Skip to main content

अभिप्राय योजनेद्वारे नाशिक जिल्ह्यातील मांडलेले प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

नाशिक| राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष अभिप्राय योजनेला जिल्ह्यात चांगले यश मिळाले असून अनेक प्रश्न आपल्यापर्यंत आले आहे. त्याची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच पक्ष संघटना वाढविण्यासाठी सक्षमपणे काम करणारे लोक पुढे यायला पाहिजे यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज येथे केले.
Efforts-are-being-made-to-solve-the-problems-raised-in-the-district-through-feedback-scheme-State-President-Jayant-Patil
नाशिक जिल्हा दौऱ्यावर आले असतांना त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय नाशिक येथे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. सरकार स्थापन झाल्यानंतर देशात आणि राज्यात दुर्दैवाने कोरोनाची महामारी पसरली त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला असून त्यातून मार्ग काढत शासन जनतेच्या हिताचे धोरणात्मक निर्णय घेत आहे. याच काळात नाशिक जिल्ह्यात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाचे सूक्ष्म नियोजन करत उपाययोजना करण्यात आल्याने राज्याच्या तुलनेत नाशिकचा मृत्युदर कमी करण्यात यश मिळाले असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंलदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे स्वागत केले.
यावेळी माजी आमदार हेमंत टकले, आमदार सरोज आहेर, माजी आमदार जयवंतराव जाधव, ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, नानासाहेब महाले, विश्वास ठाकूर, जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, दिलीप खैरे, निवृत्ती अरिंगळे, अर्जुन टिळे, अशोक सावंत, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, विद्यार्थी शहराध्यक्ष गौरव गौवर्धने, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ.सयाजीराव गायकवाड, यशवंत शिरसाठ, नगरसेवक गुरुमित बग्गा, जगदीश पवार, हरीश भडांगे, मधुकर मौले, बाळासाहेब पाटील, बाळासाहेब मते, मनोहर कोरडे, संजय खैरनार,महेश भामरे, शंकर मोकळ, जीवन रायते, अनिल परदेशी,  मोतीराम पिंगळे,  यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी जयंत पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील जलसिंचन आढावा बैठक घेण्यात आली. पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी वळण योजनांच्या माध्यमातून वळविण्यात येत आहे. याबाबत आढावा घेतला असून नाशिकच्या जिल्ह्याच्या प्रगतीसाठी आपले प्रयत्न सुरू आहे. ते म्हणाले की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माझे कुटुंब माझी जबाबदारी योजना हाती घेण्यात आली असून योजनेच्या यशस्वीतेसाठी नाशिक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी सजग रहावे असे आवाहन केले.
ते म्हणाले की, बेरोजगारीचे प्रमाण वाढत असतांना नाशिक जिल्ह्यात तरुणांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी योजना राबविली जात आहे. त्यामुळे अनेक तरुणांना फायदा मिळत असल्याने समाधान आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष अभिप्राय योजनेला जिल्ह्यात चांगले यश मिळाले असून अनेक प्रश्न आपल्यापर्यंत आले आहे. त्याची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच पक्ष संघटना वाढविण्यासाठी सक्षमपणे काम करणारे लोक पुढे यायला पाहिजे यासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्याचबरोबर लवकरच पुन्हा जिल्ह्याचा दौरा करून नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बैठक घेऊ असे त्यांनी सांगितले.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...