Skip to main content

गलवान व्हॅली सीमेवर मालेगावच्या भूमिपुत्राला वीरमरण

मुंबई|मालेगाव| भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात कर्तव्य बजावत असतांना नाशिकच्या भूमिपुत्रास वीरमरण प्राप्त झाले. सचिन मोरे असे शहीद जवानाचे नाव असून तो मूळचा मालेगाव साकुरी झाप येथील आहे. 
Shahid-javan-sachin-more
अगदी सामान्य परिस्थिती असलेलं त्याचं कुटुंब मालेगाव साकुरे येथे राहतं, वडील,आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा आणि दोन भाऊ असा परिवार आहे. सुरुवातीपासूनच त्याला देशसेवेची आवड होती,त्यामुळे सचिन याने देशसेवेचे व्रत अखेरपर्यंत जोपासले, त्याच्या देशाप्रती सेवाभावीवृत्तीचा घरच्यांसह गावकऱ्यांना ही मोठा अभिमान वाटे. गलवान खोऱ्यात पुलाचे काम सुरू आहे. यादरम्यान चीनने रोखून धरलेलं नदीचं पाणी अचानक सोडल्याने याठिकाणी  पाण्यात अडकून पडलेल्या सैनिकांच्या मदतीला तो पाण्यात उतरला होता. मात्र त्यात त्याला  वीरगती प्राप्त झाली, हे वृत गावी पसरताच गावावर शोककळा पसरली. देशसेवेचं कर्तव्य बजावणारा शहीद जवान सचिन विक्रम मोरे यांच्या हौतात्माबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

महाराष्ट्राच्या मालेगाव तालुक्यातील साकुरी येथील भारतीय लष्कराचे जवान सचिन विक्रम मोरे यांना भारत-चीनच्या सीमेवर देशासाठी कर्तव्य बजावीत असताना वीरमरण प्राप्त झाल्याचे समजून अतिशय दु:ख झाले. हुतात्मा सचिन विक्रम मोरे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो तसेच त्यांच्या कुटुंबियांना आपल्या शोकसंवेदना कळवितो, असे राज्यपालांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे. 

नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांनी ही श्रद्धांजली वाहिली. देशाच्या सीमेवर आपले कर्तव्य बजावत असतांना नाशिक जिल्ह्यातील मालेगावचे सुपुत्र सचिन मोरे यांना वीरमरण प्राप्त झाल्याचे दुःखद वृत्त समजले, मी सचिन मोरे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. मी व माझे कुटुंबीय मोरे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून शहीद मोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.


Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...