. फोटो: फाईल नाशिक  जिल्हा परिषदेने सन २०१९-२० या आर्थिक वर्षात मोठ्या प्रमाणात जनसुविधा योजने अंतर्गत कामे प्रस्तावित करुन जिल्हा नियोजन मंडळास सादर केलेली होती. ग्रामीण भागातील ग्राम स्तरावरील कामांची निकड, लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेऊन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या प्रमाणात जनसुविधेची कामे मंजुर करण्यात आली होती. सदर योजनेत मंजूर कामांमध्ये ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे, स्मशानभूमी बांधकाम करणे, दफनभूमी बांधकाम करणे, दशक्रिया विधी शेड बांधकाम करणे व तत्सम अनुषंगिक कामे आदी कामांचा समावेश असून यासाठी रुपये (२६,५७,७६,०००/-) सव्वीस कोटी सत्तावन्न लक्ष शहात्तर हजार रकमेची २५७ जनसुविधेची कामे मंजुर करण्यात आली होती.  नाशिक जिल्ह्यात मार्च २०२० पासुन आजतागायत कोविड - १९ च्या प्रादुर्भावामुळे ग्रामीण भागात विकास कामांवर मोठा परिणाम झालेला होता. ग्रामपंचायत स्तरावर विकास का...

पुरुषोत्तम कडलग: सामजिक जाणिवेचा युवानेता

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक तालुका तसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची मजबूत बांधणी असलेला भाग, राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख आदरणीय खा. शरद पवार, उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांच्या विचारांवर प्रेम करणारे अनेक लोक येथे आहेत, त्यात त्र्यंबकेश्वर येथील कडलग कुटुंबीयांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. भुजबळ समर्थक पुरुषोत्तम कडलग यांनी सामान्य कार्यकर्ता ते युवक जिल्हाध्यक्ष असा प्रवास स्वतःच्या हिंमतीवर केला आणि वरिष्ठांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरविला.  फोटो: पुरुषोत्तम कडलग, जिल्हाध्यक्ष रा.यु.का नाशिक समाजकारण आणि राजकारणाचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले. वडील माजी नगरसेवक मधुकर बापू कडलग आणि आई माजी नगरसेविका अंजना कडलग यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद नेहमीच पाठीशी होते. इ. १२ वीत विज्ञान विषय घेऊन पास झाल्यावर पुढे त्यांनी के.के.वाघ इंजिनियरिंग महाविद्यालयात मॅकेनिकल इंजिनियरींगचे शिक्षण घेतले, मात्र पुढील शिक्षणात त्यांचे मन करमेना, त्यांची ओढ सामजिक कार्यात अधिक होती. गरजूंच्या मदतीला धावून जाणे, येणाऱ्या प्रत्येकाच्या अ...

नाशिकच्या दत्तू भोकनळ यास अर्जुन पुरस्कार; पालकमंत्री ना.भुजबळांकडून अभिनंदन!

नाशिक|नाशिकचे सुपुत्र दत्तू भोकनळ यांना राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा प्रकारातील मानाचा असा 'अर्जुन पुरस्कार' आज घोषित झाला. त्याचे राज्य शासनाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. नाशिकचे दत्तू भोकनळ याचा अर्जुन पुरस्कारापर्यंतचा प्रवास अतिशय संघर्षमय असा आहे. मोलमजुरी करत शिक्षण घेतले. पुढे सैन्यात दाखल होऊन तिथे रोइंग शिकला आणि त्यानंतर ऑलिम्पिक असो, आशियाई क्रीडा स्पर्धा असो किंवा इतर आंतरदेशीय स्पर्धांमध्ये देशाचे नाव उंचावले आहे. रिओ ऑलम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व, आशियाई स्पर्धेतील सांघिक प्रकारात सुवर्ण असा त्याचा हा आलेख उंचावणारा आहे. यातून नवखेळाडूंना नक्कीच यातून प्रेरणा मिळेल. नाशिकच्याच नव्हे तर राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा यानिमित्ताने रोवला गेला आहे. असे राज्याचे अन्न,  नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री ना छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मनसेने निवेदन चिकटवले खुर्चीला; ग्रामसेवक नसल्याने कार्यकर्ते संतप्त

