Skip to main content

सरकारवाडा आणि विनयनगर पोलिस चौकीचे पोलिस आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन

नाशिक| सरकारवाडा पोलीस स्टेशन अंकित नुतनीकरण केलेल्या सराफ बाजार पोलिस चौकीचा उद्घाटन सोहळा पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांच्या हस्ते आज सोशल अंतर पाळून पार पडला. 
Police-outpost-inogration
 फोटो: नाशिक प्रेस ग्रुप
यावेळी परिमंडळ 1 पोलीस उपायुक्त अमोल तांबे, परिमंडळ 2 पोलिस उपायुक्त विजय खरात,  मुख्यालयाच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त मंगलसिंंग सुर्यवंशी, पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी, पोलीस निरीक्षक साजन सोनवणे,भद्रकाली पोलीस ठाणे, पोनि इनामदार साहेब ट्राफिक युनिट 2 इतर अधिकारी व कर्मचारी तसेच पुरातत्त्व विभागाचे उपसंचालक सौ आरती आळे या ठिकाणी उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते.
तसेच सराफ बाजार असोसिएशनचे अध्यक्ष चेतन राजापूरकर, नगरसेविका वैशाली भोसले, किराणा मर्चंट असोसिएशन'चे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, शिल्पकार प्रसन्ना तांबट, श्याम तांबोळी, सचिन साकुरकर, कृष्णा नागरे, पवन महालकर आदी शुभेच्छा देण्याकरता हजर होते. 
यावेळी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी चौकीचे अधिकारी सहा पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी, पोलीस उपनिरीक्षक धर्मेंद्र पवार आणि कर्मचारी यांना शुभेच्छा देऊन जनतेची सेवा करण्याबाबत मार्गदर्शन केले.


विनयनगर येथे पोलीस चौकीचे उदघाटन

मुबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दतील विनयनगर पोलीस चौकीचे उदघाटन पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांच्या हस्ते मंगळवारी (दि २८)  करण्यात आले.
यावेळी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले, उपायुक्त अमोल तांबे उपायुक्त विजय खरात, सहायक आयुक्त मगलसींग सूर्यवंशी, मुबई नाका पोस्टेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, भद्रकाली पोस्टेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे, नगरसेविका दीपाली कुलकर्णी, माजी नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या उपस्थित उदघाटन करण्यात आले.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...