Skip to main content

जिल्हा परिषदेच्या सभापती अश्विनी आहेर आणि वास्तुविशारद गौरव आज लग्नाच्या बेडीत अडकले; विवाह सोहळ्यात मान्यवर आणि आप्तेष्टांचा फेसबुक लाईव्हद्वारे सहभाग

नाशिक/ प्रतिनिधी: जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते मा. आ. अनिल आहेर यांची कन्या जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती अश्विनी आहेर आणि वास्तुविशारद गौरव यांचा विवाह सोहळा आज फेसबुक लाईव्हव्दारे पार पडला. अनोख्या पद्धतीने पार पडलेल्या सोहळ्यात नवदाम्पत्याला मान्यवर आणि आप्तेष्टांनी फेसबुकवर ऑनलाईन उपस्थिती दर्शवून आशिर्वाद आणि शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याने समाजापुढे एक नवा आदर्श घालून दिला.
Covid-19-corona-virus
फोटो: उदय रांजणगावकर
कोरोना महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे. त्यामुळे गर्दी होईल अशा कुठल्याच कार्यक्रमाला परवानगी नाही. लग्न कार्यात गर्दी होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. त्यामुळे  मोजकेच नातेवाईक, हितचिंतकांच्या उपस्थित लग्न सोहळे पार पडत आहे. असाच एक लग्न सोहळा ज्याने आदर्श उदाहरण सर्वांसमोर ठेवले. माजी आ. अनिल आहेर यांची कन्या चि.सौ.का.अश्विनी(सभापती-महिला व बालकल्याण विभाग जि.प.नाशिक,सदस्य-नाशिक जिल्हा नियोजन समिती (M.Arch) आणि चि.गौरव(M.Arch) यांचा विवाह सोहळा आज २४ मे २०२० रविवार रोजी फेसबुक लाईव्ह याच्या माध्यमातून संपन्न झाला.

मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात सोशल डीस्टन्स नियमांचे पालन करण्यात आले. तसेच  मास्क घालून वऱ्हाडी सहभागी झाले. उर्वरित मान्यवरांनी फेसबुक_लाईव्हद्वारे सहभागी होऊन नवदाम्पत्याला ऑनलाईन शुभेच्छा दिल्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ऑनलाईन उपस्थिती दर्शवून अश्विनी आणि गौरव यांना आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या.ऑनलाईन सहभागी झालेल्या सर्वांचे याप्रसंगी समस्त आहेर परिवार(नायडोंगर) यांनी आभार मानले. आणि समाजात जनजागृती व्हावी आणि एक आदर्श निर्माण  व्हावा यासाठी नवा पायंडा घालून दिला.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...