Skip to main content

धर्मकाटा एक सेवाधर्म! धर्मकाटा आज ८५ वा वर्धापनदिन

नाशिक| नासिक सराफ बाजारातील धर्मकाटा २३ डिसेंबर रोजी ८५ वर्ष पूर्ण होऊन ८६ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. ग्राहकांसाठी असलेला हा एकमेव असा धर्मकाटा  आहे.  की  सराफ असोसिएशनतर्फे चालविला जातो. साधारणता १८९२ साली परचुरे यांचा धर्मकाटा या ठिकाणी होता. कालांतराने हा नासिक सराफ असोसिएशन घेऊन २३ डिसेंबर १९३५ रोजी धर्मकाटा या नावाने सुरू केला. तेव्हापासून धर्मकाटा ही संकल्पना सराफ असोसिएशनतर्फे एक सेवाधर्म म्हणून राबविली जात आहे.
Dharmakata-is-a-service-religion-Dharmakata-today-is-the-85th-anniversary

व्यवसाय आणि सेवा यातील हा एक अनोखा मिलाप धर्मकाटा साधतो आहे. धर्मकाटा हा सराफ बाजारातील व्यवहारावर विश्वार्यता निर्माण करतान दिसतो. त्यामुळेच धर्मकाट्याला सेवाधर्म म्हटले गेले आहे. मौर्य काळातील चाणक्याने कौटिल्याचे अर्थशास्त्र या ग्रंथात सर्वप्रथम धर्मकाट्याचा उल्लेख आढळतो.

चाणक्याने वर्णल्याप्रमाणे, विक्रेता आणि खरेदीदार यांच्यात एक त्रयस्थ व्यक्तीकडून अथवा संस्थेकडून व्यवहाराची अथवा त्या मालाची पडताळणी करावी. या चाणक्य सूत्रासाठीच प्राचीन काळातही धर्मकाटा ही संकल्पना राबविली जात असावी,असे दिसते. त्यामुळे विक्रता आणि खरेदीदार यांच्यातील सोन्याचांदीचे व्यवहार अधिक विश्वासाने होत राहण्यासाठी सराफ बाजारातील धर्मकाटा हा महत्त्वाचा दुवा ठरतो आहे. यामुळे आतापर्यंत सराफ बाजारातील विश्वार्सता टिकून आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. त्यामुळे पारदर्शक व्यवहाराची खात्री देणारा धर्मकाटा नाशिक सराफ बाजाराची शान ठरतो आहे.
Dharmakata-is-a-service-religion-Dharmakata-today-is-the-85th-anniversary


८५ वर्षाची सेवा आजही सुरूच..

८५ वर्षांपासून आजही आपला धर्मकाटा ग्राहकांच्या सेवेसाठी रोज सकाळी १० ते रात्री ८.३० पर्यंत अविरत सुरू आहे. या सेवेचा लाभ सराफ बाजारात खरेदीसाठी येणार्या ग्राहकांनी व विक्रेत्यांनी घ्यायला हवा असे आवाहन करण्यात आले आहे.
Dharmakata-is-a-service-religion-Dharmakata-today-is-the-85th-anniversary
                      चेतन राजापूरकर 
   अध्यक्ष-नासिक सराफ असोसिएशन

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...