मधु ओझा पुणतांबा| महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते पुणतांबा ग्रामपंचायतीवर धडकले आणि रस्त्याच्या दुरुस्तीचे निवेदन देण्यासाठी आत गेले मात्र याठिकाणी ग्रामसेवक नसल्याने खुर्चीलाच निवेदन चिकटवून अभिनव आंदोलन करत संतप्त पदाधिकारी, कार्यकर्त्यानी तीव्र घोषणाबाजी केली. फोटो: मधु ओझा पुणतांबाच्या मुख्य रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहे, असे असतानाही सदर ग्रामसेवक व ग्रामपंचायततर्फे कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाही. तसेच पूरक पाणीपुरवठा योजनेच्या नावाखाली ही उडवाउडवीची उत्तरे देतात. गावात  खड्डे पडल्याने गावकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय, ग्रामपंचायत लोकांना वेठीस धरण्याचे काम ग्रामपंचायत करत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. सदर रस्त्याची दुरुस्ती लवकर झाली नाही तर आठ दिवसात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणतांबा ग्रामपंचायतला टाळे ठोकले शिवाय राहणार नाही असा इशारा निवेदनाव्दारे दिला आहे. यावेळी मनसेचे उपतालुका अध्यक्ष गणेश जाधव, शहराध्यक्ष संदीप  लाळे, उपशहराध्यक्ष संजय सोनवणे, शेतकरी मनसे पदाधिकारी वाल्मीक घोडेकर, शहर संघटक सनी टोरपे उपस्थित ...

गणेशोत्सव, मोहरम घरातच साधेपणाने साजरे करा: जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद|कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आणि प्रादुर्भाव वाढणार नाही यांची दक्षता घेत सर्वांनी शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करीत येणारा गणेशोत्सव आणि मोहरम सण सामाजिक भान राखत साधेपणाने घरातच साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे. फोटो: भास्कर निकाळजे आज जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) कार्यालयामार्फत आयोजित सार्वजनिक गणोशोत्सव व मोहरम मध्यवर्ती शांतता समितीची बैठक जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्येक्षतेखाली एम.जी.एम.महाविदयालयाच्या  रूख्मिनी सभागृहत पार पाडली. यावेळी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक  गणेश गावडे, उपविभागीय पोलीस अधिकारी (पैठण) गोरख भामरे, विभागातील  पोलीस अधिकारी, भगवान फॉर्मसी महाविदयालयाचे विभाग प्रमुख नानासाहेब धारवाले,  जिल्हा, तालुक्यातील गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष, सरपंच, ग्रामपंचयात, पंचायत समिती अध्यक्ष व सदस्य संबधित गावाचे पोलीस पाटील आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांच्या हस्ते कोरोना योध्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी श्री. चव्हाण म्...

पुणतांबा येथे मनसेतर्फे नागरिकांना मास्क वाटप

पुणतांबा| प्रतिनिध| राहता तालुक्यातील पुणतांबा  नवनिर्माण सेनेच्या मार्फत रोजनदारी करणाऱ्या नागरिकांना मोफत मास्कचे वाटप करण्यात आले. फोटो: मधु ओझा सालाबादप्रमाणे 74 वा स्वातंत्रदिवस हा कोरोनामुळे धुमधडाक्यात साजरा करण्यास मर्यादा आल्या असल्याने गावात फिजिकल डिस्टनिग राखत ध्वजारोहणचा कार्यक्रम संपन्न झाला.त्यात पुणतांबा येथील नवनिर्माण सेनेच्या राहाता तालुका उपाध्यक्ष गणेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणतांबा शहराध्यक्ष संदीप लाळे,संजय सोनवणे,कमलेश महंकाळे,आदित्य घोडेराव,याच्यासह कार्यकर्ते शासनाच्या सर्व नियमाचे पालन करत रोजनदारी निमित्त घराबाहेर पडणाऱ्या कुटुंबाला मास्कचे वाटप करण्यात आले. तसेच या नागरिकांना कोरोना बाबत काय खबरदरी घ्यावी,कामाच्या ठिकणी दोन व्यक्तीमध्ये सहा फुटाचे अंतर ठेवून काम करावे,वारंवार साबणाने हात स्वच्छ धुण्याची मार्गदर्शक सूचनापर मार्गदर्शन केले.शेवटी पुणतांबा महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर अध्यक्ष संदीप लाळे यांनी उपस्तित नागरिक,पदाधिकारी यांचे आभार मानले .

