Skip to main content

इडी आणी 'राज'कारण

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीला दोन महिन्यांचा कालावधी आहे. निवडणुकीच्या तोंडावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांना अंमलबजावणी संचालनालयाने दादर येथील कोहिनूर मिल म्हणजे आताचे कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी नोटीस पाठवली आहे. चौकशीसाठी राज यांना 22  ऑगस्ट रोजी हजर राहण्याचे आदेश आहेत.
Image source -google|image by wikipedia
                                             
त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कोहिनूर मिल राज ठाकरे, राजेंद्र शिरोडकर आणी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेष जोशी यांनी खरेदी केली. यात इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग फायनान्शीयल सर्विसेस लि. या कंपनीने देखील मोठी गुंतवणूक केली होती,  त्यामध्ये  कंपनीला तोटा सहन करावा लागल्याने कंपनीने काढता पाय घेतला. त्यापाठोपाठ राज यानी ही आपली हिस्सेदारी विकल्याचे सांगितले जाते. त्यामुळे कोहिनूर मिलमध्ये जे व्यवहार झाले ते व्यवहार ईडीला तपासायचे असल्याचे बोललं जाते. ईडी ही केंद्रिय स्तरावरील आर्थिक घोटाळे आणी व्यवहार तपासायचे काम  करते. ही संस्था केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांचा आहे. असेच आरोप काँग्रेस सत्तेवर असतांना ही झालेत. 
Image sourse- google|image by wikipedia
                                      

ईडीच्या टाइमिंगवर प्रश्नं?

केंद्रात सन 2004 आणी 2014 ला भाजपा सरकार होते, त्यावेळी का कारवाई केली नाही असा सवाल ही विरोधीपक्ष आणि राज समर्थकांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीत नोटबंदी, जीएसटी,  प्रत्येकी 15 लाख देण्याच्या घोषणांचा समाचार घेतांना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणी अमित शहा यांच्यावर राज यांनी चौफेर टिका केली होती, ईव्हीएमच्या मुद्यावर विरोधकांना एकत्र करण्याचे काम करत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची ही त्यांनी भेट घेतली होती. ईव्हीएम प्रश्नी सातत्याने भूमिका ते घेत असून रस्त्यावर उतरुन आंदोलन केल्यानेच नोटीस पाठवली असून याद राखा चौकशी कोहिनूर मिलची नसून कोहिनूर हि-याची करताय अशा आशयाचे पोस्टर ही कार्यकर्त्यांनी सोशल मिडियावर झळकवायला सुरुवात केलीय. लोकसभा निवडणुकीच्या काळात तृणमूल काँग्रेस आणी भाजपा यांच्यात देखील वादंग झाला होता

                                                      सोशल माध्यमातील वायरल पोस्ट

                                                                    फोटो- व्हाट्सअप 

भाजप-मनसे कलगीतुरा रंगणार

आगामी निवडणुकीत मनसे आणी भाजपा यांच्यातच कलंगीतुरा रंगण्याची चिन्हे दिसताय. त्याचा हा ट्रेलर तर नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे,सद्या भाजप सावध भूमिका घेत आहे. मात्र मनसे कार्यकर्ते सोशल माध्यमात आक्रमक भूमिका मांडत आहे. राज ठाकरे यांनी मात्र  22 तारखेला ईडी कार्यालयाबाहेर गर्दी न करता शांतता राखण्याचे आवाहन केले आहे .

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...