Skip to main content

प्रेसनोट हातात पडली अन् त्यात माझ्याशीच साम्य असलेल्या व्यक्तीचे वर्णन वाचले..!

औरंगाबाद- मनपाच्या ताप केंद्रातील अनास्था, सह रुग्णांचे हाल, मिनी घाटीत कर्मचाऱ्यांनी घेतलेली काळजी व काही राजकीय पुढाऱ्यांनी दाखविलेला बालीशपणा असे संमिश्र अनुभव घेतले. घाबरुन जाऊ नका, धैर्यानेच कोरोनाला हरविणे सहज शक्य आहे, कोरोनाचा पराभव करुन सुखरुप घरी परतलेले पत्रकार तुषार वखरे सांगत होते.
Covid-19-corona-virus
फोटो: फाईल
ते म्हणाले, आरोग्य विषयक वार्तांकन करीत असल्याने शहरात पहिला रुग्ण आढळला, तेव्हापासून दररोज घाटी व मिनीघाटी रुग्णालयात जात होतो. मागील महिन्यात आईला काही लक्षणे जाणवू लागली. फॅमिली डॉक्टरांकडे उपचार घेऊन फरक पडला नाही. मलाही शंका होती, पण पत्रकारितेतील जबाबदारीही होती. वडील आईसोबत महापालिकेच्या सिडको कम्युनिटी सेंटरमध्ये गेले. तिथला अनुभव खूपच वाईट होता, असे वडिलांनी सांगितले.

दुसऱ्या दिवशी डॉ. हेडगेवार हॉस्पिटलमागील मनपा शाळेतील केंद्रात गेलो. त्यांनी शंका व्यक्त केली. लगेच मी स्वब दिले. दुसऱ्या दिवशी प्रेसनोटमध्ये माझ्याच परिसरात, माझ्याच वयाचा रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे दिसले. नावे नसल्याने फोन करुन खात्री केली. तो मीच असल्याचे कळले. आईचाही अहवाल पॉझिटिव्ह होता. लगेच मिनी घाटीत ऍडमिट झालो.

परिचारिका, सफाई कामगार, जेवण देणारे कर्मचारी यांचा खूप चांगला अनुभव आला. डॉक्टर दोन-तीन दिवसांतून एकदा येत. मी पत्रकार असल्याचे कळल्याने आमची अधिक काळजी घेण्यात आली. इतर रुग्ण त्यांच्या व्यथा सांगत होते. मधुमेह असलेल्यांना भात देणे, दुर्लक्ष असे प्रकार व्यथित करीत होते. एकाने तिथल्या दुरावस्थेचा व्हिडिओ दाखवला. मी रुग्णालयातूनच तो व्हायरल केला. मग रुग्णांची अधिक काळजी घेतली जाऊ लागली.

मी पॉझिटिव्ह असल्याचे कळल्यावर परिसरातील काही राजकीय नेत्यांनी दिलासा, धीर देण्याऐवजी अफवा पसरवून नागरिकांत संभ्रम व भीती पसरवली. रुग्णालयात मला विचारणा झाली. मी माझ्या संपर्कात आलेल्यांची नावे सांगितली. त्यांचा शोध सुरू झाला. त्यातील अनेकांनी मलाच उलट विचारले, की आमची नावे का सांगितली? मी काही मित्रांना बोलून तपासणी करण्याचे सुचवले. त्यात तीन पॉझिटिव्ह आढळले. त्यांच्या संपर्कातील काही, असे अनेक रुग्ण समोर आले. आमच्या भागातील आकडा वाढला. वेळीच तपासणी झाल्याने त्यातील बहुतेक जण बरे झाले. अशा परिस्थितीत राजकीय नेत्यांनी भान ठेवून वागावे, एवढीच अपेक्षा आहे. तुषार यांची ही भावना औरंगाबादकर, प्रशासन व राजकीय नेत्यांनी धडा घ्यावा, अशीच आहे.

तुषार वखरे, पत्रकार औरंगाबाद

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...