Skip to main content

फक्त लढ म्हणा!

भिंत खचली चुल विझली होते नव्हते गेले,
प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पानी थोडे ठेवले''

महापुरानंतर विदारक व काळजाला वेदना देणारी परिस्थिती आहे, त्याच्याशी साम्य दर्शवणाऱ्या
कुसुमाग्रज यांच्या 'फक्त लढ म्हणा'  या कवितेच्या पंक्ती मनात लागलीच तरळल्या. महापुराला आता आठोडा झालाय. पुराचे पानी अद्याप काही ठिकाणी ओसरले नसल्याने मदतकार्यात अडचणी येत आहेत.विशेष करुन पूराने वेढलेल्या ग्रामीण भागात पूरग्रस्तांची उपासमार तसेच रोगराईच्या संकटाला सामोरं जावं लागण्याची भिती आहे. प्रथम कोल्हापूर, सांगलीकरांसमोर रोगराई आटोक्यात ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आव्हान आहे.प्रशासनासह दानशूर व्यक्ती संघटना मदत करीत आहेत.

"संसार मोडून पडला तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवूणी फक्त लढ म्हणा!"
 महामार्गावरील पानी ओसरू लागल्याने हळूहळू कोल्हापूर शहर पूर्वपदावर येत आहे.दूध, इंधन, गॅस, दैनंदिन गरजेच्या वस्तू पोहचत आहेत.पुरात अनेकांचा संसार वाहून गेलाय त्यामुळे शिधा शिजवण्यासाठीची भांडी आणी धान्य भरडणाऱ्या गिरण्या सुस्थितीत असण्याची शक्यता नाही, त्यामुळे तयार अन्नाची पाकिटे पोहचते करावे लागतील. कोल्हापूर ,सांगलीतील लोक आणी सामाजिक संघटना त्यासाठी कामाला लागल्याय. महाराष्ट्रातील कानाकोप-यातून वैद्यकीय आणी इतर मदतीचा ओघ सुरू आहे. तो जेथे गरज आहे अशा पूररेषेतील ग्रामीण भागात पोहचते करण्याला प्राधान्य दयावे लागेल, संकटातून उभे राहण्यासाठीची धडपड पुरग्रस्त करीत आहेत, त्याच्या जिद्दीला दाद  द्यावी लागेल, तसेच त्यांचे मनोबल उंचावून पायावर उभं करण्यासाठी आपल्या सर्वाना त्यांचा आधार बनवा लागेल.


स्वच्छतेसाठी दोन्ही जिल्ह्यांना प्रत्येकी 1 कोटीची तरतूद;  औरंगाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय
महापुरानंतरचे गांभीर्य लक्षात घेऊन सांगलीचे जेष्ठ पत्रकार शिवराज काटकर आणी काही सामाजिक कार्यकर्त्यानी शिर्डी संस्थाने दिलेल्या 10 कोटी निधीतून काही रक्कम रोगराई पसरू नये यासाठी स्वच्छतेसाठी वापरावी याकरिता शिर्डी संस्थानकडे प्रयत्न चालविले होते ते यशस्वी झाले आहेत. औरंगाबाद खंडपीठाने 10 कोटी मुख्यमंत्री निधीला मंजूर करतानाच सांगली कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रत्येकी 1 कोटी स्वच्छतेसाठी खर्चाला देण्याचे आपले मागणे मान्य केले आहे, यामध्ये खर्चाबाबत आक्षेप घेणारे पिटिशनर यांनी ही चांगली भूमिका घेतली, ज्येष्ठ पत्रकार माधव ओझा यांनीही साथ दिल्याने. आता सांगली कोल्हापूर दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यावर आजच 1 कोटी जमा होतील. तो फक्त स्वच्छतेवर खर्च करायचा आहे आणि 10 आठवड्यात खर्चाचे अहवाल औरंगाबाद खण्डपीठाला द्यायचे आहेत. एका सकारात्मक कार्याला हाक दिली आणि साईबाबा पावले याचा खूप आनंद आहे. संस्थानचे पदाधिकारी, अधिकारी, न्यायालय आणि पिटिशनर संदीप कुलकर्णी, संजय काळे, माधव ओझा या सर्वांचे आम्ही सांगली, कोल्हापूरकर ऋणी आहोत असे काटकर यांनी सांगितले

दिगंबर मराठे, नाशिक


Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...