Skip to main content

खा. सुप्रिया सुळे यांचा एक फोन अन् रशियात अडकलेले नाशिकचे ५ विद्यार्थी सुखरूप परतले!

नाशिक|प्रतिनिधी| रशियात कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन झाल्याने  वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेले नाशिकचे पाच विद्यार्थी अडकून पडले होते, त्यांना भारतात येण्यासाठी तिकीट उपलब्ध होत नसल्याने ते चिंतीत होते. राष्ट्रवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांना नाशिकचे रोहित अहिरे यांनी विद्यार्थ्यांची आपबिती  सांगितली, त्यांनी भारतीय दूतावास आणि परराष्ट्रमंत्र्यांशी लगेच संपर्क साधला आणि त्यांच्या शिष्टाईमुळे अडकलेले विद्यार्थी सुखरुप मायदेशी परतले.
Nashik-medical-student
नाशिकचे विद्यार्थी सुखरुप मायदेशी
भारतातून वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी रशियात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जातात. महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. नाशिकचे देखील पाच विद्यार्थी रशियातील ओश स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीत शिक्षण घेत आहेत. अथर्व अनिल ततार (सटाणा ता. बागलाण), किर्ती चंद्रकांत रेनगाडे (उपेंद्रनगर, नाशिक),  उन्नती योगेश माधरेले (जुने नाशिक), श्रेयश रसाळ आणि विश्वनाथ सपनार अशी विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे विद्यार्थी लाॅकडाऊनमुळे रशियात अडकले होते, भारतात येण्यासाठी वंदे भारत मिशन अंतर्गत जी विमानसेवा सुरू होती,  ती विद्यार्थ्याना मायदेशी परत आणण्यासाठी पुरेशी नव्हती, या विद्यार्थ्यांना विमानाचे तिकीट उपलब्ध होत नव्हते त्यामुळे ते सर्वजण चिंतेत होते. अडचण सांगावी तरी कोणाला आणि कोण परदेशात मदत करेल अशा विवंचनेत होते. 
Nashik-medical-student
मात्र बागलाण तालुक्यातील विद्यार्थी अथर्व ततार यांना नाशिक जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष रोहित अहिरे यांची आठवण झाली, मग व्हाॅट्स अॅप काॅलद्वारे त्यांना आपबिती कळवली आणि ते देवदुतासारखे मदतीला सरसावल्याने विद्यार्थ्यांच्या जीवातजीव आला, त्यांनी तातडीने सगळी घटना समजून घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या संसदरत्न खा. सुप्रियाताई सुळे यांच्याशी फोनवर सविस्तर चर्चा केली आणि यातून काय उपाययोजना करता येईल ते ठरवले. 

त्याप्रमाणे सुप्रियाताई यांनी ट्वीटर तसेच फोनद्वारे भारतीय दूतावास आणि परराष्टमंत्री डॉ. एस जयशंकर आणि हरदिप कौर या अधिकाऱ्यांशी संपर्क केला आणि त्यांना भारतात आणण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले. त्याप्रमाणे अखेरीस सर्व गोष्टी लक्षात घेऊन बिषकेक, किर्गिस्तान (रशिया) येथे अडकलेल्या या सर्व पाच विद्यार्थींना भारतात येण्यासाठी तिकीट उपलब्ध करुन देण्यात आले. खा. सुळे आणि अहिरे यांनी केलेल्या मदतीसाठी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी आभार मानले तसेच या मदतकार्यासाठी प्रयत्न करणारे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष रोहित अहिरे यांचे ही सर्वत्र कौतुक होत आहे.



Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...