Skip to main content

पीएम किसान योजनेतील लाभार्थ्यांना पाठवलेल्या नोटीसा परत घ्या; अन्यथा आंदोलन छेडू: पुरुषोत्तम कडलग

नाशिक |प्रतिनिधी| नाशिक जिल्ह्यातील ११००० शेतकऱ्यांना पीएम  किसान योजनेतून प्राप्त झालेला लाभ वसुली व अपात्रतेच्या नोटीस देण्यात आल्या आहे. शेतकऱ्यांना कुठला ही लाभ देतांना अनेक कागद पत्रांची मागणी होऊन त्यात त्यांच्या पात्रतेची शहानिशा केली जाते. त्यांनतर त्या योजनांचा लाभ दिला जातो. लाभ द्यायचा आणि परत घ्यायचा असा प्रकार निंदनीय आहे. शेतकऱ्यांना पाठवलेल्या वसुलीच्या नोटिसा मागे घ्यावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी दिला. 
Withdraw-notices-sent-to-PM-Kisan-Yojana-beneficiaries-Otherwise-start-the-movement-Purushottam-Kadlag

पीएम  किसान योजने अंतर्गत प्राप्त होणारा वार्षिक तीन हप्त्यात मिळणारा ६०००/- रूपयांचा लाभ या योजनेचा खुप गाजावाजा करण्यात आला होता. त्यात शेतकरी ७/१२ च्या आधारे लाभार्थी झाले होते.  अशा लाभार्थ्यांना अपात्र ठरवत तहसीलदारांमार्फत नोटिसा देण्यात आल्या आहेत. एकीकडे पावसाने शेती पिकाचे मोठे नुकसान झाले. शेतकरी त्यासंकटातून सावरण्याचा प्रयत्न करत असतांना अशा प्रकारच्या नोटीसा पाठवून शेतकऱ्यांची केंद्र सरकार थट्टा करत आहे असा आरोप कडलग यांनी केला. परस्पर खात्यावर पैसेही जमा होण्यास गेल्या दोन वर्षापासुन सुरूवात झाली होती. त्यात अनेक शेतकरी जे अल्पभूधारक आहेत त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यास सुरूवात केली होती. परंतु कालपासून शेतकऱ्यांना पी एम योजनेतील लाभार्थ्यांना अपात्र ठरवले आहे. केंद्र सरकार अनेक फसव्या घोषणा करून जनेतेची थट्टा करत असल्याचाच हा प्रकार आहे असे ते म्हणाले.

प्रत्येक तहसील कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशारा: पुरुषोत्तम कडलग


जिल्ह्यातील ११००० शेतकर्याना पाठविलेल्या ह्या नोटींसा परत घेण्यात याव्यात अन्यथा जिल्ह्यातील प्रत्येक तहसिलदार कार्यालयावर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नाशिक जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस त्या वतीने जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना देण्यात आल्याची माहीती जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कडलग यांनी दिली.

पुरुषोत्तम कडलग, जिल्हाधक्ष,राष्ट्रवादी युवक काँग्रेस, नाशिक

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...