Skip to main content

नाशिकचा आधारवड हरपला, मान्यवरांकडून भावपूर्ण श्रद्धांजली

नाशिक|प्रतिनिधी|नाशिकचे वैभव बहुआयामी व्यक्तिमत्वाचे धनी वनाधिपती माजी मंत्री विनायकदादा पाटील (८०) यांचे काल अल्पशा आजाराने निधन झाले. एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर नाशिक अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
Nashik-Aadharwad-lost-heartfelt-tributes-from-dignitaries

साहित्य, संस्कृती, सामाजिक, सहकार, उद्योग, वनशेती आदी क्षेत्रांची चांगली जाण असणारे तसेच महाराष्ट्रातील सुसंस्कृत राजकारणी म्हणून ते महाराष्ट्रभर परिचीत होते. नाशिकमधील सामान्य माणूस असो की त्या त्या क्षेत्रातील मोठी व्यक्ती मार्गदर्शनासाठी अशा सर्वांचाच राबता त्यांच्याकडे असे मदतीसाठी त्यांची दारं सदैव उघडी होती. प्रश्न कोणताही असो त्यांचेकडे गेल्यावर तो सुटलाच समजा, वनमंत्री म्हणून किंवा विविध संस्थांमध्ये काम करतांना आपल्या कार्यकुशलता ठसा त्यांनी उमटवला. नाशिकचे एक पितृतुल्य व्यक्तिमत्व होते, नाशिकचा आधारवड आपल्यात नाही यांची कल्पना करवत नाही, त्यांच्या जाण्याने नाशिकचे वैभव हरपल्याची भावना नाशिककरांमध्ये आहे. 

नाशिकचा आधारवड हरपला अशा शब्दात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोकसंवेदना व्यक्त करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. 



ज्येष्ठ मार्गदर्शक, नाशिकचे दादा हरपले: ना. छगन भुजबळ



यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, ज्येष्ठ नेते विनायकदादा पाटील यांना महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व कवीवर्य कुसुमाग्रज यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद लाभला. तसेच शरदचंद्र पवार साहेब यांच्यासोबत त्यांनी राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम केलं.पवार साहेबांचे ते जीवाचे मित्र होते.नाशिकमध्ये सर्व पक्षांचे नेते त्यांचे मार्गदर्शन घेत असत.वनशेती हा त्यांचा अत्यंत आवडीचा आणि अभ्यासाचा विषय होता. त्यामुळे भारतातील सहकारी वनशेतीचे ते जनक ठरले. वनस्पतीच्या तेलापासून डिझेल या इंधनाची निर्मिती होऊ शकते त्या जेट्रोफा या वनस्पतीची मोठ्या प्रमाणावर तंत्रशुद्ध शेती त्यांनी १९८६ मध्ये केली होती. या वनस्पतीपासून प्रायोगिक तत्वावर डिझेल निर्मिती करून त्यांनी तेव्हा जगाचे लक्ष वेधून घेतले होते. विनायकदादा पाटील यांना वनशेतीतील योगदानासाठी महाराष्ट्र शासनाचा कृषीभूषण आणि वनश्री तर भारत सरकारचा इंदिरा प्रियदर्शनी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. फुड अँड अॅग्रीकल्चरल ऑर्गनायझेशन ऑफ युनायटेड नेशन्सचा आऊटस्टँडिंग ट्री फार्मर ऑफ इंडिया तसेच जीनिव्हा येथील रोलेक्स अवॉर्डही त्यांनी पटकावला होता. हे पुरस्कार मिळवणारे ते पहिले व एकमेव भारतीय होते.यासह विविध पुरस्काराचे ते मानकरी ठरले होते.


ते म्हणाले की, विनायकदादा पाटील यांचा प्रवास थक्क करणारा होता. निफाड तालुक्यात कुंदेवाडीचे सरपंच म्हणून त्यांनी राजकारणात श्रीगणेशा केला. त्यानंतर निफाड तालुका पंचायत समिती सभापती, निफाडचे आमदार, विधान परिषद सदस्य अशी भरारी घेत त्यांनी राज्य मंत्रिमंडळात उद्योग, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व युवकसेवा अशा विविध खात्यांच्या मंत्रिपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. सहकार क्षेत्रातही त्यांचा दबदबा राहिला. सहकारी सोसायटीचे चेअरमन, नाशिक जिल्हा सहकारी भूविकास बँकेचे अध्यक्ष, निफाड सहकारी साखर कारखान्याचे संचालक, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. राज्यमंत्रिपदाच्या दर्जासह त्यांनी महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले.


त्यांच्या निधनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणाऱ्या आणि आदराचे स्थान असलेल्या दादांना आपण कायमचे मुकलो आहोत. विनायकदादांच्या निधनाने पाटील कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मी व माझे कुटुंबीय त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून राज्यशासनाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो असो छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

देवद्यादेवपणघ्या उपक्रमाला अखेरची उपस्थिती :आकाश पगार


दरवर्षी प्रमाणे नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवातील अंनत चतुर्दशीला देखील देवद्यादेवपणघ्या उपक्रम राबविला होता. कोरोनाच्या संकटामुळे स्वयंसेवकांच्या सुरक्षिततेसाठी फेस शिल्ड, फेस मास्क दिले होते. या फेस शिल्डचे प्रकाशन विनायक दादांच्या हस्ते छोटेखानी कार्यक्रमात केले होते. दादांच्या उपस्थितीत संपन्न झालेला हा शेवटचाच कार्यक्रम असावा.तरुणाईला देखील लाजवेल असा उत्साह असलेल्या दादांना भावपुर्ण श्रद्धांजली 
आकाश पगार, सामाजिक कार्यकर्ते तथा युवा नेते एनसीपी, नाशिक.

राजकारणातला सभ्य गृहस्थ आणि नाशिकचे वैभव: हेमंत देसाई


जेव्हा समाजात पर्यावरणाची जाणीव जागृती नव्हती, अशा काळात पर्यावरणावर, झाडांवर मनापासून प्रेम करणारा माणूस ही विनायकदादा पाटील यांची खरी ओळख. अत्यंत सुसंस्कृत, साहित्य व कलाप्रेमी, रसिक माणूस. यशवंतरावांचे संस्कार लाभलेला राजकारणातला सभ्य गृहस्थ आणि नाशिकचे वैभव. त्यांचे अचानक निघून जाणे चटका लावून जाणारे आहे. 
हेमंत देसाई, ज्येष्ठ पत्रकार, लेखक



Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...