Skip to main content

केंद्राकडून दागिन्यावरील हॉलमार्कच्या मुदतीत वाढ: कॅट आणि एआयजेजीएफ'तर्फे निर्णयाचे स्वागत!

नाशिक| केंद्र सरकारने ज्वेलर्ससाठी दागिन्यांवर हॉलमार्क करणे अनिवार्य केले आहे,  त्यामुळे हॉलमार्क करण्यासाठी कॅट तर्फे मुदतवाढ देण्याची विनंती करण्यात आली, त्याप्रमाणे केंद्राने अंतिम तारीख सप्टेंबर ते जून २०२१ पर्यंत वाढविली आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स आणि देशातील ज्वेलरी व्यापारयांची सर्वात मोठी संस्था, ऑल इंडिया ज्वेलर्स अँड गोल्डस्मिथ फेडरेशन यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. हा देशाच्या ज्वेलर्स व्यापाऱ्यांसाठी एक मोठा दिलासा आहे.
Jewelery-hollmark
फोटो:फाईल
CAIT & AIJGF संघटनानी काही दिवसांपूर्वी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि ग्राहक व्यवहार मंत्री  रामविलास पासवान यांना निवेदन पाठविले होते. कोरोनामुळे चालू वर्षात बंद पडलेल्या व्यापाराचे कारण सांगून हॉलमार्कसाठी आवश्यक असलेली मुदत वाढवावी अशी मागणी केली. कॅटचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी स्वत: केंद्रियमंत्री गोयल यांच्याकडे हा मुद्दा उपस्थित केला आणि त्यांच्या हस्तक्षेपाची विनंती केली जी मान्य करण्यात आली आणि निर्णय घेण्यात आला.

देशभरात ३ लाखाहून अधिक दागिने व्यापारी आहेत, त्यापैकी सुमारे ३० हजार बड्या व्यापाऱ्याकडे केवळ हॉलमार्कची सुविधा आहे. याविषयी आयएनजेजेएफचे राष्ट्रीय संयोजक पंकज अरोरा म्हणाले की, सरकारच्या या निर्णयामुळे देशभरातील सुमारे २.७५ लाख लहान ज्वेलर्स व्यापाऱ्याना, परंतु त्यांच्याशी संबंधित सुमारे २.७५ लाख लहान ज्वेलर्स  व्यापार्यांना ,आणि त्याच कारागीर ना पण  मोठा दिलासा मिळणार आहे
  
आधीच करोना व तसेच सोने चांदी भाव वाढमुळे होणाऱ्या अस्तिर परिस्थितीत कॅट आणि 'एआयजेजीएफ'ही संस्था व्यापारी हितासाठी कायम अग्रस्थानी असून पुढाकार घेते व कार्य तडीस नेत आहे. त्याबरोबर Cait -Aijgf तर्फ़े १० हजार राखी भारतीय सेनेसाठी  बनविण्यात आल्या असून श्री.राजनाथ सिंह यांच्या कडे सुपूर्त केल्याय, असे 'एआयजेजीएफ'चे संस्थापक सदस्य, महाराष्ट्र माध्यम प्रमुख, नाशिक सराफ असोसिएशनचे उपाध्यक्ष मेहुल थोरात यांनी सांगितले आहे.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...