Skip to main content

नाशकात पुन्हा लॉकडाऊन; सायंकाळी सात ते पहाटे पाच कडक निर्बंध

नाशिक|शहरातील वाढती करोनाबाधित रूग्णांची संख्या लक्षात घेता उद्यापासून सायंकाळी ७ ते पहाटे ५ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घोषित केले. नाशिक शहरातील वाढती रुग्ण संख्या व विशेषत: तरुणांचे वाढते मृत्यू या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्त यांच्याशी झालेल्या सविस्तर चर्चेनंतर ते बोलत होते.
Nasik-lockdown
कोरोनाचा संसर्ग नाशिक शहरात वाढू लागल्यानंतर सुरूवातीच्या काळात प्रमाण ठराविक ठिकाणी होते तसेच वयस्कर वयोगटांमध्ये होते. परंतु आता या संसर्गाचा फैलाव सर्वदूर होत चाललेला असल्याने व मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांमध्ये तरुणांचे प्रमाण वाढत चाललेले असल्याने अनावश्यक फिरणाऱ्या व्यक्तींवर निर्बंध आणणे गरजेचे झाले आहे अशी बाब, या संदर्भातील सर्व सांखिकी माहिती घेतल्यानंतर समोर आली असे ना. भुजबळ यांनी सांगितले.

गेल्या आठवड्यात झालेल्या व्यापारी संघटनेच्या बैठकीत देखील व्यवसायिकांनी स्वयंस्फूर्तीने सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत दुकाने उघडी ठेवण्यात येतील व इतर वेळी बंद ठेवण्यात येतील असा पर्याय मांडला होता व त्याचे स्वागत श्री. भुजबळ यांनी केले होते. त्यामुळे ५ वाजेनंतर आपोआपच गर्दी कमी होण्यास मदत होत आहे. तरीदेखील करोनाचा वाढता धोका लक्षात घेता आपल्याला खबरदारी घ्यावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर उद्यापासून शहरात सायंकाळी ७ ते पहाटे ५ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यामधून जीवनावश्यक बाबींशी संबंधित व्यक्ती तसेच रात्रपाळी वरील औद्योगिक अस्थापना मधील कामगार यांना वगळण्यात आले असल्याचे देखील त्यांनी सांगितले. परंतु अशा व्यक्तीने आपले ओळखपत्र तसेच कामाची निकड पोलीस अधिकाऱ्यांना समजावून देणे गरजेचे राहील व कोणी गैरफायदा घेत असल्याचे आढळून आल्यास त्याचे विरुद्ध कठोर पोलीस कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुरेश जगदाळे, पोलीस उपायुक्त अशोक तांबे, पोलीस सहायक आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...