Skip to main content

सिन्नर नगरपालिकेकडून वाहतूकदारांची बेकायदेशीर लूट:नाशिक ट्रान्सपोर्ट आणि गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा आरोप

नाशिक|सिन्नर शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. या काळात अत्यावश्यक सेवा बाजवणाऱ्या वाहतुकदारांची मात्र बेकायदेशीर लूट केली जात असून सदर लूट थांबाबवी तसेच लॉकडाऊन मधून अत्यावश्यकत सेवेत काम करत असलेल्या वाहतूक क्षेत्राला वगळण्यात यावे अशी मागणी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, नाशिक गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष पी. एम सैनी व सिन्नर नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष सुनील ढाने यांनी केलेली आहे.
Nsk-goods-and-transport
फोटो: फाईल
नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन व गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता सिन्नर शहरात लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. मात्र या भागात एमआयडीसीक्षेत्र नियमित सुरु आहे. असे असतांना या ठिकाणाहून मालवाहतूक करणाऱ्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना नगरपालिका विभागाकडून नोटीस देण्यात येत असून याठिकाणी येण्या जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. 

वास्तविक ट्रान्सपोर्ट करणाऱ्या वाहनांचा सिन्नर शहरातील लॉकडाऊन विभागास कुठलाही अडथळा निर्माण झालेला नाही. या भागात एमआयडीसी सुरु असल्याने आपत्कालीन सेवेत असलेले ट्रान्सपोर्ट व्यवसाय सुरु राहणे आवश्यक असतांना ट्रान्सपोर्ट उद्योजकांना नोटीसा देण्यात येत आहे. तसेच वाहतूकदारांकडून बेकायदेशीर आर्थिक लूट करण्यात येत आहे. तरी आपत्कालीन परिस्थितीत कुठलाही अडथळा निर्माण न करता सुरु आलेल्या ट्रान्सपोर्ट व्यवसाय नियमित सुरु ठेवण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे.

याबाबत नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन व नाशिक गुड्स ट्रान्सपोर्ट यांच्या वतीने नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ, सिन्नर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व सिन्नर तहसीलदार यांना दिले आहे.त्यावेळी सुभाष जांगडा, अजय जाधव,दत्ता ढमाले,शरद खालकर,वाशिम सय्यद , उत्तम कातकाडे ,दीपक अहिरे,विनायक तांबे,बळीराम कदम,इकबाल सय्यद आदी सोबत होते.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...