Skip to main content

भगूर पंचक्रोशीतील युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यास कटिबध्द: प्रेरणा बलकवडे

नाशिक|नाशिक जिल्ह्यातील झेप फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या रोजगार मेळाव्य मार्फत पुणे येथील जगदंबा ऑटो कोम्पोनंटस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत नाशिक जिल्ह्यातील २५ युवकांस रोजगार उपलब्ध झाला आहे. भगूर पंचक्रोशीतील युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यास कटिबध्द असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष आणि झेप भरारी फाउंडेशनच्या सौ.प्रेरणा बलकवडे यांनी केले. 
Committed-to-provide-employment-to-the-youth-of-Bhagur-Panchkrushi-Prerna-Balkwade

झेप भरारी फाउंडेशन समाजातील सर्वच घटकांसाठी काम करत आहे, कोरोना महामारीमुळे आज अनेक युवक बेरोजगारीच्या विळख्यात सापडले आहे.  शिक्षित तरुणांपुढे रोजगाराचा प्रश्न उभा राहिलेला असून अशा कठीण कालावधीत रोजगार मेळावे घेऊन युवकांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्याच्या संकल्पनेला राष्ट्रवादी महिला
 काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष व झेप फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ.प्रेरणा बलकवडे यांनी मुहूर्तरूप दिले, त्यासाठी वर्चुअल रोजगार मेळावा भरवून त्यांनी पहिल्या टप्प्यात युवकांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर आधारित नोकरी अश्याप्रकारे  २५ मुलांसाठी नोकरीची व्यवस्था करून दिली. त्यासोबतच त्याच तरुणांची तिथे राहण्याची व जेवण्याचे व्यवस्थेचे आयोजन देखील पूर्णपणे झेप फाउंडेशनने करून दिले.

शैक्षणिक गुणवत्तेनुसार नोकरी

झेप फाउंडेशन हे समाजसेवेसाठी उभी राहिलेली संस्था असून  अश्याच प्रकारे मेळावे घेऊन युवकांना त्यांच्या शैक्षणिक गुणवत्ते नुसार नोकरीची संधी उपलब्ध करून देणेसाठी आम्ही कटिबद्ध असून, सध्याच्या टप्प्यात भगूर व पंचक्रोशीतील युवकांस रोजगार उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस असून रोजगार मेळाव्याचा पुढचा टप्पा हा येत्या २० सप्टेबर रोजी होणार असून जास्तीत जास्त युवकांनी ह्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सौ. प्रेरणा बलकवडे यांनी केले.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...