Skip to main content

आपत्तीचा महापूर


नाशिकमध्ये गोदावरीला महापूर आला. त्यापाठोपाठ कृष्णाखोऱ्यात सांगली, कोल्हापूर आणी सातारा या जिल्ह्यांना पूराने वेढा दिला. सन 2005 च्या महापुरानंतर हा सर्वात मोठा महापूर ठरला. सुरुवातीला कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाणी सोडल्याने हा महापूर आल्याची अफवा पसरली होती, मात्र त्यानंतर जाणकारांच्या वस्तुस्थिती लक्षात आली. अचानक झालेल्या अतिवृष्टीचा तो फटका होता. आता हळूहळू पुराचे पानी ओसरत आहे, शासकीय आणी सामाजिक संस्थानी स्वतःला मदत कार्यात झोकून दिले आहे.मात्र वित्त व जीवितहानी मोठी आहे. त्यातून सावरणे आपत्तीग्रस्त जिल्ह्यांना कठीण आहे.10 जिल्ह्यात ओला दुष्काळ आहे तर 27 जिल्ह्यात कोरडा दुष्काळाचा सामना करावा लागत आहे असे विचित्र चित्र महाराष्ट्रात आहे.

 फोटो :उदय रांजणगावकर

नाशिक, इगतपुरी अतिवृष्टीमुळे महापूर

नाशिकला जुन्या जाणत्या लोकांच्या माहितीप्रमाणे सन 1972 ला सर्वात मोठा महापूर आल्याचे सांगण्यात येतं. 2008, 2016  नंतर आताचा ऑगस्ट 2019 चा महापूर हा त्यापेक्षा मोठा आहे. ऑगस्ट महिन्याच्या 9 दिवसातच विक्रमी पावसाची नोंद झाली. नाशिक 277 %, त्र्यंबक 243% आणी पेठ 157 % तर इगतपुरीत 237% इतका पाऊस झाला. अतिवृष्टीमुळेच गंगापूर आणी दारणा धरणातून हजारो क्यूसेक पाणी सोडल्याने गोदावरीला महापूर आला.1972 नंतर 2019 चा महापुरात गोदाकाठी असलेला पुरमापक दूतोंडया मारुती बुडाला आणी महापूर मापक नारोशंकर घंटेला पानी लागले. या महापुरामुळे सायखेडा, चांदोरी गावातील लोकांना वेळीच सुरक्षित स्थळी हलविले. जिल्हा प्रशासन, पोलीस, आपत्ती व्यावथापन विभाग सतर्क असल्याने जीवित हानी होणार नाही याची दक्षता घेण्यात आली. तरीही गोदातिरी असलेल्या बाजारपेठेत पानी शिरले. गंगापूर धरणात मोठया प्रमाणात गाळ असल्याने गोदाकाठीही गाळ साचला होता. गोदावरीतील वाळू उपसा झाल्याने सर्वत्र गाळाच साम्राज्य होतं. पूररेषेतील बांधकामांमुळे नदीचे पात्र अरुंद झाले आहे. त्याचा परिणाम दिसून येत आहे. नैसर्गीक आपत्तीसोबतच मानवी चुकाही महापुराला हातभार लावत आहे.

सांगली, कोल्हापुरातील महाप्रलय

कृष्णाकाठावर असलेल्या सांगली, कोल्हापूर आणी साताऱ्यात अतिवृष्टीमुळे आलेल्या  महापुरात जीवित आणी वित्तहानी झाली आहे.कृष्णानदीला आलेला पूर त्यातच वारणा आणी राधानगरी धरणातून पानी सोडल्याने हा परिसर जलमय झाला. 9 दिवासात सांगलीत 758 % तर कोल्हापुरात 480 टक्के पाऊस झाला. नैसर्गीक आपत्तीने ना प्रशासनाला व नागरिकांना सावरण्याची संधी दिली नाही. क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले लाखो लोकांचे संसार उघड्यावर आले पुराची पातळी वाढल्याने अन्न पाण्यावाचून हाल झाले मात्र त्यांना मदत पोहचवणे पुरामुळे अवघड झाले. आपत्ती व्यवस्थापन विभाग आणी प्रशासनाने हरिपूर गावातील लोकांना काढण्यासाठी प्रयत्न केलेत पण लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते,त्यातच ब्रम्हनाळ येथे बचावकार्य सुरू असतांना दुर्घटना घडली त्यात 17 जणांना आपले प्राण गमवावे लागले. 2005 मध्ये ही या ठिकाणी महापूर आला होता. त्यादृष्टीने आपत्तीपूर्वी व्यवस्थापन होणे गरजेचे होते पण त्यात आपण कमी पडल्याचे दिसले. आता आपत्तीग्रस्ताना उभे करण्यासाठी मदतीचे हात सरसावले आहे. अहोरात्र बचावकार्य करणारे भारतीय सैन्य आणी एनडीआरएफचे जवान यांच्या मदतीला सामाजिक संस्था पुढे होत खांद्याला खांदा लावून कामाला लागल्या आहे.वेळ राजकारण व त्रुटी काढण्याची नाही आपत्तीच्या महापुरात सर्वस्व गमावलेल्या आधार देण्याची आहे. ईद साद्या पद्धतीने साजरी करत मुस्लिम बांधवानी पूरग्रस्त नागरिकांना मदतीचा दिलेला हात संवेदनशीलतेची जाणीव करुन देणारा आहे.

दिगंबर मराठे, नाशिक


Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...