Skip to main content

पूरग्रस्तभावांसाठी बहीणींची धाव


महापूरामुळे कोल्हापुर आणि सांगली भागामध्ये जिवीत आणि वित्तहानी झालेली आहे. तेथील पूरग्रस्त बांधवांचा जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे. त्यांच्या वेदना समजून घेत पुराने दिलेल्या जखमांवर मायेची फुंकर घालता यावी म्हणून नाशिकमधील महिला भगिनीं ही सरसावल्या आहे. सांगली-कोल्हापूरकडे मदतीचा ओघ वाहत असतांना पूरग्रस्तांसाठी “झेप फाऊंडेशन”तर्फे रॅली काढून मदत जमा करण्यात आली. राखी पोर्णिमेच्या दिवशी  पुरग्रस्त बांधवांना ही मदत पोहचेल.
संवेदनशील 'झेप'

महापूरामुळे नाशिक गोदाकाठचे गावे सावरली पण कोल्हापुर आणि सांगली भागामध्ये मोठया प्रमाणावर नुकसान झाले असून तिथल्या लोकांना नव्याने संसार उभा करणं कठीण झालं आहे, मात्र त्यांची पुन्हा उभे राहण्याची जिद्द, धडपड बघून त्यांना खंबीर साथ देण्याची गरज आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी नव्यानेच स्थापन केलेल्या “ झेप फाऊंडेशन” या संस्थेतर्फे मदत जमा अभियान हाती घेत साथ देण्याचा निश्चय केला. काही महिला भगिनींना सोबत घेत घरोघरी जात पुरग्रस्त बांधवांसाठी मदत मागितली, नागरिकांनी या कार्याला उस्फूर्त प्रतिसाद दिला. ‘झेप फाऊंडेशनच्या’ वतीने धान्य, तेल, कपडे, चटाई-ब्लॅकेट, पाणी बॉटल, औषध, बिस्कीट, स्नॅक्स, पापड,सॅनेटरी पॅड, साबण, मेणबत्ती आदि मदतीच्या वस्तुंची पॅकिंग करण्यात आली. संस्थेच्या अध्यक्षा प्रेरणा बलकवडे व विशाल बलकवडे स्वत: सांगली ग्रामीण गावांना जाऊन ही सर्व मदत गरजू कुटुंबाना राखी पोर्णीमेच्या दिवशी सुपुर्द करणार आहेत.

मदतीसाठी सरसावलेले हात

तसेच भगूरचे नागरिक, नाशिक फोरम, अग्रवाल महिला मंडळ, रा. काँग्रेस देवळाली कॅम्प, विरा फुड्स, ॲक्वा शुअर वॉटर, सिमला नमकीन प्रा. ली. ज्योती वाघचौरे, अक्षय शेळके, कैलास भोर, संतोष सोनवणे, सायरा शेख, विशाल नागरे, गायत्री झांजरे, श्रीकांत सोनवणे, साईनाथ पंडोरे, रिझवान शेख, साहिल मोरे यांचे विशेष सहकार्य लाभले.



Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...