Skip to main content

सोशल डिस्टन्सींग पाळून त्र्यंबकेश्वरला धार्मीक विधी सुरू करण्याचा निर्णय

त्र्यंबकेश्वर|  त्र्यंबकच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी गेल्या ४ महिन्यापासुन बंद असलेले धार्मीक विधी सुरू करण्याचा निर्णय त्र्यंबक-ईगतपुरीचे आ.हिरामण खोसकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. त्यासाठी कलम १४४ तसेच इतर नियम काटेकोर पद्धतीने पाळण्याच्या सूचना आ.खोसकर यांनी लोकप्रतिनिधी, मंदिर प्रशासन, महसूल आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीत केल्या आहे.
Decision-to-start-religious-rituals-in-Trimbakeshwar-by-observing-social-distance
कोवीड १९ प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्यापासून त्र्यंबकेश्वर मंदीरासह धार्मीक विधी कालसर्प शांती, नारायण नागबली आदी विधी बंद असल्यामुळे त्यावर अवलंबून असणारे अनेक व्यवसाय देखील बंद होते. त्यात प्रामुख्याने पुरोहित मंडळींकडे काम करणारे आदिवासी तसेच इतर कामगार, शहरातील कापड व्यापारी,फुल, भांडी, नागाची प्रतिमा विकणारे सोनार, लोजिंग व्यवसाय आणि इतर अनेक व्यावसायिकांवर बेरोजगारीची वेळ आली होती, त्याअनुषंगाने आ. हिरामण खोस्कर यांच्याध्यक्षतेखली एक पुरोहित, महसूल, पोलिस आदींची बैठक आयोजित करण्यात आली होती.
Trabankeswar
त्यात पुरोहित संघाची एक नियंत्रण समिती करुन सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम तंतोतंत पाळून एक नियमावली सादर करण्याच्या सूचना प्रांत अधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार दिपक प. गिरसे, सीईओ संजय जाधव उपविभागीय पोलिस अधिकारी भिमाशंकर ढोले यांनी केल्या होत्या. त्याअनुषंगाने आज कुशावर्ततीर्थ येथे सोशल सोशल डिस्टन्सिंगच्या नियमावली प्रमाणे आ. हिरामण खोसकर यांनी विधी सुरू करण्याच्या सूचना पुरोहित मंडळींसह प्रांत अधिकारी चव्हाण, तहसीलदार गिरासे, सीईओ संजय जाधव यांना करण्यात आल्या आणि कलम १४४ तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना ही पोलिस सहायक निरीक्षक करपे यांना केल्या.

याप्रसंगी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर ,राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष पुरुषो्तम कडलग, शहराध्यक्ष मनोज कन्नव, विजय गांगुर्डे, पुरोहीत संघातर्फे डाॅ दिलीप जोशी,गिरीष जोशी,मोहन लोहगावकर, प्रसन्ना जोशी, राहुल फडके, पंकज धारणे, मंगेश दिघे, गटनेते समीर पाटणकर नगरसेवक सागर उजे आदिंसह काही व्यापारी उपस्थित होते.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...