Skip to main content

कोरोना संकट आणि कायदा दोन्ही झाले डोईजड

दिवसरात्र एकच धास्ती! कोरोना ,कोरोना आणि कोरोना...अशा स्थितीत समाज मनाची स्थिती कशी असेल किंवा समाजाची क्रियाशीलता संपते की काय असे अनेक प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात. या महामारीला सामोरे जाण्यासाठी केंद्र सरकारने संसर्गरोग प्रतिबंध कायदा,आपत्ती व्यवस्थापन कायदा देशभर लागू केला आहे. यासोबतच नागरी प्रतिबंधासाठी स्थनिक जिल्हा प्रशासनांकडून ही आठ दहा अन्य कायद्यानुसार आपले अधिकार वापरले जात आहे, हा प्रकार म्हणजे रोगा पेक्षा इलाज भयंकर अशी अवस्था होऊन बसली आहे. देशाची व नागरिकांसाठीचे विशेषतः इंग्रजांच्या जाचक व त्याहून आपले नागरी अधिकार शून्य करणारे कायदे हे समाज हिताचे नसताना ते वापरले जात आहेत, हे दुर्दैव आहे.
Covid-19-corona-virus
फोटो:फाईल
या संकटात एवढे सर्व कायदे वापरुनही प्रशासकीय भोंगळ कारभार कुठेही रोखता आला नाही. याच आत्मपरिक्षण हे सर्व कायदे वापरत असलेल्या राजकिय, प्रशासकीय यंत्रणेने जरुर करावेत.या दरम्यान ६३ दिवसात अनेक गोष्टी समोर आल्या पण अगदी आणीबाणीचे कायदे हे समाजाला शिस्त लावण्यासाठी आहे की धमकवण्यासाठी? हे उमजू शकले नाही. त्यावर चर्चा ही होतांना दिसली नाही. प्रवासी मजुरांच्या विषयावर तर सरकार चांगलचं तोंडघशी पडलं. त्यामुळे  सुुुुरुवातीला जो आविर्भाव दिसत होता तो कमी झाला. आणखी एक उदाहरण समोर आले ते म्हणजे संस्थात्मक विलगीकरण हा प्रकार जणू त्या नागरिकाने मोठा गुन्हा केल्यागत आपण  त्याच्याकडे पाहतोय, त्याला शिक्षा दिलीच पाहिजे असा आविर्भाव ही समाजात बघायला मिळतो, मात्र या संदर्भात हळूहळू जनजागृती आणि आवाज उठवल्याने देशभरातील स्थानिक जिल्हा प्रशासने भानावर आली. आता सार्वत्रिक टीकेची झोड उठल्याने जिल्हा प्रशासनं आपली जबाबदारी गावकारभाऱ्यांकडे सोपवत मान सोडवून घेत आहे.

आता या विलगिकरणातील विस्कळीतपणाच उदाहरण द्यायच झाल तर अनेक गावात हा पोरखेळ दिसून आला. गावात काही ठिकाणी १४ दिवस तर काही ठिकाणी १० दिवस ठेवले जात आहे. त्या लोकांची गावातील पोहच कशी आहे यावर हे विलगीकरण अवलंबलेलं आहे. विशेष म्हणजे या संस्थात्मक विलगीकरण केंद्रात सर्व समदुखी असल्याचे जाणवलं. तसेच सर्वाना आपल्या घरुन जेवण घेऊन येणे सर्वानाच शक्य आहे का? लक्षण आढळल्याशिवाय कुणाचीही चाचणी करायची नाही,दुसरे ज्याना आपल्या घरात अलग रहण्याची सोय नाही.असा नागरिकांना संस्थात्मक विलगीकरण केन्द्रात ठेवणे सोयीचे आणि किती गरजेचे आहे?ज्यांच्याकडे सोय सुविधा आहे.त्याना याठिकाणी ठेवून काय साधले जात असे अनंत प्रश्न आहेच,कारण दिवसभरात किमान दोन वेळा या व्यक्तीशी परिवारातील सदस्याचा संपर्क येतच आहे. तेव्हा त्यांना संसर्ग होणे शक्य नाही हे समजने चुकीचे आहे. त्यामुळेच स्थानिक जिल्हा प्रशासनाने याबाबत निश्चीत व योग्य ते निर्णय घेणे गरजेचे आहे.

माधव ओझा, ज्येष्ठ पत्रकार शिर्डी

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...