सोशल डिस्टन्सींग पाळून त्र्यंबकेश्वरला धार्मीक विधी सुरू करण्याचा निर्णय

त्र्यंबकेश्वर|  त्र्यंबकच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी गेल्या ४ महिन्यापासुन बंद असलेले धार्मीक विधी सुरू करण्याचा निर्णय त्र्यंबक-ईगतपुरीचे आ.हिरामण खोसकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. त्यासाठी कलम १४४ तसेच इतर नियम काटेकोर पद्धतीने पाळण्याच्या सूचना आ.खोसकर यांनी लोकप्रतिनिधी, मंदिर प्रशासन, महसूल आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीत केल्या आहे. कोवीड १९ प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्यापासून त्र्यंबकेश्वर मंदीरासह धार्मीक विधी कालसर्प शांती, नारायण नागबली आदी विधी बंद असल्यामुळे त्यावर अवलंबून असणारे अनेक व्यवसाय देखील बंद होते. त्यात प्रामुख्याने पुरोहित मंडळींकडे काम करणारे आदिवासी तसेच इतर कामगार, शहरातील कापड व्यापारी,फुल, भांडी, नागाची प्रतिमा विकणारे सोनार, लोजिंग व्यवसाय आणि इतर अनेक व्यावसायिकांवर बेरोजगारीची वेळ आली होती, त्याअनुषंगाने आ. हिरामण खोस्कर यांच्याध्यक्षतेखली एक पुरोहित, महसूल, पोलिस आदींची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात पुरोहित संघाची एक नियंत्रण समिती करुन सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम तंतोतंत पाळून एक नियमावली सादर करण्याच्या सूचना प्रांत अधिकारी तेज...

🌹🌳"जंगल - निसर्ग"🌳🌹

फोटो:जी पी खैरनार डोंगरावर पडे पावसाच्या सरी !  हिरवागार निसर्ग अंघोळ करी !! धो धो कोसळती श्रावण सरी ! धावत जाई खोल खोल दरी !! नद्यांचा निसर्ग वनात भारी ! जंगल भटकंती कराच खरी !! पाऊस धारा वाहे डोंगरावरी ! झिरपत जाई डोंगर कपारी !! झुळु झुळु वाहे नदी किनारी ! पशु पक्षांची तहान होई पुरी !! नद्यांचा निसर्ग वनात भारी ! जंगल भटकंती कराच खरी !! रानात असे जीव श्रुष्टी न्यारी ! जोमात वाढे पीक गहु बाजरी !! भरदार कणीस चवीस भारी ! हुरड्याचे कणीस असे ज्वारी !! नद्यांचा निसर्ग वनात भारी! जंगल भटकंती कराच खरी ! हिरवीगार शालू घेऊन उरी ! मखमली धरा अंगी पांघरी !! गुलाबी गारव्यात राम प्रहरी ! आनंदी दिसे पशु पक्षी सारी !! नद्यांचा निसर्ग वनात भारी ! जंगल भटकंती कराच खरी !! चिमणी पाखरे किलबिल करी ! सजीवांना सांगे उठा लवकरी !! सकाळ झाली पहा तर खरी ! सोनेरी छटा दिसे भूतलावरी !! नद्यांचा निसर्ग वनात भारी! जंगल भटकंती कराच खरी  कोकिळा कुहू कुहू गायन करी ! पक्षी घेई नभी आनंद भरारी !! झाडे झुडपे डोले डोंगरावरी ! पाऊस वारा झेलती अंगावरी !! नद्यांचा निसर्ग वनात भारी ! जंगल भटकंती कराच खरी !! वाघोबा साऱ्य...